शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
2
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
3
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
4
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
5
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
6
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
7
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
8
भारतातील या मुख्यमंत्र्यांनी भारत-पाकिस्तान युद्धावेळी चालवलं होतं विमान, सैनिकांना पोहोचवलं होतं श्रीनगरला
9
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी
10
एजाज खान अडचणीत, महिला आयोगाची कारवाई; ULLU ने 'हाउस अरेस्ट'चे सर्व एपिसोड हटवले
11
सौरभची हत्या करणाऱ्या मुस्कान-साहिलने हात जोडले; जेलमध्ये ढसाढसा रडले अन् म्हणाले...
12
आई, वडील आयटी प्रोफेशनल; काळजावर दगड ठेवत अवघ्या तीन वर्षांच्या मुलीला दिला जैन धर्माचा संथारा, कहाणी ऐकून व्हाल भावूक...
13
Gold Rates 2 May : सोन्याच्या किंमतीत जोरदार घसरण, ७८ हजारांपर्यंत येऊ शकतो १० ग्रॅम सोन्याचा दर?
14
अधिकाधिक हिंदू तरुणींवर बलात्कार करण्याचं होतं लक्ष्य, भोपाळ लव्ह जिहाद प्रकरणातील आरोपीचा धक्कादायक दावा 
15
पहलगाम हल्ल्याचा दणका! भारताकडून पाकिस्तानचा ऑलिम्पिक विजेता अर्शद नदीम BLOCK!!
16
वादग्रस्त आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर दिल्ली पोलिसांत हजर; मनाने आलेली नाही, सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप 
17
Waves Summit 2025: "भारतात पुरेसे सिनेमागृहच नाहीत..." आमिर खानने व्यक्त केली खंत
18
श्रीराम दर्शनाची ओढ लागली, ३०० वर्षे जुनी परंपरा मोडली; हनुमानगढीचे महंत मंदिराबाहेर पडले!
19
केवळ १००० रुपयांनी गुंतवणूक करून तुमच्या मुलांना बनवू शकता कोट्यधीश; कोणती आहे ही स्कीम?
20
पत्नी माहेरी गेली, पतीने घरातच केली आत्महत्या; अकोला जिल्ह्यातील धक्कादायक घटना

सातपट बिलांनी लोकांचे डोळे पांढरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2018 03:02 IST

मुख्यमंत्र्यांची जाचक करआकारणी टाळण्याची घोषणा होत असतानाच वसुलीचा दणका; २७ गावांत नाराजी

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेतून २७ गावे वगळण्यात येतील, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अलीकडेच विधिमंडळात दिले आहे. त्याचबरोबर येथे मालमत्ता कराची आकारणी अनेक पटीत जाचक स्वरूपात करु नये असे सूचित केले आहे. मात्र मुख्यमंत्र्यांची घोषणा होत असतानाच या गावातील नागरिकांकडून सातपट मालमत्ता कर वसूल करण्याची बिले हाती पडली. मुख्यमंत्र्यांच्या घोषणेचे रीतसर आदेश निघण्यास विलंब लागत असला तरी तूर्त सरकारच्या कथनी व करणीतील अंतर दिसल्याने नागरिकांमध्ये रोष निर्माण झाला आहे.जून २०१५ मध्ये महापालिकेत २७ गावे समाविष्ट करण्यात आली. त्यांना किमान तीन वर्षे मालमत्ता कराच्या आकारणीत वाढ करु नये, असा सररकारी नियम आहे. महापालिकेने यंदाच्या अर्थिक वर्षापासून २७ गावांतील मालमत्ताधारकाना सहा ते सातपटीने कर आकारणी करण्याकरिता बिले पाठवली आहेत. २७ गावांत सोयीसुविधा पुरवल्या जात नाहीत त्यामुळे जास्तीचा कर भरणार नाही. या मुद्द्यावर संघर्ष समितीने मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन हा विषय मांडला होता. तसेच विधिमंडळात काही सदस्यांनी हा मुद्दा उपस्थित केला.मुख्यमंत्र्यांनी लवकरच २७ गावे वेगळी करण्यात येणार असल्यामुळे महापालिकेने जास्त कराची आकारणी करू नये, असे स्पष्ट केले. महापालिकेने २७ गावांतील एका अधिकृत इमारतीच्या मालमत्ता धारकांना चक्क सात लाख ५० हजार रुपयांचे मालमत्ता कराचे बिल धाडले आहे. यापूर्वी ग्रामपंचायतीच्या मालमत्ता करानुसार ६७ हजार रुपये मालमत्ता कर भरावा लागत होता. सोसायटीने हा कर भरला आहे. अन्यथा महापालिकेकडून व्याज आकारले गेले असते. याविषयी जाब विचारून देखील महापालिकेचे अधिकारी धड उत्तर देत नाहीत.सातपटीने कर आकारणी केली जात असताना बदल्यात सुविधा काय देणार याचे उत्तर महापालिकेच्या अधिकारी वर्गाकडे नाही. सुविधा पुरवल्या जात नसतील तर जाचक कर भरायचा का, असा सवाल रहिवाशांनी केला आहे. २७ गावे वेगळी केली जाणार असतील तर महापालिकेने कराची वसूल करू नये, असे रहिवाशांंचे मत आहे.महापालिकेने २७ गावांकरिता अग्निशमन केंद्राची सुविधा पुरवावी, असे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने महापालिकेस सूचित केले आहे. मात्र महापालिकेने ही सुविधा पुरवलेली नाही. एखाद्या इमारतीचे बांधकाम करण्यासाठी अग्निशमन दलाचा ना हरकत दाखला घ्यावा लागतो. हा दाखला कोणत्या स्तरावर मिळेल. कोणाकडून मिळेल याची सुस्पष्टता महापालिकेकडून केली जात नाही. मात्र अग्निशमन केंद्राची उभारणी होत नाही ही विसंगती आहे.ग्रामपंचायतीच्या काळात जिल्हा परिषदेकडून या इमारतीला बांधकाम परवानगी दिली आहे. ती परवानगी खोटी ठरवण्याचा घाट महापालिकेचे अधिकारी घालत आहेत. यामुळे बेकायदा बांधकामे करणारे मोकाट व अधिकृत रेराची नोंदणी करुन काम करणाऱ्या बिल्डरांची महापालिकेकडून छळवणूक केली जात असल्याचा आरोप केला जात आहे.या २७ गावात सगळीच बांधकामे अनधिकृत नाहीत. अगदी जेमतेम १ टक्के बांधकामे अधिकृत असली व त्यांनी ‘रेरा’ची नोंदणी केली असेल तर त्याच अधिकृत इमारतधारकांना महापालिकेकडून सतावले जात आहे. ३ मे रोजी राज्य सरकारने काढलेल्या कार्यालयीन आदेशानुसार महापालिका हद्दीतील बेकायदा इमारतींची यादी वेबसाईटवर प्रसिद्ध करणे बंधनकारक होते.बेकायदा इमारतीत घर घेणाºयांची फसवणूक टाळणे हा त्यामागील हेतू होता. महापालिका अधिकाºयांनी चक्क एका अधिकृत इमारतीला बेकायदा ठरवून वेबसाईटवरील अनधिकृत बांधकामांच्या यादीत उल्लेख केला आहे. त्यामुळे संबंधित इमारतधारकांकडून महापालिकेच्या विरोधात दिवाणी व फौजदारी खटला दाखल केला जाऊ शकतो.

टॅग्स :kalyanकल्याणdombivaliडोंबिवली