शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
2
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
3
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
4
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
5
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
6
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
7
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
8
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
9
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
10
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
11
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
12
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्री सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
13
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
14
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे
15
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
16
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
17
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
18
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
19
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
20
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा

किसान व जवान यांच्या युतीमुळे शेतकरी आंदोलन सकारात्मक व ताकदीचे : अभय कांता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:41 IST

ठाणे : दिल्ली येथील शेतकरी आंदोलनातील सर्वात मनात भरणारी गोष्ट म्हणजे या आंदोलनात सर्वत्र पसरलेली सकारात्मकता, अशा शब्दांत परिवर्तनाचा ...

ठाणे : दिल्ली येथील शेतकरी आंदोलनातील सर्वात मनात भरणारी गोष्ट म्हणजे या आंदोलनात सर्वत्र पसरलेली सकारात्मकता, अशा शब्दांत परिवर्तनाचा वाटसरू या पाक्षिकाचे संपादक अभय कांता यांनी शेतकरी आंदोलनाचे समर्थन केले.

पुणे ते दिल्ली किसान ज्योतयात्रेत सहभागी ठाणेकर व लॉकडाऊनच्या संकटाने सैरभैर झालेल्या कष्टकऱ्यांना, रोजंदारीवर काम करणाऱ्या मजुरांना, घरकाम करणाऱ्या महिलांना, फेरीवाल्यांना उपासमारीपासून वाचवण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालून त्यांना मोफत अन्नधान्य, औषधे, गरजेच्या वस्तूंचे वाटप करण्यात पुढाकार घेतलेल्या ठाण्यातील युवकांचा आणि या कार्यात सहभागी झालेल्या समाजसेवी संस्थांचा रविवारी समता विचार प्रसारक संस्थेतर्फे प्रशस्तीपत्रक देऊन सन्मान करण्यात आला. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. मराठी ग्रंथसंग्रहालयात झालेल्या या कार्यक्रमाचे अध्यक्षपद ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते जगदीश खैरालिया यांनी भूषवले. यावेळी कांता यांनी प्रेक्षकांशी संवाद साधताना सांगितले की, सरकारने आणि सरकारच्या पाठीराख्यांनी या आंदोलनाला बदनाम करण्याचे शक्य ते सर्व मार्ग अवलंबले, जेणेकरून याला समर्थन करण्यासाठी इतर लोकांनी इथे येऊ नये. तरीही या आंदोलनाची तीव्रता अजून तशीच प्रखर आहे. इथे देशाच्या सीमांचे रक्षण करणारे अनेक जवान सुट्टीत या आंदोलनात सहभागी झालेले आहेत. खऱ्या अर्थाने जवान – किसान युती इथे नांदताना दिसून आली. खलिस्तानींपासून आंदोलनजीवीपर्यंत अनेक अपशब्दाने संबोधूनही या शेतकऱ्यांचा निर्धार किंचितही कमी झालेला नाही. अतिशय ताकद देणारे असे हे आंदोलन आहे, असे त्यांनी आवर्जून सांगितले. प्रास्ताविक संस्थेचे एकलव्य कार्यकर्ता सुशांत जगताप याने तर आभारप्रदर्शन संस्थेतील सहसचिव अनुजा लोहार यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. संजय मंगला गोपाळ यांनी केले.

---------

फोटो मेलवर