शहरं
Join us  
Trending Stories
1
दिवाळीदरम्यानच करणार होते ब्लास्ट, पण...; दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात धक्कादायक खुलासा!
2
गुप्त दौरा... अन डील पक्की...! इस्रायल भारताला दोन शक्तिशाली क्षेपणास्त्रे देणार; पाकिस्तान, चीन सगळेच टप्प्यात...
3
Delhi Blast : "मला डिस्टर्ब करू नका, महत्त्वाचं काम करतोय..."; कुटुंबाशी अनेक महिने बोलायचा नाही उमर
4
गाड्या पुढे सरकल्या अन्....; दिल्ली कार स्फोटाचा 'तो' भीषण VIDEO पहिल्यांदाच समोर, CCTV पडले बंद
5
३० हजारांपेक्षा कमी आहे सॅलरी तरी, SIP द्वारे बनवू शकता १ कोटींचा फंड; महिन्याला किती करावी लागेल गुंतवणूक?
6
"सकाळी मुलीला शाळेत सोडायला गेली अन् पतीसह एकाने बंधक बनवले, मग..."; IAS पत्नीचा खळबळजनक दावा
7
Accident:पोलीस व्हॅनच्या धडकेत एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू, परिसरात हळहळ!
8
२३ नोव्हेंबरपर्यंत कोकण रेल्वेवर मेगा ब्लॉक; सेवांवर मोठा परिणाम, तुमचं तिकीट याच वेळेत आहे?
9
Samudra Shastra: नुसत्या हसण्यावरून स्वभाव ओळखता येतो? समुद्र शास्त्रात मिळते उत्तर
10
वनडे करिअर टिकवण्यासाठी हिटमॅन रोहित शर्माला BCCI ची 'ती' अट मान्य; विराट कोहलीचं काय?
11
Groww IPO Listing: केवळ ५% होता GMP, पण कंपनीची धमाकेदार एन्ट्री; पहिल्याच दिवशी 'या' शेअरनं दिला २३% पेक्षा जास्त फायदा
12
Delhi Blast: दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणी महत्त्वाची अपडेट, संशयितांना कार विकणारा डीलर ताब्यात!
13
Delhi Blast : २६ जानेवारी, दिवाळीला स्फोट करण्याचा होता प्लॅन, पण...; दिल्ली स्फोट प्रकरणात मुझम्मिलचा मोठा खुलासा
14
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात आणखी एक दहशतवादी डॉक्टर अटकेत; देशभरात छापेमारी सुरू...
15
निवृत्तीनंतरचे जीवन सुरक्षित! एकदाच गुंतवणूक करा आणि आयुष्यभर १ लाखाहून अधिक पेन्शन मिळवा
16
“महायुती विजयी झाली पाहिजे”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांना सूचना
17
प्रसिद्ध अभिनेत्रीच्या मैत्रिणीचा दिल्ली स्फोटात मृत्यू, दु:ख व्यक्त करत म्हणाली, "इतका क्रूर..."
18
कोल्हापूर: बिबट्याच्या हल्ल्यात बैल ठार, गगनबावडा तालुक्यात भीतीचे वातावरण
19
पतीसोबत तलाक, मग बनली प्रोफेसर; 'जैश-ए-मोहम्मद'मध्ये महिलांच्या भर्तीची होती जबाबदारी! दहशतवादी डॉ. शाहीनची संपूर्ण कुंडली
20
AQIS: मुंब्रा येथील शिक्षकाच्या घरावर एटीएसचा छापा; पुण्यातील'अल-कायदा' प्रकरणाशी कनेक्शन

सातपट बिलांनी लोकांचे डोळे पांढरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2018 03:02 IST

मुख्यमंत्र्यांची जाचक करआकारणी टाळण्याची घोषणा होत असतानाच वसुलीचा दणका; २७ गावांत नाराजी

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेतून २७ गावे वगळण्यात येतील, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अलीकडेच विधिमंडळात दिले आहे. त्याचबरोबर येथे मालमत्ता कराची आकारणी अनेक पटीत जाचक स्वरूपात करु नये असे सूचित केले आहे. मात्र मुख्यमंत्र्यांची घोषणा होत असतानाच या गावातील नागरिकांकडून सातपट मालमत्ता कर वसूल करण्याची बिले हाती पडली. मुख्यमंत्र्यांच्या घोषणेचे रीतसर आदेश निघण्यास विलंब लागत असला तरी तूर्त सरकारच्या कथनी व करणीतील अंतर दिसल्याने नागरिकांमध्ये रोष निर्माण झाला आहे.जून २०१५ मध्ये महापालिकेत २७ गावे समाविष्ट करण्यात आली. त्यांना किमान तीन वर्षे मालमत्ता कराच्या आकारणीत वाढ करु नये, असा सररकारी नियम आहे. महापालिकेने यंदाच्या अर्थिक वर्षापासून २७ गावांतील मालमत्ताधारकाना सहा ते सातपटीने कर आकारणी करण्याकरिता बिले पाठवली आहेत. २७ गावांत सोयीसुविधा पुरवल्या जात नाहीत त्यामुळे जास्तीचा कर भरणार नाही. या मुद्द्यावर संघर्ष समितीने मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन हा विषय मांडला होता. तसेच विधिमंडळात काही सदस्यांनी हा मुद्दा उपस्थित केला.मुख्यमंत्र्यांनी लवकरच २७ गावे वेगळी करण्यात येणार असल्यामुळे महापालिकेने जास्त कराची आकारणी करू नये, असे स्पष्ट केले. महापालिकेने २७ गावांतील एका अधिकृत इमारतीच्या मालमत्ता धारकांना चक्क सात लाख ५० हजार रुपयांचे मालमत्ता कराचे बिल धाडले आहे. यापूर्वी ग्रामपंचायतीच्या मालमत्ता करानुसार ६७ हजार रुपये मालमत्ता कर भरावा लागत होता. सोसायटीने हा कर भरला आहे. अन्यथा महापालिकेकडून व्याज आकारले गेले असते. याविषयी जाब विचारून देखील महापालिकेचे अधिकारी धड उत्तर देत नाहीत.सातपटीने कर आकारणी केली जात असताना बदल्यात सुविधा काय देणार याचे उत्तर महापालिकेच्या अधिकारी वर्गाकडे नाही. सुविधा पुरवल्या जात नसतील तर जाचक कर भरायचा का, असा सवाल रहिवाशांनी केला आहे. २७ गावे वेगळी केली जाणार असतील तर महापालिकेने कराची वसूल करू नये, असे रहिवाशांंचे मत आहे.महापालिकेने २७ गावांकरिता अग्निशमन केंद्राची सुविधा पुरवावी, असे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने महापालिकेस सूचित केले आहे. मात्र महापालिकेने ही सुविधा पुरवलेली नाही. एखाद्या इमारतीचे बांधकाम करण्यासाठी अग्निशमन दलाचा ना हरकत दाखला घ्यावा लागतो. हा दाखला कोणत्या स्तरावर मिळेल. कोणाकडून मिळेल याची सुस्पष्टता महापालिकेकडून केली जात नाही. मात्र अग्निशमन केंद्राची उभारणी होत नाही ही विसंगती आहे.ग्रामपंचायतीच्या काळात जिल्हा परिषदेकडून या इमारतीला बांधकाम परवानगी दिली आहे. ती परवानगी खोटी ठरवण्याचा घाट महापालिकेचे अधिकारी घालत आहेत. यामुळे बेकायदा बांधकामे करणारे मोकाट व अधिकृत रेराची नोंदणी करुन काम करणाऱ्या बिल्डरांची महापालिकेकडून छळवणूक केली जात असल्याचा आरोप केला जात आहे.या २७ गावात सगळीच बांधकामे अनधिकृत नाहीत. अगदी जेमतेम १ टक्के बांधकामे अधिकृत असली व त्यांनी ‘रेरा’ची नोंदणी केली असेल तर त्याच अधिकृत इमारतधारकांना महापालिकेकडून सतावले जात आहे. ३ मे रोजी राज्य सरकारने काढलेल्या कार्यालयीन आदेशानुसार महापालिका हद्दीतील बेकायदा इमारतींची यादी वेबसाईटवर प्रसिद्ध करणे बंधनकारक होते.बेकायदा इमारतीत घर घेणाºयांची फसवणूक टाळणे हा त्यामागील हेतू होता. महापालिका अधिकाºयांनी चक्क एका अधिकृत इमारतीला बेकायदा ठरवून वेबसाईटवरील अनधिकृत बांधकामांच्या यादीत उल्लेख केला आहे. त्यामुळे संबंधित इमारतधारकांकडून महापालिकेच्या विरोधात दिवाणी व फौजदारी खटला दाखल केला जाऊ शकतो.

टॅग्स :kalyanकल्याणdombivaliडोंबिवली