शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

कल्याण परिमंडळात शेतकऱ्यांनी पावणेदोन कोटींची थकबाकी भरली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:38 IST

डोंबिवली : कृषिपंपाच्या वीज बिल थकबाकीत पन्नास टक्के सवलत व नवीन वीजजोडणीसाठी महावितरणने प्रजासत्ताक दिनापासून सुरू केलेल्या महाऊर्जा अभियानाला ...

डोंबिवली : कृषिपंपाच्या वीज बिल थकबाकीत पन्नास टक्के सवलत व नवीन वीजजोडणीसाठी महावितरणने प्रजासत्ताक दिनापासून सुरू केलेल्या महाऊर्जा अभियानाला कल्याण परिमंडळात शेतकऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. अभियानाच्या पहिल्या १५ दिवसांतच कृषिपंप ग्राहकांनी एक कोटी ८३ लाख रुपयांची थकबाकी भरून तितक्याच रकमेची सवलत मिळवल्याची माहिती गुरुवारी दिली.

या परिमंडळात एकूण २३ हजार ४८८ कृषिपंप ग्राहक असून त्यांच्याकडे २८ कोटींचे वीजबिल थकीत आहे. त्यांतील साडेसहा हजार ग्राहकांचा वीजपुरवठा कायमस्वरूपी बंद असून त्यांच्याकडे आठ कोटी ७८ लाख, तर वीजपुरवठा सुरू असणाऱ्या उर्वरित ग्राहकांकडे १९ कोटी १८ लाख रुपयांची थकबाकी आहे. पाच वर्षांपूर्वीच्या थकबाकीवरील व्याज व विलंब आकार माफ, त्यानंतरच्या थकबाकीवर विलंब आकार माफ व प्रचलित दरानुसार आकारलेला व्याजदर या अभियानातील तरतुदींमुळे एकूण थकबाकीच्या रकमेतून दोन कोटी २१ लाख रुपये माफ झाले आहेत. आता परिमंडलातील शेतकऱ्यांनी २५ कोटी ७५ लाख रुपयांच्या एकूण थकबाकीपैकी केवळ पन्नास टक्के म्हणजेच १२ कोटी ८७ लाख रुपये चालू वीज बिलासह एकरकमी भरल्यास उर्वरित ५० टक्के रक्कम माफ करण्यात येणार आहे.

पालघर व ठाणे जिल्ह्यांतील सर्व शेतकऱ्यांना या अभियानाचा लाभ देण्यासाठी मुख्य अभियंता दिनेश अग्रवाल यांच्या नेतृत्वाखाली नियोजन केले असून ठिकठिकाणी शेतकरी मेळाव्यांचे आयोजन करण्यात येत आहे. यानुसार वाडा उपविभागातील अंबाडी शाखेत आयोजित मेळाव्यात ४१ शेतकऱ्यांनी २९ लाखांची थकबाकी भरली; तर गुरुवारी सफाळे ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित मेळाव्याला ३०० शेतकऱ्यांनी हजेरी लावून वीज बिल थकबाकीतून मुक्त होण्याचा संकल्प केला.

या अभियानाच्या माध्यमातून ठाणे व पालघर जिल्ह्यांतील सर्वच २३ हजार ५०० शेतकऱ्यांना त्यांचे वीज बिल शून्यावर आणण्याची संधी उपलब्ध झाली असून तिचा लाभ घेण्याचे आवाहन अग्रवाल यांनी केले आहे.

-//---------

फोटो आहे