शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

मालगाडीच्या टँकरमधून वायुगळती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2019 23:03 IST

खर्र्डी स्थानकाजवळील घटना। पाच तासांनंतर नियंत्रण, उग्र वासामुळे घबराट

कसारा : मुंबईहून कसाराकडे जाणारी मालगाडीतील गॅस टँकरमधून खर्डी स्थानकाजवळ सकाळी ८ वाजता वायुगळती सुरू झाल्याची घटना घडली. भारत पेट्रोलियमच्या गॅस टॅँकरची वाहतूक करणारी ही गाडी खर्डी-कसारा स्थानकांदरम्यान उभी होती. या गाडीतील एका टॅँकरमधून वायुगळती होत असल्याचे स्थानिक नागरिकांनी खर्डी स्टेशन मास्तरांना कळवले. त्यांनी संबंधित यंत्रणेला कळवताच उरण येथून भारत पेट्रोलियमची तज्ज्ञ टीम घटनास्थळी दाखल झाली. त्यांनी पाच तासांनी वायुगळती बंद करण्यात यश मिळवले. यादरम्यान थोडीशी जरी ठिणगी पडली असती तरी मोठा अनर्थ झाला असता.

या घटनेविषयी माहिती मिळताच लागलीच रेल्वे सुरक्षा अधिकारी हनुमान सिंग, तहसीलदार नीलिमा सूर्यवंशी, लोहमार्ग पोलीस अधिकारी शार्दूल, आपत्ती व्यवस्थापन टीम आणि पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले. वायुगळती सुरू असल्यामुळे वाहतूक सुरू राहिल्यास धोका निर्माण होऊ शकतो हे ओळखून आपत्ती व्यवस्थापन टीमने रेल्वे अधिकारी आणि तहसीलदारांना वाहतूक बंद करण्याविषयी विनंती केली. त्यानुसार दुपारी १२.३० वाजता वाहतूक बंद करण्यात आली.

तसेच रेल्वे पोलीस व महसूल कर्मचाऱ्यांच्या मदतीने गॅस टँकर लागतची घरे रिकामी करून सुरक्षेचा उपाय म्हणून रहिवाशांना इतरत्र हलवण्यात आले होते.दरम्यान, वायुगळती सुरू असतानाही रेल्वे प्रशासनाने वाहतूक सुरू ठेवली होती. त्यामुळे चालू गाड्यांमधून एखादी ठिणगी उडाली असती तर मोठा अनर्थ घडला असता. वेळीच ही वायुगळती नियंत्रणात आल्याने मोठी दुर्घटना टळल्याच प्रतिक्रिया यावेळी अनेकांनी दिली. वायुगळतीमुळे परिसरात सर्वत्र उग्र वास पसरल्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागला.वणवा पेटलेला असता तर मोठी दुर्घटना घडली असतीवायुगळती झालेल्या परिसरात रेल्वे रूळांजवळील डोंगर-टेकड्यांवर नेहमी वणव्याच्या घटना घडतात. आज जर वणवा पेटला असता तर मोठा अनर्थ घडून मोठी जीवित आणि वित्तहानी झाली असती.