शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
3
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
4
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
5
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
6
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
7
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
8
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
9
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
10
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
11
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
12
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
13
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
14
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
15
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
16
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
17
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
18
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
19
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...
20
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका

नकारातूनच माणूस पुढची पायरी चढतो आणि उत्कर्ष होतो

By admin | Updated: July 4, 2017 06:35 IST

अभिनयात करिअर करण्यासाठी चांगले दिसणे, विचारात सुसूत्रता पाहिजे, हे सर्व उपयुक्त साधने आहेत. मात्र, आपल्या आयुष्यात

लोकमत न्यूज नेटवर्कडोंबिवली : अभिनयात करिअर करण्यासाठी चांगले दिसणे, विचारात सुसूत्रता पाहिजे, हे सर्व उपयुक्त साधने आहेत. मात्र, आपल्या आयुष्यात कुणीतरी आपल्याला नाकरणारे पाहिजेत. हे आयुष्यात घडलेच पाहिजे. नकारातूनच माणूस पुढची पायरी चढायला शिकतो, असे मत सुप्रसिद्ध अभिनेत्री-दिग्दर्शिका आणि निवेदिका संपदा कुलकर्णी यांनी व्यक्त केले. ‘वेध’ या संस्थेतर्फे कलाकरांसाठी घेतल्या जाणाऱ्या ‘वेध-भेट’ या कार्यक्रमात कुलकर्णी यांनी मुलांशी संवाद साधला. रामनगरमधील आनंद बालभवनमध्ये रविवारी झालेल्या हा कार्यक्रम झाला. त्यात सौरभ सोहोनी यांनी त्यांच्याशी संवाद साधला. या वेळी संस्थेचे संकेत ओक, मधुरा ओक, दीपाली काळे, भाग्यलक्ष्मी पडसलगीकर, पै लायब्ररीचे पुडंलिक पै आदी मान्यवर उपस्थित होते. कुलकर्णी म्हणाल्या, ‘नागमंडल’ या नाटकासाठी जर्मनीला जाण्याची संधी मला महाविद्यालयीन जीवनात चालून आली होती. निवड झाल्यावर लोकांनी डोक्यावर घेतले. विजया मेहता यांनी निवडले त्यामुळे माझे करिअर चांगले झाले, अशी चर्चा सुरू होती. ऐनवेळी त्यांनी तू या नाटकात नाही, असे त्यांनी सांगितले. विजयातार्इंनी दिलेल्या नकारानंतर त्यांच्या हस्तेच पुरस्कार घेणार, एवढे मनाशी पक्का ठरवले. त्यांचा नकार माझ्यासाठी महत्त्वाचा ठरला. प्रत्येक व्यक्तीचे पाय मातीचे असतात, हे दाखणारा तो क्षण होता. त्यांच्याविषयी माझ्या मनात कोणतीही द्वेषाची भावना नव्हती. मी पुढे त्यांच्याकडून ११ पुरस्कार घेतले. पुढचे हजारो होकारांसाठी तो पहिला नकार महत्त्वाचा होता. नाट्यसृष्टीत मोजक्याच महिलांनी जग पाहिले आहे. त्यामुळे विस्तृत दृष्टीकोन विजयातार्इंकडे आहे. त्यामुळे पुढे मी त्यांच्याकडे नाट्य प्रशिक्षणासाठीही गेली, असे त्यांनी सांगितले. रिमा लागू यांच्यासोबत ‘घर तिघां’चे हे नाटक केले. त्यावेळी दौऱ्याला बस निघणार म्हणजे काय हे माहीत नव्हते. मी पहिल्या सीटवर बसली होती. ती सीट मुख्य अभिनेत्रीची होती. हे समजल्यावर चौथ्या सीटवर बसली. त्या पहिल्या सीटवर जाण्यासाठी अनेक कलाकृती द्याव्या लागणार आहेत, हा अंकुर माझ्यात रीमातार्इंमुळे फुटला, असे त्या म्हणाल्या.मी निवेदन करताना कंटाळा येणार नाही, याची काळजी घेते. निवेदन हे खूप आव्हानात्मक क्षेत्र आहे. चांगल्या व मेहनती लोकांसाठी हे खूप चांगला क्षेत्र आहे. या क्षेत्रात संयम असावा लागतो. अनेक गोष्टी आवडत नसताना कराव्या लागतात. कारण आपल्याकडे दिग्दर्शकाचा दृष्टीकोन नसतो. हे प्रशिक्षण आपल्याला कोणतीही संस्था देऊ शकत नाही. माझा आवाज समजंस असावा, असे नेहमी वाटते. कारण मी शिक्षिकेची मुलगी आहे. माझी आई मला समजून सांगत असे. चांगल्या आवाजासाठी व्यायाम केला पाहिजे, असा सल्ला त्यांनी दिला.बालनाट्य प्रशिक्षकांनी मक्तेदारी घेऊ नयेबालनाट्य प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांमध्ये स्वामीत्व भावना तयार होते. जो तो आपली पुंजी घेऊन आला आहे. तो त्या मार्गानेच जाणार आहे. संस्थांनी कुणीची ही मक्तेदारी घेऊ नये. संस्थेत शिक्षण देणाऱ्या पाच व्यक्तींच्या अभिनयाच्या स्टाइलशिवाय खूप मोठे जग आहे. संस्था प्रशिक्षकांनी गुरू बनल्यावर थांबू नका. आयुष्यभर शिष्य बनून राहा, असा सल्ला संस्थांनाही कुलकर्णी त्यांनी या वेळी दिला. समाधान महत्त्वाचे : एखाद्या गोष्टींचे मॅनेजमेंट तेव्हाच होते. जेव्हा ती गोष्ट आपल्याला आवडते. त्यामुळे ज्या गोष्टीत मनापासून समाधान मिळते तीच गोष्ट करा, असे आवाहनही त्यांनी या वेळी केले.