शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
2
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
3
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
4
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
5
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
6
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
7
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
8
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
9
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
10
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
11
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
12
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
13
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
14
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
15
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
16
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
17
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
18
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
19
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
20
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार

‘त्या’ कुटुंबीयांच्या पुनर्वसनाचे भिजत घोंगडे

By admin | Updated: July 7, 2017 06:09 IST

कल्याण-डोंबिवली महापालिकेने २००० मध्ये केलेल्या पूर्वेतील राजर्षी शाहू उद्यान ते रमाबाई आंबेडकर चौक या रस्त्याच्या रुंदीकरणासाठी

लोकमत न्यूज नेटवर्क कोळसेवाडी : कल्याण-डोंबिवली महापालिकेने २००० मध्ये केलेल्या पूर्वेतील राजर्षी शाहू उद्यान ते रमाबाई आंबेडकर चौक या रस्त्याच्या रुंदीकरणासाठी २४ ते २५ घरे तोडण्यात आली. त्यात बाधित झालेल्या कुटुंबीयांचे पुनर्वसन केले जाईल, असे महापालिकेने न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले होते. मात्र, १७ वर्षांत पुनर्वसन न झाल्याने रहिवासी आंदोलनाच्या तयारीत आहेत.२०१३ मध्ये कोळसेवाडी प्रभागाचे तत्कालीन नगरसेवक उदय रसाळ यांनी बीएसयूपी योजनेतून बांधलेल्या इमारतींमध्ये या कुटुंबांचे पुनर्वसन करावे, असा प्रस्ताव मांडला होता. त्याला तत्कालीन महापौर वैजंयती घोलप यांनी मान्यता दिली होती. महापालिकेच्या पुनर्वसन समितीच्या ११ आॅगस्ट २०१४ ला झालेल्या बैठकीत १५ कुटुंबीयांचे कचोरे येथील बीएसयूपी इमारतीत पुनर्वसन करण्याचा निर्णयही घेण्यात आला. त्यामुळे रहिवाशांनी महापालिकेच्या संबंधित विभागाकडे कागदपत्रे जमा केली. मात्र, अद्याप पुनर्वसन न झाल्याचे रहिवाशांतर्फे त्यांच्या वकील अ‍ॅड. स्वाती गायकवाड यांनी महापालिका आयुक्तांना २० मार्चला पत्राद्वारे कळवले आहे.महापालिका प्रशासनाने आतापर्यंत विविध कारणे पुढे करून आमचे पुनर्वसन करण्यास दिरंगाई केली. त्यामुळे आमची घरे तुटल्यापासून आम्ही भाड्याच्या घरात राहत आहोत, असे राजेश गायकवाड, सुलोचना कांबळे, माया वाघमारे, प्रतिभा पवार आदी बाधितांनी सांगितले. स्थानिक नगरसेवक सचिन पोटे म्हणाले, २०१४ मध्ये पुनर्वसनाचा ठराव मंजूर झालेला असतानाही प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांच्या उदासीनतेमुळे हा प्रश्न प्रलंबित राहिलेला आहे. महापालिकेच्या विविध प्रकल्पांमध्ये बाधित झालेल्या नागरिकांच्या पुनर्वसनाची अनेक प्रकरणे प्रलंबित आहेत. त्यावर प्रशासनाकडून धोरणात्मक निर्णय लवकरच अपेक्षित आहे. राजर्षी शाहू उद्यान ते रमाबाई आंबेडकर चौक रस्त्यातील बाधितांचे अजूनही पुनर्वसन का झाले नाही, हा एक मोठा प्रश्नच आहे.-राजेंद्र देवळेकर, महापौर, केडीएमसी