शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
2
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
3
देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
4
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
5
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
6
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
7
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पॉवरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
8
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?
9
“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार
10
Bigg Boss 19: 'बिग बॉस हिंदी'कडून मराठमोळ्या प्रणित मोरेवर अन्याय? शोसाठी मिळालं सगळ्यांपेक्षा कमी मानधन
11
Moto G67 Power: ७०००mAh बॅटरी आणि चार कॅमेरे; मोटो जी६७ पॉवर भारतात लॉन्च!
12
भारत, चीन, तुर्कस्तान... तीन देशांनी घेतला असा निर्णय की रशियाला होतंय नुकसान, ट्रम्प यांच्यामुळे नाईलाज
13
"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी
14
परदेशी सहल बजेटमध्ये! 'या' ५ देशांमध्ये भारतीय रुपया आहे मजबूत; कमी खर्चात करा परदेशवारी
15
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
16
बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का! मतदानाच्या तोंडावर भाजप आमदाराने राजदमध्ये प्रवेश केला; नाराज का झाला...
17
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
18
चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा
19
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
20
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'

किसान व जवान यांच्या युतीमुळे शेतकरी आंदोलन सकारात्मक व ताकदीचे : अभय कांता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:41 IST

ठाणे : दिल्ली येथील शेतकरी आंदोलनातील सर्वात मनात भरणारी गोष्ट म्हणजे या आंदोलनात सर्वत्र पसरलेली सकारात्मकता, अशा शब्दांत परिवर्तनाचा ...

ठाणे : दिल्ली येथील शेतकरी आंदोलनातील सर्वात मनात भरणारी गोष्ट म्हणजे या आंदोलनात सर्वत्र पसरलेली सकारात्मकता, अशा शब्दांत परिवर्तनाचा वाटसरू या पाक्षिकाचे संपादक अभय कांता यांनी शेतकरी आंदोलनाचे समर्थन केले.

पुणे ते दिल्ली किसान ज्योतयात्रेत सहभागी ठाणेकर व लॉकडाऊनच्या संकटाने सैरभैर झालेल्या कष्टकऱ्यांना, रोजंदारीवर काम करणाऱ्या मजुरांना, घरकाम करणाऱ्या महिलांना, फेरीवाल्यांना उपासमारीपासून वाचवण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालून त्यांना मोफत अन्नधान्य, औषधे, गरजेच्या वस्तूंचे वाटप करण्यात पुढाकार घेतलेल्या ठाण्यातील युवकांचा आणि या कार्यात सहभागी झालेल्या समाजसेवी संस्थांचा रविवारी समता विचार प्रसारक संस्थेतर्फे प्रशस्तीपत्रक देऊन सन्मान करण्यात आला. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. मराठी ग्रंथसंग्रहालयात झालेल्या या कार्यक्रमाचे अध्यक्षपद ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते जगदीश खैरालिया यांनी भूषवले. यावेळी कांता यांनी प्रेक्षकांशी संवाद साधताना सांगितले की, सरकारने आणि सरकारच्या पाठीराख्यांनी या आंदोलनाला बदनाम करण्याचे शक्य ते सर्व मार्ग अवलंबले, जेणेकरून याला समर्थन करण्यासाठी इतर लोकांनी इथे येऊ नये. तरीही या आंदोलनाची तीव्रता अजून तशीच प्रखर आहे. इथे देशाच्या सीमांचे रक्षण करणारे अनेक जवान सुट्टीत या आंदोलनात सहभागी झालेले आहेत. खऱ्या अर्थाने जवान – किसान युती इथे नांदताना दिसून आली. खलिस्तानींपासून आंदोलनजीवीपर्यंत अनेक अपशब्दाने संबोधूनही या शेतकऱ्यांचा निर्धार किंचितही कमी झालेला नाही. अतिशय ताकद देणारे असे हे आंदोलन आहे, असे त्यांनी आवर्जून सांगितले. प्रास्ताविक संस्थेचे एकलव्य कार्यकर्ता सुशांत जगताप याने तर आभारप्रदर्शन संस्थेतील सहसचिव अनुजा लोहार यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. संजय मंगला गोपाळ यांनी केले.

---------

फोटो मेलवर