शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

धरणाच्या माथ्यावरील गावात पाण्यासाठी जीवघेणा प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2019 00:24 IST

वेटागाव आजपर्यंत दुर्लक्षित : रस्ता नसल्याने करावी लागते टँकरची प्रतीक्षा

जनार्दन भेरे।लोकमत न्यूज नेटवर्कभातसानगर : शहापूर तालुक्यातील वेटापाड्याच्या चारही बाजूंनी उंच डोंगर, दऱ्या असल्यामुळे शहापूर, कसारा, डोळखांब, वासिंद यापैकी कोणत्याच बाजारपेठांशी या पाड्यांचा सहसा संबंध येत नाही. या गावासाठी ना रस्ता ना काही सुविधा. गावासाठी वनविभागाची विहीर बांधली असली, तरी तिला प्यायला घोटभर पाणी नसल्याने पाड्यातील महिलांना थेट दीड किमी खोल दरीत उतरून भातसा धरणातील पाणी आणावे लागत आहे.

शहापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर पाण्याची तीव्र टंचाई असून या पाण्यासाठी नागरिकांना वणवण भटकावे लागते आहे. वेटापाडा येथे टँकर सुरू आहे, पण तेथे टँकर येण्याची वाट पाहावी लागते आहे.

शहापूर तालुक्यातील भातसा धरणाच्या आतील विस्थापित झालेले गाव म्हणजेच वेटागाव. भातसा धरणाच्या बांधणीस सुरुवात झाली आणि त्यावेळी धरण क्षेत्रातील घोडेपाऊल, पाचीवरा, पाल्हेरी ही तीन गावे विस्थापित झाली. या गावांतील काही कुटुंबे आपापल्या नातेवाइकांच्या आसºयाला गेली, तर काहींनी आपल्याला जेथे रानावनात जागा मिळेल, तेथे आपले बस्तान ठेवले.

यातीलच एक गाव म्हणजे आजचा वेटा हा पाडा.भातसा धरणातून विस्थापित झालेल्या घरांपैकीच चारपाच घरे धरणाच्या डोंगरमाथ्यावर येऊन आपले बस्तान धरणाच्या उंच अशा टेकडीवर वस्ती केली आहे. आज या पाड्यात तब्बल १९ घरे झाली असून त्यावेळच्या १० ते १२ लोकसंख्येची ९० लोकसंख्या झाली आहे. आज गाव जरी कोठेरा ग्रामपंचायतीच्या अखत्यारीत असला, तरी या पाड्याला सुविधा देणेच कठीण असल्याचे स्वत: गावकरी तुळशी गोमा कैवारी, वसंत पांडुरंग भगत, शंकर राम कैवारी, अनंता वाळकू भगत सांगत आहेत. कोठेरा गावापासून तीनसाडेतीन किमी अंतरावर दºयाखोऱ्यांतून पायवाट करून डोंगराच्या टोकावर हे गाव वसले आहे. या गावात कोणतेही वाहन जाऊ शकत नसल्याने येथे सुविधा मिळणेच अशक्य होऊन बसले आहे.

येथील लोक विटा पाडून आपली घरे बांधत आहेत. येथे चारचाकी वाहनच येत नसल्याने गावाची मोठी पंचाईत झाली आहे. पाणी आणल्यानंतर मगच दिवसभराचे कामकाज, असा या गावकºयांचा नित्याचा कार्यक्रम आहे. जोपर्यंत घरात पाणी नाही, तोपर्यंत कोणत्याच कामाला सुरुवात होतच नाही. केवळ पाण्यासाठी महिला आणि पुरुष यांचा बराच वेळ जात असल्याचे नागरिक सांगत आहेत. 

आता या गावाचे भविष्य बदलणार आहे, ते मुमरी धरणामुळे. या धरणामुळे आता थेट सारंगपुरीमधून मुरबीचापाडा आणि थेट वेटा या रस्त्याने पाणी येथे पोहोचणार आहे. या गावात रस्ताच नाही, त्यामुळे चारचाकी वाहन येथे जात नसतानाही त्यांच्यासाठी विहीर बांधण्यात आली आहे. मात्र, त्यात पाणी नसल्याने त्यांना धरणातील पाण्यावर अवलंबून राहावे लागते आहे. आम्हाला जितक्या सुविधा देणे शक्य होते, तितक्या सुविधा देण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत.- भाऊ दरोडा, सदस्य, ग्रामपंचायत कोठाराया पाड्याला पाणी पुरवठा करणे शक्य नाही. मात्र, पाणी पुरवठा योजनेच्या माध्यमातून ठराव आल्यास त्यावर विचार करता येऊ शकेल.- एम. बी. आव्हाड, उपअभियंता, पाणीपुरवठा विभाग