शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: राज्यात भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी आघाडीवर, महाविकाआघाडीची काय परिस्थिती?
2
Dharangoan Nagar Parishad Election Result 2025 : शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांना होमपीचवर मोठा धक्का; मविआ उमेदवाराचा मोठा विजय
3
Jawhar Nagar Parishad Result 2025: जव्हार नगरपरिषदेवर भाजपचा भगवा, १४ जागांवर उधळला गुलाल, पूजा उदावंत नगरध्यक्ष; शिंदे सेनेला फक्त एवढ्या जागा
4
बँका तुम्हाला क्रेडिट कार्ड घेण्यासाठी का आग्रह धरतात? कुठून होते त्यांची खरी कमाई?
5
Newasa Nagar Panchayat Elections Results 2025 : नेवासामध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा नगराध्यक्ष, तर शंकरराव गडाखांचा दबदबा कायम
6
Vengurla Nagar Parishad Election Result 2025: दीपक केसरकरांना धक्का, वेंगुर्ल्यात भाजपाचा ७ जागांवर विजय; शिंदेसेनेला मिळाली १ जागा
7
'देश सोडू नका, अन्यथा परतणे कठीण'; अमेरिकेत नोकरी करणाऱ्या भारतीयांना गुगलचा इशारा!
8
इराणवर मोठ्या हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल? नेतन्याहू घेणार डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; इराणी अधिकारी म्हणतात...
9
अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी
10
Video - फिरायला निघाले, ट्रेनमध्ये भांडले अन् साता जन्माची साथ २ महिन्यांत सुटली, कपलसोबत काय घडलं?
11
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
12
Maharashtra Local Body Election Results 2025: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
13
BSF काँस्टेबल भरतीत माजी अग्निवीरांना 50% आरक्षण; वयोमर्यादेतही मोठी सवलत, केंद्राचा निर्णय
14
घर खरेदीचे स्वप्न होणार साकार! 'ही' बँक देतेय स्वस्त होम लोन; ५० लाखांच्या कर्जासाठी किती हवी सॅलरी?
15
नात्याला काळीमा! विम्याच्या पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
16
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
17
Nora Fatehi : "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती?
18
घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली...
19
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
20
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
Daily Top 2Weekly Top 5

धरणाच्या माथ्यावरील गावात पाण्यासाठी जीवघेणा प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2019 00:24 IST

वेटागाव आजपर्यंत दुर्लक्षित : रस्ता नसल्याने करावी लागते टँकरची प्रतीक्षा

जनार्दन भेरे।लोकमत न्यूज नेटवर्कभातसानगर : शहापूर तालुक्यातील वेटापाड्याच्या चारही बाजूंनी उंच डोंगर, दऱ्या असल्यामुळे शहापूर, कसारा, डोळखांब, वासिंद यापैकी कोणत्याच बाजारपेठांशी या पाड्यांचा सहसा संबंध येत नाही. या गावासाठी ना रस्ता ना काही सुविधा. गावासाठी वनविभागाची विहीर बांधली असली, तरी तिला प्यायला घोटभर पाणी नसल्याने पाड्यातील महिलांना थेट दीड किमी खोल दरीत उतरून भातसा धरणातील पाणी आणावे लागत आहे.

शहापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर पाण्याची तीव्र टंचाई असून या पाण्यासाठी नागरिकांना वणवण भटकावे लागते आहे. वेटापाडा येथे टँकर सुरू आहे, पण तेथे टँकर येण्याची वाट पाहावी लागते आहे.

शहापूर तालुक्यातील भातसा धरणाच्या आतील विस्थापित झालेले गाव म्हणजेच वेटागाव. भातसा धरणाच्या बांधणीस सुरुवात झाली आणि त्यावेळी धरण क्षेत्रातील घोडेपाऊल, पाचीवरा, पाल्हेरी ही तीन गावे विस्थापित झाली. या गावांतील काही कुटुंबे आपापल्या नातेवाइकांच्या आसºयाला गेली, तर काहींनी आपल्याला जेथे रानावनात जागा मिळेल, तेथे आपले बस्तान ठेवले.

यातीलच एक गाव म्हणजे आजचा वेटा हा पाडा.भातसा धरणातून विस्थापित झालेल्या घरांपैकीच चारपाच घरे धरणाच्या डोंगरमाथ्यावर येऊन आपले बस्तान धरणाच्या उंच अशा टेकडीवर वस्ती केली आहे. आज या पाड्यात तब्बल १९ घरे झाली असून त्यावेळच्या १० ते १२ लोकसंख्येची ९० लोकसंख्या झाली आहे. आज गाव जरी कोठेरा ग्रामपंचायतीच्या अखत्यारीत असला, तरी या पाड्याला सुविधा देणेच कठीण असल्याचे स्वत: गावकरी तुळशी गोमा कैवारी, वसंत पांडुरंग भगत, शंकर राम कैवारी, अनंता वाळकू भगत सांगत आहेत. कोठेरा गावापासून तीनसाडेतीन किमी अंतरावर दºयाखोऱ्यांतून पायवाट करून डोंगराच्या टोकावर हे गाव वसले आहे. या गावात कोणतेही वाहन जाऊ शकत नसल्याने येथे सुविधा मिळणेच अशक्य होऊन बसले आहे.

येथील लोक विटा पाडून आपली घरे बांधत आहेत. येथे चारचाकी वाहनच येत नसल्याने गावाची मोठी पंचाईत झाली आहे. पाणी आणल्यानंतर मगच दिवसभराचे कामकाज, असा या गावकºयांचा नित्याचा कार्यक्रम आहे. जोपर्यंत घरात पाणी नाही, तोपर्यंत कोणत्याच कामाला सुरुवात होतच नाही. केवळ पाण्यासाठी महिला आणि पुरुष यांचा बराच वेळ जात असल्याचे नागरिक सांगत आहेत. 

आता या गावाचे भविष्य बदलणार आहे, ते मुमरी धरणामुळे. या धरणामुळे आता थेट सारंगपुरीमधून मुरबीचापाडा आणि थेट वेटा या रस्त्याने पाणी येथे पोहोचणार आहे. या गावात रस्ताच नाही, त्यामुळे चारचाकी वाहन येथे जात नसतानाही त्यांच्यासाठी विहीर बांधण्यात आली आहे. मात्र, त्यात पाणी नसल्याने त्यांना धरणातील पाण्यावर अवलंबून राहावे लागते आहे. आम्हाला जितक्या सुविधा देणे शक्य होते, तितक्या सुविधा देण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत.- भाऊ दरोडा, सदस्य, ग्रामपंचायत कोठाराया पाड्याला पाणी पुरवठा करणे शक्य नाही. मात्र, पाणी पुरवठा योजनेच्या माध्यमातून ठराव आल्यास त्यावर विचार करता येऊ शकेल.- एम. बी. आव्हाड, उपअभियंता, पाणीपुरवठा विभाग