शहरं
Join us  
Trending Stories
1
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
2
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
3
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
4
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
5
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार
6
“धर्म-भाषा काहीही असो, आपण सर्व हिंदू आहोत; ब्रिटिशांनी आपल्यात फूट पाडली”- मोहन भागवत
7
"...तोपर्यंत मी तुरुंगात राहण्यास तयार आहे"; सोनम वांगचुक यांनी जोधपूरहून भावाकडे पाठवला मेसेज
8
INDW vs PAKW: अचानक मैदानात पसरला पांढरा धूर: भारत-पाक सामन्यात नेमकं काय घडलं?
9
IND W vs PAK W : पुरुष असो वा महिला, नो हँडशेक फॉर्म्युला! हरमनप्रीतनं पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ
10
‘’२०२७ चा वर्ल्डकप खेळायला मिळाला तर…’’, बोलता बोलता रोहित झाला होता भावूक, तो व्हिडीओ होतोय व्हायरल  
11
बिहारमध्ये केव्हा होणार विधानसभा निवडणूक? CEC ज्ञानेश कुमार यांची घोषणा; SIR संदर्भातही मोठं विधान
12
गुजरातमधून आणलेला सिंह तामिळनाडूच्या प्राणीसंग्रहालयातून पळाला; स्थानिकांमध्ये घबराट...
13
EMI थकवला तर फोन, लॅपटॉप होणार लॉक! RBI चा नवा नियम; कर्ज वसुलीसाठी बँकांना मिळणार 'हे' अधिकार
14
अनिल परबांचे आरोप, ज्योती रामदास कदम पहिल्यांदाच मीडियासमोर आल्या; आगीची घटना कशी घडली?
15
"केस ओढले, इस्रायलच्या ध्वजाला किस करायला लावलं"; ग्रेटा थनबर्गला अमानुष वागणुकीचा आरोप, प्रकरण काय?
16
अनर्थ टळला! लँडिंगपूर्वी एअर इंडिया विमानाचं RAT एक्टिव्ह; बर्मिघम रनवेवर विमान सुरक्षित उतरवलं
17
देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी खिशात किती कॅश ठेवतात? स्वतःच केला खुलासा
18
Nashik Crime: टोळी संघर्षातून गोळीबार, भाजप नेत्यानंतर म्होरक्या विकी वाघसह साथीदार अडकला जाळ्यात
19
रोहित शर्माला कर्णधार पदावरून हटवण्यामागचं 'गंभीर' कनेक्शन; जाणून घ्या सविस्तर
20
Rape Case: पार्टीसाठी बोलावलं, शिक्षकेवर चार जीम ट्रेनर्संनी केला सामूहिक बलात्कार; आरोपींची नावे आली समोर

पावसाळ्याच्या तोंडावर खोदकाम

By admin | Updated: June 2, 2017 05:28 IST

१५ मेनंतर खोदकाम करू नये तसेच ३१ मेपर्यंत डांबरीकरणाची कामे पूर्ण करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले असताना पावसाळ्याच्या

लोकमत न्यूज नेटवर्क मीरा रोड : १५ मेनंतर खोदकाम करू नये तसेच ३१ मेपर्यंत डांबरीकरणाची कामे पूर्ण करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले असताना पावसाळ्याच्या तोंडावर मीरा-भार्इंदरमध्ये अद्यापही खोदकामे सुरूच आहेत. डांबरीकरणही घाईगडबडीत सुरू असून पावसात टिकणार नसले, तरी ठेकेदारांचे खिसे मात्र भरणार आहेत. पावसाळ्यात किंवा त्याआधी १५ दिवस केलेले डांबरीकरण टिकत नसल्याने राज्य शासनाने मेदरम्यानच डांबरीकरणाची कामे पूर्ण करण्याचे आदेश परिपत्रकाद्वारे दिलेले आहेत. पाण्यामुळे डांबर टिकत नसल्याने केलेला खर्च पाण्यात जातोच, शिवाय काम पुन्हा करावे लागत असल्याने खर्च वाढतो. डांबर उखडल्याने सर्वसामान्य नागरिक व वाहनचालकांना संपूर्ण पावसाळ्यात त्रास सहन करावा लागतो. आता सुरू असलेल्या कामाची परिस्थिती लक्षात घेता मीरा-भार्इंदरकरांची वाहने पावसाळ्यात उखडलेल्या खड्ड्यात जाऊ शकतात, अशी भीती व्यक्त होत आहे.मीरा-भार्इंदर महापालिका आयुक्त डॉ. नरेश गीते यांनीदेखील आपत्कालीन आढावा बैठकीत १५ मेनंतर खड्डे खणण्यास परवानगी देऊ नये तसेच ३१ मेपर्यंत डांबरीकरणाची कामे पूर्ण करा, असे निर्देश सार्वजनिक बांधकाम विभागास व संबंधितांना दिले होते. पावसाळा तोंडावर आला असताना शहरात सर्रास रस्तेखोदाई सुरूच असून खोदकाम केलेले रस्ते अजूनही डांबरीकरणाअभावी रखडले आहेत. खोदकाम केल्यावर रस्ते दगडमातीने भरल्यावर लगेच खडी व डांबर टाकता येत नाही. खड्ड्यांतील माती चांगली खाली बसावी लागते. आधीच डांबरीकरण केल्यास रस्ता खचतो आणि पाण्यामुळे डांबर टिकत नाही, असा अनुभव आहे. ज्या ठिकाणी खडीकरण केले आहे, तेथेदेखील आता डांबरीकरण केल्यास ते टिकणार नाही. परंतु, या सर्व बाबींची कल्पना व आयुक्तांचे आदेश असतानासुद्धा पालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागातील अनागोंदी व गैरकारभारामुळे सर्रास खोदकामे सुरू आहेत. चांगले रस्तेदेखील पावसाआधी खोदले जात असल्याने पावसाळ्यात लोकांना नाहक जाच होणार आहे. अर्धवट राहिलेले काही रस्ते ढिसाळपणामुळे केवळ खडीकरण करून ठेवल्यानेदेखील पावसाळ्यात स्थिती बिकट होणार आहे.या सर्व कामांवर काटेकोर देखरेख ठेवण्यासह डांबर व कामाचा दर्जा याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले जात आहे. पालिका निवडणूकसुद्धा तोंडावर असल्याने जो तो आपापल्या प्रभागातील कामे उरकण्यासाठी आग्रही असल्याचे दिसते. काम टिकणार का?पालिकेच्या भोंगळ व ठेकेदारधार्जिण्या कारभारामुळे पावसाळ्यात आता केलेले डांबरीकरण टिकणार का, याबद्दल साशंकता आहेच. शिवाय, खोदकामाच्या ठिकाणी रस्ते खचण्याची भीती निर्माण झाली आहे. पालिकेच्या अधिकाऱ्यांनी वेळीच कामे पूर्ण न केल्याने ही परिस्थिती ओढवली आहे. याप्रकरणी शहर अभियंता शिवाजी बारकुंड व कार्यकारी अभियंता दीपक खांबित यांच्याशी पालिकेच्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता त्यांनी फोन उचलला नाही. प्रशासनाच्या मनमानी व भ्रष्ट कारभाराला सत्ताधाऱ्यांची साथ असल्याने कामांचा दर्जा न राखता केवळ खिसेभरू वृत्तीने कामे उरकली जात आहेत. यामुळे शहरवासीयांच्या पैशांचा दुरुपयोग होऊन पावसाळ्यात लोकांचे हाल होणार आहेत. -प्रमोद सामंत, नगरसेवक१५ मेनंतर खोदकामास परवानगी देऊ नये व ३१ मेपर्यंत डांबरीकरणाची कामे पूर्ण करण्याच्या आयुक्तांच्या आदेशांचे पालन केले जात आहे. पाणीपुरवठा, भूमिगत गटार योजनेदरम्यान पडलेले खड्डे प्राधान्याने बुजवायला घेतले आहेत. -नितीन मुकणे, उपअभियंता, बांधकाम विभाग