शहरं
Join us  
Trending Stories
1
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
2
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
3
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
4
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
7
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
8
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
9
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
10
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
11
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
12
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
13
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
14
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
15
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
IPL 2026: कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
17
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
18
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
19
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
20
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

कारवाई थंडावल्याने पुनर्वसनाचा विसर; फेरीवाला संघटनांचे मागणीकडे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2019 00:11 IST

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रेल्वेस्थानकापासून १५० मीटर अंतरापर्यंत व्यवसाय करण्यास फेरीवाल्यांना मनाई करण्यात आली आहे.

कल्याण : एकीकडे फेरीवाल्यांच्या पुनर्वसनासाठी केडीएमसी प्रशासनाला मुहूर्त मिळत नसताना दुसरीकडे महापालिकेची कारवाई पूर्णपणे थंडावल्याने फेरीवाला संघटनांनाही फेरीवाला पुनर्वसनाच्या मागणीचा विसर पडला आहे. केडीएमसीच्या डोळेझाकपणाच्या भूमिकेमुळे रेल्वेस्थानक परिसरातील मनाई केलेल्या हद्दीत फेरीवाल्यांचे धंदे जोमात सुरू असल्याने उच्च न्यायालयाच्या आदेशाला महापालिकेकडून तिलांजली दिली जात असल्याचे चित्रही पाहावयास मिळत आहे.

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रेल्वेस्थानकापासून १५० मीटर अंतरापर्यंत व्यवसाय करण्यास फेरीवाल्यांना मनाई करण्यात आली आहे. या आदेशाची अंमलबजावणी काटेकोरपणे होणे अपेक्षित होते. पण, फेरीवाला अतिक्रमणविरोधी पथकाचे त्याकडे दुर्लक्ष झाल्याने न्यायालयाच्या आदेशाची ऐशीतैशी झाल्याची प्रचीती कल्याणमधील स्कायवॉक आणि स्थानक परिसरातील वास्तव पाहता येते. महापालिकेच्या सर्वेक्षणानुसार केडीएमसीच्या हद्दीत नऊ हजार ५३१ फेरीवाले आढळून आले आहेत. सर्वेक्षणात आढळलेल्या फेरीवाल्यांच्या पुनर्वसनाचा भाग म्हणून महापालिकेकडून त्यांना ओळखपत्रे दिली जाणार आहेत तसेच त्यांच्या व्यवसाय करण्याच्या जागा ठरवून दिल्या जाणार आहेत. पण, या कार्यवाहीला अद्याप मुहूर्त मिळालेला नसताना ‘मनाई’ केलेल्या हद्दीत बसणाऱ्या फेरीवाल्यांविरोधातील कारवाईही पूर्ण थंडावली आहे. ज्यावेळेस कारवाई सुरू होती, त्यावेळेस फेरीवाला संघटनांकडून फेरीवाला पुनर्वसनाची मागणी लावून धरत कारवाईला विरोध केला जायचा, पण सध्या केडीएमसीची कारवाईच थंडावल्याने फेरीवाल्यांचा धंदा बिनदिक्कत सुरू आहे. धंदाही तेजीत असल्याने फेरीवाला संघटनांना पुनर्वसनाच्या मागणीचाही विसर पडल्याचे बोलले जात आहे.

फेरीवाला अतिक्रमणविरोधी पथकाचे उपायुक्त सुनील जोशी यांच्या मोबाइलवर संपर्क साधला असता होऊ शकला नाही.फेरीवाल्यांच्या पुनर्वसनाच्या मागणीचा आम्हाला विसर पडलेला नाही. त्यांचे पुनर्वसन हे झालेच पाहिजे. लोकसभा निवडणुकीत व्यस्त असल्याचे कारण देत अधिकाऱ्यांनी पुनर्वसनाचा मुद्दा लांबवला आहे. आम्ही पुन्हा आयुक्तांना पत्र देऊन विशेष बैठक लावण्याची मागणी करणार आहोत. फेरीवाल्यांच्या पुनर्वसनाच्या मागणीबाबत एकदाच काय तो सोक्षमोक्ष लावावा, अशी आमचीभूमिका आहे. - अरविंद मोरे, अध्यक्ष, फेरीवाला कृती संघर्ष समिती