शहरं
Join us  
Trending Stories
1
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
2
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
3
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
4
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
5
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
6
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
7
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
8
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
9
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
10
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
11
"वरण-भात माझं आवडीचं जेवण", ट्रोल झाल्यावर विवेक अग्निहोत्रींची पलटी, म्हणाले- "मला अक्कल आली तेव्हा..."
12
Gold Silver Price 21 August: सोन्याच्या दरातील घसरण थांबली, चांदीमध्ये ₹१७४५ ची तेजी, सोनं किती महाग झालं? जाणून घ्या
13
Viral Video : जंगलात राहणाऱ्या व्यक्तीने आयुष्यात पहिल्यांदा खाल्ला रसगुल्ला; प्रतिक्रिया पाहून तुम्हीही खूश व्हाल!
14
'या' सरकारी योजनेत ज्येष्ठांना ५ वर्षांत मिळेल १२,००,००० पेक्षा जास्त व्याज; कोण घेऊ शकतो लाभ?
15
Video: कुत्रा येणाऱ्या-जाणाऱ्यांवर सतत भुंकायचा; टोळक्याने मालकालाच लाठ्या-काठ्यांनी बेदम चोपले...
16
नशीब असावं तर असं! पावसापासून वाचण्यासाठी दुकानात शिरली, काही वेळाने करोडपती बनून बाहेर आली
17
जिम सोडा अन् ब्रॉन्को टेस्टवर फोकस करा! टीम इंडियातील खेळाडूंना जपावा लागणार फिटनेसचा नवा 'मंत्र'
18
आरोग्य विमा आणि गंभीर आजार विम्यात काय आहे फरक? अनेकजण इन्शुरन्स घेताना करतात चूक!
19
रोज मृत्यूची भीती, तरीही खचली नाही सौंदर्यवती! कोण आहे Nadeen Ayoub? तिच्या नावाची चर्चा का?
20
श्वेताची विवाहित प्रियकरानेच केली हत्या; फिरायला घेऊन गेला आणि कार घातली तलावात, दोघांमध्ये काय बिनसलं होतं?

कारवाई थंडावल्याने पुनर्वसनाचा विसर; फेरीवाला संघटनांचे मागणीकडे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2019 00:11 IST

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रेल्वेस्थानकापासून १५० मीटर अंतरापर्यंत व्यवसाय करण्यास फेरीवाल्यांना मनाई करण्यात आली आहे.

कल्याण : एकीकडे फेरीवाल्यांच्या पुनर्वसनासाठी केडीएमसी प्रशासनाला मुहूर्त मिळत नसताना दुसरीकडे महापालिकेची कारवाई पूर्णपणे थंडावल्याने फेरीवाला संघटनांनाही फेरीवाला पुनर्वसनाच्या मागणीचा विसर पडला आहे. केडीएमसीच्या डोळेझाकपणाच्या भूमिकेमुळे रेल्वेस्थानक परिसरातील मनाई केलेल्या हद्दीत फेरीवाल्यांचे धंदे जोमात सुरू असल्याने उच्च न्यायालयाच्या आदेशाला महापालिकेकडून तिलांजली दिली जात असल्याचे चित्रही पाहावयास मिळत आहे.

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रेल्वेस्थानकापासून १५० मीटर अंतरापर्यंत व्यवसाय करण्यास फेरीवाल्यांना मनाई करण्यात आली आहे. या आदेशाची अंमलबजावणी काटेकोरपणे होणे अपेक्षित होते. पण, फेरीवाला अतिक्रमणविरोधी पथकाचे त्याकडे दुर्लक्ष झाल्याने न्यायालयाच्या आदेशाची ऐशीतैशी झाल्याची प्रचीती कल्याणमधील स्कायवॉक आणि स्थानक परिसरातील वास्तव पाहता येते. महापालिकेच्या सर्वेक्षणानुसार केडीएमसीच्या हद्दीत नऊ हजार ५३१ फेरीवाले आढळून आले आहेत. सर्वेक्षणात आढळलेल्या फेरीवाल्यांच्या पुनर्वसनाचा भाग म्हणून महापालिकेकडून त्यांना ओळखपत्रे दिली जाणार आहेत तसेच त्यांच्या व्यवसाय करण्याच्या जागा ठरवून दिल्या जाणार आहेत. पण, या कार्यवाहीला अद्याप मुहूर्त मिळालेला नसताना ‘मनाई’ केलेल्या हद्दीत बसणाऱ्या फेरीवाल्यांविरोधातील कारवाईही पूर्ण थंडावली आहे. ज्यावेळेस कारवाई सुरू होती, त्यावेळेस फेरीवाला संघटनांकडून फेरीवाला पुनर्वसनाची मागणी लावून धरत कारवाईला विरोध केला जायचा, पण सध्या केडीएमसीची कारवाईच थंडावल्याने फेरीवाल्यांचा धंदा बिनदिक्कत सुरू आहे. धंदाही तेजीत असल्याने फेरीवाला संघटनांना पुनर्वसनाच्या मागणीचाही विसर पडल्याचे बोलले जात आहे.

फेरीवाला अतिक्रमणविरोधी पथकाचे उपायुक्त सुनील जोशी यांच्या मोबाइलवर संपर्क साधला असता होऊ शकला नाही.फेरीवाल्यांच्या पुनर्वसनाच्या मागणीचा आम्हाला विसर पडलेला नाही. त्यांचे पुनर्वसन हे झालेच पाहिजे. लोकसभा निवडणुकीत व्यस्त असल्याचे कारण देत अधिकाऱ्यांनी पुनर्वसनाचा मुद्दा लांबवला आहे. आम्ही पुन्हा आयुक्तांना पत्र देऊन विशेष बैठक लावण्याची मागणी करणार आहोत. फेरीवाल्यांच्या पुनर्वसनाच्या मागणीबाबत एकदाच काय तो सोक्षमोक्ष लावावा, अशी आमचीभूमिका आहे. - अरविंद मोरे, अध्यक्ष, फेरीवाला कृती संघर्ष समिती