शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

पालघर जिल्ह्यातील शेतकरी खरीप हंगामासाठी सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2020 01:13 IST

शेती साहित्य खरेदीसाठी झुंबड : शेतकऱ्यांची कृषी सेवा केंद्रांवर गर्दी

पालघर/पारोळ : यंदा रोहिणी नक्षत्र कोरडे गेल्यानंतर मृग नक्षत्रात पावसाने हलकी सुरुवात केल्याने पालघर जिल्ह्यातील शेतकरी खरीप हंगामासाठी सज्ज झाले असून त्यांनी भातपेरणीला सुरुवात केली आहे. मात्र दोन दिवसांपासून ऊनही पडत असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.वसई तालुक्यासह जिल्ह्यात सर्वात जास्त घेण्यात येणाºया भातपिकाच्या पेरण्यांना सुरुवात झाली आहे. पेरणीसाठी लागणारी बियाणे म्हणून भाताच्या वाणासह इतर साहित्य खरेदी करण्यासाठी शेतकºयांची या भागातील कृषी सेवा केंद्रांवर गर्दी दिसून येत आहे. तसेच नांगरणीसाठी ट्रॅक्टर भाड्याने लागलीच मिळावे म्हणून ट्रॅक्टरमालकाकडे खेटे मारणे सुरू झाले असून लगेच ट्रॅक्टर मिळावा म्हणून शेतकरी प्रयत्नशील आहेत.चालू वर्षाच्या खरीप हंगामाला तालुक्यात सुरुवात झाली असून पेरणीसाठी लागणारी सुधारित व संकरित भातबियाणे, खते, औषधे यांची जुळवाजुळव करण्यासाठी शेतकरी कृषी सेवा केंद्रावर गर्दी करत आहेत. मात्र चालू वर्षी दरसाल वाढणाºया महागाईचा परिणाम जाणवत असून खते, बियाणे, औषधे यांच्यासह लागणारी अवजारे नांगरणीसाठी ताशी भाड्याने घेण्यात येणारे ट्रॅक्टर यांचे साधारण ५ ते १५ टक्के भाव वाढले आहेत. मागील वर्षीच्या तुलनेत भातबियाण्यांच्या १० किलोच्या एका पिशवीचा असलेला दर चालू वर्षी ५० रुपयांनी वाढल्याचे शेतकरी सांगत आहेत. वाढती महागाई, मजुरांची टंचाई, वरुणराजाची खप्पामर्जी, रोगराई यांचा सामना करून लागवड केलेली शेती पिकली तरी पिकाला मिळणारा भाव यांची सांगड घालताना वरील कारणांमुळे पारंपरिक पद्धतीने केली जाणारी भातशेती न परवडणारी असून दुसरे काही उत्पन्नाचे साधन नसल्याने खोट खाऊन भातशेती कसावी लागत असल्याचे शेतकºयांचे म्हणणे आहे.गेल्या वर्षी अतिवृष्टी व अवकाळी पावसामुळे भातशेतीचे मोठे नुकसान झाले होते. पण, या वर्षी कोरोनाचे सावट असताना लावणीसाठी डहाणू, जव्हार, मोखाडा या ठिकाणाहून भातलावणीसाठी येणाºया मजुरांची टंचाई होणार असल्याचे वसईतील आडणे येथील शेतकरी लक्ष्मी प्रसाद पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :Farmerशेतकरी