शहरं
Join us  
Trending Stories
1
"खडा हूं आज भी वहीं..."; मतचोरीच्या आरोपांवरून जेपी नड्डांनी घेतली राहुल गांधींची 'फिरकी', VIDEO शेअर करत सगळंच उघडं पाडलं!
2
ट्रम्प यांनी भारतावर का लावलंय मोठ्या प्रमाणात टॅरिफ, अखेर व्हाईट हाऊसनं सांगितलं कारण
3
'नोरा फतेहीसारखी फिगर बनव'; पतीने केला पत्नीचा अतोनात छळ, चिडलेल्या तिने शिकवला 'असा' धडा!
4
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
5
CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा फोटो आला समोर, आरोपी गुजरातचा रहिवासी
6
Mumbai Rain Updates Live: मुंबईसाठी हवामान विभागाचा ऑरेंज अलर्ट, मुंबई रेल्वेची वाहतूक धीम्या गतीनं सुरू
7
गृहकर्जाचे हप्ते डोईजड झालेत? सरकार स्वस्तात देतंय २५ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज; कोण घेऊ शकतो लाभ?
8
'मुंबईचा फौजदार' सिनेमाचा रिमेक येणार? गश्मीर म्हणाला- "मी सिनेमा बनवेन पण प्राजक्ता माळीला..."
9
India China Talks: व्यापारापासून ते थेट उड्डाणांपर्यंत; भारत-चीन यांच्यातील चर्चेत अनेक समस्यांवर निघाला तोडगा
10
Ritul: मासिक पाळीदरम्यान केस का धुवू नयेत? जाणून घ्या शास्त्र आणि विज्ञान!
11
BMC: पावसाळ्यात कुठे अडकलात तर काय कराल? मुंबई महानगरपालिकेची महत्त्वाची पोस्ट!
12
'हिला भुतांनी पछाडलेले आहे'; तांत्रिक गरम सळीने चटके देत राहिला, वेदनेने मुलीचा मृत्यू झाला
13
खळबळजनक! बीडमधील कोर्टात सरकारी वकिलाने स्वतःला संपवलं; कारण काय?
14
"चहलने तो टीशर्ट स्टंट खरंच केला? माझा विश्वासच बसत नव्हता..", धनश्री वर्माने व्यक्त केल्या भावना
15
पंतप्रधान अन् मुख्यमंत्र्यांनाही पदावरुन हटवण्याची तरतूद; केंद्र सरकारच्या नवीन विधेयकात नेमकं काय?
16
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
17
आधी बोलत होता, अचानक हात खेचला, धक्का दिला; रेखा गुप्ता यांच्यावर कसा हल्ला झाला? प्रत्यक्षदर्शी म्हणाले...
18
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
19
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
20
रात्रीच्या वेळी शेतामध्ये प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत होती मुलगी; मागून गेलेल्या वडिलांनी बघितलं, उचललं टोकाचं पाऊल अन्...

घरांच्या डेब्रिजसह कचरा विल्हेवाटीसाठी १५ कोटींचा खर्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:45 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : जिल्ह्यात यंदाच्या पावसाळ्यात सर्वाधिक अतिवृष्टी जुलैमध्ये झाली आहे. या दोन-तीन दिवसांच्या कालावधीत ठिकठिकाणची घरे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : जिल्ह्यात यंदाच्या पावसाळ्यात सर्वाधिक अतिवृष्टी जुलैमध्ये झाली आहे. या दोन-तीन दिवसांच्या कालावधीत ठिकठिकाणची घरे पडली, भूस्खलन झाले. सार्वजनिक ठिकाणी साचलेल्या कचऱ्यांच्या ढिगाऱ्यांच्या विल्हेवाटीसाठी तब्बल १५ कोटींपेक्षा अधिक रकमेचा खर्च झाल्याचे वास्तव उघडकीस आले आहे.

जुलैतील अतिवृष्टीत जिल्ह्यातील ३१ ठिकाणच्या १८ हजार ५३८ कुटुंबीयांना स्थलांतरित करावे लागले. जिल्हाभरात १६४ पक्क्या, कच्च्या घरांची पडझड झाली. याशिवाय भूस्खलन होऊन काही ठिकाणचे जनजीवनही विस्कळीत झाले. जिल्हाभरातील २४ ठिकाणच्या सार्वजनिक ठिकाणी जमा झालेला कचरा, मातीचे ढिगारे आदी उपसण्यासाठी १५ कोटी दोन लाखांचा खर्च झालेला आहे. यापैकी आतापर्यंत अवघे २५ लाख रुपये या विल्हेवाटीसाठी वाटप झाले आहेत.

या अतिवृष्टीत ३१ ठिकाणी जीवघेणे पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते. रेल्वे व उपनगरीय वाहतूक बंद करावी लागली होती. या कालावधीत जिल्ह्यात सर्वाधिक कल्याण तालुक्यातील सहा ठिकाणी १४ हजार ९८८ कुटुंबीयांची परवड झाली. अंबरनाथ तालुक्यात चार ठिकाणचे तीन हजार ३१ परिवार आणि शहापूर तालुक्यातील २० ठिकाणी ५१८ कुटुंबीयांना अतिवृष्टीचा जबरदस्त फटका बसला. या रहिवाशांच्या घरातील चीज वस्तू, भांडी आदी नऊ कोटी २६ लाख ९० हजार रुपयांच्या नुकसानीचे पंचनामे झाले आहेत. मात्र, यापैकी फक्त दोन कोटी ४० लाख ६५ हजारांचे वाटप झाले.

उर्वरित सात कोटी रुपयांची भरपाई अद्याप कागदावरच आहे. जिल्ह्यात १६४ पक्क्या-कच्च्या घरांची पडझड

अतिवृष्टीमुळे १६४ घरांचे नुकसान होऊन पडझड झालेली आहे. यामध्ये १५१ निवासी घरांचा समावेश आहे. यात पक्क्या घरांसह कच्च्या घरांचा आणि झोपड्यांचा समावेश आहे. याशिवाय गाई, म्हशींचे १३ गोठे उद्ध्वस्त झाले आहेत. या तब्बल १६४ घरांच्या दुरुस्तीसाठी आजपर्यंत शासनाकडून भरपाई मिळालेली नाही.

अपेक्षित नुकसानभरपाई

जिल्ह्यात पूर्ण पडझड झालेल्या १४ घरांसाठी १३ लाखांची भरपाई अपेक्षित आहे. पूर्ण पडझड झालेल्या सहा कच्च्या घरांसाठी पाच लाख ७० हजार, १६ झोपड्यांसाठी ९६ हजार, अंशतः नष्ट झालेल्या ६४ पक्क्या घरांचे तीन लाख ८४ हजार आणि अंशतः नष्ट झालेल्या ५१ कच्च्या घरांच्या तीन लाख सहा हजारांच्या नुकसानभरपाईकडे अतिवृष्टीग्रस्तांच्या नजरा लागून आहेत.