शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
2
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
3
RCBच्या यश दयालवर बंदीची कारवाई; अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी 'या' स्पर्धेतून बाद
4
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
5
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
6
सर्वाधिक धावा कुटल्या, मग कर्णधाराला माघारी धाडलं, २२ वर्षांच्या ऑलराउंडरने जिंकवला सामना
7
सोशल मीडियावर मैत्री केली; चार तरुणींच्या जाळ्यात अडकलेल्या आजोबांनी आयुष्यभराची कमाई गमावली!
8
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
9
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
10
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
11
जिला गर्लफ्रेंड म्हटलं तिनेच राखी बांधली! मोहम्मद सिराज आणि आशा भोसलेंच्या नातीचं रक्षाबंधन, फोटो समोर
12
'धकधक गर्ल' माधुरीचं सौंदर्य पाहून घायाळ झालेला अभिनेता, एकही रुपया मानधन न घेता केला सिनेमा
13
तुरुंगात असलेल्या सोनम रघुवंशीच्या आजीचे निधन; नातीच्या क्रूर कृत्यामुळे बसलेला धक्का
14
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
15
Bigg Boss 19: पहलगाम हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीला 'बिग बॉस'ची ऑफर! शोमध्ये दिसणार असल्याची चर्चा
16
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
17
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
18
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  
19
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
20
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’

राजकारणी संमेलनाध्यक्ष ठरवतात यात तथ्य

By admin | Updated: November 6, 2016 04:14 IST

राजकारणी संमेलनाध्यक्ष ठरवतात हे आरोप निराधार नाहीत. त्यात काही अंशी तथ्य आहे, अशी भूमिका साहित्य संमेलनाध्यक्षपदाच्या रिंगणातील उमेदवार मदन

- जान्हवी मोर्ये,  डोंबिवलीराजकारणी संमेलनाध्यक्ष ठरवतात हे आरोप निराधार नाहीत. त्यात काही अंशी तथ्य आहे, अशी भूमिका साहित्य संमेलनाध्यक्षपदाच्या रिंगणातील उमेदवार मदन कुलकर्णी यांनी घेतली. अन्य उमेदवार जयप्रकाश घुमटकर आणि त्यांचे सूचक अशोक बागवे यांनी आधी हा आरोप केला होता. घुमटकर यांना असा अनुभव आला असेल म्हणून त्यांनी आरोप केला असेल, असेही कुलकर्णी म्हणाले. अन्य उमेदवार प्रवीण दवणे आणि अक्षयकुमार काळे यांनी मात्र या आरोपात तथ्य नसल्याचे स्पष्ट केले.साहित्य संमेलन पूर्वीही शेटजी-भटजींचे होते, ते आजही तसेच असल्याच्या आरोपाबद्दल विचारता कुलकर्णी यांनी साहित्य संमेलनाला जातीय रंग दिला जाऊ नये, असे मत मांडले. मी सुद्धा ब्राह्मण आहे. पण मी कधीही जातीपातीचे राजकारण केलेले नाही. साहित्यात विविध जातीचे लोक आहेत. तेही लिहितात. आता तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरसुद्धा ते ब्राह्मण असल्याची टीका केली जाते. त्याच्या तुलनेत आमचे पद अगदीच किरकोळ आहे, असे सांगत त्यांनी जातीय रंग देण्याच्या प्रयत्नांचा समाचार घेतला.गांधी प्रतिष्ठानचे गिरीश गांधी यांनी निवडणुपकीपूर्वीच अक्षयकुमार काळे यांना समर्थन दिले. निवडणुकीचे अर्ज भरण्यापूर्वी असे राजकारण सुरू झाल्याने मी मराठवाड्यात मी प्रचार करणार नाही, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली. प्रवीण दवणे व अक्षयकुमार काळे यांनी मात्र अध्यक्षपदाची निवडणूक निकोप व्हावी, तिला जातीय रंग देऊ नये, अशी अपेक्षा व्यक्त केली.साहित्य महामंडळात विशिष्ट लोकांची मक्तेदारी आहे. ठेकेदार आणि मध्यस्थ असे स्वरूप महामंडळाला आले आहे. त्यातूनच मक्तेदारीचा आरोप होतो. घुमटकर यांच्या याबाबतच्या आरोपात त्यांना आलेला अनुभव असेल. तो नाकारता येणार नाही. मी नागपूर भागाकडील असल्याने महामंडळाच्या राजकारणाशी मी परिचित आहे. इतकेच काय, मी उमेदवारी अर्ज भरला तेव्हा अक्षयकुमार काळे यांनी मला माघार घेण्यासाठी फोन केला होता. पण मी माघार घेतलेली नाही, असे सांगत कुलकर्णी यांनी महामंडळाच्या राजकारणाबाबत भूमिका मांडली.या निवडणुकीत आतापर्यंत घुमटकर यांनीच साहित्य महामंडळ, अध्यक्ष निवड आणि संमेलनावरील शेटजी-भटजींची छाप हे मुद्दे चर्चेत आणले आहेत. प्रगल्भता, परिपक्वता दाखवा : दवणेदवणे यांनी मात्र साहित्य महामंडळात कोणताही भेदभाव नसल्याचे मत मांडले. प्रचारासाठी मी फिरतो आहे. मला असा कोणताही अनुभव आलेला नाही. सर्व मंडळी अभ्यासू आहेत. सगळे साहित्यिक चांगले आहेत. साहित्यात सर्व प्रकारचे प्रवाह आहेत. ते त्यांचे त्यांचे विचार मांडतात. त्यात मक्तेदारीचा विषय उपस्थिती करणे मला तरी योग्य वाटत नाही. सध्याची संमेलने सगळ््या प्रवाहांना सामावून घेणारी होत आहेत. अध्यक्षपदासाठी जो साहित्यिक उभा राहतो. तो प्रगल्भ व परिपक्व असतो. त्याने कोणतेही वक्तव्य जबाबदारीपूर्वक करावे. त्याचे भान बहुधा घुमटकर यांना राहिले नसावे, असे मत दवणे यांनी घुमटकर व बागवे यांचा उल्लेख न करता मांडले. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून साहित्य संमेलनाला साहित्यप्रेमी हजेरी लावतात. त्याला शेटजी व भटजींचे संमेलन म्हणून हिणवणे हे साहित्यप्रेमींचा अवमान केल्यासारखे होईल, अशी भूमिकाही त्यांनी घेतली.संमेलन शेटजी-भटजींचे नव्हे : काळे साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत उभे राहिल्यावर अशा प्रकारची कोणतीही प्रतिक्रिया व मत व्यक्त करायचे नाही, असे माझे दोरण ठरल्याचे काळे यांनी स्पष्ट केले आणि आरोप-प्रत्यारोप, वादग्रस्त मुद्द्यांवर भूमिका घेण्यास नकार दिला. साहित्य संमेलनाच्या निवडणुकीचा एक अलिखित संकेत आपण पाळला पाहिजे.स्पर्धा जरूर व्वाही, पण अध्यक्षपदाची निवडणूक निकोपपणे पार पडली पाहिजे, असे ते म्हणाले. सााहित्य महामंडळात मक्तेदारी आहे, असे मला तरी वाटत नाही. संमेलनाला महाराष्ट्रातून इतके लोक येतात. त्यामुळे मला तरी संमेलन शेटजी- भटजींचे आहे, असे वाटत नाही. तसे वक्तव्य संमेलनाला येणाऱ्या विविध जातीपातींच्या समूहावर अविश्वास दाखविण्यासारखे आहे, असे काळे यांनी स्पष्ट केले.