शहरं
Join us  
Trending Stories
1
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
2
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
3
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा
4
सेकंड हँड कारच्या किंमती धडाधड घसरल्या...; स्पिनी, कार्स २४ सारखे २ लाखांपर्यंत डिस्काऊंट देऊ लागले...
5
वादग्रस्त विधानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाराज; आ. गोपीचंद पडळकरांना केला फोन, म्हणाले...
6
सर्वच नावं परप्रांतीय कशे? राजुऱ्यातील ६,८५३ मतदारांच्या वोट चोरीच्या आरोपांवर आयोगाकडून थंड प्रतिसाद
7
"पाकिस्तान, बांगलादेशमध्ये घरात असल्यासारखं वाटतं’’, काँग्रेसच्या सॅम पित्रोदा यांचं विधान, Gen-Z ला केलं असं आवाहन    
8
IPO असावा तर असा! ७४% प्रीमिअमवर बंपर लिस्टिंग; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल
9
सर्वपित्री अमावास्या २०२५: सर्वपित्री अमावस्येला सूर्यग्रहण; त्यादिवशी श्राद्धविधी करावे की नाही?
10
E 20 पेट्रोलमुळे करोडोंची फेरारी खराब झाली; युजरने विचारले, गडकरी घेणार का जबाबदारी?  
11
Video:"...तर मंत्रिपदाची खुर्ची सोडावी लागेल"; DCM अजित पवारांनी पक्षातील नेत्यांचे कान टोचले
12
आयफोन १६ खरेदी करण्याची योग्य वेळ; २७ हजारांहून अधिक रुपये वाचतील, कुठे सुरू आहे ऑफर?
13
अतिशय गुप्तपणे अमेरिकेचे सैन्य बांगलादेशात पोहचलं; १२० जवान दाखल, काही तरी मोठं घडतंय?
14
‘मला एकटे पाडण्यासाठी मोठा राजकीय डाव शिजतोय’; मनोज जरांगे यांचा खळबळजनक दावा
15
कमाल झाली राव! वजन कमी होईल अन् चेहऱ्यावर ग्लो येईल; रोज 'हे' फळ खाल्ल्याचे 'जादुई' फायदे
16
India vs Oman सामन्याआधीच्या सराव सत्रात ६ खेळाडू गैरहजर? टीम इंडियात नेमकं काय घडतंय...
17
आर्यनची केस लढण्यास मुकुल रोहतगींनी दिलेला नकार, शाहरुख खान थेट त्यांच्या पत्नीशीच बोलला
18
राज ठाकरे यांनी अंबरनाथमध्ये कार्यकर्त्यांना दिला असा कानमंत्र, पितृपक्षाबाबत म्हणाले... 
19
एका क्लिकमध्ये मिळणार PF ची पूर्ण हिस्ट्री; EPFO नं बदलली पासबुक पाहण्याची सुविधा
20
Tanya Mittal : "नवऱ्याला राजासारखं ठेवेन", बेरोजगाराशी लग्न करण्यास तयार आहे तान्या मित्तल, म्हणाली...

सरकारी पुरस्कार परत करण्याचा शेतकऱ्यांचा इशारा

By admin | Updated: March 21, 2017 01:44 IST

एकीकडे कर्जबाजारी शेतकऱ्यांना कर्जमाफीवर देण्यावरुन वाद सुरु असताना वांगणी आणि परिसरातील शेतकऱ्यांनी विजेसाठीचा

बदलापूर : एकीकडे कर्जबाजारी शेतकऱ्यांना कर्जमाफीवर देण्यावरुन वाद सुरु असताना वांगणी आणि परिसरातील शेतकऱ्यांनी विजेसाठीचा आपला संघर्ष तीव्र केला आहे. योग्य दाबाने, पुरेसा वीजपुरवठा होत नसल्याने शेतीचे नुकसान होत आहे. हा वीजपुरवठा सुरळीत न झाल्यास कृषीदिनी राज्य सरकारकडून मिळालेले सर्व पुरस्कार परत करण्याचा निर्णय त्यांनी जाहीर केला आहे.अंबरनाथ तालुक्यातील उल्हासनदी किनारी काराव, इंदगाव येथील शेतकऱ्यांना चार वर्षांपासून अनियमित आणि कमी दाबाने वीजपुरवठा होतो. परिणामी, चार वर्षात त्यांचे किमान चाळीस वीजपंप जळाले आहेत. वीज पुरवठ्यासंदर्भात काराव येथील देशमुख कृषी पर्यटन केंद्राचे प्रमुख गणपतराव देशमुख, चंद्रकांत देशमुख, रमेश देशमुख, दिलीप देशमुख व विलास देशमुख यांनी अनेकदा वीज वितरण विभाग आणि राज्य शासनाकडे पाठपुरावा केला. मात्र तरीही वीजपुरवठा सुरळीत होत नसल्याने शेतकऱ्यांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत आहे. मार्च २०१३ ला उपअभियंत्यांना त्यांनी पहिले पत्र दिले. त्यानंतर फेबु्रुवारी २०१४ ला कल्याणच्या कार्यकारी अभियंत्यांना निवेदन दिले. तरीही कारवाई न झाल्याने जुलै २०१४ ला राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही निवेदन दिले. मात्र अद्याप कारवाई झालेली नाही. फेब्रुवारी २०१७ मध्ये पुन्हा उपअभियंत्यांना निवेदन दिले. या नंतर एक अधिकारी तेथे आला. त्याने पाहणी केली. ‘यावर उपाय म्हणजे तुमच्या खर्चाने खांब बसवून घ्या. म्हणजे तुमचा प्रश्न सुटेल,’ असे त्यांना सांगितल्याचे विलास देशमुख म्हणाले. आम्ही शासनाकडे कर्जमाफी मागत नाही की वीज बिलात सूटही मागत नाही. वेळच्या वेळी आम्ही बिले भरत असतो. असे असताना गेल्या चार वर्षांपासून वीजपुरवठा सुरळीत व योग्य दाबाने करण्याची मागणी लोकशाही मार्गाने करूनही जर आमच्या मागणीला केराची टोपली दाखवली जात असेल, तर आम्हालाही आंदोलनाचा मार्ग अवलंबावा लागेल, असे दिलीप देशमुख म्हणाले. कृषी विभागाकडून चांगले सहकार्य मिळते. मात्र वीज खात्याकडून योग्य प्रतिसाद मिळत नाही. येथील गंजलेले खांब आणि वीजवाहिन्या तातडीने बदलून योग्य दाबाने व सुरळीत वीजपुरवठा करावा. पुरवठा महिन्याभरात सुधारला नाही, तर येत्या कृषीदिनी शासनाचे सर्व पुरस्कार शासनाला परत करू, असा इशारा त्यांनी दिला. (प्रतिनिधी)