शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

पालघर जिल्ह्यातील शेतकरी खरीप हंगामासाठी सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2020 01:13 IST

शेती साहित्य खरेदीसाठी झुंबड : शेतकऱ्यांची कृषी सेवा केंद्रांवर गर्दी

पालघर/पारोळ : यंदा रोहिणी नक्षत्र कोरडे गेल्यानंतर मृग नक्षत्रात पावसाने हलकी सुरुवात केल्याने पालघर जिल्ह्यातील शेतकरी खरीप हंगामासाठी सज्ज झाले असून त्यांनी भातपेरणीला सुरुवात केली आहे. मात्र दोन दिवसांपासून ऊनही पडत असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.वसई तालुक्यासह जिल्ह्यात सर्वात जास्त घेण्यात येणाºया भातपिकाच्या पेरण्यांना सुरुवात झाली आहे. पेरणीसाठी लागणारी बियाणे म्हणून भाताच्या वाणासह इतर साहित्य खरेदी करण्यासाठी शेतकºयांची या भागातील कृषी सेवा केंद्रांवर गर्दी दिसून येत आहे. तसेच नांगरणीसाठी ट्रॅक्टर भाड्याने लागलीच मिळावे म्हणून ट्रॅक्टरमालकाकडे खेटे मारणे सुरू झाले असून लगेच ट्रॅक्टर मिळावा म्हणून शेतकरी प्रयत्नशील आहेत.चालू वर्षाच्या खरीप हंगामाला तालुक्यात सुरुवात झाली असून पेरणीसाठी लागणारी सुधारित व संकरित भातबियाणे, खते, औषधे यांची जुळवाजुळव करण्यासाठी शेतकरी कृषी सेवा केंद्रावर गर्दी करत आहेत. मात्र चालू वर्षी दरसाल वाढणाºया महागाईचा परिणाम जाणवत असून खते, बियाणे, औषधे यांच्यासह लागणारी अवजारे नांगरणीसाठी ताशी भाड्याने घेण्यात येणारे ट्रॅक्टर यांचे साधारण ५ ते १५ टक्के भाव वाढले आहेत. मागील वर्षीच्या तुलनेत भातबियाण्यांच्या १० किलोच्या एका पिशवीचा असलेला दर चालू वर्षी ५० रुपयांनी वाढल्याचे शेतकरी सांगत आहेत. वाढती महागाई, मजुरांची टंचाई, वरुणराजाची खप्पामर्जी, रोगराई यांचा सामना करून लागवड केलेली शेती पिकली तरी पिकाला मिळणारा भाव यांची सांगड घालताना वरील कारणांमुळे पारंपरिक पद्धतीने केली जाणारी भातशेती न परवडणारी असून दुसरे काही उत्पन्नाचे साधन नसल्याने खोट खाऊन भातशेती कसावी लागत असल्याचे शेतकºयांचे म्हणणे आहे.गेल्या वर्षी अतिवृष्टी व अवकाळी पावसामुळे भातशेतीचे मोठे नुकसान झाले होते. पण, या वर्षी कोरोनाचे सावट असताना लावणीसाठी डहाणू, जव्हार, मोखाडा या ठिकाणाहून भातलावणीसाठी येणाºया मजुरांची टंचाई होणार असल्याचे वसईतील आडणे येथील शेतकरी लक्ष्मी प्रसाद पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :Farmerशेतकरी