शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेसाठी निधी वळवला; संजय शिरसाट संतापले, म्हणाले, “खाते बंद केले तरी चालेल”
2
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
3
"तुम्ही अजित पवारांना भेटल्या, खरं की खोटं... उत्तर द्या?"; सुषमा अंधारे-अंजली दमानिया सोशल मीडियावर भिडल्या
4
“तेव्हा मी केंद्रात होतो, फडणवीस नाही”; जातनिहाय जनगणनेवर पृथ्वीराज चव्हाण स्पष्टच बोलले
5
Tata Motors नं Q4 निकाल आणि डिविडेंडपूर्वी घेतला मोठा निर्णय; ५०० कोटी रुपयांचं आहे प्रकरण
6
"...तर पाकिस्तान हल्ला करेल!"; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची भारताला पोकळ धमकी
7
Tarot Card: 'पेराल ते उगवेल' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
8
गर्लफ्रेंडसोबत चायनीज खाताना आईने लेकाला रंगेहाथ पकडलं; रस्त्यात चपलेने मारलं, धू-धू धुतलं
9
'या' कंपनीनं लाँच केला १८० दिवसांचा प्लान; SonyLIV सारख्या OTT चं मिळणार सबस्क्रिप्शन, काय आहे खास?
10
Leopard in Marathi: परीकडे बघून राधा अन् समृद्धी हसली; तिघींची गट्टी जमली
11
क्रिकेटवेडी, बोल्ड फोटो अन् शुबमनसोबत रिलेशनशीपची चर्चा; अवनीत कौर नेमकी आहे तरी कोण?
12
IPL 2025: वैभव सूर्यवंशीकडे आहेत 'इतक्या' बॅट; आकडा ऐकून नितीश राणा झाला शॉक, पाहा व्हिडीओ
13
"दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्यांना सोडणार नाही"; पहलगाम हल्ल्यावरुन PM मोदींची मोठी घोषणा
14
खात्यात काय सुरु माहिती नाही, निधी वळल्यावर संतापाला काय अर्थ? वडेट्टीवारांचा शिरसाटांवर निशाणा
15
नाशिकमध्ये आणखी एक हत्या! आरोपीने हत्या केल्यानंतर स्वतःच नेले जिल्हा रुग्णालयात, स्वतःहून गेला पोलीस ठाण्यात
16
“अमित शाह महाराष्ट्रात ३ पक्ष चालवतात, अजितदादा-एकनाथ शिंदे कधीही CM होणार नाहीत”: संजय राऊत
17
हिंदी चित्रपटात का दिसत नाहीत भरत जाधव? सांगितलं महत्त्वाचं कारण, म्हणाले- "एकदा मला नोकराची भूमिका..."
18
भारताच्या भीतीनं कराची स्टॉक एक्सचेंजमध्ये भूकंप, असा पडला की आता बाहेर येणंही झालं कठीण
19
Rashid Khan: असा झेल कधीच पाहिला नसेल, गुजरात- हैदराबाद सामन्यात राशीद खानची जबरदस्त फिल्डिंग
20
काव्या मारनपेक्षाही अनेक पटींनी श्रीमंत आहे राम चरणची सासू; एकट्या सांभाळतात ७७ हजार कोटींचा व्यवसाय

किसान व जवान यांच्या युतीमुळे शेतकरी आंदोलन सकारात्मक व ताकदीचे : अभय कांता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:41 IST

ठाणे : दिल्ली येथील शेतकरी आंदोलनातील सर्वात मनात भरणारी गोष्ट म्हणजे या आंदोलनात सर्वत्र पसरलेली सकारात्मकता, अशा शब्दांत परिवर्तनाचा ...

ठाणे : दिल्ली येथील शेतकरी आंदोलनातील सर्वात मनात भरणारी गोष्ट म्हणजे या आंदोलनात सर्वत्र पसरलेली सकारात्मकता, अशा शब्दांत परिवर्तनाचा वाटसरू या पाक्षिकाचे संपादक अभय कांता यांनी शेतकरी आंदोलनाचे समर्थन केले.

पुणे ते दिल्ली किसान ज्योतयात्रेत सहभागी ठाणेकर व लॉकडाऊनच्या संकटाने सैरभैर झालेल्या कष्टकऱ्यांना, रोजंदारीवर काम करणाऱ्या मजुरांना, घरकाम करणाऱ्या महिलांना, फेरीवाल्यांना उपासमारीपासून वाचवण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालून त्यांना मोफत अन्नधान्य, औषधे, गरजेच्या वस्तूंचे वाटप करण्यात पुढाकार घेतलेल्या ठाण्यातील युवकांचा आणि या कार्यात सहभागी झालेल्या समाजसेवी संस्थांचा रविवारी समता विचार प्रसारक संस्थेतर्फे प्रशस्तीपत्रक देऊन सन्मान करण्यात आला. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. मराठी ग्रंथसंग्रहालयात झालेल्या या कार्यक्रमाचे अध्यक्षपद ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते जगदीश खैरालिया यांनी भूषवले. यावेळी कांता यांनी प्रेक्षकांशी संवाद साधताना सांगितले की, सरकारने आणि सरकारच्या पाठीराख्यांनी या आंदोलनाला बदनाम करण्याचे शक्य ते सर्व मार्ग अवलंबले, जेणेकरून याला समर्थन करण्यासाठी इतर लोकांनी इथे येऊ नये. तरीही या आंदोलनाची तीव्रता अजून तशीच प्रखर आहे. इथे देशाच्या सीमांचे रक्षण करणारे अनेक जवान सुट्टीत या आंदोलनात सहभागी झालेले आहेत. खऱ्या अर्थाने जवान – किसान युती इथे नांदताना दिसून आली. खलिस्तानींपासून आंदोलनजीवीपर्यंत अनेक अपशब्दाने संबोधूनही या शेतकऱ्यांचा निर्धार किंचितही कमी झालेला नाही. अतिशय ताकद देणारे असे हे आंदोलन आहे, असे त्यांनी आवर्जून सांगितले. प्रास्ताविक संस्थेचे एकलव्य कार्यकर्ता सुशांत जगताप याने तर आभारप्रदर्शन संस्थेतील सहसचिव अनुजा लोहार यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. संजय मंगला गोपाळ यांनी केले.

---------

फोटो मेलवर