शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
2
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
3
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
4
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
5
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
6
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
7
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट
8
अरे बापरे! डोक सटकलं आणि गेम झोनच्या कर्मचाऱ्याचे नाक युवकाने हातोड्याने फोडले
9
११ कोटींची लॉटरी जिंकणारा 'तो' व्यक्ती अखेर सापडला! रस्त्यावर विकत होता कांदे-बटाटे अन्...
10
Smartphones: २४ जीबी रॅम, ७५०० mAh बॅटरी आणि सुपरफास्ट चार्जिंग; जबरदस्त फोन लॉन्च!
11
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले
12
भारताला डिवचण्याचा प्रयत्न; मोहम्मद युनूस यांनी पाकिस्ताननंतर तुर्कीला दिला वादग्रस्त नकाशा
13
Viral Video: लग्नात स्वयंपाक बनवताना तरुणाचं घाणेरडं कृत्य; व्हिडिओ समोर येताच अटक!
14
३०, ४० आणि ५० व्या वर्षी 'कोट्यधीश' व्हायचेय? तुमच्या वयानुसार निवडा गुंतवणुकीची योग्य स्ट्रॅटेजी!
15
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
16
ICC Rankings : हातात विश्वचषकाचा 'दागिना'; पण जाता जाता लॉरानं 'वनडे क्वीन’ स्मृतीचा मुकूट हिसकावला!
17
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
18
सलग चौथ्या दिवशी बाजारात घसरण! गुंतवणूकदारांचे २.६ लाख कोटी पाण्यात; 'ही' आहेत ५ कारणे
19
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
20
मंदिराच्या गर्भगृहाची दुरुस्ती करताना सापडलं घबाड, कलशात होती सोन्याची एवढी नाणी...  

राजकारणी संमेलनाध्यक्ष ठरवतात यात तथ्य

By admin | Updated: November 6, 2016 04:14 IST

राजकारणी संमेलनाध्यक्ष ठरवतात हे आरोप निराधार नाहीत. त्यात काही अंशी तथ्य आहे, अशी भूमिका साहित्य संमेलनाध्यक्षपदाच्या रिंगणातील उमेदवार मदन

- जान्हवी मोर्ये,  डोंबिवलीराजकारणी संमेलनाध्यक्ष ठरवतात हे आरोप निराधार नाहीत. त्यात काही अंशी तथ्य आहे, अशी भूमिका साहित्य संमेलनाध्यक्षपदाच्या रिंगणातील उमेदवार मदन कुलकर्णी यांनी घेतली. अन्य उमेदवार जयप्रकाश घुमटकर आणि त्यांचे सूचक अशोक बागवे यांनी आधी हा आरोप केला होता. घुमटकर यांना असा अनुभव आला असेल म्हणून त्यांनी आरोप केला असेल, असेही कुलकर्णी म्हणाले. अन्य उमेदवार प्रवीण दवणे आणि अक्षयकुमार काळे यांनी मात्र या आरोपात तथ्य नसल्याचे स्पष्ट केले.साहित्य संमेलन पूर्वीही शेटजी-भटजींचे होते, ते आजही तसेच असल्याच्या आरोपाबद्दल विचारता कुलकर्णी यांनी साहित्य संमेलनाला जातीय रंग दिला जाऊ नये, असे मत मांडले. मी सुद्धा ब्राह्मण आहे. पण मी कधीही जातीपातीचे राजकारण केलेले नाही. साहित्यात विविध जातीचे लोक आहेत. तेही लिहितात. आता तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरसुद्धा ते ब्राह्मण असल्याची टीका केली जाते. त्याच्या तुलनेत आमचे पद अगदीच किरकोळ आहे, असे सांगत त्यांनी जातीय रंग देण्याच्या प्रयत्नांचा समाचार घेतला.गांधी प्रतिष्ठानचे गिरीश गांधी यांनी निवडणुपकीपूर्वीच अक्षयकुमार काळे यांना समर्थन दिले. निवडणुकीचे अर्ज भरण्यापूर्वी असे राजकारण सुरू झाल्याने मी मराठवाड्यात मी प्रचार करणार नाही, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली. प्रवीण दवणे व अक्षयकुमार काळे यांनी मात्र अध्यक्षपदाची निवडणूक निकोप व्हावी, तिला जातीय रंग देऊ नये, अशी अपेक्षा व्यक्त केली.साहित्य महामंडळात विशिष्ट लोकांची मक्तेदारी आहे. ठेकेदार आणि मध्यस्थ असे स्वरूप महामंडळाला आले आहे. त्यातूनच मक्तेदारीचा आरोप होतो. घुमटकर यांच्या याबाबतच्या आरोपात त्यांना आलेला अनुभव असेल. तो नाकारता येणार नाही. मी नागपूर भागाकडील असल्याने महामंडळाच्या राजकारणाशी मी परिचित आहे. इतकेच काय, मी उमेदवारी अर्ज भरला तेव्हा अक्षयकुमार काळे यांनी मला माघार घेण्यासाठी फोन केला होता. पण मी माघार घेतलेली नाही, असे सांगत कुलकर्णी यांनी महामंडळाच्या राजकारणाबाबत भूमिका मांडली.या निवडणुकीत आतापर्यंत घुमटकर यांनीच साहित्य महामंडळ, अध्यक्ष निवड आणि संमेलनावरील शेटजी-भटजींची छाप हे मुद्दे चर्चेत आणले आहेत. प्रगल्भता, परिपक्वता दाखवा : दवणेदवणे यांनी मात्र साहित्य महामंडळात कोणताही भेदभाव नसल्याचे मत मांडले. प्रचारासाठी मी फिरतो आहे. मला असा कोणताही अनुभव आलेला नाही. सर्व मंडळी अभ्यासू आहेत. सगळे साहित्यिक चांगले आहेत. साहित्यात सर्व प्रकारचे प्रवाह आहेत. ते त्यांचे त्यांचे विचार मांडतात. त्यात मक्तेदारीचा विषय उपस्थिती करणे मला तरी योग्य वाटत नाही. सध्याची संमेलने सगळ््या प्रवाहांना सामावून घेणारी होत आहेत. अध्यक्षपदासाठी जो साहित्यिक उभा राहतो. तो प्रगल्भ व परिपक्व असतो. त्याने कोणतेही वक्तव्य जबाबदारीपूर्वक करावे. त्याचे भान बहुधा घुमटकर यांना राहिले नसावे, असे मत दवणे यांनी घुमटकर व बागवे यांचा उल्लेख न करता मांडले. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून साहित्य संमेलनाला साहित्यप्रेमी हजेरी लावतात. त्याला शेटजी व भटजींचे संमेलन म्हणून हिणवणे हे साहित्यप्रेमींचा अवमान केल्यासारखे होईल, अशी भूमिकाही त्यांनी घेतली.संमेलन शेटजी-भटजींचे नव्हे : काळे साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत उभे राहिल्यावर अशा प्रकारची कोणतीही प्रतिक्रिया व मत व्यक्त करायचे नाही, असे माझे दोरण ठरल्याचे काळे यांनी स्पष्ट केले आणि आरोप-प्रत्यारोप, वादग्रस्त मुद्द्यांवर भूमिका घेण्यास नकार दिला. साहित्य संमेलनाच्या निवडणुकीचा एक अलिखित संकेत आपण पाळला पाहिजे.स्पर्धा जरूर व्वाही, पण अध्यक्षपदाची निवडणूक निकोपपणे पार पडली पाहिजे, असे ते म्हणाले. सााहित्य महामंडळात मक्तेदारी आहे, असे मला तरी वाटत नाही. संमेलनाला महाराष्ट्रातून इतके लोक येतात. त्यामुळे मला तरी संमेलन शेटजी- भटजींचे आहे, असे वाटत नाही. तसे वक्तव्य संमेलनाला येणाऱ्या विविध जातीपातींच्या समूहावर अविश्वास दाखविण्यासारखे आहे, असे काळे यांनी स्पष्ट केले.