शहरं
Join us  
Trending Stories
1
‘स्वर्गाचा दरवाजा उघडलाय!, त्यांना मरण येऊ दे’ नाताळादिवशी झेलेन्स्कींनी केली पुतीन यांच्या मृत्यूची कामना  
2
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात 'तारा'चा भीमपराक्रम! मगरींच्या विळख्यात दीड किमी पोहून वारणा धरण केले पार
3
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
4
KTM Duke: केटीएम ड्यूक १६० आता आणखी पॉवरफुल! ग्राहकांना मिळणार नवीन अपडेट्स
5
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
6
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
7
ग्लॅमर अन् परंपरेचा 'गुलाबी संगम'... BIGG BOSS गाजवणाऱ्या मालती चहरचा 'सुपरहॉट' लूक (PHOTOS)
8
बॉक्सर नीरजनं विचारलं, कसे आहात? पंतप्रथान मोदींनी उत्तर दिलं, तुझ्यासारखाच...!; VIDEO व्हायरल
9
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
10
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
11
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
12
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
13
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
14
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
15
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
16
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
17
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
18
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
19
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
20
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
Daily Top 2Weekly Top 5

धरणाच्या माथ्यावरील गावात पाण्यासाठी जीवघेणा प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2019 00:24 IST

वेटागाव आजपर्यंत दुर्लक्षित : रस्ता नसल्याने करावी लागते टँकरची प्रतीक्षा

जनार्दन भेरे।लोकमत न्यूज नेटवर्कभातसानगर : शहापूर तालुक्यातील वेटापाड्याच्या चारही बाजूंनी उंच डोंगर, दऱ्या असल्यामुळे शहापूर, कसारा, डोळखांब, वासिंद यापैकी कोणत्याच बाजारपेठांशी या पाड्यांचा सहसा संबंध येत नाही. या गावासाठी ना रस्ता ना काही सुविधा. गावासाठी वनविभागाची विहीर बांधली असली, तरी तिला प्यायला घोटभर पाणी नसल्याने पाड्यातील महिलांना थेट दीड किमी खोल दरीत उतरून भातसा धरणातील पाणी आणावे लागत आहे.

शहापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर पाण्याची तीव्र टंचाई असून या पाण्यासाठी नागरिकांना वणवण भटकावे लागते आहे. वेटापाडा येथे टँकर सुरू आहे, पण तेथे टँकर येण्याची वाट पाहावी लागते आहे.

शहापूर तालुक्यातील भातसा धरणाच्या आतील विस्थापित झालेले गाव म्हणजेच वेटागाव. भातसा धरणाच्या बांधणीस सुरुवात झाली आणि त्यावेळी धरण क्षेत्रातील घोडेपाऊल, पाचीवरा, पाल्हेरी ही तीन गावे विस्थापित झाली. या गावांतील काही कुटुंबे आपापल्या नातेवाइकांच्या आसºयाला गेली, तर काहींनी आपल्याला जेथे रानावनात जागा मिळेल, तेथे आपले बस्तान ठेवले.

यातीलच एक गाव म्हणजे आजचा वेटा हा पाडा.भातसा धरणातून विस्थापित झालेल्या घरांपैकीच चारपाच घरे धरणाच्या डोंगरमाथ्यावर येऊन आपले बस्तान धरणाच्या उंच अशा टेकडीवर वस्ती केली आहे. आज या पाड्यात तब्बल १९ घरे झाली असून त्यावेळच्या १० ते १२ लोकसंख्येची ९० लोकसंख्या झाली आहे. आज गाव जरी कोठेरा ग्रामपंचायतीच्या अखत्यारीत असला, तरी या पाड्याला सुविधा देणेच कठीण असल्याचे स्वत: गावकरी तुळशी गोमा कैवारी, वसंत पांडुरंग भगत, शंकर राम कैवारी, अनंता वाळकू भगत सांगत आहेत. कोठेरा गावापासून तीनसाडेतीन किमी अंतरावर दºयाखोऱ्यांतून पायवाट करून डोंगराच्या टोकावर हे गाव वसले आहे. या गावात कोणतेही वाहन जाऊ शकत नसल्याने येथे सुविधा मिळणेच अशक्य होऊन बसले आहे.

येथील लोक विटा पाडून आपली घरे बांधत आहेत. येथे चारचाकी वाहनच येत नसल्याने गावाची मोठी पंचाईत झाली आहे. पाणी आणल्यानंतर मगच दिवसभराचे कामकाज, असा या गावकºयांचा नित्याचा कार्यक्रम आहे. जोपर्यंत घरात पाणी नाही, तोपर्यंत कोणत्याच कामाला सुरुवात होतच नाही. केवळ पाण्यासाठी महिला आणि पुरुष यांचा बराच वेळ जात असल्याचे नागरिक सांगत आहेत. 

आता या गावाचे भविष्य बदलणार आहे, ते मुमरी धरणामुळे. या धरणामुळे आता थेट सारंगपुरीमधून मुरबीचापाडा आणि थेट वेटा या रस्त्याने पाणी येथे पोहोचणार आहे. या गावात रस्ताच नाही, त्यामुळे चारचाकी वाहन येथे जात नसतानाही त्यांच्यासाठी विहीर बांधण्यात आली आहे. मात्र, त्यात पाणी नसल्याने त्यांना धरणातील पाण्यावर अवलंबून राहावे लागते आहे. आम्हाला जितक्या सुविधा देणे शक्य होते, तितक्या सुविधा देण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत.- भाऊ दरोडा, सदस्य, ग्रामपंचायत कोठाराया पाड्याला पाणी पुरवठा करणे शक्य नाही. मात्र, पाणी पुरवठा योजनेच्या माध्यमातून ठराव आल्यास त्यावर विचार करता येऊ शकेल.- एम. बी. आव्हाड, उपअभियंता, पाणीपुरवठा विभाग