शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

शेतकऱ्यांना भाताने मारले, पण कंदमुळांनी तारले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2020 00:14 IST

केवळ भातशेती नव्हे तर कंदमुळांची शेती हा एक पर्याय समोर आला आहे.

- जनार्दन भेरेभातसानगर : परतीच्या पावसाने शेतकऱ्यांची पिके हातची गेल्याने रडकुंडीस आलेली अवस्था झालेली असताना मात्र शहापूर तालुक्यातील नडगाव येथील साखरपाड्यातील शेतकऱ्यांनी लावलेल्या कंदमुळे यांचे अधिक उत्पादन झाल्याने भाताने मारले, पण कंदमुळाने तारले, असे म्हणण्याची वेळ आली आहे.

केवळ भातशेती नव्हे तर कंदमुळांची शेती हा एक पर्याय समोर आला आहे. अधिक पाऊस पडल्यास मोठ्या प्रमाणात कंदमुळे आणि पाऊस प्रमाणात पडल्यास दोन्ही पिके जोमदार. रताळ्यांंसाठी केवळ त्याला आलेल्या वेली पाणवठ्याच्या जागी ठेवून दुसऱ्या वर्षी ओढलेल्या मातीच्या ओट्यात त्या लावल्या की, पुन्हा उत्पादन सुरू होते. आज बाजारात त्यांना ६० रुपये किलो दर मिळत आहे. चावी ७० ते ८० रुपये किलो, अळू कंद ४० ते ५० रुपये तर करवंदे ६० ते ७० रुपयांना विकली जात असल्याने हे उत्पादन घेणाऱ्यांना मात्र सुगीचे दिवस आले आहेत.

तालुक्यातील नडगाव ग्रामपंचायत क्षेत्रातील साखरपाडा या आदिवासीपाड्यात ९८ कुटुंबे राहत असून ही सर्व कुटुंबे गेल्या १० वर्षे रताळी, चावी, करवंदे यांचे उत्पादन घेत आहेत. या आधी परंपरागत पद्धतीने केवळ सणावाराला उपवासासाठी लागतात म्हणून तितक्याच प्रमाणात त्यांचे उत्पादन केले जात होते. मात्र, गेल्या १० वर्षांंपासून प्रत्येक शेतकरी व्यापारी तत्त्वावर आधारित रताळी, चावी, करवंदे यांची शेती करून कमाई करीत आहे. पाड्यातील पंढरीनाथ रेरा म्हणाले की, मला या वर्षी कमीतकमी लाख ते सव्वा लाख रुपयांची रताळी, ७० ते ८० हजारांची चावी, ५० हजारांंची करवंदे असे उत्पन्न मिळेल.

टॅग्स :thaneठाणे