शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
2
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
3
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
4
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार
5
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
6
दुसऱ्यांचा विनाश करणे हा धर्म नाही अधर्म आहे, शिक्षा झालीच पाहिजे - प्रेमानंद महाराज
7
‘पत्नीचे अनेक तरुणांशी अनैतिक संबंध, नशेच्या धुंदीत घालतात धिंगाणा, करतात अश्लील चाळे ’, पतीचे गंभीर आरोप, पुरावेही दिले   
8
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
9
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
10
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
11
जिद्द असावी तर अशी! अंगणवाडी ते IAS अधिकारी; ३ वेळा अपयश, मानली नाही हार, रचला इतिहास
12
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
13
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
14
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
15
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
16
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
17
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
18
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
19
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
20
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'

काँग्रेस-राष्ट्रवादीने दरोडे घातल्याने शेतक-यांनी आत्महत्या केल्या - सदाभाऊ खोत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2018 22:46 IST

मराठवाडा, विदर्भात कापूस पिकत होता. त्याचे मार्केटींग गेल्या पन्नास वर्षात झाले नाही. कापसावर प्रक्रिया करणा:या सूत गिरण्या या पश्चिम महाराष्ट्रात झाल्या.

कल्याण - मराठवाडा, विदर्भात कापूस पिकत होता. त्याचे मार्केटींग गेल्या पन्नास वर्षात झाले नाही. कापसावर प्रक्रिया करणा:या सूत गिरण्या या पश्चिम महाराष्ट्रात झाल्या. ज्या ठिकाणी जे पिकत होते. त्याठिकाणी त्याचे मार्केटींग करुन क्लस्टर निर्माण करायला हवे होते.   रोजगार उपलब्ध झाला असता  सरकारी अनुदानाच्या माध्यमातून काँग्रेस-राष्ट्रवादीने कोटय़ावधी रुपये लाटत त्यावर दरोडा घातला. त्यामुळेच महाराष्ट्रात आत्महत्या वाढल्या असा आरोप सहकार खात्याचे राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी येथे केले. 

उत्तर महाराष्ट्र खांदेश विकास मंडळ कल्याणच्या वतीने खडकपाडा येथील साई चौकात खांदेश फेस्टीवल-2018 चे उद्घाटन राज्यमंत्री खोत यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी पद्मश्री निलिमा मिश्र, आमदार नरेंद्र पवार, मंडळाचे अध्यक्ष विकास पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. उद्घाटनापश्चात राज्यमंत्री खोत यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना उपरोक्त आरोप केला. खोत यांनी सांगितले की, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने सरकारी अनुदाने लाटत सहकारी सूत कारखाने हे त्यांच्या मतदार संघात उभे केले. त्यामुळे शेतक:याच्या मालाला योग्य हमी भाव मिळाला नाही. ज्या ठिकाणी पिकले त्या ठिकाणी त्याचे उत्पादन विकले गेले नाही. त्यातून दृष्टचक्र निर्माण झाले. त्यामुळेच शेतकरी आत्महत्येकडे वळला. शेतक:याला आत्महत्येच्या गर्तेतून बाहेर काढण्याचे आमचे प्रयत्न सुरु आहेत. 2008 साली 6 हजार 900 कोटी रुपयांची शेतक:यांना कजर्माफी दिली गेली. आजच्या घडीला सरकारने 23 हजार कोटी रुपयांची कजर्माफी दिली आहे. अजूनही काही शेतक:यांच्या खात्यात कजर्माफीची रक्कम जमा होत आहे. ज्या बँका शेतक:याच्या कर्जाची वसूली करण्यासाठी सक्ती करीत असतील त्यावर त्याना सक्ती करु नये असे सांगण्यात आलेले आहे.

त्याचबरोबर सावकरी कर्ज असेल तर त्याच्या विरोधात सरकारकडे अथवा पोलिस ठाण्यात जाऊन शेतकरी तक्रार देऊ शकतात. त्याना तातडीने न्याय मिळेल. विदर्भातील सहा व मराठवाडय़ातील आठ ठिकाणी तसेच खांदेशातील जळगावात नानाजी देशमुख कृषी योजना लागू केली आहे. पाच हजार कोटीचा हा प्रकल्प आहे. आत्महत्या रोखण्यासाठी 2017 पर्यंत शेतक:यांना विजेचे कनेक्शन दिलेले आहे. तसेच या पुढे ऑगस्ट 2018 र्पयत विजेचे कनेक्शन दिले जाणार आहे. जलयुक्त शिवारामुळे राज्यातील शेती उत्पादन वाढले आहे. राज्य व केंद्राने शेतक:यांचे उत्पादन खरेदी केले आहे. गोडाऊन हाऊसफुल्ल झालेली आहेत. आत्ता खाजगी गोडाऊन घेऊन त्यात हे उत्पादन ठेवले जाणार आहे. निर्यातीला प्रोत्साहन देत शीतगृहे उभारण्यासाठी सरकार प्रयत्न शील आहे असे खोत यांनी सांगितले.

दरम्यान उत्तर प्रदेशात महिलेवर झालेल्या बलात्कार प्रकरणी खाेत यांनी ही घटना खेदजनक आहे. या प्रकरणाची चाैकशी केंद्र व त्याठिकाणचे राज्य सरकार चाैकशी करेल. या घटना भविष्यात घडू नये असे मला वाटते अशी प्रतिक्रिया खाेत यांनी दिली आहे.