शहरं
Join us  
Trending Stories
1
उड्डाण करताच ब्रिटनमध्ये विमान कोसळले; एअर इंडिया अपघातासारखेच आगीचे लोळ... 
2
पुढील महिन्यापासून संपूर्ण देशात मतदार याद्यांचे सखोल पुनरीक्षण
3
धक्कादायक : बिहारच्या मतदार याद्यांत म्यानमार, नेपाळी, बांगलादेशींचा भरणा
4
नागरिकांना ४ लाखांचे विमा संरक्षण मिळणार? पीएमजेजेबीवाय अंतर्गत विमा संरक्षण दुप्पट करणार
5
विधिज्ञ उज्ज्वल निकम, आणखी तिघे राज्यसभेवर; श्रुंगला, सदानंदन, मीनाक्षी जैन यांचाही समावेश
6
बिहारमध्ये गुंडाराज: १३ दिवसांत ३० हत्या; नेते, अधिकाऱ्यांनाही सोडले नाही
7
उत्तर कोरियाच्या विरोधात जाऊ नका, रशियाचा अमेरिका-जपानला इशारा
8
शनैश्वर बनावट ॲप तयार करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आंदोलने मजेसाठी नसतात, लोकांचे हक्क महत्वाचे; मद्रास हायकोर्ट : पक्षाची मनमानी चालू शकत नाही
10
‘सुंदर’ फिरकीने भारताचा ‘रूट’ मोकळा; भारताला विजयासाठी १९३ धावांचे लक्ष्य
11
भारताचा पराभव, पण मालिका ३-२ ने जिंकली; शेफाली वर्माची अर्धशतकी खेळी व्यर्थ
12
बाजाराची चाल कंपन्यांचे निकाल ठरवणार; विक्रीचा मारा सुरूच
13
तुमच्यामुळे झाला महाराष्ट्र टॉपर! नागरिकांची यूपीआयला पसंती
14
IND vs ENG : अति 'सुंदर'! वॉशिंग्टनच्या फिरकीतील जादूसह टीम इंडियाच्या विजयातील मोठा अडथळा झाला दूर
15
नीरज चोप्रा अन् अरशद नदीम पुन्हा भिडणार; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिलीच लढत
16
ठाणे: जि.प., पं. समित्यांचा निवडणूक प्रभाग रचना मसुदा प्रसिद्ध; हरकतींसाठी २१ जुलैपर्यंत मुदत
17
भाजपाकडून खासदारकी मिळालेल्या उज्ज्वल निकम यांची संपत्ती किती? मुंबईत किती कोटींची घरं?
18
ब्रूकची आडवी-तिडवी फटकेबाजी! ३ चेंडूत कुटल्या १४ धावा; मग आकाशदीपनं 'मिडल स्टंप' उडवत घेतला बदला
19
"प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या गुंडांना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करा’’, काँग्रेसची मागणी  
20
जगद्गुरू अविमुक्तेश्वरानंद यांनी व्यक्त केली मराठी शिकण्याची इच्छा; शिंदेसेना देणार मराठीचे धडे

धान्याचा काळाबाजार करणारे सरकार हद्दपार करा

By admin | Updated: October 28, 2015 00:48 IST

सध्या अन्न धान्याच्या गोदामावर धाडी टाकून साठेबाजीची प्रकरणे शिवसेना-भाजपा सरकार बाहेर काढीत असली तरी या साठेबाजीला या सरकारनेच गेल्या सहा महिन्यात उत्तेजन दिले आहे.

कल्याण : सध्या अन्न धान्याच्या गोदामावर धाडी टाकून साठेबाजीची प्रकरणे शिवसेना-भाजपा सरकार बाहेर काढीत असली तरी या साठेबाजीला या सरकारनेच गेल्या सहा महिन्यात उत्तेजन दिले आहे. व्यापाऱ्याने किती माल गोदामात ठेवावा याबाबत आमच्या आघाडी सरकारने निर्बंध घातले होते. परंतु, सध्याच्या सरकारने ते उठविल्याने ही परिस्थिती ओढावली असून अन्न धान्याचा काळाबाजार करणारे युतीचे सरकार हद्दपार करा, असे आवाहन माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी डोंबिवलीत केले.काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ डोंबिवली पश्चिमेतील गावदेवी मैदानात आयोजित केलेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. कुठे ठेवलाय महाराष्ट्र माझा अशी स्थिती सध्या राज्याची झाली आहे. अन्नधान्याचे भाव गगनाला भिडले आहेत, शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरू आहेत. यात आता शालेय विद्यार्थीदेखील आत्महत्या करू लागले आहेत. ज्यांना राज्याचे प्रश्न समजत नाहीत अशा लोकांच्या हातात आज सत्ता आहे. महाराष्ट्र दिशाहीन झाला असून अच्छे दिन आम्हाला दाखविले नाही तरी चालतील. परंतु, आमचे मागचेच चांगले दिवस पुन्हा आणा असे म्हणण्याची वेळ जनतेवर आली असल्याचे ते म्हणाले. भ्रष्टाचाराच्या चौकशीचे धाडस दाखविणार का?गेली साडेसतरा वर्षे केडीएमसीत सत्ता भोगणाऱ्या युतीने मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार केला असून पारदर्शकतेचा आव आणणाऱ्या भाजपाने भ्रष्टाचाराची चौकशी करण्याचे धाडस दाखवावे, असे आव्हान राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आपल्या भाषणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले. धर्माच्या नावाखाली मते मागणाऱ्या शिवसेना भाजपाने सुसंस्कृत शहरांची कशी वाट लावली हे आज येथील जनता अनुभवत आहे. शहरे जेव्हा विस्तारतात तेव्हा पायाभूत सुविधा पुरविण्याचे काम स्थानिक स्वराज्य संस्थांचे असते. परंतु, येथे सत्ता भोगणाऱ्यांचे याकडे पुरते दुर्लक्ष झाल्याचे ते म्हणाले.