शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात आनंदी देश धोक्यात! रशियन सैन्याने घेरले; युरोपमध्ये खळबळ, युक्रेननंतर..
2
अचानक बसला आग लागली, ५ जणांचा मृत्यू, काच फोडून चालक पळून गेला
3
४ दिवसांच्या संघर्षात भारत ठरला वरचढ, पाकिस्तानला मोठं नुकसान; न्यूयॉर्क टाईम्सचा रिपोर्ट
4
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
5
पाकिस्ताननंतर बांगलादेशनं IMF कडे पसरले हात, बुडत्या अर्थव्यवस्थेचं कारण देत 'इतक्या' पैशांची मागणी
6
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
7
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
8
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
9
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
10
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
11
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
12
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
13
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
14
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
15
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
16
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
17
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
18
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
19
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
20
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?

फडणवीसांच्या घूमजावाने बेअब्रू

By admin | Updated: December 21, 2015 01:15 IST

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या नोव्हेंबरमध्ये झालेल्या निवडणुकीच्या प्रचार सभांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या नोव्हेंबरमध्ये झालेल्या निवडणुकीच्या प्रचार सभांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्मार्ट सिटींतर्गत होणाऱ्या विकासासाठी तब्बल ६ हजार ५०० कोटी रुपयांचे गलेलठ्ठ पॅकेज जाहीर केले होते. मात्र, विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात काँग्रेसचे आमदार संजय दत्त यांनी मुख्यमंत्र्यांना विधानपरिषदेत विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात मुख्यमंत्री फडणवीस यांनी चक्क घूमजाव करीत असे पॅकेज जाहीर केलेच नसल्याचे सांगितले. त्यांच्या या कोलांटउडीमुळे केडीएमसीतील भाजप आमदार, नगरसेवकांची प्रचंड कोंडी झाली. निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेची युती तोडत भाजपाने स्वतंत्र निवडणूक लढवली. त्यामुळे आता त्यांच्या मदतीला शिवसेनाही नाही. उलटपक्षी भाजपाची बेअब्रू पाहण्यात शिवसैनिक धन्यता मानत आहेत. त्यामुळे भाजपाची अवस्था कात्रीत सापडल्यासारखी झाली आहे. ठाणे महापालिका ही ‘अ’ वर्गातील महापालिका असून त्यांनी एकूण ६ हजार ६३० कोटी रुपयांचा स्मार्ट सिटीचा प्रस्ताव केंद्राला पाठवलेला आहे. केडीएमसी ‘क’ वर्गातील महापालिका आहे. त्यामुळे तिचा स्मार्ट सिटीचा प्रस्ताव अवघ्या १ हजार ४४४ कोटींचा आहे. मग, फडणवीस यांनी जाहीर सभेत स्मार्ट सिटीकरिता साडेसहा हजार कोटी रुपयांची घोषणा कशी केली? आता हे उरलेले साडेपाच हजार कोटी रुपये मिळणार की नाही? राज्यात काँग्रेसचे सरकार असताना तत्कालीन मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचे आश्वासन दिले होते. निवडणुकीच्या तोंडावर दिलेले ते आश्वासन काँग्रेसला लाभदायक ठरले. पुन्हा सत्तेवर काँग्रेस आली तेव्हा विलासराव देशमुख हे मुख्यमंत्री झाले होते. अल्पावधीत शेतकऱ्यांची वीजमाफी बंद झाली. त्या वेळी निवडणुकीत अशी आश्वासने द्यायचीच असतात, असे देशमुख जाहीरपणे बोलले होते. त्या वेळी फडणवीस यांच्यासह भाजपाच्या नेत्यांनी गदारोळ केला होता. आता फडणवीस वेगळे काय करीत आहेत. फडणवीस आणि भाजपा इतर व्यक्ती व पक्षांपेक्षा वेगळे असल्याचा दावा करतात. तो किती फोल आहे, ते दिसून आले.मुख्यमंत्र्यांनी अशी तोंडाला पाने पुसण्याची किंवा विश्वासघात करण्याची काहीच गरज नव्हती. मुख्यमंत्र्यांनी नितीन गडकरी यांच्यासारखी शेकडो, हजारो कोटी रुपयांची भंपक आश्वासने दिली नसती, तरीही या वेळेस नागरिकांनी त्यांना आपलेसे केलेच असते. महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीतही नागरिकांनी भाजपाला मतदान करत न भुतो अशा ४२ जागांवर निवडून देत शिवसेनेच्या तोंडाला फेस आणला. कल्याण-डोंबिवलीमधील जनता सुज्ञ आहे. तिला पैशांचे प्रलोभन दाखवून भुलवण्याची गरज नाही. अगोदर २७ गावे महापालिका हद्दीत समाविष्ट करायची. त्यानंतर, त्यांच्याकरिता नगरपालिका स्थापन करण्याचा निर्णय घ्यायचा. त्याकरिता निवडणूक आयोगाची चपराक घ्यायची आणि निकालानंतर आता मूग गिळून बसायचे... हा सर्व घटनाक्रम नगरविकास विभागाचा कारभार किती भोंगळ आहे व मुख्यमंत्र्यांचे त्यावर कसे नियंत्रण नाही, हेच दाखवतो. आता त्यात पॅकेजची घोषणा व घूमजाव याची भर पडली आहे. राज्यातील सत्तेत शिवसेना सामील झाल्यापासून भाजपा व शिवसेना यांच्यातील संघर्ष व विसंवाद पदोपदी अनुभवास येत आहे. केडीएमसीच्या निवडणुकीत अगोदर घटस्फोट व नंतर सोयरीक झालेली असल्याने शिवसेना भाजपा व मुख्यमंत्री फडणवीस यांचे नाक कापण्याची संधी सोडणार नाही. सध्या वेगवेगळ्या समित्यांच्या निवडणुका होणे बाकी आहे. त्यामुळे कदाचित शिवसेना गप्प बसली असली तरी पॅकेजवरून केलेल्या घूमजावाचे भांडवल शिवसेना नक्की करणार, ही काळ्या दगडावरील रेघ आहे. मनसेला निवडणुकीत नागरिकांनी घरचा रस्ता दाखवला. त्यांनी गाजर वाटो आंदोलन करत मुख्यमंत्र्यांचा निषेध केला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अगोदर स्मार्ट सिटीला विरोध केला व नंतर पाठिंबा दर्शविला. परंतु, मनसेवर तोंडसुख घेण्याकरिता दाखवायला भाजपाकडे तोंड नाही, अशी विचित्र परिस्थिती आहे.