शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
2
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
3
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
4
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
5
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
6
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
7
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
8
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
9
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
10
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
11
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
12
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
13
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
14
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
15
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
16
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
17
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
18
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
19
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
20
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप

खंडणीखोर त्रिकुटाला अटक ; ठाणे खंडणी विरोधी पथकाची कारवाई

By अजित मांडके | Updated: November 4, 2023 14:56 IST

परिसरातील नागरीकांकडून कोणी ब्लॅकमेलींग करून खंडणी उकळण्याचा प्रयत्न करीत असेल तर त्वरीत खंडणी विरोधी पथकाकडे तक्रार दाखल करावी असे आवाहन गुन्हे शाखेचे उपायुक्त शिवराज पाटील यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केले आहे.

ठाणे : माहिती अधिकार कायद्यान्वये मिळविलेल्या माहितीचा गैरवापर करून मुंबईतील आझाद मैदान येथे उपोषणास बसून शासकीय अधिकाऱ्याकडे दोन लाख रूपये खंडणीची मागणी करणाऱ्या सुभाष पाटील (४०), समषाद पठाण (४८), संतोष हिरे (४४) अशा तीन जणांच्या टोळीस ठाणे शहर पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने अटक केली. त्या त्रिकुटाला येत्या ७ नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी मिळाली असून अशाप्रकारे ठाणे, भिवंडी, कल्याण, उल्हासनगर, बदलापूर या परिसरातील नागरीकांकडून कोणी ब्लॅकमेलींग करून खंडणी उकळण्याचा प्रयत्न करीत असेल तर त्वरीत खंडणी विरोधी पथकाकडे तक्रार दाखल करावी असे आवाहन गुन्हे शाखेचे उपायुक्त शिवराज पाटील यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केले आहे.

अटकेतील त्रिकुटापैकी नाशिक येथील पाटील हा माहिती अधिकारी कार्यकर्ता आहे. तसेच अंबरनाथ येथ पठाण आणि नाशिकमधील हिरे हे दोघे साप्ताहिकाचे पत्रकार आहेत. त्यांनी कळवा येथील सह दुय्यम निबंधक, वर्ग २ चे अधिकारी तथा तक्रारदार जयंत दामोदर जोपळे यांच्या कार्यालयात भ्रष्टाचार सुरू असल्याबाबतच्या बातम्या वृत्तपत्रात छापू बदनामी करू, तसेच तक्रारदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात यावी याकरीता संबंधीत वरिष्ठ कार्यालयात तक्रारी अर्ज करू अशी धमकी दिली. तसेच तक्रार न करण्यासाठी त्यांच्याकडे २ लाख रूपये खंडणीची मागणी केली. परंतू तक्रारदारांनी त्यास नकार दिल्याने यातील पठाण व हिरे हे खंडणीची रक्कम देण्यासाठी दबाव यावा याकरीता त्यांच्याविरोधात बातम्या छापून मुंबई,आझाद मैदान येथे वेळोवेळी उपोषणास बसुन त्यांच्याकडे खंडणीची मागणी करीत होते.

२ नोव्हेंबर २०२३ रोजी जोपळे यांनी खंडणी विरोधी पथक कार्यालयात जाऊन तक्रार केली. त्यानंतर तक्रारदारांकडे मागणी केलेली खंडणीची रक्कम स्वीकारण्याकरीता कळवा, सरोवर हॉटेल येथे हिरे याला ५० हजार तर पठाण याला एक लाख रुपये घेताना वरीष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांच्या पथकाने रंगेहाथ पकडले. त्यांच्याविरोधात जोपळे यांच्या तक्रारीनुसार कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करत अटक केली. तर पाटील याला नाशिक येथून अटक केली. या तिघांच्या विरोधात ठाण्यात गुन्हा दाखल नसून त्यांनी मुंबई, ठाणे, नवी मुंबई, नाशिक या परिसरात अशाप्रकारे खंडणीची मागणी केली असल्याची शक्यता वर्तवित त्यादृष्टीने पुढील तपास सुरू असल्याची माहिती उपायुक्त पाटील यांनी दिली.