शहरं
Join us  
Trending Stories
1
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
2
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
3
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
4
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
5
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
6
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
7
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
8
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...
9
"आई...मी त्याला मारून टाकलं, खोलीत बॉडी पडलीय"; मोठ्या बहिणीनं छोट्या भावाला का मारले?
10
ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेची रोमँटिक केमिस्ट्री, 'आरपार' सिनेमाचं पहिलं गाणं रिलीज
11
Donald Trump Tariffs : 'जर ट्रम्प-पुतिन यांची चर्चा अयशस्वी झाली तर आम्ही भारतावर अधिक शुल्क लादू...', अमेरिकेची नवी धमकी
12
राज कुंद्राने आशीर्वाद घेताच केली किडनी ऑफर, ऐकून काय म्हणाले प्रेमानंद महाराज? जाणून आश्चर्य वाटेल
13
"अजित पवार यांनी लाडकी बहीण योजना आणल्यानेच महायुतीला २३८ जागा मिळाल्या’’, सुनिल तटकरेंचा दावा   
14
मुंबईत शिवसेना-मनसेची ताकद जास्त, राज ठाकरेंचा दावा; CM फडणवीस म्हणाले...
15
War 2 Review: ॲक्शनच्या नादात कथेवर फेरलं पाणी, कसा आहे हृतिक रोशन-ज्यु. एनटीआरचा 'वॉर २'?
16
थरकाप उडवणारा व्हिडीओ! मृत्यूने घातली झडप, बापाने लेकीसमोर जागेवरच सोडला जीव; दिल्लीतील घटना
17
अर्जुन तेंडुलकर संदर्भात हवाई सुंदरीला झालेला गैरसमज! क्रिकेटच्या देवानं आधी गंमत केली; मग...
18
पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टासमोर EVM मधील मतमोजणी झाली; पराभूत उमेदवार बनला 'विजयी', गावकरी अवाक्
19
Viral: माकड दादाने घेतली ‘डॉगेश भाऊं’ची मुलाखत, धम्माल VIDEO पाहून तुम्हीही पोट धरून हसाल
20
एकत्र जीवन संपवूया असं सांगून अल्पवयीन प्रेयसीला विष पाजून मारले, मग झाला फरार

पालघर जिल्ह्यातील शेतकरी खरीप हंगामासाठी सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2020 01:13 IST

शेती साहित्य खरेदीसाठी झुंबड : शेतकऱ्यांची कृषी सेवा केंद्रांवर गर्दी

पालघर/पारोळ : यंदा रोहिणी नक्षत्र कोरडे गेल्यानंतर मृग नक्षत्रात पावसाने हलकी सुरुवात केल्याने पालघर जिल्ह्यातील शेतकरी खरीप हंगामासाठी सज्ज झाले असून त्यांनी भातपेरणीला सुरुवात केली आहे. मात्र दोन दिवसांपासून ऊनही पडत असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.वसई तालुक्यासह जिल्ह्यात सर्वात जास्त घेण्यात येणाºया भातपिकाच्या पेरण्यांना सुरुवात झाली आहे. पेरणीसाठी लागणारी बियाणे म्हणून भाताच्या वाणासह इतर साहित्य खरेदी करण्यासाठी शेतकºयांची या भागातील कृषी सेवा केंद्रांवर गर्दी दिसून येत आहे. तसेच नांगरणीसाठी ट्रॅक्टर भाड्याने लागलीच मिळावे म्हणून ट्रॅक्टरमालकाकडे खेटे मारणे सुरू झाले असून लगेच ट्रॅक्टर मिळावा म्हणून शेतकरी प्रयत्नशील आहेत.चालू वर्षाच्या खरीप हंगामाला तालुक्यात सुरुवात झाली असून पेरणीसाठी लागणारी सुधारित व संकरित भातबियाणे, खते, औषधे यांची जुळवाजुळव करण्यासाठी शेतकरी कृषी सेवा केंद्रावर गर्दी करत आहेत. मात्र चालू वर्षी दरसाल वाढणाºया महागाईचा परिणाम जाणवत असून खते, बियाणे, औषधे यांच्यासह लागणारी अवजारे नांगरणीसाठी ताशी भाड्याने घेण्यात येणारे ट्रॅक्टर यांचे साधारण ५ ते १५ टक्के भाव वाढले आहेत. मागील वर्षीच्या तुलनेत भातबियाण्यांच्या १० किलोच्या एका पिशवीचा असलेला दर चालू वर्षी ५० रुपयांनी वाढल्याचे शेतकरी सांगत आहेत. वाढती महागाई, मजुरांची टंचाई, वरुणराजाची खप्पामर्जी, रोगराई यांचा सामना करून लागवड केलेली शेती पिकली तरी पिकाला मिळणारा भाव यांची सांगड घालताना वरील कारणांमुळे पारंपरिक पद्धतीने केली जाणारी भातशेती न परवडणारी असून दुसरे काही उत्पन्नाचे साधन नसल्याने खोट खाऊन भातशेती कसावी लागत असल्याचे शेतकºयांचे म्हणणे आहे.गेल्या वर्षी अतिवृष्टी व अवकाळी पावसामुळे भातशेतीचे मोठे नुकसान झाले होते. पण, या वर्षी कोरोनाचे सावट असताना लावणीसाठी डहाणू, जव्हार, मोखाडा या ठिकाणाहून भातलावणीसाठी येणाºया मजुरांची टंचाई होणार असल्याचे वसईतील आडणे येथील शेतकरी लक्ष्मी प्रसाद पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :Farmerशेतकरी