शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

कल्याण परिमंडळात शेतकऱ्यांनी पावणेदोन कोटींची थकबाकी भरली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:38 IST

डोंबिवली : कृषिपंपाच्या वीज बिल थकबाकीत पन्नास टक्के सवलत व नवीन वीजजोडणीसाठी महावितरणने प्रजासत्ताक दिनापासून सुरू केलेल्या महाऊर्जा अभियानाला ...

डोंबिवली : कृषिपंपाच्या वीज बिल थकबाकीत पन्नास टक्के सवलत व नवीन वीजजोडणीसाठी महावितरणने प्रजासत्ताक दिनापासून सुरू केलेल्या महाऊर्जा अभियानाला कल्याण परिमंडळात शेतकऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. अभियानाच्या पहिल्या १५ दिवसांतच कृषिपंप ग्राहकांनी एक कोटी ८३ लाख रुपयांची थकबाकी भरून तितक्याच रकमेची सवलत मिळवल्याची माहिती गुरुवारी दिली.

या परिमंडळात एकूण २३ हजार ४८८ कृषिपंप ग्राहक असून त्यांच्याकडे २८ कोटींचे वीजबिल थकीत आहे. त्यांतील साडेसहा हजार ग्राहकांचा वीजपुरवठा कायमस्वरूपी बंद असून त्यांच्याकडे आठ कोटी ७८ लाख, तर वीजपुरवठा सुरू असणाऱ्या उर्वरित ग्राहकांकडे १९ कोटी १८ लाख रुपयांची थकबाकी आहे. पाच वर्षांपूर्वीच्या थकबाकीवरील व्याज व विलंब आकार माफ, त्यानंतरच्या थकबाकीवर विलंब आकार माफ व प्रचलित दरानुसार आकारलेला व्याजदर या अभियानातील तरतुदींमुळे एकूण थकबाकीच्या रकमेतून दोन कोटी २१ लाख रुपये माफ झाले आहेत. आता परिमंडलातील शेतकऱ्यांनी २५ कोटी ७५ लाख रुपयांच्या एकूण थकबाकीपैकी केवळ पन्नास टक्के म्हणजेच १२ कोटी ८७ लाख रुपये चालू वीज बिलासह एकरकमी भरल्यास उर्वरित ५० टक्के रक्कम माफ करण्यात येणार आहे.

पालघर व ठाणे जिल्ह्यांतील सर्व शेतकऱ्यांना या अभियानाचा लाभ देण्यासाठी मुख्य अभियंता दिनेश अग्रवाल यांच्या नेतृत्वाखाली नियोजन केले असून ठिकठिकाणी शेतकरी मेळाव्यांचे आयोजन करण्यात येत आहे. यानुसार वाडा उपविभागातील अंबाडी शाखेत आयोजित मेळाव्यात ४१ शेतकऱ्यांनी २९ लाखांची थकबाकी भरली; तर गुरुवारी सफाळे ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित मेळाव्याला ३०० शेतकऱ्यांनी हजेरी लावून वीज बिल थकबाकीतून मुक्त होण्याचा संकल्प केला.

या अभियानाच्या माध्यमातून ठाणे व पालघर जिल्ह्यांतील सर्वच २३ हजार ५०० शेतकऱ्यांना त्यांचे वीज बिल शून्यावर आणण्याची संधी उपलब्ध झाली असून तिचा लाभ घेण्याचे आवाहन अग्रवाल यांनी केले आहे.

-//---------

फोटो आहे