शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
2
लाल किल्ल्याजवळ कारचा भीषण स्फोट, ८ ठार; 'प्रत्येक अँगलने तपास करा', गृहमंत्री अमित शाह यांचे तातडीचे आदेश!
3
दिल्लीत लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या स्फोटातील जखमी आणि मृतांची यादी समोर
4
दिल्लीतील ‘ब्लास्ट’, मागील पाच वर्षांतील केरळनंतरचा ठरला सर्वात मोठा स्फोट
5
लाल किल्ल्याजवळ स्फोट, दुर्घटनेनंतर देश हादरला! राहुल गांधी ते शरद पवार... कोण काय म्हणाले?
6
लाल किल्याजवळील स्फोटाने देश हादरला; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमित शाह यांना फोन, पोस्ट करत म्हणाले-
7
Red Fort Blast Video: अनेकांच्या उडाल्या चिंधड्या! स्फोटानंतरची दृश्ये बघून होईल थरकाप, नेमकी कुठे घडली घटना?
8
Prem Chopra : दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीत सुधारणा; लीलावती रुग्णालयात दाखल
9
Red Fort Blast:  कार हळूहळू सिग्नलजवळ येऊन थांबली अन् झाला स्फोट; पोलीस आयुक्तांनी सांगितली घटना
10
लाल किल्ल्याजवळील स्फोटानंतर महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये हाय अलर्ट! तपास यंत्रणा सतर्क
11
Delhi Red Fort Blast: मोठी बातमी! दिल्लीत लाल किल्ल्याजवळ भीषण स्फोट, 8 जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
12
कुणाचा हात तुटून पडला, कुणाचा कोथळा बाहेर आला; प्रत्यक्षदर्शीने सांगितली दिल्ली स्फोटाची हादरवून टाकणारी घटना
13
'त्या' जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवार, शीतल तेजवानींना पोलिसांकडून क्लीन चिट
14
भयानक कोसळणार ...! मी १९७१ पासून सोने खरेदी करतोय, पण...; रॉबर्ट कियोसाकी यांच्या दाव्याने खळबळ 
15
दहशतवाद्यांच्या टोळीत महिला डॉक्टरही सामील, थेट पाकिस्तानशी कनेक्शन; कारमध्ये घेऊन फिरत होती एके ४७!
16
जडेजाला संघाबाहेर काढण्यात धोनी सगळ्यात पुढे असेल! माजी क्रिकेटरनं त्यामागचं कारणही सांगून टाकलं
17
भारताच्या शेजारी देशांत भरतो 'नवरीचा बाजार', खरेदी करण्यासाठी चीनमधून येतात लोक! काय आहे प्रकार?
18
राष्ट्रवादीने हटवले तरी रुपाली ठोंबरे पाटील 'प्रवक्त्या'च; पोस्ट करत म्हणाल्या, 'अजित पवारांना भेटून...'
19
ताजमहालसमोर साखरपुडा...! दोनवेळा ऑस्ट्रेलियाला वर्ल्डकप जिंकविणारी भारताची सून होणार; कोण आहे ती...
20
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...

शेतकऱ्यांना पावला ‘राम’, कामातील अडथळे दूर, जमिनी देण्यास तयार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2018 03:41 IST

मुंबई-बडोदा प्रस्तावित महामार्गाच्या कामाला अंबरनाथ तालुक्यात आता कोणताही विरोध होणार नाही.

बदलापूर : मुंबई-बडोदा प्रस्तावित महामार्गाच्या कामाला अंबरनाथ तालुक्यात आता कोणताही विरोध होणार नाही. शेतकºयांना अपेक्षित असलेला मोबदला देण्यास सरकार तयार झाल्याने शेतकºयांनी आपल्या जमिनी देण्यास तयारी दर्शवली आहे. केंद्र सरकारच्या भूपृष्ठ मंत्रालयाकडून अंबरनाथ तालुक्यातील भूमी अधिग्रहण होणाºया २८७ शेतकºयांना भरघोेस मोबदला देत शेतकºयांच्या मागण्या पूर्ण केल्याचे संघर्ष समितीचे प्रमुख व बदलापूरचे माजी नगराध्यक्ष राम पातकर यांनी स्पष्ट केले.केंद्र सरकारने दिलेल्या मोबदल्यामुळे अंबरनाथ तालुक्यातील सर्व शेतकºयांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. शेतकºयांनी केंद्र सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले असून आपल्या जमिनी सरकारने अधिग्रहण करण्यासाठी त्यांनी संपूर्ण सहमती दर्शवली आहे. विशेष म्हणजे सात वर्षे हे शेतकरी सनदशीर मार्गांनी या मागणीचा पाठपुरावा पातकर यांच्या नेतृत्वाखाली करत होते. एकही आंदोलन न करता या पाठपुराव्याला यश आल्याचे पातकर यांनी सांगितले. केंद्र सरकारच्या भूपृष्ठ विभागाने हे पैसे जाहीर केल्यानंतर शनिवारी बदलापूरमध्ये शेतकºयांनी कात्रप येथे एकत्र जमून आनंदोत्सव साजरा केला.प्रस्तावित मुंबई-बडोदा महामार्गाचा मोठा भाग हा अंबरनाथ तालुक्यातील बदलापूर शहर आणि ग्रामीण भागातून जाणार आहे. बदलापूरमधील चामटोलीपासून ते डोके, दापोली, एरंजाड, सोनिवली, बदलापूर गाव या पट्ट्यातून जाणारा हा मार्ग २०११ मध्ये केंद्र सरकारने प्रस्तावित केला होता. त्यासाठी जमीन संपादनाची प्रक्रि या सुरू करण्यात आली होती. मात्र, ही प्रक्रि या सुरू असताना अनेक शेतकºयांनी त्यावर आक्षेप घेत मोबदल्याची रक्कम जाहीर करण्याची मागणी केंद्राकडे करत होते.दरम्यानच्या काळात केंद्र सरकारने २०१३ मध्ये भूसंपादनाचा नवीन कायदा जाहीर केला. या कायद्यानुसारच शेतकºयांना मोबदला द्यावा, अशी मागणी पातकर यांनी लावून धरली होती. ही मागणी मान्य करण्यासाठी त्यांनी भूपृष्ठ विकासमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे चार वर्षे सातत्याने पाठपुरावा करत होते. गडकरी यांची दिल्लीत यासंदर्भात आठ ते दहा वेळा चर्चाही झाली होती. अखेर, सर्व वाटाघाटीनंतर शेतकºयांना सर्वोच्च मोबदला मिळाल्याचा दावा त्यांनी केला आहे.>‘समृद्धी’पेक्षाही जास्त मोबदलामुंबई-नागपूर समृद्धी महामार्गापेक्षाही जास्त मोबदला अंबरनाथ तालुक्यातील गावांना मिळणार असल्याचे पातकर यांनी सांगितले. केंद्र सरकारने मोबदला जाहीर केल्यामुळे येथील शेतकरी समाधानी आहे. त्यामुळे आता या कामाला लवकरच गती मिळावी आणि शेतकºयांना लवकरात लवकर हे पैसे त्यांच्या खात्यात जमा करून जमीन अधिग्रहणाची प्रक्रि या करून या कामाची तातडीने सुरुवात करावी, अशी मागणी पातकर यांनी केली आहे. यावेळी माजी नगरसेवक अविनाश पातकर, जयवंत मुठे, प्रभाकर पाटील यांच्यासह शेतकरी संघर्ष समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. बडोदा महामार्गाच्या मोजणीसाठी दोन वर्षापूर्वी सरकारने प्रयत्न सुरू केले होते. मात्र स्थानिक शेतकºयांनी ही मोजणी बंद पाडली होती. त्यानंतर पुन्हा सरकारने चोख पोलीस बंदोबस्तामध्ये ही मोजणी पूर्ण करण्यात आली. त्यामुळे शेतकºयांनी कायदेशीर मार्गाने लढा देत अधिकाधिक आर्थिक लाभ मिळविण्यासाठी प्रयत्न केले. त्यांच्या लढ्याला यश आले आहे.