शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

केडीएमसीच्या अभय योजनेचा फुसका बार, पालिकेचा दावा फोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2019 04:14 IST

कल्याण-डोंबिवली महापालिकेने मालमत्ताकराच्या वसुलीसाठी मालमत्ताधारकांकरिता अभय योजना लागू केली होती. सप्टेंबर ते नोव्हेंबर २०१८ या काळात ही योजना लागू होती.

- मुरलीधर भवारकल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेने मालमत्ताकराच्या वसुलीसाठी मालमत्ताधारकांकरिता अभय योजना लागू केली होती. सप्टेंबर ते नोव्हेंबर २०१८ या काळात ही योजना लागू होती. या योजनेच्या माध्यमातून महापालिकेच्या तिजोरीत एक हजार कोटी रुपये जमा होतील, असा दावा पालिका प्रशासनाने केला होता. प्रत्यक्षात हा दावा पुरता फोल ठरला आहे. या योजनेतून केवळ ६६ कोटी ३१ लाख रुपयांची वसुली करणे पालिकेला शक्य झाले आहे.महापालिकेने बिल्डरांसाठी ओपन लॅण्ड टॅक्समध्ये कराचे दर कमी करण्याचा ठराव मंजूर केला. त्यावरून प्रशासनाला टीकेचे लक्ष्य व्हावे लागले. बिल्डरांसाठी सूट दिली जाते आणि सामान्य नागरिकांच्या मालमत्ताकराच्या वसुलीसाठी जाचक पद्धती वापरल्या जातात. पालिका प्रशासनाने केवळ ओपन लॅण्डचा दर कमी केला नाही, तर बिल्डरांना अभय योजनाही लागू केली होती. केवळ बिल्डरांना अभय योजना लागू केल्यास आणखी अडचणी येण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने सावध पवित्रा घेत सरसकट सर्वच मालमत्ताधारकांना मालमत्ताकराची थकबाकी व दंडाची रक्कम भरण्यासाठी अभय योजना जाहीर केली. ओपन लॅण्ड टॅक्सचा विषय मंजूर होताच अभय योजना १८ सप्टेंबर ते ३० नोव्हेंबर या कालावधीसाठी लागू करण्यात आली. या योजनेत तीन टप्पे पाडण्यात आले. २५, ४० आणि ५० टक्के थकबाकीची रक्कम भरणाऱ्यांना मालमत्ताकराच्या व्याज व दंडाच्या रकमेत सूट दिली होती. अभय योजना जाहीर करताना मालमत्ताकराची एक हजार कोटी रुपयांची वसुली होईल, असा दावा प्रशासनाकडून करण्यात आला होता. एक हजार कोटी वसूल झाले, तर त्यावर महापालिकेस १२० कोटींचे व्याज मिळू शकले असते. मात्र, अभय योजनेपश्चात पालिकेकडे केवळ ६६ कोटी ३१ लाख रुपये जमा झाले. त्यामुळे अभय योजनेतून पालिकेस फायदा झालेला नाही. या योजनेमध्ये सामान्य नागरिक आणि बिल्डरांनी किती रुपयांचा भरणा केला, याचे वर्गीकरणही पालिकेच्या मालमत्ता विभागाकडे नाही.अभय योजनेव्यतिरिक्त महापालिकेस चालू वर्षाच्या मालमत्ताकराची वसुलीही करायची आहे. त्यासाठी ३४० कोटी रुपये लक्ष्य ठेवलेले आहे. अभय योजनेचे लक्ष्य न गाठल्याने मालमत्ता विभागाला वसुलीसाठी आणखी परिश्रम घ्यावे लागतील.बिल्डरांकडून ओपन लॅण्ड टॅक्सच्या चालू मागणीसह थकबाकी धरून ४१९ कोटी रुपये येणे बाकी होते. बिल्डरांनी ५० टक्के रक्कम भरल्याशिवाय त्यांना अभय योजना लागू करू नये, असे तत्कालीन आयुक्तांनी म्हटले होते. या प्रमुख अटीकडे दुर्लक्ष करण्यात आले.जमिनीवरील कर ३२१ कोटी रुपये असून, त्यावरील व्याजाची रक्कम १५५ कोटी आहे. इमारतीच्या कराची मूळ रक्कम ३६१ कोटी रुपये असून, त्यावरील व्याजाची रक्कम १७९ कोटी रुपये आहे. दोन्ही मिळून १०१८ कोटींची वसुली अपेक्षित होती.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिका