शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
4
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
5
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
6
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
7
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
8
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
9
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
10
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
11
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
12
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
13
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
14
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
15
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
16
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
17
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
18
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
19
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
20
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक

शेतकऱ्यांना १३७ कोटींचे पीककर्ज !

By admin | Updated: July 16, 2016 01:39 IST

खरिपाचे पीक घेण्यासाठी शेतकऱ्यांना होत असलेली आर्थिक चणचण दूर करण्यासाठी ठाणे व पालघर जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना आतापर्यंत १३७ कोटी २५ लाख रुपयांचे पीककर्जवाटप केल्याचा दावा

सुरेश लोखंडे,  ठाणेखरिपाचे पीक घेण्यासाठी शेतकऱ्यांना होत असलेली आर्थिक चणचण दूर करण्यासाठी ठाणे व पालघर जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना आतापर्यंत १३७ कोटी २५ लाख रुपयांचे पीककर्जवाटप केल्याचा दावा ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी (टीडीसीसी) बँकेने केला आहे. या वर्षी दोन्ही जिल्ह्यांतील शेतकऱ्यांची आर्थिक समस्या दूर करण्यासाठी रब्बी कर्जापोटी ४५ कोटी, तर खरीप कर्जापोटी १६५ कोटी ८० रुपये वाटप करण्याचे नियोजन टीडीसीसी बँकेने केले आहे. यापैकी २६ हजार २१ शेतकऱ्यांना १३७ कोटी २५ लाखांचे खरीप पीककर्जवाटप केले आहे. २४ हजार ८१० हेक्टर शेतातील पीक घेण्यासाठी शेतकऱ्यांना हा कर्जपुरवठा केला असल्याचे टीडीसीसी बँकेचे अध्यक्ष बाबाजी पाटील यांनी लोकमतला सांगितले. ठाणे जिल्ह्यातील १५ हजार ६०३ शेतकऱ्यांनी त्यांच्या १३ हजार २१९ हेक्टर शेतावरील पिकांच्या उमेदीवर ७४ कोटी ५४ लाख रुपये कर्ज घेतले आहे. तर, पालघर जिल्ह्यातील १० हजार ४१८ शेतकऱ्यांनी ११ हजार ५९० शेतीवर ६२ कोटी ७० लाख रुपयांचे कर्ज घेतले आहे. उर्वरित शेतकऱ्यांनादेखील या पीककर्जाचा लाभ ३० सप्टेंबरपर्यंत घेता येणार आहे. तर, पंतप्रधान पीकविम्याचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी ३१ जुलैपर्यंत बँकेत अर्ज दाखल करणे अपेक्षित असल्याचे टीडीसीसी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भगीरथ भोईर यांनी नमूद केले. शेतकऱ्यांना टीडीसीसी बँकेच्या ५९ शाखांद्वारेच पीककर्जाचे वाटप होत आहे. यासाठी ठाणे जिल्ह्यात २९ शाखा असून पालघर जिल्ह्यात ३० शाखा शेतकऱ्यांना कर्जपुरवठा करीत आहेत. जिल्ह्यातील भात या प्रमुख पिकापोटी हेक्टरी ६० हजार रुपये व नागली पिकाकरिता हेक्टरी ३५ हजार रुपये कर्ज शेतकऱ्यांना दिले जात आहे. यानुसार, या आर्थिक वर्षात रब्बी व खरीप पिकांसाठी ठाणे जिल्ह्यात ९० कोटी ८१ लाख, तर पालघर जिल्ह्यात १२० कोटी रुपये पीककर्जवाटप करण्याचा लक्ष्यांक आहे.