शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
2
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
3
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
4
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
5
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
6
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
7
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
8
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
9
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
10
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
11
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
12
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
13
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
14
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
15
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
16
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
17
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
18
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
19
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
20
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...

भिवंडीतील बांधकाम व्यावसायिक जमीन बळकावेल या भीतीने शेतकऱ्यांचे ऐन थंडीत शेतावरच आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2022 19:37 IST

गोदाम प्रकल्पासाठी स्थानिक शेतकऱ्यांच्या जमिनी विकत घेत शेतकऱ्यांना मोबदला न देता उलट वाढीव क्षेत्राची खरेदी करत शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा प्रकार भिवंडीतील पिंपळास गावात समोर आला आहे.

नितिन पंडीत 

गोदाम प्रकल्पासाठी स्थानिक शेतकऱ्यांच्या जमिनी विकत घेत शेतकऱ्यांना मोबदला न देता उलट वाढीव क्षेत्राची खरेदी करत शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा प्रकार भिवंडीतील पिंपळास गावात समोर आला आहे. विशेष म्हणजे वाढीव जमीन विकत घेतल्यानंतर त्याचा कोणताही मोबदला शेतकऱ्यांना न देता परस्पर शेतावर मातीचा भराव टाकण्याचा प्रकार शेतकऱ्यांच्या लक्षात आल्या नंतर बांधकाम व्यावसायिक आपल्या जागेवर भरणी करेल या भीतीने शेतकऱ्यांनी आपल्या कुटुंबासह शनिवार पासून ऐन थंडीत शेतावरच आंदोलन करण्यास सुरुवात केली. 

भिवंडी तालुक्यातील पिंपळास येथील शेतकरी धोंडू तुकाराम पताळे व तानाजी मारुती पताळे यांची मोजे पिंपळघर येथे सर्व्हे नं ११७/३/अ ४५ गुंठे , ११७/१२ येथे १७ गुंठे तर सन ११९/१ ब २८ गुंठे अशी सुमारे सुमारे ९० गुंठे शेत जमीन असून पिंपळास ग्राम पंचायत हद्दीत भूमी वर्ल्ड या गोदाम संकुलाच्या व्यावसायिकाने गोदाम प्रकल्पासाठी ९० गुंठे जमिनी पैकी २८ गुंठे जमीन विकत घेतली होती . मात्र जमीनीचे खरेदीखत करतांना शेतकऱ्यांच्या अज्ञानाचा फायदा घेत व्यावसायिकाने संपूर्ण ९० गुंठे जमिनीचे खरेदी खत केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे . विशेष म्हणजे शेतकऱ्यांनी आपली फसवणूक झाली असल्याने भूमी वर्ल्डच्या बांधकाम व्यावसायिका विरोधात न्यायालयात दावा देखील दाखल केला असून सदर प्रकरण न्यायप्रविष्ठ असतांना शेतकऱ्यांच्या घरी साखरपुड्याच्या कार्यक्रम असल्याने शेतकरी घरच्या कार्यक्रमात व्यस्त असल्याचे पाहून व्यावसायिकाने शेतात मातीची भरणी करण्यास सुरुवात केली.

विशेष म्हणजे रात्री काळोखाचा फायदा घेत कुणालाही कानोसा लागणार नाही अशा पद्धतीने शेतात भरणी करण्यात येत होती मात्र आपल्या शेतात माती भरणी होत असल्याची माहिती शेतकऱ्यांना मिळताच शेतकऱ्यांनी आपल्या कुटुंबासह शेतावर धाव घेत कुटुंबासह कडाक्याच्या थंडीत आपल्या शेताचे रक्षण करीत आहेत . विशेष म्हणजे बांधकाम व्यावसायिक शेतजमिनीवर जी भरणी करत असून ती अनधिकृत असून शासनाचे स्वामित्व धनाची रक्कम न भारताचं केली असल्याचा आरोप देखील शेतकऱ्यांनी केला आहे . तर बांधकाम व्यावसायिक पैशाच्या जोरावर पोलीस प्रशासनाला हाताशी धरून आमच्यावर खोटे गुन्हे दाखल करून पोलिसांची भीती घालत आहे , मात्र जोपर्यंत बांधकाम व्यावसायिकाचा खोटारडेपणा समोर येऊन त्यावर गुन्हा दाखल होत नाही व आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही आमच्या जमिनीवरून हटणार नाही अशी प्रतिक्रिया शेतकरी धोंडू पताळे, तानाजी पताळे , गीतांजली पताळे यांनी दिली आहे.    

टॅग्स :bhiwandiभिवंडी