शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीचे प्रदूषण रोखण्यासाठी चीनचा 'धक्कादायक' सल्ला! ३००० मोठे उद्योग बंद करण्याची सूचना; बीजिंगच्या धर्तीवर प्लॅन तयार?
2
Short Term Investment: केवळ एका वर्षासाठी गुंतवणूक करायचीये? 'हे' ५ पर्याय देऊ शकतात तुम्हाला जबरदस्त रिटर्न, जाणून घ्या
3
गृहकर्जावर होईल १८ लाख रुपयांपर्यंतची बचत! EMI कमी करण्यापेक्षा वापरावा लागेल 'हा' पर्याय
4
कोल्हापूर हादरलं! मुलानेच केली आई-वडिलांची हत्या; धक्कादायक कारण आले समोर
5
ICICI Prudential AMC IPO Listing: आयसीआयसीआय प्रूडेंशियल एएमसीच्या आयपीओनं केलं मालामाल; प्रत्येक शेअरवर मिळाला 'इतका' नफा
6
बांगलादेशात ISI सक्रीय, कंटरपंथींकडून जाळपोळ, हिंसाचार सुरू; भारताविरोधात पाकिस्तानचं षडयंत्र?
7
नोकरी बदलणाऱ्यांना EPFO चा मोठा दिलासा! 'ब्रेक'बाबतचे नियम बदलले; आता शनिवार-रविवारची सुट्टी अडथळा ठरणार नाही
8
Dolphin in Mumbai: मुंबईकरांना सुखद धक्का! वरळी सी फेसच्या समुद्रकिनाऱ्यावर डॉल्फिनची मस्ती, व्हिडीओ व्हायरल
9
मुंबईत ठाकरे बंधू युतीत शरद पवारांची राष्ट्रवादी सहभागी होणार?; २२ जागांचा देणार प्रस्ताव
10
VIDEO: दादरमध्ये अजब प्रकार, एक तरुण या इमारतीवरुन त्या इमारतीवर मारतोय उड्या; पोलिसांची दमछाक
11
Stock Market Today: शेअर बाजाराची जबरदस्त सुरुवात; Sensex ची ३३० अंकांनी उसळी; IT Stocks सुस्साट
12
अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिनामध्ये जेट विमानाचा अपघात; संपूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त
13
'...तर त्यांचा एक हात तोडून दुसऱ्या हातात दिला असता'; इम्तियाज जलील मंत्री संजय निषाद यांच्यावर संतापले
14
'या' कंपनीच्या गुंतवणूकदारांना ₹५५,५५० कोटींपेक्षा अधिकचा फटका; १६ महिन्यांत स्टॉक ८० टक्क्यांनी आपटला
15
मुंबई विमानतळाची गोपनीय माहिती चोरट्यांच्या हाती; ऐरोलीतील घटना : अदानी ग्रुपच्या मॅनेजरचा लॅपटॉप चोरीला
16
मी सर्वांसमोर तिला चुकीच्या पद्धतीने का किस करेल? ट्रोल झाल्यावर राकेश बेदींनी दिलं स्पष्टीकरण
17
डेमोक्रेट्सच्या खासदारांनी जारी केले एपस्टीनचे ६८ नवीन फोटो; महिलेसोबत दिसले बिल गेट्स
18
Vijay Mallya : देशातून फरार, पण लंडनमध्ये मात्र जोरदार सेलिब्रेशन; ललित मोदीच्या घरी झाली विजय माल्ल्याची जंगी बर्थ डे पार्टी
19
उस्मान हादी यांच्या मृत्यूनंतर बांग्लादेश पेटला, कट्टरपंथांनी भारताचे नाव घेतले; शेख हसीना यांच्या सरकारला हादीनेच दिले होते हादरे
20
राज्यातील पहिले 'जेन झी टपाल' आयआयटी मुंबईत; कार्यालयामध्ये नवीन सुविधांसह डिजिटल सेवा
Daily Top 2Weekly Top 5

घरांच्या डेब्रिजसह कचरा विल्हेवाटीसाठी १५ कोटींचा खर्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:45 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : जिल्ह्यात यंदाच्या पावसाळ्यात सर्वाधिक अतिवृष्टी जुलैमध्ये झाली आहे. या दोन-तीन दिवसांच्या कालावधीत ठिकठिकाणची घरे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : जिल्ह्यात यंदाच्या पावसाळ्यात सर्वाधिक अतिवृष्टी जुलैमध्ये झाली आहे. या दोन-तीन दिवसांच्या कालावधीत ठिकठिकाणची घरे पडली, भूस्खलन झाले. सार्वजनिक ठिकाणी साचलेल्या कचऱ्यांच्या ढिगाऱ्यांच्या विल्हेवाटीसाठी तब्बल १५ कोटींपेक्षा अधिक रकमेचा खर्च झाल्याचे वास्तव उघडकीस आले आहे.

जुलैतील अतिवृष्टीत जिल्ह्यातील ३१ ठिकाणच्या १८ हजार ५३८ कुटुंबीयांना स्थलांतरित करावे लागले. जिल्हाभरात १६४ पक्क्या, कच्च्या घरांची पडझड झाली. याशिवाय भूस्खलन होऊन काही ठिकाणचे जनजीवनही विस्कळीत झाले. जिल्हाभरातील २४ ठिकाणच्या सार्वजनिक ठिकाणी जमा झालेला कचरा, मातीचे ढिगारे आदी उपसण्यासाठी १५ कोटी दोन लाखांचा खर्च झालेला आहे. यापैकी आतापर्यंत अवघे २५ लाख रुपये या विल्हेवाटीसाठी वाटप झाले आहेत.

या अतिवृष्टीत ३१ ठिकाणी जीवघेणे पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते. रेल्वे व उपनगरीय वाहतूक बंद करावी लागली होती. या कालावधीत जिल्ह्यात सर्वाधिक कल्याण तालुक्यातील सहा ठिकाणी १४ हजार ९८८ कुटुंबीयांची परवड झाली. अंबरनाथ तालुक्यात चार ठिकाणचे तीन हजार ३१ परिवार आणि शहापूर तालुक्यातील २० ठिकाणी ५१८ कुटुंबीयांना अतिवृष्टीचा जबरदस्त फटका बसला. या रहिवाशांच्या घरातील चीज वस्तू, भांडी आदी नऊ कोटी २६ लाख ९० हजार रुपयांच्या नुकसानीचे पंचनामे झाले आहेत. मात्र, यापैकी फक्त दोन कोटी ४० लाख ६५ हजारांचे वाटप झाले.

उर्वरित सात कोटी रुपयांची भरपाई अद्याप कागदावरच आहे. जिल्ह्यात १६४ पक्क्या-कच्च्या घरांची पडझड

अतिवृष्टीमुळे १६४ घरांचे नुकसान होऊन पडझड झालेली आहे. यामध्ये १५१ निवासी घरांचा समावेश आहे. यात पक्क्या घरांसह कच्च्या घरांचा आणि झोपड्यांचा समावेश आहे. याशिवाय गाई, म्हशींचे १३ गोठे उद्ध्वस्त झाले आहेत. या तब्बल १६४ घरांच्या दुरुस्तीसाठी आजपर्यंत शासनाकडून भरपाई मिळालेली नाही.

अपेक्षित नुकसानभरपाई

जिल्ह्यात पूर्ण पडझड झालेल्या १४ घरांसाठी १३ लाखांची भरपाई अपेक्षित आहे. पूर्ण पडझड झालेल्या सहा कच्च्या घरांसाठी पाच लाख ७० हजार, १६ झोपड्यांसाठी ९६ हजार, अंशतः नष्ट झालेल्या ६४ पक्क्या घरांचे तीन लाख ८४ हजार आणि अंशतः नष्ट झालेल्या ५१ कच्च्या घरांच्या तीन लाख सहा हजारांच्या नुकसानभरपाईकडे अतिवृष्टीग्रस्तांच्या नजरा लागून आहेत.