शहरं
Join us  
Trending Stories
1
अंकारा हादरलं! लिबियाच्या मिलिट्री चीफना घेऊन जाणारं विमान कोसळलं, एअरपोर्ट तडकाफडकी बंद
2
PPF Calculator: दर महिन्याला ₹२,०००, ₹३,००० आणि ₹५,००० गुंतवले तर मॅच्युरिटीवर किती रक्कम मिळेल; पैसेही राहतील सुरक्षित
3
कोडीन कफ सिरप तस्करीचा मास्टरमाइंड शुभम जायसवालवर ५० हजारांचं इनाम; आता संपत्तीवर चालणार बुलडोझर!
4
पाहुणी म्हणून आली, लाखोंचे दागिने घेऊन पसार झाली; बंगळुरुमध्ये महिलेला अटक
5
बांगलादेश भारताकडून ५०,००० टन तांदूळ खरेदी करणार; दोन्ही देशांचे संबंध सुधारण्यासाठी युनूस सरकारचे प्रयत्न
6
३० वर्षांचा संसार, क्षणाचा राग अन् होत्याचं नव्हतं झालं; संशयी पतीने पत्नीला क्रूरपणे संपवलं
7
मोठा गेम प्लॅन! भाजपने शिंदेसेनेचे ठाण्यामध्येच दाबले नाक; मुंबईत अधिक जागा मागू नये म्हणून...
8
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २४ डिसेंबर २०२५: धनलाभ होईल, नवे काम हाती घ्याल!
9
कोर्टात कराड प्रथमच बोलला; पण न्यायाधीशांनी थांबवले; संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप निश्चित
10
संपादकीय: त्रिशंकूंची त्रेधातिरपीट! एचवन-बी व्हिसाधारक आज अक्षरशः लटकले आहेत...
11
महापालिका निवडणूक : मुंबईत भाऊबंध प्रयोगाचा आज आरंभ; पुण्यात पवार काका पुतण्यांचे मनाेमिलन होणार
12
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उद्धव ठाकरेंना काेर्टाचा दिलासा; मुलीनंतर पित्याची याचिका फेटाळली
13
बांधकाम मजुरांना किमान मास्क तरी द्या! तुम्हाला गरिबांची काळजी नाही; हायकोर्टाचे फटकारे   
14
पाच लाखांची लाच घेताना जीएसटी अधीक्षकाला अटक; अधिकाऱ्याकडे सापडले घबाड, सीबीआयची कारवाई
15
सरकारला मजुरांच्या घामाची किंमत आहे का? मनरेगा बदलण्यावर विस्तृत लेख...
16
प्रदूषणकारी मेट्रो-२ बीच्या आरएमसी प्लांटचे काम थांबवा; ‘एमएमआरडीए’च्या कंत्राटदाराला नोटीस 
17
निश्चित नसलेल्या जागी कुत्र्यांना अन्न देण्यापासून रोखणे गुन्हा ठरत नाही; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्वाळा  
18
म्हाडा अधिकारी राजकीय दबावाला बळी का पडतात? पुनर्विकास थांबविल्याने उच्च न्यायालयाचा सवाल
19
गृहप्रकल्पात गोदरेजची ११० कोटींची फसवणूक; अहमदाबादच्या सिद्धी ग्रुपविरुद्ध गुन्हा दाखल 
20
जयंत नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञान रत्न पुरस्कार; मराठी शास्त्रज्ञांचाही राष्ट्रपतींकडून गौरव
Daily Top 2Weekly Top 5

फ्युनिक्युलर रेल्वेचे श्रेय राष्ट्रवादीचेच

By admin | Updated: April 29, 2017 01:28 IST

अंबरनाथ तालुक्यातील मलंगगडावरील फ्युनिक्युलर रेल्वे प्रकल्पाचे सर्व श्रेय खरेतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आहे. २००८ मध्ये हा प्रकल्प मंजूर झाला.

डोंबिवली : अंबरनाथ तालुक्यातील मलंगगडावरील फ्युनिक्युलर रेल्वे प्रकल्पाचे सर्व श्रेय खरेतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आहे. २००८ मध्ये हा प्रकल्प मंजूर झाला. त्यासाठी कोट्यवधींचा निधी मिळाला, तेव्हा त्यास सुरुवात झाली. त्यावेळी किसन कथोरे हे आमच्याच पक्षाचे आमदार होते. त्यामुळे आघाडी सरकारच्या काळात या महत्त्वाच्या प्रकल्पाला मंजुरी मिळाली, हेच वास्तव आहे. पण, न केलेल्या कामांचे श्रेय घेण्याची शिवसेनेची सवय जुनीच आहे, असा घणाघाती आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार आनंद परांजपे यांनी केला आहे. परांजपे म्हणाले की, फ्युनिक्युलर रेल्वेसाठी कथोरे यांनीच नऊ वर्षे पाठपुरावा केला. त्यामुळे आता निदान प्रकल्प पूर्णत्वास जाताना तरी दिसत आहे. अन्यथा, अनेक गोष्टी जशा कागदावर आहेत, तसेच झाले असते, असा टोलाही त्यांनी खासदार डॉ. शिंदे यांना लगावला. मलंगगडावरील फ्युनिक्युलर रेल्वे प्रकल्प काही महिन्यांत पूर्ण होणार असल्याचे ‘लोकमत’मधील वृत्तांमुळे समजले आणि समाधान वाटल्याचे ते म्हणाले. हा प्रकल्प महत्त्वाचा आहे. तत्कालीन सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी कथोरे यांच्या प्रकल्पाला तातडीने मंजुरी देत कामाला लागण्याचे आदेश दिले होते, हे सर्वश्रुत आहे. त्यानंतरच्या काळात त्याचा शुभारंभ झाला. कामही सुरूही झाले. मात्र, त्यादरम्यान कथोरे यांचा मतदारसंघ बदलला गेला. पण, त्यानंतर अंबरनाथ मतदारसंघातील शिवसेनेच्या आमदारांनी या प्रकल्पात लक्ष का घातले नाही, याबाबतची त्यांना काहीच माहिती नव्हती. कथोरे यांनी यासाठी कसा आणि कुठून निधी आणला, ही सर्व पार्श्वभूमी तरी खासदार शिंदे यांना माहीत आहे का? विकासकामांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस कधीही मागेपुढे बघत नाही. ना प्रकल्प मंजुरीसाठी अडकवून ठेवत, त्यातील हे उदाहरण आहे, असे परांजपे म्हणाले. माझ्या खासदारकीच्या काळात मी ठाकुर्लीचा उड्डाणपूल, माणकोलीचा पूल असो, हे मंजूर करून घेतले होते. याची माहिती शिंदे यांना आहे, पण त्यासाठी सगळ्यांना विश्वासात घेत पुढे जाण्याचे औदार्य ते दाखवणार नाहीत, हे देखील सगळ्यांना माहीत आहे. ठाकुर्ली स्थानकाचा कायापालट आणि दिवा स्थानकाचे रूपडे पालटणार, हे देखील माझ्याच कारकिर्दीत मी रेल्वे बोर्डासह एमआरव्हीसीकडून मंजूर करवून आणले होते. खासदारांसाठी काम करणारे ज्येष्ठ शिवसैनिक या सगळ्यांचे साक्षीदार आहेत. ते याबाबत माझ्याविरोधात भाष्यच करू शकणार नाहीत, असा टोलाही त्यांनी लगावला. कल्याण-डोंबिवलीसह अन्य ठिकाणी सुरू असलेले प्रकल्प निश्चितच आघाडी सरकारच्या काळात सुरू झाले आहेत. तोच रेटा हे पुढे नेत आहेत. यांनी केलेली कामे सांगावीत. यांच्या संकल्पनेतून सुरू झालेले प्रकल्प आणि तडीस गेलेले प्रकल्प यांनी सांगावेत, असे खुले आव्हानही परांजपे यांनी दिले. (प्रतिनिधी)