शहरं
Join us  
Trending Stories
1
रात्री उशिरापर्यंत सुरू होती धुमश्चक्री; पाकचे हल्ले भारताने हवेतच उधळले
2
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
3
'आम्ही भारत आणि पाकिस्तानला शस्त्रे टाकण्यास सांगू शकत नाही' : जेडी व्हेन्स
4
पुन्हा पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला; इस्रायल मेड ड्रोनने केली लाहोरची डिफेन्स सिस्टिम ध्वस्त
5
शरद पवार बोलले, त्याचा नक्की अर्थ काय घ्यायचा?
6
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
7
मसूद अझहरचा लहान भाऊ अब्दुल रौफ अझहर ऑपरेशन सिंदूरमध्ये ठार
8
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
9
'मैं भी अगर मारा जाता तो अच्छा होता!' कोण हा मसूद अझर? - आठवून पाहा...
10
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
11
अजित पवारांसोबत जायचे का हे नवी पिढी ठरवेल, मी त्या प्रक्रियेत नाही : शरद पवार
12
संपादकीय : सावध, हे युद्ध छुपेही आहे!
13
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
14
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
15
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
16
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
17
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
18
Operation Sindoor Live Updates: एलओसीवर स्फोटांचे आवाज, जम्मूमध्ये पूर्णपणे ब्लॅकआऊट
19
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
20
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...

भिवंडीतील भूमाफियांचा आरक्षित भूखंडांवर डोळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:48 IST

भिवंडी : भिवंडी महापालिकेचे आरक्षित भूखंड भूमाफियांनी गिळंकृत करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. आरक्षित भूखंडांवर डोळा ठेवणाऱ्या भूमाफियांवर कारवाई ...

भिवंडी : भिवंडी महापालिकेचे आरक्षित भूखंड भूमाफियांनी गिळंकृत करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. आरक्षित भूखंडांवर डोळा ठेवणाऱ्या भूमाफियांवर कारवाई करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. भिवंडी महापालिकेने २०११ मध्ये प्रारूप विकास आरखड्याची राज्य सरकारकडून मंजुरी घेत २९४ भूखंड विविध विकासकामांसाठी आरक्षित केले होते. मात्र नेते व नगरसेवकांच्या स्वार्थासाठी काही आरक्षणाची अदलाबदल तर काही भूखंडांवरील आरक्षण उठविण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे. तर ७९ आरक्षित भूखंडावर भूमाफियांनी व लोकप्रतिनिधी यांनी अतिक्रमण केले असून याकडे पालिका प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने आता राज्य शासनाने त्याबाबत लक्ष घालून संबंधितांवर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

भिवंडी महापालिका अस्तित्वात आल्यानंतर २००६ मध्ये पालिकेने विकास आराखडा तयार केला. त्यास २०११ मध्ये राज्य सरकारने मान्यता दिली. या विकास आराखड्यात शाळा, प्लेग्राउंड, पोलीस वसाहत, लहान मुलांना खेळण्याचे मैदान, टपाल कार्यालय, पार्किंग, उद्यान, सफाई कर्मचाऱ्यांसाठी निवासी वसाहत, सरकारी कार्यालय आदींसाठी एकूण २९४ आरक्षित भूखंड राखीव ठेवण्यात आले. मात्र कालांतराने सत्तेत बदल झाल्यानंतर लोकप्रतिनिधींनी काही आरक्षणांमध्ये फेरबदल केले तर प्रभाग समिती १ ते ५ मधील सुमारे ७९ आरक्षित भूखंडावर अंशतः तर काही भूखंडांवर पूर्णपणे बांधकामे उभी राहिली आहेत. सरकारची विधानमंडळ सदस्यांची अंदाज समिती भिवंडीत आली होती. त्यावेळेस या समितीने शहरातील वाढत्या अनधिकृत बांधकामाबाबत प्रश्न उपस्थित करून आरक्षित भूखंडावरील अतिक्रमणाबाबत विचारणा केली असता पालिका आयुक्त डॉ. पंकज आशिया,उपायुक्त दीपक सावंत, नगररचना अधिकारी प्रल्हाद होगे-पाटील, शहर अभियंता एल. पी. गायकवाड यांच्याकडे याबाबत उत्तरे नसल्याने या समितीने पालिका प्रशासनावर ताशेरे ओढले असल्याचे समजते. समितीने खडेबोल सुनावल्यानंतर प्रशासनाने आरक्षित भूखंडावर बांधकाम करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे संकेत दिले असल्याचे समजते.