शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

फडणवीसांच्या घूमजावाने बेअब्रू

By admin | Updated: December 21, 2015 01:15 IST

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या नोव्हेंबरमध्ये झालेल्या निवडणुकीच्या प्रचार सभांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या नोव्हेंबरमध्ये झालेल्या निवडणुकीच्या प्रचार सभांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्मार्ट सिटींतर्गत होणाऱ्या विकासासाठी तब्बल ६ हजार ५०० कोटी रुपयांचे गलेलठ्ठ पॅकेज जाहीर केले होते. मात्र, विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात काँग्रेसचे आमदार संजय दत्त यांनी मुख्यमंत्र्यांना विधानपरिषदेत विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात मुख्यमंत्री फडणवीस यांनी चक्क घूमजाव करीत असे पॅकेज जाहीर केलेच नसल्याचे सांगितले. त्यांच्या या कोलांटउडीमुळे केडीएमसीतील भाजप आमदार, नगरसेवकांची प्रचंड कोंडी झाली. निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेची युती तोडत भाजपाने स्वतंत्र निवडणूक लढवली. त्यामुळे आता त्यांच्या मदतीला शिवसेनाही नाही. उलटपक्षी भाजपाची बेअब्रू पाहण्यात शिवसैनिक धन्यता मानत आहेत. त्यामुळे भाजपाची अवस्था कात्रीत सापडल्यासारखी झाली आहे. ठाणे महापालिका ही ‘अ’ वर्गातील महापालिका असून त्यांनी एकूण ६ हजार ६३० कोटी रुपयांचा स्मार्ट सिटीचा प्रस्ताव केंद्राला पाठवलेला आहे. केडीएमसी ‘क’ वर्गातील महापालिका आहे. त्यामुळे तिचा स्मार्ट सिटीचा प्रस्ताव अवघ्या १ हजार ४४४ कोटींचा आहे. मग, फडणवीस यांनी जाहीर सभेत स्मार्ट सिटीकरिता साडेसहा हजार कोटी रुपयांची घोषणा कशी केली? आता हे उरलेले साडेपाच हजार कोटी रुपये मिळणार की नाही? राज्यात काँग्रेसचे सरकार असताना तत्कालीन मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचे आश्वासन दिले होते. निवडणुकीच्या तोंडावर दिलेले ते आश्वासन काँग्रेसला लाभदायक ठरले. पुन्हा सत्तेवर काँग्रेस आली तेव्हा विलासराव देशमुख हे मुख्यमंत्री झाले होते. अल्पावधीत शेतकऱ्यांची वीजमाफी बंद झाली. त्या वेळी निवडणुकीत अशी आश्वासने द्यायचीच असतात, असे देशमुख जाहीरपणे बोलले होते. त्या वेळी फडणवीस यांच्यासह भाजपाच्या नेत्यांनी गदारोळ केला होता. आता फडणवीस वेगळे काय करीत आहेत. फडणवीस आणि भाजपा इतर व्यक्ती व पक्षांपेक्षा वेगळे असल्याचा दावा करतात. तो किती फोल आहे, ते दिसून आले.मुख्यमंत्र्यांनी अशी तोंडाला पाने पुसण्याची किंवा विश्वासघात करण्याची काहीच गरज नव्हती. मुख्यमंत्र्यांनी नितीन गडकरी यांच्यासारखी शेकडो, हजारो कोटी रुपयांची भंपक आश्वासने दिली नसती, तरीही या वेळेस नागरिकांनी त्यांना आपलेसे केलेच असते. महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीतही नागरिकांनी भाजपाला मतदान करत न भुतो अशा ४२ जागांवर निवडून देत शिवसेनेच्या तोंडाला फेस आणला. कल्याण-डोंबिवलीमधील जनता सुज्ञ आहे. तिला पैशांचे प्रलोभन दाखवून भुलवण्याची गरज नाही. अगोदर २७ गावे महापालिका हद्दीत समाविष्ट करायची. त्यानंतर, त्यांच्याकरिता नगरपालिका स्थापन करण्याचा निर्णय घ्यायचा. त्याकरिता निवडणूक आयोगाची चपराक घ्यायची आणि निकालानंतर आता मूग गिळून बसायचे... हा सर्व घटनाक्रम नगरविकास विभागाचा कारभार किती भोंगळ आहे व मुख्यमंत्र्यांचे त्यावर कसे नियंत्रण नाही, हेच दाखवतो. आता त्यात पॅकेजची घोषणा व घूमजाव याची भर पडली आहे. राज्यातील सत्तेत शिवसेना सामील झाल्यापासून भाजपा व शिवसेना यांच्यातील संघर्ष व विसंवाद पदोपदी अनुभवास येत आहे. केडीएमसीच्या निवडणुकीत अगोदर घटस्फोट व नंतर सोयरीक झालेली असल्याने शिवसेना भाजपा व मुख्यमंत्री फडणवीस यांचे नाक कापण्याची संधी सोडणार नाही. सध्या वेगवेगळ्या समित्यांच्या निवडणुका होणे बाकी आहे. त्यामुळे कदाचित शिवसेना गप्प बसली असली तरी पॅकेजवरून केलेल्या घूमजावाचे भांडवल शिवसेना नक्की करणार, ही काळ्या दगडावरील रेघ आहे. मनसेला निवडणुकीत नागरिकांनी घरचा रस्ता दाखवला. त्यांनी गाजर वाटो आंदोलन करत मुख्यमंत्र्यांचा निषेध केला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अगोदर स्मार्ट सिटीला विरोध केला व नंतर पाठिंबा दर्शविला. परंतु, मनसेवर तोंडसुख घेण्याकरिता दाखवायला भाजपाकडे तोंड नाही, अशी विचित्र परिस्थिती आहे.