शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

घरांच्या डेब्रिजसह कचरा विल्हेवाटीसाठी १५ कोटींचा खर्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:45 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : जिल्ह्यात यंदाच्या पावसाळ्यात सर्वाधिक अतिवृष्टी जुलैमध्ये झाली आहे. या दोन-तीन दिवसांच्या कालावधीत ठिकठिकाणची घरे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : जिल्ह्यात यंदाच्या पावसाळ्यात सर्वाधिक अतिवृष्टी जुलैमध्ये झाली आहे. या दोन-तीन दिवसांच्या कालावधीत ठिकठिकाणची घरे पडली, भूस्खलन झाले. सार्वजनिक ठिकाणी साचलेल्या कचऱ्यांच्या ढिगाऱ्यांच्या विल्हेवाटीसाठी तब्बल १५ कोटींपेक्षा अधिक रकमेचा खर्च झाल्याचे वास्तव उघडकीस आले आहे.

जुलैतील अतिवृष्टीत जिल्ह्यातील ३१ ठिकाणच्या १८ हजार ५३८ कुटुंबीयांना स्थलांतरित करावे लागले. जिल्हाभरात १६४ पक्क्या, कच्च्या घरांची पडझड झाली. याशिवाय भूस्खलन होऊन काही ठिकाणचे जनजीवनही विस्कळीत झाले. जिल्हाभरातील २४ ठिकाणच्या सार्वजनिक ठिकाणी जमा झालेला कचरा, मातीचे ढिगारे आदी उपसण्यासाठी १५ कोटी दोन लाखांचा खर्च झालेला आहे. यापैकी आतापर्यंत अवघे २५ लाख रुपये या विल्हेवाटीसाठी वाटप झाले आहेत.

या अतिवृष्टीत ३१ ठिकाणी जीवघेणे पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते. रेल्वे व उपनगरीय वाहतूक बंद करावी लागली होती. या कालावधीत जिल्ह्यात सर्वाधिक कल्याण तालुक्यातील सहा ठिकाणी १४ हजार ९८८ कुटुंबीयांची परवड झाली. अंबरनाथ तालुक्यात चार ठिकाणचे तीन हजार ३१ परिवार आणि शहापूर तालुक्यातील २० ठिकाणी ५१८ कुटुंबीयांना अतिवृष्टीचा जबरदस्त फटका बसला. या रहिवाशांच्या घरातील चीज वस्तू, भांडी आदी नऊ कोटी २६ लाख ९० हजार रुपयांच्या नुकसानीचे पंचनामे झाले आहेत. मात्र, यापैकी फक्त दोन कोटी ४० लाख ६५ हजारांचे वाटप झाले.

उर्वरित सात कोटी रुपयांची भरपाई अद्याप कागदावरच आहे. जिल्ह्यात १६४ पक्क्या-कच्च्या घरांची पडझड

अतिवृष्टीमुळे १६४ घरांचे नुकसान होऊन पडझड झालेली आहे. यामध्ये १५१ निवासी घरांचा समावेश आहे. यात पक्क्या घरांसह कच्च्या घरांचा आणि झोपड्यांचा समावेश आहे. याशिवाय गाई, म्हशींचे १३ गोठे उद्ध्वस्त झाले आहेत. या तब्बल १६४ घरांच्या दुरुस्तीसाठी आजपर्यंत शासनाकडून भरपाई मिळालेली नाही.

अपेक्षित नुकसानभरपाई

जिल्ह्यात पूर्ण पडझड झालेल्या १४ घरांसाठी १३ लाखांची भरपाई अपेक्षित आहे. पूर्ण पडझड झालेल्या सहा कच्च्या घरांसाठी पाच लाख ७० हजार, १६ झोपड्यांसाठी ९६ हजार, अंशतः नष्ट झालेल्या ६४ पक्क्या घरांचे तीन लाख ८४ हजार आणि अंशतः नष्ट झालेल्या ५१ कच्च्या घरांच्या तीन लाख सहा हजारांच्या नुकसानभरपाईकडे अतिवृष्टीग्रस्तांच्या नजरा लागून आहेत.