शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

माहिती अधिकारात उघड, तीन उड्डाणपूल धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2017 04:38 IST

भिवंडी- कल्याण- शीळ या प्रचंड वाहतुकीच्या रस्त्यावरील तीन पूल धोकादायक बनले असून त्यातील काटईचा पूल दुरूस्तीपलिकडे गेलेला असतानाही त्यावरून बिनधास्त अवजड वाहनांची वाहतूक सुरू असल्याने कल्याण-डोंबिवलीकरांचा प्रवास संकटात सापडला आहे.

मुरलीधर भवार कल्याण : भिवंडी- कल्याण- शीळ या प्रचंड वाहतुकीच्या रस्त्यावरील तीन पूल धोकादायक बनले असून त्यातील काटईचा पूल दुरूस्तीपलिकडे गेलेला असतानाही त्यावरून बिनधास्त अवजड वाहनांची वाहतूक सुरू असल्याने कल्याण-डोंबिवलीकरांचा प्रवास संकटात सापडला आहे. माहिती अधिकाराचे कार्यकर्ते श्रीनिवास घाणेकर यांनी ही बाब उघडकीस आणली आहे.या २१ किलोमीटर अंतराच्या रस्त्यावरील देसाई खाडी पूल, काटईतील रेल्वेवरील पूल आणि पत्री पूल हे धोकादायक बनल्याचा अहवाल राज्य रस्ते विकास महामंडळाने कल्याण वाहतूक नियंत्रण शाखेच्या सहाय्यक पोलिस आयुक्तांना ३ आॅगस्टला दिला आहे. काटईचा पूल तर दुरुस्ती करण्यापलिकडचा आहे, असे स्पष्ट झाल्यानंतरही तो डागडुजी करून वापरात आहे. या पुलावरून जड आणि अवजड वाहनांची वाहतूक करणे धोकादायक असल्याचा अहवाल देण्यात आल्यानंतरही ती वाहतूक बिनदिक्कत सुरु आहे.भिवंडी-कल्याण-शीळ हा रस्ता मुंबई-पुणे, मुंबई-गोवा, मुंबई-नाशिक महामार्गाला जोडणारा दुवा असल्याने त्यावर वाहतुकीचा प्रचंड भार आहे. या रस्त्यालगत भिवंडी, कोन, कल्याण, डोंबिवली, शीळ परिसरात नवनवी गृहसंकुले उभी राहत असल्याने वाहतुकीचा ताण सतत वाढतो आहे.या रस्त्यावर देसाई गावाजवळ खाडीवरील उड्डाणपूल दुपदरी आहे. तोही कमकुवत आहे. तेथील आधीचा पूल पडल्यानंतर हा नवा पूल उभारण्यात आला होता. तो बांधतानाच दुपदरी न बांधता चौपदरी बांधावा अशी मागणी झाली होती. पण ती अव्हेरल्याने पुन्हा पूल बांदण्याची वेळ येणार आहे. दिवा-पनवेल मार्गावर काटईचा उड्डाणपूल आहे. रेल्वेने १९६२ मध्ये तो उभारला. पुलाचे आयुर्मान संपल्याने त्याची दुरुस्ती शक्य नसल्याचे राज्य रस्ते विकास महामंडळाने रेल्वेला १ आॅगस्ट २०१५ ला कळवले. त्यानंतर रेल्वेने त्याची दुरूस्ती केली. त्यानंतरही तो जड व अवजड वाहनांच्या वाहतुकीसाठी धोकादायक असल्याचे स्पष्ट करण्यात आले. सध्या त्यावरून शीळच्या दिशेची वाहतूक होते. त्या शेजारचा पूलही पुरेसा रूंद बांधण्यात आलेला नाही.ब्रिटिशांच्या काळात कल्याणला उभारलेला पत्री पूलही जड आणि अवजड वाहतुकीसाठी धोकादायक आहे. शीळ, डोंबिवलीहून कल्याणकडे येणारी वाहतूक या पुलावरून होते.या तिन्ही पुलांची पुनर्बांधणी आणि दुरुस्ती करण्यासाठी रस्ते विकास महामंडळाने राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठविला आहे. पण सरकारकडून त्याला मंजुरी मिळालेली नाही. त्यामुळे सरकार अपघात होण्याची वाट पाहात असल्याची टीका माहिती अधिकाराचे कार्यकर्ते घाणेकर यांनी केली आणि तिन्ही पूल नव्याने बांधून होईपर्यंत त्यावरील जड व अवजड वाहतूक तत्काळ बंद करण्याची मागणी त्यांनी केली.