शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
2
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
3
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ
4
Naxal news: दहशतवाद्यांपाठोपाठ नक्षल्यांवरही 'वार'; तेलंगणाच्या सीमेवर २२ नक्षलवादी ठार
5
Operation Sindoor Live Updates: ऑपरेशन सिंदूरचं जे लक्ष्य होतं ते साध्य केलं - राजनाथ सिंह
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्या वस्तूंचा व्यापार होतो? किती आहे टॅरिफ?
7
तणाव वाढवायचा नाही, पण...; अजित डोवाल यांची अमेरिका,ब्रिटन आणि सौदीसह अनेक देशांशी चर्चा!
8
"भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर केलेला हल्ला अभिमानास्पद, आता...", उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया
9
Operation Sindoor : "आता पाकिस्तानला वेदनांची जाणीव झाली असेल, ऑपरेशन सिंदूरचा संपूर्ण देशाला अभिमान"
10
Operation Sindoor:'आम्ही झोपलेलो होतो अन् मोठा स्फोट झाला, असं वाटलं सूर्य उगवला'; मध्यरात्री पाकिस्तानात काय घडलं?
11
भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'मुळे पाकिस्तानमध्ये भीतीचे वातावरण! पंजाबच्या CM मरियम नवाज यांनी आणीबाणी जाहीर केली
12
'ऑपरेशन सिंदूर'वर सिनेमा बनवा! नेटकऱ्यांची बॉलिवूडकडे मागणी, सुचवलं 'या' अभिनेत्याचं नाव
13
पोलिसाच्या वर्दीत पाहून लेकाची काय होती प्रतिक्रिया? अंकुश चौधरी म्हणाला, "त्याने भलतीच मागणी..."
14
Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'नंतर बांगलादेशच्या मनात भिती; खेळाडूंच्या सुरक्षेबाबत उपस्थित केले प्रश्न
15
वर्धा: विवाहित महिला आणि पुरुषाचे प्रेमसंबंध, शेतातील विहिरीत सापडले दोघांचे मृतदेह
16
'या' व्यक्तीच्या पगारापुढे मस्क-जेफ बेझोस यांचा पगार काहीच नाही; कमाईच्या बाबतीत सर्वांना टाकलं मागे
17
"किती नुकसान झालं, किती दहशतवादी मारले गेले हे समजलं असतं तर…’’, काँग्रेस खासदार इम्रान मसूद यांचं मोठं विधान
18
हवाई हल्ल्यानंतर पाकिस्तानला आणखी एक दणका; भारतीय सैन्याने नीलम-झेलम धरण उडवले
19
भारतीय सैन्यानं कसं मोडलं दहशतवाद्यांचं कंबरडं? 'ऑपरेशन सिंदूर'चा पहिला व्हिडीओ समोर! बघाच
20
ऑपरेशन सिंदूरला बाजाराचाही कडक सॅल्यूट! टाटासह डिफेन्स स्टॉक्स रॉकेट, 'हे' शेअर्स मात्र आपटले

घरांच्या डेब्रिजसह कचरा विल्हेवाटीसाठी १५ कोटींचा खर्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:45 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : जिल्ह्यात यंदाच्या पावसाळ्यात सर्वाधिक अतिवृष्टी जुलैमध्ये झाली आहे. या दोन-तीन दिवसांच्या कालावधीत ठिकठिकाणची घरे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : जिल्ह्यात यंदाच्या पावसाळ्यात सर्वाधिक अतिवृष्टी जुलैमध्ये झाली आहे. या दोन-तीन दिवसांच्या कालावधीत ठिकठिकाणची घरे पडली, भूस्खलन झाले. सार्वजनिक ठिकाणी साचलेल्या कचऱ्यांच्या ढिगाऱ्यांच्या विल्हेवाटीसाठी तब्बल १५ कोटींपेक्षा अधिक रकमेचा खर्च झाल्याचे वास्तव उघडकीस आले आहे.

जुलैतील अतिवृष्टीत जिल्ह्यातील ३१ ठिकाणच्या १८ हजार ५३८ कुटुंबीयांना स्थलांतरित करावे लागले. जिल्हाभरात १६४ पक्क्या, कच्च्या घरांची पडझड झाली. याशिवाय भूस्खलन होऊन काही ठिकाणचे जनजीवनही विस्कळीत झाले. जिल्हाभरातील २४ ठिकाणच्या सार्वजनिक ठिकाणी जमा झालेला कचरा, मातीचे ढिगारे आदी उपसण्यासाठी १५ कोटी दोन लाखांचा खर्च झालेला आहे. यापैकी आतापर्यंत अवघे २५ लाख रुपये या विल्हेवाटीसाठी वाटप झाले आहेत.

या अतिवृष्टीत ३१ ठिकाणी जीवघेणे पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते. रेल्वे व उपनगरीय वाहतूक बंद करावी लागली होती. या कालावधीत जिल्ह्यात सर्वाधिक कल्याण तालुक्यातील सहा ठिकाणी १४ हजार ९८८ कुटुंबीयांची परवड झाली. अंबरनाथ तालुक्यात चार ठिकाणचे तीन हजार ३१ परिवार आणि शहापूर तालुक्यातील २० ठिकाणी ५१८ कुटुंबीयांना अतिवृष्टीचा जबरदस्त फटका बसला. या रहिवाशांच्या घरातील चीज वस्तू, भांडी आदी नऊ कोटी २६ लाख ९० हजार रुपयांच्या नुकसानीचे पंचनामे झाले आहेत. मात्र, यापैकी फक्त दोन कोटी ४० लाख ६५ हजारांचे वाटप झाले.

उर्वरित सात कोटी रुपयांची भरपाई अद्याप कागदावरच आहे. जिल्ह्यात १६४ पक्क्या-कच्च्या घरांची पडझड

अतिवृष्टीमुळे १६४ घरांचे नुकसान होऊन पडझड झालेली आहे. यामध्ये १५१ निवासी घरांचा समावेश आहे. यात पक्क्या घरांसह कच्च्या घरांचा आणि झोपड्यांचा समावेश आहे. याशिवाय गाई, म्हशींचे १३ गोठे उद्ध्वस्त झाले आहेत. या तब्बल १६४ घरांच्या दुरुस्तीसाठी आजपर्यंत शासनाकडून भरपाई मिळालेली नाही.

अपेक्षित नुकसानभरपाई

जिल्ह्यात पूर्ण पडझड झालेल्या १४ घरांसाठी १३ लाखांची भरपाई अपेक्षित आहे. पूर्ण पडझड झालेल्या सहा कच्च्या घरांसाठी पाच लाख ७० हजार, १६ झोपड्यांसाठी ९६ हजार, अंशतः नष्ट झालेल्या ६४ पक्क्या घरांचे तीन लाख ८४ हजार आणि अंशतः नष्ट झालेल्या ५१ कच्च्या घरांच्या तीन लाख सहा हजारांच्या नुकसानभरपाईकडे अतिवृष्टीग्रस्तांच्या नजरा लागून आहेत.