शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
2
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
3
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
4
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
5
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
6
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
7
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
8
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
9
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
10
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
11
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
12
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
13
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
14
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
15
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
16
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
17
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
18
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
19
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
20
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?

चाळींच्या जमिनीसाठी झाली विशाल तावरेची हत्या?

By admin | Updated: July 17, 2017 01:18 IST

कोळेगावातील न्यू बालाजी दर्शन ही चाळ पाडून ती जमीन एका बिल्डरला देण्यात आली होती. त्यासाठीच चाळीचे पाणी तोडण्यात आले होते.

लोकमत न्यूज नेटवर्कडोंबिवली : कोळेगावातील न्यू बालाजी दर्शन ही चाळ पाडून ती जमीन एका बिल्डरला देण्यात आली होती. त्यासाठीच चाळीचे पाणी तोडण्यात आले होते. त्रासलेले चाळीतील रहिवासी शरण येतील आणि मिळेल ती रक्कम घेत घरे सोडतील, असा चाळमाफियांचा प्रयत्न होता. पण पाणी तोडल्याचा जाब विचारल्याने, त्यासाठी वेगवेगळ््या विभागात विशाल तावरेने चकरा मारल्याने बिंग फुटेल या भीतीतून आणि बिल्डरच्या दबावातून ही हत्या झाल्याचे चौकशीतून पुढे येत आहे.पोलिसांसह ज्या ज्या विभागांकडे विशाल यांनी तक्रारी केल्या, त्यांच्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणात काहीच हालचाल न करण्यामागचे गौडबंगाल काय असाही प्रश्न निर्माण झाला असून त्यातील काहींची या प्रकरणात चौकशी होण्याची शक्यता आहे. विशालने न्यू बालाजी दर्शन चाळीत तीन वर्षापूर्वी खोली घेतली होती. चाळीचा पाणी पुरवठा तोडला आणि तो दीड महिन्यानंतरही सुरळीत होत नसल्याने तो कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडे गेला. पण तेथे कोणीच त्याकडे लक्ष दिले नाही, अशी माहिती चाळीतील रहिवाशांनी दिली. विशालच्या हत्या प्रकरणातील आरोपी पंढरीनाथ पाटील याने एका बिल्डरला चाळीची जागा विकसित करण्यासाठी दिली होती. त्यात दोघांनाही निम्मा हिस्सा मिळणार होता. पण चाळकऱ्यांना हिस्सा देण्याची त्यांची तयारी नव्हती. चाळीशेजारीच पाटीलची १५ गुंठे जागा होती. तीही विकसित करायची होती. पण त्यासाठी पोहोच रस्ता बांधण्यात ही चाळ आड येत होती. चाळीतील रहिवाशांची कोंडी केली, तर ते वाटाघाटी करतील, असा त्यांचा अंदाज होता. त्यासाठी पाणी तोडण्यात आले. पण चर्चेसाठी कोणीही पुढे न येता उलट विशाल हा चाळीतील ४८ जणांच्या पाण्यासाठी भांडू लागल्याने त्यांचा प्रयत्न फसला. हत्या झाली त्या रात्री त्याने प्रथम विशालचे चुलते धरमदास व चुलत भाऊ अमितला घरी बोलावून घेतले होते. त्यानंतर एका व्यक्तीची गाडी पाठवून विशालचा आणखी एक भाऊ सुभाष याला बोलावले. तो जाण्यास तयार होत नसल्याने त्याला जबरदस्तीने नेण्यात आले. हे कळताच विशाल तेथे गेला. तेथे तोडगा काढण्याऐवजी पाटील यांनी विशालला बेदम मारहाण केली आणि उपचार घेताना विशालचा मृत्यू झाला. मालक नसतानाही या चाळीचे पाणी तोडण्याचा अधिकार पाटील व संबंधितांना कोणी दिला. ते कनेक्शन कोणी कापले आणि तक्रार करूनही पालिका, पोलिसांनी याची दखल का घेतली नाही, याबाबत सारे गप्प आहेत. सुभाषला जबरदस्तीने उचलून नेल्याबद्दल पोलिसांनी अद्याप अपहरणाचा गुन्हा का दाखल केला नाही, असा प्रश्नही त्याने व तावरे कुटुंबियांनी केला.