शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

३२ हजार गणपतींसह गौराईंना निरोप; घरीच विसर्जनावर भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2020 00:52 IST

दुपारपासून विसर्जन केंद्रांवर पोलिसांचा बंदोबस्त होता. अनेक घरगुती गणपती दुपारी लवकरच विसर्जित करण्यात येत होते. विसर्जनासाठीही घरातील मोजकीच मंडळी बाहेर पडलेली होती.

ठाणे : गुरुवारी ठाण्यातील विसर्जनघाट, कृत्रिम तलावांवर अतिशय शांतपणे, ढोलताशांविना, गर्दी टाळत एकूणच नियमांचे पालन करून गणरायांचे गौराईसह विसर्जन करण्यात आले. ठाणे पोलीस आयुक्तालयात ३२ हजार ४२६ गणपतींचे तर, १३ हजार ७२९ गौरार्इंचे विसर्जन झाले. विशेष म्हणजे अनेकांनी घरी किंवा सोसायटीच्या आवारात कृत्रिम तलाव उभारून विसर्जन केले. कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता शासनाने केलेल्या नियमांचे ठाणेकर भक्तगणांनी पालन करत सामाजिक भान राखलेले दिसले.

कोरोनाचे सावट असले तरी कोणतीही कमतरता न ठेवता बाप्पाची गेले सहा दिवस मनोभावे पूजा केल्यावर गुरुवारी गणपतीं-गौरार्इंचे विसर्जन करण्यात आले. ठाणे, कळवा, मुंब्रा आणि दिवा शहरांत ४० सार्वजनिक, ११ हजार ६७८ घरगुती गणेशमूर्ती आणि तीन हजार ७३० गौरी, भिवंडीत २७ सार्वजनिक, सहा हजार ३९० घरगुती आणि ६७० गौरी, कल्याण-डोंबिवलीत १४ सार्वजनिक, घरगुती सात हजार १५ आणि दोन हजार ४४२ गौरी तर, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूरमध्ये दोन सार्वजनिक, सात हजार २६० घरगुती आणि सहा हजार ८८७ गौरींचे विसर्जन झाले.

दुपारपासून विसर्जन केंद्रांवर पोलिसांचा बंदोबस्त होता. अनेक घरगुती गणपती दुपारी लवकरच विसर्जित करण्यात येत होते. विसर्जनासाठीही घरातील मोजकीच मंडळी बाहेर पडलेली होती. एरव्ही ढोलताशे, डीजेने दणाणणारे, गुलालाने माखणारे रस्ते यंदा शांत होते. केवळ ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या...’ असा जयघोष ऐकायला मिळत होता. विसर्जनस्थळी आरती, सेल्फीला बंदी असल्याने विसर्जन केंद्रांवर गर्दीही होत नव्हती. अनेक सार्वजनिक मंडळांच्या बाप्पांनाही शांततेत निरोप देण्यात आला. नियमानुसार बहुतांश सार्वजनिक मंडळांच्या गणेशमूर्ती या चार फुटांच्या होत्या. तसेच ठाणे महापालिकेने केलेली फिरती विसर्जन व्यवस्था, मूर्ती स्वीकार केंद्रांनाही चांगला प्रतिसाद मिळाला. अनेकांनी घरच्या घरीच बाप्पाचे विसर्जन केल्याने रस्त्यांवरही दरवर्षीपेक्षा कमी गर्दी होती.

टॅग्स :Ganesh Mahotsavगणेशोत्सव