शहरं
Join us  
Trending Stories
1
मृत अर्थव्यवस्था? मग हा वाढीचा ७% वेग कोणाचा हो राष्ट्राध्यक्ष ट्रम्प? अरविंद पनगढियांचा पलटवार
2
राहुल गांधी, आव्हान स्वीकारा! ...जेणेकरून ‘दूध का दूध, और पानी का पानी’ होईल.
3
उत्तरकाशीतून ६५० लोकांना बाहेर काढण्यात यश; ३०० लोक अजूनही अडकल्याची भीती, धरालीमध्ये बचावकार्य सुरू
4
Raksha Bandhan Shubh Muhurt: राखी बांधण्यासाठी साडेसात तासांचा शुभ मुहूर्त; सुरु झाला, कधी संपणार... अख्खा दिवस नाहीय...
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आणखी एक युद्ध संपवल्याचा दावा! ३७ वर्षांच्या युद्धाला मिळाला पूर्णविराम
6
राहुल गांधींचा दावा फॅक्ट चेकमध्ये निघाला खरा, एकच व्यक्ती ४ ठिकाणी मतदार, नंबर सारखाच
7
सावत्र आईसुद्धा 'आई'च! तिलाही पेन्शनचा हक्क हवा : सर्वोच्च न्यायालय
8
स्टॅलिन म्हणाले, आम्ही केवळ तामिळ, इंग्रजी भाषा सुरू ठेवणार; केंद्राच्या एनईपीविरोधात राज्याचे नवे शैक्षणिक धोरण 
9
आजचे राशीभविष्य, ०९ ऑगस्ट २०२५:सुखद बातमी मिळेल, आनंदी राहाल! असा जाईल आजचा दिवस
10
ओबीसी क्रिमिलेअर उत्पन्न मर्यादेचा, दर ३ वर्षांनी आढावा घ्या; इतर मागासवर्गीयांसाठी नियुक्त समितीची शिफारस
11
जिथे-जिथे नवीन मतदार तिथे-तिथे भाजपचा विजय! राहुल गांधी यांची टीका; प्रियांका गांधी म्हणाल्या...
12
रागाने गेलेला मुलगा आठ वर्षांनी परतला, पोलिसांकडून ‘सरप्राईज गिफ्ट’; आई-वडिलांचे डोळे अश्रूंनी डबडबले 
13
अमेरिकेकडून शस्त्रास्त्रं खरेदी थांबविल्याच्या वृत्ताचे भारताकडून जोरदार खंडन; संरक्षण मंत्रालयानं स्पष्टच सांगितलं 
14
८० एकरांत २५ फूट गाळ, अजूनही दबलेत १५० जण; आधुनिक मशिन धरालीत येण्यास लागणार ४ दिवस
15
निवडणूक आयोग शपथपत्र द्यायला सांगतोय; पण मी आधीच संसदेत शपथ घेतली आहे : राहुल गांधी
16
महादेवी हत्तीणीसाठी सोमवारी सर्वाेच्च न्यायालयाला साकडे, राज्य सरकार, वनतारा, नांदणी मठ देणार एकत्रित विनंतीअर्ज
17
इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे शेवटच्या रांगेत; शिंदेसेनेचे आंदोलन, तर भाजपची टीका
18
एकाच वेळी चार विद्यार्थ्यांची अंत्ययात्रा, हमसून-हमसून धाय मोकलून रडले गाव...
19
पडळकर समर्थकाचे अपहरण, पाच तासांत आरोपी ताब्यात; रोहित पवार मास्टरमाइंड असल्याचा आरोप
20
"पुणे तर ‘फ्युचर सिटी’; १० वर्षांत कायापालट; शहरासाठी आणखी पाच पोलिस ठाणी" 

सिडकोच्या मेट्रोचा लवकरच कल्याणपर्यंत विस्तार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2017 02:45 IST

मेट्रोचा पहिला टप्पा दृष्टिपथात आला आहे. या प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात आल्याने सिडकोने खांदेश्वर ते तळोजा या दुसºया टप्प्यातील प्रकल्पासाठी चाचपणी सुरू केली आहे.

कमलाकर कांबळे नवी मुंबई : मेट्रोचा पहिला टप्पा दृष्टिपथात आला आहे. या प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात आल्याने सिडकोने खांदेश्वर ते तळोजा या दुसºया टप्प्यातील प्रकल्पासाठी चाचपणी सुरू केली आहे. तिसºया टप्प्याच्या मार्गातील काही तांत्रिक अडचणी लक्षात घेता सिडकोने आता तळोजा ते कल्याण या चौथ्या टप्प्याचा विचार सुरू केला आहे. त्यादृष्टीने कार्यवाही सुरू करण्याच्या सूचना संबंधित विभागाला दिल्याची माहिती सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी यांनी ‘लोकमत’ला दिली.सिडकोने २0११ मध्ये नवी मुंबई मेट्रोच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली. तीन टप्प्यांत पूर्ण होणारा हा मेट्रो प्रकल्प २१.४५ किमी लांबीचा आहे. त्यासाठी चार हजार कोटींचा खर्च अपेक्षित आहे. त्यापैकी बेलापूर-खारघर-तळोजा-पेंधर या ११ कि.मी. लांबीच्या पहिल्या टप्प्याचे काम प्रगतिपथावर आहे. या मार्गावर एकूण ११ स्थानके आहेत. या पहिल्या टप्प्याचे काम सध्या प्रगतिपथावर आहे. सप्टेंबर २0१८ मध्ये या मार्गावर मेट्रो सुरू करण्याचा निर्धार सिडकोने केला. त्यासाठी चिनी बनावटीच्या मेट्रो खरेदी केल्या आहेत. त्यापैकी दोन मेट्रो कोच पुढील महिन्यात ट्रायलसाठी सिडकोच्या ताफ्यात दाखल होणार आहेत.दुसरा टप्पा ८.३५ कि.मी. लांबीचा आहे. तळोजा एमआयडीसी-कळंबोली-खांदेश्वर मार्गे आंतरराष्ट्रीय विमानतळाला हा मार्ग जोडला जाणार आहे. त्यासाठी सुमारे दीड हजार कोटींचा खर्च अपेक्षित आहे. विशेष म्हणजे एकूण मार्गापैकी तीन ते चार किमीचा मार्ग एमआयडीसी क्षेत्रातून जाईल. त्यासाठी एमआयडीसीही अनुकूल आहे. त्यामुळे दुसºया टप्प्यालाही लवकरच सुरूवात होण्याचा विश्वास सिडकोने व्यक्त केला आहे. पहिल्या दोन टप्प्यांना जोडण्यासाठी पेंधर ते एमआयडीसी दोन किमी लांबीचा तिसरा टप्पा प्रस्तावित आहे. परंतु, पहिला आणि दुसरा टप्पा पूर्ण होईपर्यंत तिसºया टप्प्याचे काम सुरू करणे तांत्रिकदृष्ट्या शक्य नाही. त्यामुळे व्यवहारिकदृष््या सोयीचा ठरणारा तळोजा ते कल्याणपर्यंतचा सुमारे २३ किमी लांबीचा मेट्रोच्या चौथ्या टप्प्याचे काम सुरू करण्याचा सिडकोचा निर्णय आहे. यासंदर्भात अलीकडेच संबंधित विभागाला कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्याचे गगराणी म्हणाले.पुढच्या वर्षी बेलापूर ते पेंधर मेट्रोची प्रत्यक्ष सेवा सुरू होईल, असा विश्वास सिडकोला आहे. उर्वरित दोन टप्प्यांचे काम पूर्ण होईतो पहिल्या टप्प्याचा विस्तार कल्याणपर्यंत केल्यास अधिक उपयुक्त ठरेल, असे सिडकोला वाटते.