शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस-राष्ट्रवादीने दरोडे घातल्याने शेतक-यांनी आत्महत्या केल्या - सदाभाऊ खोत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2018 22:46 IST

मराठवाडा, विदर्भात कापूस पिकत होता. त्याचे मार्केटींग गेल्या पन्नास वर्षात झाले नाही. कापसावर प्रक्रिया करणा:या सूत गिरण्या या पश्चिम महाराष्ट्रात झाल्या.

कल्याण - मराठवाडा, विदर्भात कापूस पिकत होता. त्याचे मार्केटींग गेल्या पन्नास वर्षात झाले नाही. कापसावर प्रक्रिया करणा:या सूत गिरण्या या पश्चिम महाराष्ट्रात झाल्या. ज्या ठिकाणी जे पिकत होते. त्याठिकाणी त्याचे मार्केटींग करुन क्लस्टर निर्माण करायला हवे होते.   रोजगार उपलब्ध झाला असता  सरकारी अनुदानाच्या माध्यमातून काँग्रेस-राष्ट्रवादीने कोटय़ावधी रुपये लाटत त्यावर दरोडा घातला. त्यामुळेच महाराष्ट्रात आत्महत्या वाढल्या असा आरोप सहकार खात्याचे राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी येथे केले. 

उत्तर महाराष्ट्र खांदेश विकास मंडळ कल्याणच्या वतीने खडकपाडा येथील साई चौकात खांदेश फेस्टीवल-2018 चे उद्घाटन राज्यमंत्री खोत यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी पद्मश्री निलिमा मिश्र, आमदार नरेंद्र पवार, मंडळाचे अध्यक्ष विकास पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. उद्घाटनापश्चात राज्यमंत्री खोत यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना उपरोक्त आरोप केला. खोत यांनी सांगितले की, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने सरकारी अनुदाने लाटत सहकारी सूत कारखाने हे त्यांच्या मतदार संघात उभे केले. त्यामुळे शेतक:याच्या मालाला योग्य हमी भाव मिळाला नाही. ज्या ठिकाणी पिकले त्या ठिकाणी त्याचे उत्पादन विकले गेले नाही. त्यातून दृष्टचक्र निर्माण झाले. त्यामुळेच शेतकरी आत्महत्येकडे वळला. शेतक:याला आत्महत्येच्या गर्तेतून बाहेर काढण्याचे आमचे प्रयत्न सुरु आहेत. 2008 साली 6 हजार 900 कोटी रुपयांची शेतक:यांना कजर्माफी दिली गेली. आजच्या घडीला सरकारने 23 हजार कोटी रुपयांची कजर्माफी दिली आहे. अजूनही काही शेतक:यांच्या खात्यात कजर्माफीची रक्कम जमा होत आहे. ज्या बँका शेतक:याच्या कर्जाची वसूली करण्यासाठी सक्ती करीत असतील त्यावर त्याना सक्ती करु नये असे सांगण्यात आलेले आहे.

त्याचबरोबर सावकरी कर्ज असेल तर त्याच्या विरोधात सरकारकडे अथवा पोलिस ठाण्यात जाऊन शेतकरी तक्रार देऊ शकतात. त्याना तातडीने न्याय मिळेल. विदर्भातील सहा व मराठवाडय़ातील आठ ठिकाणी तसेच खांदेशातील जळगावात नानाजी देशमुख कृषी योजना लागू केली आहे. पाच हजार कोटीचा हा प्रकल्प आहे. आत्महत्या रोखण्यासाठी 2017 पर्यंत शेतक:यांना विजेचे कनेक्शन दिलेले आहे. तसेच या पुढे ऑगस्ट 2018 र्पयत विजेचे कनेक्शन दिले जाणार आहे. जलयुक्त शिवारामुळे राज्यातील शेती उत्पादन वाढले आहे. राज्य व केंद्राने शेतक:यांचे उत्पादन खरेदी केले आहे. गोडाऊन हाऊसफुल्ल झालेली आहेत. आत्ता खाजगी गोडाऊन घेऊन त्यात हे उत्पादन ठेवले जाणार आहे. निर्यातीला प्रोत्साहन देत शीतगृहे उभारण्यासाठी सरकार प्रयत्न शील आहे असे खोत यांनी सांगितले.

दरम्यान उत्तर प्रदेशात महिलेवर झालेल्या बलात्कार प्रकरणी खाेत यांनी ही घटना खेदजनक आहे. या प्रकरणाची चाैकशी केंद्र व त्याठिकाणचे राज्य सरकार चाैकशी करेल. या घटना भविष्यात घडू नये असे मला वाटते अशी प्रतिक्रिया खाेत यांनी दिली आहे.