शहरं
Join us  
Trending Stories
1
"दहशतवादी हल्ला झाला, तर आम्ही जशास तसे उत्तर देणार"; जयशंकर यांनी अमेरिकेतून पाकिस्तानला फटकारलं
2
युद्धाच्या फुसक्या धमक्यांचे 'बार' सोडणाऱ्या बिलावल भुट्टोंचं 'भिरभिरं' जमिनीवर; म्हणाले, 'भारतासोबत...'
3
आईनं मुलाचा मुलीप्रमाणे श्रृंगार केला, आनंदात फोटो काढले अन् संपूर्ण कुटुंबाने एकाच वेळी जीवन संपवले! नेमकं काय घडलं?
4
ENG vs IND : गिल-जड्डू जोडी जमली! अर्धा संघ तंबूत परतल्यावर टीम इंडियानं साधला 'त्रिशतकी' डाव
5
कर्नाटकात मुख्यमंत्री पदावरून अंतर्गत कलह सुरू असतानाच सरकारचा मोठा निर्णय; २ शहरांची नावं बदलली
6
आमदार संग्राम जगताप यांना जीवे मारण्याची धमकी, पोलिसांत तक्रार दाखल
7
कॅप्टन्सीत शतकी 'रोमान्स'! शुबमन गिलनं मारली विराटसह या दिग्गजांच्या क्लबमध्ये एन्ट्री
8
"...तर काँग्रेस पक्षाला थेट आरोपी बनवता येईल"; नॅशनल हेराल्ड प्रकरणात EDचा न्यायालयात दावा
9
IND vs ENG: बुमराहवर प्रचंड संतापले रवी शास्त्री; गंभीर-गिल जोडीला म्हणाले- "त्याच्या हातातून..."
10
"एकदा तरी मला माझ्या बहिणीला भेटू द्या"; सोनम रघुवंशीच्या भावाची मागणी, म्हणाला... 
11
यशस्वी जैस्वालची सेंच्युरी हुकली! पण एका डावात अनेक विक्रम; हिटमॅन रोहित शर्मालाही टाकले मागे
12
खतरनाक इनस्विंग! स्टायलिश अंदाजात बॉल सोडला अन् 'क्लीन बोल्ड' होऊन तंबूत परतला (VIDEO)
13
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना मोठा धक्का, सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा!
14
८ वर्षांनी संधी; आता प्रमोशनही मिळालं! पण तो पुन्हा 'बिनकामाचा' ठरला
15
"माझ्यासमोरच त्याने तिघांना मारलंय"; वाल्मिक कराडच्या जुन्या सहकाऱ्याचा धक्कादायक दावा; म्हणाले, "त्याला बीडचा..."
16
कठड्यावर धडकून बाईकखाली पाय अडकला अन...; दुचाकी पेटल्याने तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
17
टॉयलेटमध्ये जाणाऱ्या महिलांचे बनवत होता व्हिडीओ; प्रसिद्ध आयटी कंपनीमधील इंजिनियरला अटक
18
आधार कार्ड दिलं नाही म्हणून काढली पँट; कावड यात्रेआधी ओळख पटवणाऱ्या लोकांवर भडकले ओवैसी
19
इन्स्टाग्रामवर सूत जुळलं, कोर्ट मॅरेजनंतर मुलाला दिला जन्म; २२ वर्षीय तरुणीने संपवलं आयुष्य
20
सर्वाधिक कसोटी सामने जिंकणारे भारतीय कर्णधार, धोनी दुसऱ्या क्रमांकावर, पहिला कोण?

पावसाळ्याच्या तोंडावर खोदकाम

By admin | Updated: June 2, 2017 05:28 IST

१५ मेनंतर खोदकाम करू नये तसेच ३१ मेपर्यंत डांबरीकरणाची कामे पूर्ण करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले असताना पावसाळ्याच्या

लोकमत न्यूज नेटवर्क मीरा रोड : १५ मेनंतर खोदकाम करू नये तसेच ३१ मेपर्यंत डांबरीकरणाची कामे पूर्ण करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले असताना पावसाळ्याच्या तोंडावर मीरा-भार्इंदरमध्ये अद्यापही खोदकामे सुरूच आहेत. डांबरीकरणही घाईगडबडीत सुरू असून पावसात टिकणार नसले, तरी ठेकेदारांचे खिसे मात्र भरणार आहेत. पावसाळ्यात किंवा त्याआधी १५ दिवस केलेले डांबरीकरण टिकत नसल्याने राज्य शासनाने मेदरम्यानच डांबरीकरणाची कामे पूर्ण करण्याचे आदेश परिपत्रकाद्वारे दिलेले आहेत. पाण्यामुळे डांबर टिकत नसल्याने केलेला खर्च पाण्यात जातोच, शिवाय काम पुन्हा करावे लागत असल्याने खर्च वाढतो. डांबर उखडल्याने सर्वसामान्य नागरिक व वाहनचालकांना संपूर्ण पावसाळ्यात त्रास सहन करावा लागतो. आता सुरू असलेल्या कामाची परिस्थिती लक्षात घेता मीरा-भार्इंदरकरांची वाहने पावसाळ्यात उखडलेल्या खड्ड्यात जाऊ शकतात, अशी भीती व्यक्त होत आहे.मीरा-भार्इंदर महापालिका आयुक्त डॉ. नरेश गीते यांनीदेखील आपत्कालीन आढावा बैठकीत १५ मेनंतर खड्डे खणण्यास परवानगी देऊ नये तसेच ३१ मेपर्यंत डांबरीकरणाची कामे पूर्ण करा, असे निर्देश सार्वजनिक बांधकाम विभागास व संबंधितांना दिले होते. पावसाळा तोंडावर आला असताना शहरात सर्रास रस्तेखोदाई सुरूच असून खोदकाम केलेले रस्ते अजूनही डांबरीकरणाअभावी रखडले आहेत. खोदकाम केल्यावर रस्ते दगडमातीने भरल्यावर लगेच खडी व डांबर टाकता येत नाही. खड्ड्यांतील माती चांगली खाली बसावी लागते. आधीच डांबरीकरण केल्यास रस्ता खचतो आणि पाण्यामुळे डांबर टिकत नाही, असा अनुभव आहे. ज्या ठिकाणी खडीकरण केले आहे, तेथेदेखील आता डांबरीकरण केल्यास ते टिकणार नाही. परंतु, या सर्व बाबींची कल्पना व आयुक्तांचे आदेश असतानासुद्धा पालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागातील अनागोंदी व गैरकारभारामुळे सर्रास खोदकामे सुरू आहेत. चांगले रस्तेदेखील पावसाआधी खोदले जात असल्याने पावसाळ्यात लोकांना नाहक जाच होणार आहे. अर्धवट राहिलेले काही रस्ते ढिसाळपणामुळे केवळ खडीकरण करून ठेवल्यानेदेखील पावसाळ्यात स्थिती बिकट होणार आहे.या सर्व कामांवर काटेकोर देखरेख ठेवण्यासह डांबर व कामाचा दर्जा याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले जात आहे. पालिका निवडणूकसुद्धा तोंडावर असल्याने जो तो आपापल्या प्रभागातील कामे उरकण्यासाठी आग्रही असल्याचे दिसते. काम टिकणार का?पालिकेच्या भोंगळ व ठेकेदारधार्जिण्या कारभारामुळे पावसाळ्यात आता केलेले डांबरीकरण टिकणार का, याबद्दल साशंकता आहेच. शिवाय, खोदकामाच्या ठिकाणी रस्ते खचण्याची भीती निर्माण झाली आहे. पालिकेच्या अधिकाऱ्यांनी वेळीच कामे पूर्ण न केल्याने ही परिस्थिती ओढवली आहे. याप्रकरणी शहर अभियंता शिवाजी बारकुंड व कार्यकारी अभियंता दीपक खांबित यांच्याशी पालिकेच्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता त्यांनी फोन उचलला नाही. प्रशासनाच्या मनमानी व भ्रष्ट कारभाराला सत्ताधाऱ्यांची साथ असल्याने कामांचा दर्जा न राखता केवळ खिसेभरू वृत्तीने कामे उरकली जात आहेत. यामुळे शहरवासीयांच्या पैशांचा दुरुपयोग होऊन पावसाळ्यात लोकांचे हाल होणार आहेत. -प्रमोद सामंत, नगरसेवक१५ मेनंतर खोदकामास परवानगी देऊ नये व ३१ मेपर्यंत डांबरीकरणाची कामे पूर्ण करण्याच्या आयुक्तांच्या आदेशांचे पालन केले जात आहे. पाणीपुरवठा, भूमिगत गटार योजनेदरम्यान पडलेले खड्डे प्राधान्याने बुजवायला घेतले आहेत. -नितीन मुकणे, उपअभियंता, बांधकाम विभाग