शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
2
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
3
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
4
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
5
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
6
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
7
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
8
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
9
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
10
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
11
"संघाने आता नथुराम आणि मनुस्मृतीला तिलांजली देऊन गांधी विचार आणि संविधान स्वीकारावे’’, काँग्रेसने दिला सल्ला  
12
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
13
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
14
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
15
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
16
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
17
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
18
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
19
गर्दीवर दगडफेक, पोलिसांकडून लाठीमार, करूरमधील चेंगराचेंगरीबाबत विजयच्या पक्षाला वेगळाच संशय, केली अशी मागणी 
20
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश

आधार क्र मांक नसलेल्या शेतकऱ्यांनी तातडीने आधारनोंदणी करावी - जिल्हाधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2020 18:50 IST

ठाणे : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांना मिळावा, यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्नशील आहे. ...

ठळक मुद्देज्या पात्र शेतकऱ्यांकडे आधार क्र मांक नाही, त्यांनी तातडीने आधारनोंदणी करावी शेतकऱ्यांनी आपल्या बँक शाखेशी आधार लिंक करणे आवश्यकया योजनेंमध्ये अल्पमुदत पीक कर्ज व पुनर्गठीत कर्ज यांचा समावेश

ठाणे : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांना मिळावा, यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्नशील आहे. आधार क्र मांक हा लाभार्थी निश्चित करण्याचा मुख्य निकष आहे. यामुळे अद्याप ज्या पात्र शेतकऱ्यांकडे आधार क्र मांक नाही, त्यांनी तातडीने आधारनोंदणी करावी असे आवाहन जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी शेतकऱ्यांना केले आहे.     शेतकऱ्यांनी आपल्या बँक शाखेशी आधार लिंक करणे आवश्यक आहे. ज्या शेतकऱ्यांनी बँक खात्यास आधारलिंक केलेले नाही अथवा ज्यांच्या कडे आधार क्र मांक नाही , अशा शेतकऱ्यांनी आपले बँक खाते तात्काळ आधार लिंक करणे गरजेचे आहे. मात्र ज्यांच्याकडे आधारक्र मांक नाही, त्यांनी आधार नोंदणी प्रक्रि या पूर्ण केल्यानंतरच संबंधीत शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. या योजनेंमध्ये अल्पमुदत पीक कर्ज व पुनर्गठीत कर्ज यांचा समावेश आहे. १ एप्रिल २०१५ ते ३१ मार्च २०१९ या कालावधीत वितरीत केलेले कर्ज, ३० सप्टेंबर २०१९ अखेर थकीत व परतफेड न केलेले कर्ज यांचा दोन लाख रूपये मर्यादेत समावेश आहे. कर्जमुक्ती योजनेमध्ये ज्या खात्याची अथवा अल्पमुदत पीक कर्जाचे पुनर्गठन/फेर पुनर्गठन केलेल्या कर्ज खात्याची मुद्दल व व्याजासह थकबाकीची रक्कम दोन लाखापेक्षा जास्त असेल, अशी कर्जखाती कर्जमुक्तीच्या लाभास पात्र ठरणार नाहीत. या साठीची अधिक माहितीसाठी असलेला शासन निर्णय संकेत स्थळावर शेतकऱ्यांसाठी उपलब्ध आहे.

टॅग्स :thaneठाणेcollectorजिल्हाधिकारी