शहरं
Join us  
Trending Stories
1
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
2
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
3
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
4
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
5
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
6
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
7
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
8
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
9
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
10
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
11
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
12
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार
13
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
14
'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा
15
VIRAL : चोरांनी कार चालकावर झाडली गोळी, पण पुढे जे झालं त्यानं स्वतःच घाबरले! Video बघून सगळेच झाले हैराण
16
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
17
जगातला 'असा' एकमेव देश, जिथे घरात पाळल्या जातात मगरी; विकून होते कोटी रुपयांची कमाई!
18
Who Is Yash Rathod : विदर्भाची रन मशीन! पोट्याचं द्विशतक अवघ्या ६ धावांनी हुकलं
19
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
20
यामाहाची FZ किती रुपयांनी स्वस्त झाली? जुना काळ आठवला..., फसिनो, आर१५ वर किती जीएसटी कमी झाला...

फ्युनिक्युलर रेल्वेचे श्रेय राष्ट्रवादीचेच

By admin | Updated: April 29, 2017 01:28 IST

अंबरनाथ तालुक्यातील मलंगगडावरील फ्युनिक्युलर रेल्वे प्रकल्पाचे सर्व श्रेय खरेतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आहे. २००८ मध्ये हा प्रकल्प मंजूर झाला.

डोंबिवली : अंबरनाथ तालुक्यातील मलंगगडावरील फ्युनिक्युलर रेल्वे प्रकल्पाचे सर्व श्रेय खरेतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आहे. २००८ मध्ये हा प्रकल्प मंजूर झाला. त्यासाठी कोट्यवधींचा निधी मिळाला, तेव्हा त्यास सुरुवात झाली. त्यावेळी किसन कथोरे हे आमच्याच पक्षाचे आमदार होते. त्यामुळे आघाडी सरकारच्या काळात या महत्त्वाच्या प्रकल्पाला मंजुरी मिळाली, हेच वास्तव आहे. पण, न केलेल्या कामांचे श्रेय घेण्याची शिवसेनेची सवय जुनीच आहे, असा घणाघाती आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार आनंद परांजपे यांनी केला आहे. परांजपे म्हणाले की, फ्युनिक्युलर रेल्वेसाठी कथोरे यांनीच नऊ वर्षे पाठपुरावा केला. त्यामुळे आता निदान प्रकल्प पूर्णत्वास जाताना तरी दिसत आहे. अन्यथा, अनेक गोष्टी जशा कागदावर आहेत, तसेच झाले असते, असा टोलाही त्यांनी खासदार डॉ. शिंदे यांना लगावला. मलंगगडावरील फ्युनिक्युलर रेल्वे प्रकल्प काही महिन्यांत पूर्ण होणार असल्याचे ‘लोकमत’मधील वृत्तांमुळे समजले आणि समाधान वाटल्याचे ते म्हणाले. हा प्रकल्प महत्त्वाचा आहे. तत्कालीन सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी कथोरे यांच्या प्रकल्पाला तातडीने मंजुरी देत कामाला लागण्याचे आदेश दिले होते, हे सर्वश्रुत आहे. त्यानंतरच्या काळात त्याचा शुभारंभ झाला. कामही सुरूही झाले. मात्र, त्यादरम्यान कथोरे यांचा मतदारसंघ बदलला गेला. पण, त्यानंतर अंबरनाथ मतदारसंघातील शिवसेनेच्या आमदारांनी या प्रकल्पात लक्ष का घातले नाही, याबाबतची त्यांना काहीच माहिती नव्हती. कथोरे यांनी यासाठी कसा आणि कुठून निधी आणला, ही सर्व पार्श्वभूमी तरी खासदार शिंदे यांना माहीत आहे का? विकासकामांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस कधीही मागेपुढे बघत नाही. ना प्रकल्प मंजुरीसाठी अडकवून ठेवत, त्यातील हे उदाहरण आहे, असे परांजपे म्हणाले. माझ्या खासदारकीच्या काळात मी ठाकुर्लीचा उड्डाणपूल, माणकोलीचा पूल असो, हे मंजूर करून घेतले होते. याची माहिती शिंदे यांना आहे, पण त्यासाठी सगळ्यांना विश्वासात घेत पुढे जाण्याचे औदार्य ते दाखवणार नाहीत, हे देखील सगळ्यांना माहीत आहे. ठाकुर्ली स्थानकाचा कायापालट आणि दिवा स्थानकाचे रूपडे पालटणार, हे देखील माझ्याच कारकिर्दीत मी रेल्वे बोर्डासह एमआरव्हीसीकडून मंजूर करवून आणले होते. खासदारांसाठी काम करणारे ज्येष्ठ शिवसैनिक या सगळ्यांचे साक्षीदार आहेत. ते याबाबत माझ्याविरोधात भाष्यच करू शकणार नाहीत, असा टोलाही त्यांनी लगावला. कल्याण-डोंबिवलीसह अन्य ठिकाणी सुरू असलेले प्रकल्प निश्चितच आघाडी सरकारच्या काळात सुरू झाले आहेत. तोच रेटा हे पुढे नेत आहेत. यांनी केलेली कामे सांगावीत. यांच्या संकल्पनेतून सुरू झालेले प्रकल्प आणि तडीस गेलेले प्रकल्प यांनी सांगावेत, असे खुले आव्हानही परांजपे यांनी दिले. (प्रतिनिधी)