शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
3
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
4
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
5
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
6
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
7
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
8
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
9
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
10
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
11
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
12
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
13
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
14
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
15
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
16
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
17
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
18
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
19
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
20
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!

फ्युनिक्युलर रेल्वेचे श्रेय राष्ट्रवादीचेच

By admin | Updated: April 29, 2017 01:28 IST

अंबरनाथ तालुक्यातील मलंगगडावरील फ्युनिक्युलर रेल्वे प्रकल्पाचे सर्व श्रेय खरेतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आहे. २००८ मध्ये हा प्रकल्प मंजूर झाला.

डोंबिवली : अंबरनाथ तालुक्यातील मलंगगडावरील फ्युनिक्युलर रेल्वे प्रकल्पाचे सर्व श्रेय खरेतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आहे. २००८ मध्ये हा प्रकल्प मंजूर झाला. त्यासाठी कोट्यवधींचा निधी मिळाला, तेव्हा त्यास सुरुवात झाली. त्यावेळी किसन कथोरे हे आमच्याच पक्षाचे आमदार होते. त्यामुळे आघाडी सरकारच्या काळात या महत्त्वाच्या प्रकल्पाला मंजुरी मिळाली, हेच वास्तव आहे. पण, न केलेल्या कामांचे श्रेय घेण्याची शिवसेनेची सवय जुनीच आहे, असा घणाघाती आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार आनंद परांजपे यांनी केला आहे. परांजपे म्हणाले की, फ्युनिक्युलर रेल्वेसाठी कथोरे यांनीच नऊ वर्षे पाठपुरावा केला. त्यामुळे आता निदान प्रकल्प पूर्णत्वास जाताना तरी दिसत आहे. अन्यथा, अनेक गोष्टी जशा कागदावर आहेत, तसेच झाले असते, असा टोलाही त्यांनी खासदार डॉ. शिंदे यांना लगावला. मलंगगडावरील फ्युनिक्युलर रेल्वे प्रकल्प काही महिन्यांत पूर्ण होणार असल्याचे ‘लोकमत’मधील वृत्तांमुळे समजले आणि समाधान वाटल्याचे ते म्हणाले. हा प्रकल्प महत्त्वाचा आहे. तत्कालीन सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी कथोरे यांच्या प्रकल्पाला तातडीने मंजुरी देत कामाला लागण्याचे आदेश दिले होते, हे सर्वश्रुत आहे. त्यानंतरच्या काळात त्याचा शुभारंभ झाला. कामही सुरूही झाले. मात्र, त्यादरम्यान कथोरे यांचा मतदारसंघ बदलला गेला. पण, त्यानंतर अंबरनाथ मतदारसंघातील शिवसेनेच्या आमदारांनी या प्रकल्पात लक्ष का घातले नाही, याबाबतची त्यांना काहीच माहिती नव्हती. कथोरे यांनी यासाठी कसा आणि कुठून निधी आणला, ही सर्व पार्श्वभूमी तरी खासदार शिंदे यांना माहीत आहे का? विकासकामांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस कधीही मागेपुढे बघत नाही. ना प्रकल्प मंजुरीसाठी अडकवून ठेवत, त्यातील हे उदाहरण आहे, असे परांजपे म्हणाले. माझ्या खासदारकीच्या काळात मी ठाकुर्लीचा उड्डाणपूल, माणकोलीचा पूल असो, हे मंजूर करून घेतले होते. याची माहिती शिंदे यांना आहे, पण त्यासाठी सगळ्यांना विश्वासात घेत पुढे जाण्याचे औदार्य ते दाखवणार नाहीत, हे देखील सगळ्यांना माहीत आहे. ठाकुर्ली स्थानकाचा कायापालट आणि दिवा स्थानकाचे रूपडे पालटणार, हे देखील माझ्याच कारकिर्दीत मी रेल्वे बोर्डासह एमआरव्हीसीकडून मंजूर करवून आणले होते. खासदारांसाठी काम करणारे ज्येष्ठ शिवसैनिक या सगळ्यांचे साक्षीदार आहेत. ते याबाबत माझ्याविरोधात भाष्यच करू शकणार नाहीत, असा टोलाही त्यांनी लगावला. कल्याण-डोंबिवलीसह अन्य ठिकाणी सुरू असलेले प्रकल्प निश्चितच आघाडी सरकारच्या काळात सुरू झाले आहेत. तोच रेटा हे पुढे नेत आहेत. यांनी केलेली कामे सांगावीत. यांच्या संकल्पनेतून सुरू झालेले प्रकल्प आणि तडीस गेलेले प्रकल्प यांनी सांगावेत, असे खुले आव्हानही परांजपे यांनी दिले. (प्रतिनिधी)