शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
2
इकडे सुप्रिम कोर्टात सुनावणी, तिकडे दोन्ही शिवसेना एकत्र लढणार? गोंडस नाव दिले, म्हणे उद्धव ठाकरेंची परवानगी...
3
दिल्ली ब्लास्टचं इंटरनॅशनल कनेक्शन? पाकिस्तानच नव्हे, 'या' मुस्लीम देशाचं नावही येतंय समोर; पासपोर्टवरून धक्कादायक खुलासा!
4
'त्या' पोस्टरनं उलगडलं जैशचं टेरर मॉड्युल; समोर आला फोटो, एक महिना आधीच पाकिस्तानातून..
5
Bihar Election Exit Poll: मैथिली ठाकूर हरणार की जिंकणार, एक्झिट पोलचा अंदाज काय?
6
बापरे... ६ बायका...! सर्व जणी एकाच वेळी प्रेग्नन्ट; इंटरनेटवर व्हायरल होतोय हा युवक; बघा VIDEO
7
Motorola: ६.६७ इंचाचा डिस्प्ले, ५००० एमएएचची बॅटरी; 'हा' वॉटरप्रूफ फोन झाला आणखी स्वस्त!
8
शिवसेना कुणाची? आता सुप्रीम कोर्टात पुढच्याच वर्षी अंतिम सुनावणी होणार; आजची तारीख पुढे ढकलली
9
₹१ च्या शेअरची कमाल, १ लाखांच्या गुंतवणूकीचे झाले ₹१ कोटी; ₹१४५ वर आला भाव, तुमच्याकडे आहे का?
10
लग्नात बूट चोरल्यानं भडकला नवरा, वरमाला फेकली; नाराज नवरीनेही लग्न मोडले, अनवाणीच परत पाठवला
11
वनप्लस 15 ची किंमत रिलायन्स डिजिटलने लीक केली, डिलीटही केली पण...; गुगलवर आताही दिसतेय...
12
Swami Samartha: देवाजवळ दिवा लावताना काच फुटली, दिवा पडला तर स्वामींना करावी 'ही' प्रार्थना!
13
अतूट प्रेम! कोमात असलेल्या लेकीला शुद्धीवर आणण्यासाठी १० वर्ष आईने रोज केला डान्स अन्...
14
सलग तिसऱ्या दिवशी बाजारात तेजी! IT शेअर्समध्ये जोरदार खरेदी, एशियन पेंट्स टॉप गेनर, कुठे झाली घसरण?
15
Delhi Blast : "दावत के लिए बिरयानी तैयार..."; दिल्ली स्फोटासाठी खास कोडवर्ड, चॅट बॉक्समध्ये धक्कादायक खुलासा
16
Shreeji Global FMCG Shares: पहिल्याच दिवशी शेअरची स्थिती खराब; १२५ रुपयांचा शेअर आला ९९ रुपयांवर, गुंतवणूकदारांवर डोकं धरण्याची वेळ
17
बिहार निवडणुकीत NDA पराभूत झाल्यास निफ्टी ७% पर्यंत घसरू शकतो? ब्रोकरेज फर्मने दिला इशारा
18
सोनम-राजाचं लग्न ते बेवफाई अन् हत्या... सगळं समोर येणार! राजा रघुवंशी हत्या प्रकरणात कुणी दिली पहिली साक्ष?
19
जीएसटी रद्द झाल्यानं जीवन, आरोग्य विमा घेण्याचं प्रमाण वाढलं; प्रीमियम वाढून ३४,००७ कोटी रुपयांवर 
20
'पैसे दुप्पट' करणारा ते अल फलाह युनिव्हर्सिटीचा मालक; हा जावेद अहमद सिद्दीकी कोण?

सरकारी पुरस्कार परत करण्याचा शेतकऱ्यांचा इशारा

By admin | Updated: March 21, 2017 01:44 IST

एकीकडे कर्जबाजारी शेतकऱ्यांना कर्जमाफीवर देण्यावरुन वाद सुरु असताना वांगणी आणि परिसरातील शेतकऱ्यांनी विजेसाठीचा

बदलापूर : एकीकडे कर्जबाजारी शेतकऱ्यांना कर्जमाफीवर देण्यावरुन वाद सुरु असताना वांगणी आणि परिसरातील शेतकऱ्यांनी विजेसाठीचा आपला संघर्ष तीव्र केला आहे. योग्य दाबाने, पुरेसा वीजपुरवठा होत नसल्याने शेतीचे नुकसान होत आहे. हा वीजपुरवठा सुरळीत न झाल्यास कृषीदिनी राज्य सरकारकडून मिळालेले सर्व पुरस्कार परत करण्याचा निर्णय त्यांनी जाहीर केला आहे.अंबरनाथ तालुक्यातील उल्हासनदी किनारी काराव, इंदगाव येथील शेतकऱ्यांना चार वर्षांपासून अनियमित आणि कमी दाबाने वीजपुरवठा होतो. परिणामी, चार वर्षात त्यांचे किमान चाळीस वीजपंप जळाले आहेत. वीज पुरवठ्यासंदर्भात काराव येथील देशमुख कृषी पर्यटन केंद्राचे प्रमुख गणपतराव देशमुख, चंद्रकांत देशमुख, रमेश देशमुख, दिलीप देशमुख व विलास देशमुख यांनी अनेकदा वीज वितरण विभाग आणि राज्य शासनाकडे पाठपुरावा केला. मात्र तरीही वीजपुरवठा सुरळीत होत नसल्याने शेतकऱ्यांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत आहे. मार्च २०१३ ला उपअभियंत्यांना त्यांनी पहिले पत्र दिले. त्यानंतर फेबु्रुवारी २०१४ ला कल्याणच्या कार्यकारी अभियंत्यांना निवेदन दिले. तरीही कारवाई न झाल्याने जुलै २०१४ ला राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही निवेदन दिले. मात्र अद्याप कारवाई झालेली नाही. फेब्रुवारी २०१७ मध्ये पुन्हा उपअभियंत्यांना निवेदन दिले. या नंतर एक अधिकारी तेथे आला. त्याने पाहणी केली. ‘यावर उपाय म्हणजे तुमच्या खर्चाने खांब बसवून घ्या. म्हणजे तुमचा प्रश्न सुटेल,’ असे त्यांना सांगितल्याचे विलास देशमुख म्हणाले. आम्ही शासनाकडे कर्जमाफी मागत नाही की वीज बिलात सूटही मागत नाही. वेळच्या वेळी आम्ही बिले भरत असतो. असे असताना गेल्या चार वर्षांपासून वीजपुरवठा सुरळीत व योग्य दाबाने करण्याची मागणी लोकशाही मार्गाने करूनही जर आमच्या मागणीला केराची टोपली दाखवली जात असेल, तर आम्हालाही आंदोलनाचा मार्ग अवलंबावा लागेल, असे दिलीप देशमुख म्हणाले. कृषी विभागाकडून चांगले सहकार्य मिळते. मात्र वीज खात्याकडून योग्य प्रतिसाद मिळत नाही. येथील गंजलेले खांब आणि वीजवाहिन्या तातडीने बदलून योग्य दाबाने व सुरळीत वीजपुरवठा करावा. पुरवठा महिन्याभरात सुधारला नाही, तर येत्या कृषीदिनी शासनाचे सर्व पुरस्कार शासनाला परत करू, असा इशारा त्यांनी दिला. (प्रतिनिधी)