शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
7
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
8
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

कल्याण परिमंडळात शेतकऱ्यांनी पावणेदोन कोटींची थकबाकी भरली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:38 IST

डोंबिवली : कृषिपंपाच्या वीज बिल थकबाकीत पन्नास टक्के सवलत व नवीन वीजजोडणीसाठी महावितरणने प्रजासत्ताक दिनापासून सुरू केलेल्या महाऊर्जा अभियानाला ...

डोंबिवली : कृषिपंपाच्या वीज बिल थकबाकीत पन्नास टक्के सवलत व नवीन वीजजोडणीसाठी महावितरणने प्रजासत्ताक दिनापासून सुरू केलेल्या महाऊर्जा अभियानाला कल्याण परिमंडळात शेतकऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. अभियानाच्या पहिल्या १५ दिवसांतच कृषिपंप ग्राहकांनी एक कोटी ८३ लाख रुपयांची थकबाकी भरून तितक्याच रकमेची सवलत मिळवल्याची माहिती गुरुवारी दिली.

या परिमंडळात एकूण २३ हजार ४८८ कृषिपंप ग्राहक असून त्यांच्याकडे २८ कोटींचे वीजबिल थकीत आहे. त्यांतील साडेसहा हजार ग्राहकांचा वीजपुरवठा कायमस्वरूपी बंद असून त्यांच्याकडे आठ कोटी ७८ लाख, तर वीजपुरवठा सुरू असणाऱ्या उर्वरित ग्राहकांकडे १९ कोटी १८ लाख रुपयांची थकबाकी आहे. पाच वर्षांपूर्वीच्या थकबाकीवरील व्याज व विलंब आकार माफ, त्यानंतरच्या थकबाकीवर विलंब आकार माफ व प्रचलित दरानुसार आकारलेला व्याजदर या अभियानातील तरतुदींमुळे एकूण थकबाकीच्या रकमेतून दोन कोटी २१ लाख रुपये माफ झाले आहेत. आता परिमंडलातील शेतकऱ्यांनी २५ कोटी ७५ लाख रुपयांच्या एकूण थकबाकीपैकी केवळ पन्नास टक्के म्हणजेच १२ कोटी ८७ लाख रुपये चालू वीज बिलासह एकरकमी भरल्यास उर्वरित ५० टक्के रक्कम माफ करण्यात येणार आहे.

पालघर व ठाणे जिल्ह्यांतील सर्व शेतकऱ्यांना या अभियानाचा लाभ देण्यासाठी मुख्य अभियंता दिनेश अग्रवाल यांच्या नेतृत्वाखाली नियोजन केले असून ठिकठिकाणी शेतकरी मेळाव्यांचे आयोजन करण्यात येत आहे. यानुसार वाडा उपविभागातील अंबाडी शाखेत आयोजित मेळाव्यात ४१ शेतकऱ्यांनी २९ लाखांची थकबाकी भरली; तर गुरुवारी सफाळे ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित मेळाव्याला ३०० शेतकऱ्यांनी हजेरी लावून वीज बिल थकबाकीतून मुक्त होण्याचा संकल्प केला.

या अभियानाच्या माध्यमातून ठाणे व पालघर जिल्ह्यांतील सर्वच २३ हजार ५०० शेतकऱ्यांना त्यांचे वीज बिल शून्यावर आणण्याची संधी उपलब्ध झाली असून तिचा लाभ घेण्याचे आवाहन अग्रवाल यांनी केले आहे.

-//---------

फोटो आहे