शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या कॅप्टननेच इंधन स्वीच बंद केला; को-पायलटचा आवाज कातरलेला...; अमेरिकी रिपोर्टमध्ये मोठा दावा
2
CM फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना दिलेल्या ऑफरवर संजय राऊत थेट बोलले, म्हणाले, “तुम्ही आधी...”
3
"तुझे पाय कापून टाकू, बघू तुला योगी वाचवतात की मोदी..."; महिलांनी केला छांगुर गँगचा पर्दाफाश
4
"आता हाच माझा पती"; फेसबुकवर झाली मैत्री, २० वर्षांच्या मुलासोबत २ मुलांच्या आईने थाटला संसार! पतीला कळलं अन्...
5
'पोलिसांची परवानगी घेतली नव्हती', बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणावर कर्नाटक सरकारचा अहवाल; कोहलीचेही नाव घेतले
6
“ST महामंडळात काय चाललेय हे मलाच माहिती नाही”; खुद्द प्रताप सरनाईक उद्विग्न, प्रकरण काय?
7
Reliance Infra Share Price: १२००% नं वधारला अनिल अंबानींच्या कंपनीचा 'हा' शेअर; आता ₹९००० कोटी उभारण्याची तयारी
8
महिलेने ९ भिक्षूंना ब्लॅकमेल करून उकळले तब्बल १०२ कोटी रुपये; घरी सापडले ८०,००० अश्लील व्हिडिओ!
9
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निशाण्यावर १५० देश..; इतके टक्के शुल्क लादण्याची तयारी, भारतावर किती?
10
लव्ह मॅरेज केलं अन् कंगाल झाला; पैसा मिळवण्यासाठी तरुणाने 'असा' मार्ग निवडला, जो थेट तुरुंगात घेऊन गेला!
11
'मुंबईत मराठीतून नमाज पठण करा'; नितेश राणेंवर असदुद्दीन ओवेसींचा पलटवार; म्हणाले...
12
"हाताचे बाहुले बनण्याच्या बदल्यात..."; प्रकाश आंबेडकरांचा आनंदराज आंबेडकरांना खरमरीत प्रश्न
13
मार्क झुकरबर्गविरोधात खटला सुरू; ८ अब्ज डॉलर्सचं आहे प्रकरण, काय आहे कारण?
14
मुलाचा वाढदिवस करून घरी परतणाऱ्यांवर काळाचा घाला; नाशिक इथं अपघातात ७ नातेवाईकांचा मृत्यू
15
Video - अग्निकल्लोळ! इराकमधील शॉपिंग मॉलमध्ये भीषण आग, ५० जणांचा होरपळून मृत्यू
16
एका भाजी विक्रेत्याच्या भांडणाने पेटले इस्रायल-सीरिया युद्ध; आतापर्यंत ३०० लोकांचा मृत्यू...
17
बांगलादेशात सुरक्षा दल अन् शेख हसीना समर्थकांमध्ये संघर्ष, चार जणांचा मृत्यू
18
"मला काही झाले, तर असीम मुनीरच जबाबदार"; पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना कसली भीती वाटतेय?
19
IND vs ENG: "जसप्रीत बुमराह टीम इंडियासाठी अनलकी" माजी क्रिकेटपटू डेव्हिड लॉयड असे का म्हणाले? वाचा
20
कोहलीला तोड नाही! टी-२० सह कसोटीतून निवृत्ती; तरीही तो ठरला क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमधील 'किंग'

माहिती अधिकारात उघड, तीन उड्डाणपूल धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2017 04:38 IST

भिवंडी- कल्याण- शीळ या प्रचंड वाहतुकीच्या रस्त्यावरील तीन पूल धोकादायक बनले असून त्यातील काटईचा पूल दुरूस्तीपलिकडे गेलेला असतानाही त्यावरून बिनधास्त अवजड वाहनांची वाहतूक सुरू असल्याने कल्याण-डोंबिवलीकरांचा प्रवास संकटात सापडला आहे.

मुरलीधर भवार कल्याण : भिवंडी- कल्याण- शीळ या प्रचंड वाहतुकीच्या रस्त्यावरील तीन पूल धोकादायक बनले असून त्यातील काटईचा पूल दुरूस्तीपलिकडे गेलेला असतानाही त्यावरून बिनधास्त अवजड वाहनांची वाहतूक सुरू असल्याने कल्याण-डोंबिवलीकरांचा प्रवास संकटात सापडला आहे. माहिती अधिकाराचे कार्यकर्ते श्रीनिवास घाणेकर यांनी ही बाब उघडकीस आणली आहे.या २१ किलोमीटर अंतराच्या रस्त्यावरील देसाई खाडी पूल, काटईतील रेल्वेवरील पूल आणि पत्री पूल हे धोकादायक बनल्याचा अहवाल राज्य रस्ते विकास महामंडळाने कल्याण वाहतूक नियंत्रण शाखेच्या सहाय्यक पोलिस आयुक्तांना ३ आॅगस्टला दिला आहे. काटईचा पूल तर दुरुस्ती करण्यापलिकडचा आहे, असे स्पष्ट झाल्यानंतरही तो डागडुजी करून वापरात आहे. या पुलावरून जड आणि अवजड वाहनांची वाहतूक करणे धोकादायक असल्याचा अहवाल देण्यात आल्यानंतरही ती वाहतूक बिनदिक्कत सुरु आहे.भिवंडी-कल्याण-शीळ हा रस्ता मुंबई-पुणे, मुंबई-गोवा, मुंबई-नाशिक महामार्गाला जोडणारा दुवा असल्याने त्यावर वाहतुकीचा प्रचंड भार आहे. या रस्त्यालगत भिवंडी, कोन, कल्याण, डोंबिवली, शीळ परिसरात नवनवी गृहसंकुले उभी राहत असल्याने वाहतुकीचा ताण सतत वाढतो आहे.या रस्त्यावर देसाई गावाजवळ खाडीवरील उड्डाणपूल दुपदरी आहे. तोही कमकुवत आहे. तेथील आधीचा पूल पडल्यानंतर हा नवा पूल उभारण्यात आला होता. तो बांधतानाच दुपदरी न बांधता चौपदरी बांधावा अशी मागणी झाली होती. पण ती अव्हेरल्याने पुन्हा पूल बांदण्याची वेळ येणार आहे. दिवा-पनवेल मार्गावर काटईचा उड्डाणपूल आहे. रेल्वेने १९६२ मध्ये तो उभारला. पुलाचे आयुर्मान संपल्याने त्याची दुरुस्ती शक्य नसल्याचे राज्य रस्ते विकास महामंडळाने रेल्वेला १ आॅगस्ट २०१५ ला कळवले. त्यानंतर रेल्वेने त्याची दुरूस्ती केली. त्यानंतरही तो जड व अवजड वाहनांच्या वाहतुकीसाठी धोकादायक असल्याचे स्पष्ट करण्यात आले. सध्या त्यावरून शीळच्या दिशेची वाहतूक होते. त्या शेजारचा पूलही पुरेसा रूंद बांधण्यात आलेला नाही.ब्रिटिशांच्या काळात कल्याणला उभारलेला पत्री पूलही जड आणि अवजड वाहतुकीसाठी धोकादायक आहे. शीळ, डोंबिवलीहून कल्याणकडे येणारी वाहतूक या पुलावरून होते.या तिन्ही पुलांची पुनर्बांधणी आणि दुरुस्ती करण्यासाठी रस्ते विकास महामंडळाने राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठविला आहे. पण सरकारकडून त्याला मंजुरी मिळालेली नाही. त्यामुळे सरकार अपघात होण्याची वाट पाहात असल्याची टीका माहिती अधिकाराचे कार्यकर्ते घाणेकर यांनी केली आणि तिन्ही पूल नव्याने बांधून होईपर्यंत त्यावरील जड व अवजड वाहतूक तत्काळ बंद करण्याची मागणी त्यांनी केली.