शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

शेतकऱ्यांना पावला ‘राम’, कामातील अडथळे दूर, जमिनी देण्यास तयार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2018 03:41 IST

मुंबई-बडोदा प्रस्तावित महामार्गाच्या कामाला अंबरनाथ तालुक्यात आता कोणताही विरोध होणार नाही.

बदलापूर : मुंबई-बडोदा प्रस्तावित महामार्गाच्या कामाला अंबरनाथ तालुक्यात आता कोणताही विरोध होणार नाही. शेतकºयांना अपेक्षित असलेला मोबदला देण्यास सरकार तयार झाल्याने शेतकºयांनी आपल्या जमिनी देण्यास तयारी दर्शवली आहे. केंद्र सरकारच्या भूपृष्ठ मंत्रालयाकडून अंबरनाथ तालुक्यातील भूमी अधिग्रहण होणाºया २८७ शेतकºयांना भरघोेस मोबदला देत शेतकºयांच्या मागण्या पूर्ण केल्याचे संघर्ष समितीचे प्रमुख व बदलापूरचे माजी नगराध्यक्ष राम पातकर यांनी स्पष्ट केले.केंद्र सरकारने दिलेल्या मोबदल्यामुळे अंबरनाथ तालुक्यातील सर्व शेतकºयांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. शेतकºयांनी केंद्र सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले असून आपल्या जमिनी सरकारने अधिग्रहण करण्यासाठी त्यांनी संपूर्ण सहमती दर्शवली आहे. विशेष म्हणजे सात वर्षे हे शेतकरी सनदशीर मार्गांनी या मागणीचा पाठपुरावा पातकर यांच्या नेतृत्वाखाली करत होते. एकही आंदोलन न करता या पाठपुराव्याला यश आल्याचे पातकर यांनी सांगितले. केंद्र सरकारच्या भूपृष्ठ विभागाने हे पैसे जाहीर केल्यानंतर शनिवारी बदलापूरमध्ये शेतकºयांनी कात्रप येथे एकत्र जमून आनंदोत्सव साजरा केला.प्रस्तावित मुंबई-बडोदा महामार्गाचा मोठा भाग हा अंबरनाथ तालुक्यातील बदलापूर शहर आणि ग्रामीण भागातून जाणार आहे. बदलापूरमधील चामटोलीपासून ते डोके, दापोली, एरंजाड, सोनिवली, बदलापूर गाव या पट्ट्यातून जाणारा हा मार्ग २०११ मध्ये केंद्र सरकारने प्रस्तावित केला होता. त्यासाठी जमीन संपादनाची प्रक्रि या सुरू करण्यात आली होती. मात्र, ही प्रक्रि या सुरू असताना अनेक शेतकºयांनी त्यावर आक्षेप घेत मोबदल्याची रक्कम जाहीर करण्याची मागणी केंद्राकडे करत होते.दरम्यानच्या काळात केंद्र सरकारने २०१३ मध्ये भूसंपादनाचा नवीन कायदा जाहीर केला. या कायद्यानुसारच शेतकºयांना मोबदला द्यावा, अशी मागणी पातकर यांनी लावून धरली होती. ही मागणी मान्य करण्यासाठी त्यांनी भूपृष्ठ विकासमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे चार वर्षे सातत्याने पाठपुरावा करत होते. गडकरी यांची दिल्लीत यासंदर्भात आठ ते दहा वेळा चर्चाही झाली होती. अखेर, सर्व वाटाघाटीनंतर शेतकºयांना सर्वोच्च मोबदला मिळाल्याचा दावा त्यांनी केला आहे.>‘समृद्धी’पेक्षाही जास्त मोबदलामुंबई-नागपूर समृद्धी महामार्गापेक्षाही जास्त मोबदला अंबरनाथ तालुक्यातील गावांना मिळणार असल्याचे पातकर यांनी सांगितले. केंद्र सरकारने मोबदला जाहीर केल्यामुळे येथील शेतकरी समाधानी आहे. त्यामुळे आता या कामाला लवकरच गती मिळावी आणि शेतकºयांना लवकरात लवकर हे पैसे त्यांच्या खात्यात जमा करून जमीन अधिग्रहणाची प्रक्रि या करून या कामाची तातडीने सुरुवात करावी, अशी मागणी पातकर यांनी केली आहे. यावेळी माजी नगरसेवक अविनाश पातकर, जयवंत मुठे, प्रभाकर पाटील यांच्यासह शेतकरी संघर्ष समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. बडोदा महामार्गाच्या मोजणीसाठी दोन वर्षापूर्वी सरकारने प्रयत्न सुरू केले होते. मात्र स्थानिक शेतकºयांनी ही मोजणी बंद पाडली होती. त्यानंतर पुन्हा सरकारने चोख पोलीस बंदोबस्तामध्ये ही मोजणी पूर्ण करण्यात आली. त्यामुळे शेतकºयांनी कायदेशीर मार्गाने लढा देत अधिकाधिक आर्थिक लाभ मिळविण्यासाठी प्रयत्न केले. त्यांच्या लढ्याला यश आले आहे.