शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
3
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
4
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
5
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
6
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
7
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
8
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
9
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
10
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
11
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
12
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
13
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
14
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
15
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
16
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
17
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
18
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
19
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
20
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट

वीटभट्ट्यांवर मजुरांच्या नशिबी अशुद्ध पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 05:17 IST

ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण, आदिवासी क्षेत्रात वीटभट्टीवर काम करण्यासाठी जिल्ह्यातील तसेच बाजूच्या पालघरसह इतर जिल्ह्यांतील बहुतेक आदिवासी कुटुंबे स्थलांतरित होऊन ...

ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण, आदिवासी क्षेत्रात वीटभट्टीवर काम करण्यासाठी जिल्ह्यातील तसेच बाजूच्या पालघरसह इतर जिल्ह्यांतील बहुतेक आदिवासी कुटुंबे स्थलांतरित होऊन मजुरीसाठी येत असतात. या कुटुंबांतील गरोदर महिला, स्तनदा माता, किशोरवयीन मुली व ० ते ५ वर्षे वयोगटातील बालकांचा मोठ्या प्रमाणात समावेश असतो. या घटकाला अंगणवाडी सेवांतर्गत पूरक पोषण आहार, लसीकरण, वाढीची देखरेख या सेवा प्राधान्याने दिल्या जातात. त्याचबरोबर या लाभार्थ्यांची आरोग्य तपासणीसुद्धा केली जाते. त्यात कोविड – १९ च्या पार्श्वभूमीवर आरोग्य तपासणी अत्यंत महत्त्वपूर्ण असल्याने जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष सुषमा लोणे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भाऊसाहेब दांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली गटस्तरावर बाल विकास प्रकल्प अधिकारी व तालुका आरोग्य अधिकारी यांच्या समन्वयाने विशेष मोहीम राबवण्यात आली. यावेळी वीटभट्टीनिहाय मजुरांसाठी आरोग्य तपासणी मोहिमेबरोबरच तिथे काम करणारे मजूर वापरत असलेल्या पाण्याचीदेखील तपासणी करण्यात आली. यावेळी पाच तालुक्यांतील एक हजार ३५३ ठिकाणचे पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. या तपासणी मोहिमेचा अहवाल प्राप्त झाला असून पाच तालुक्यांमध्ये ४६२ ठिकाणी पाणी शुद्धीकरण केले नसल्याची बाब उघडकीस आली. विशेष म्हणजे या पाण्याचा येथे काम करणारे मजूर पिण्यासाठीदेखील वापर करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे या मजुरांमध्ये अशुद्ध पाण्यामुळे जलजन्य आजार होण्याचा धोका लक्षात घेता ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी पाणी शुद्धीकरणाचा विषय प्राधान्याने घेण्याच्या सूचना केल्या.

.......................