शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
2
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
3
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
4
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
5
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
6
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
7
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
8
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
9
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
10
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
11
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
12
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
13
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
14
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
15
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
16
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
17
निमिषा प्रियासाठी सरकार जनतेकडून ८ कोटी मागत आहे? परराष्ट्र मंत्रालयाने सत्य सांगितले
18
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
19
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार
20
ऑनलाइन बेटिंग आता दंडनीय गुन्हा, केंद्रीय मंत्रिमंडळाचा गेमिंग विधेयकाला हिरवा कंदील

पावसाळ्याच्या तोंडावर खोदकाम

By admin | Updated: June 2, 2017 05:28 IST

१५ मेनंतर खोदकाम करू नये तसेच ३१ मेपर्यंत डांबरीकरणाची कामे पूर्ण करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले असताना पावसाळ्याच्या

लोकमत न्यूज नेटवर्क मीरा रोड : १५ मेनंतर खोदकाम करू नये तसेच ३१ मेपर्यंत डांबरीकरणाची कामे पूर्ण करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले असताना पावसाळ्याच्या तोंडावर मीरा-भार्इंदरमध्ये अद्यापही खोदकामे सुरूच आहेत. डांबरीकरणही घाईगडबडीत सुरू असून पावसात टिकणार नसले, तरी ठेकेदारांचे खिसे मात्र भरणार आहेत. पावसाळ्यात किंवा त्याआधी १५ दिवस केलेले डांबरीकरण टिकत नसल्याने राज्य शासनाने मेदरम्यानच डांबरीकरणाची कामे पूर्ण करण्याचे आदेश परिपत्रकाद्वारे दिलेले आहेत. पाण्यामुळे डांबर टिकत नसल्याने केलेला खर्च पाण्यात जातोच, शिवाय काम पुन्हा करावे लागत असल्याने खर्च वाढतो. डांबर उखडल्याने सर्वसामान्य नागरिक व वाहनचालकांना संपूर्ण पावसाळ्यात त्रास सहन करावा लागतो. आता सुरू असलेल्या कामाची परिस्थिती लक्षात घेता मीरा-भार्इंदरकरांची वाहने पावसाळ्यात उखडलेल्या खड्ड्यात जाऊ शकतात, अशी भीती व्यक्त होत आहे.मीरा-भार्इंदर महापालिका आयुक्त डॉ. नरेश गीते यांनीदेखील आपत्कालीन आढावा बैठकीत १५ मेनंतर खड्डे खणण्यास परवानगी देऊ नये तसेच ३१ मेपर्यंत डांबरीकरणाची कामे पूर्ण करा, असे निर्देश सार्वजनिक बांधकाम विभागास व संबंधितांना दिले होते. पावसाळा तोंडावर आला असताना शहरात सर्रास रस्तेखोदाई सुरूच असून खोदकाम केलेले रस्ते अजूनही डांबरीकरणाअभावी रखडले आहेत. खोदकाम केल्यावर रस्ते दगडमातीने भरल्यावर लगेच खडी व डांबर टाकता येत नाही. खड्ड्यांतील माती चांगली खाली बसावी लागते. आधीच डांबरीकरण केल्यास रस्ता खचतो आणि पाण्यामुळे डांबर टिकत नाही, असा अनुभव आहे. ज्या ठिकाणी खडीकरण केले आहे, तेथेदेखील आता डांबरीकरण केल्यास ते टिकणार नाही. परंतु, या सर्व बाबींची कल्पना व आयुक्तांचे आदेश असतानासुद्धा पालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागातील अनागोंदी व गैरकारभारामुळे सर्रास खोदकामे सुरू आहेत. चांगले रस्तेदेखील पावसाआधी खोदले जात असल्याने पावसाळ्यात लोकांना नाहक जाच होणार आहे. अर्धवट राहिलेले काही रस्ते ढिसाळपणामुळे केवळ खडीकरण करून ठेवल्यानेदेखील पावसाळ्यात स्थिती बिकट होणार आहे.या सर्व कामांवर काटेकोर देखरेख ठेवण्यासह डांबर व कामाचा दर्जा याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले जात आहे. पालिका निवडणूकसुद्धा तोंडावर असल्याने जो तो आपापल्या प्रभागातील कामे उरकण्यासाठी आग्रही असल्याचे दिसते. काम टिकणार का?पालिकेच्या भोंगळ व ठेकेदारधार्जिण्या कारभारामुळे पावसाळ्यात आता केलेले डांबरीकरण टिकणार का, याबद्दल साशंकता आहेच. शिवाय, खोदकामाच्या ठिकाणी रस्ते खचण्याची भीती निर्माण झाली आहे. पालिकेच्या अधिकाऱ्यांनी वेळीच कामे पूर्ण न केल्याने ही परिस्थिती ओढवली आहे. याप्रकरणी शहर अभियंता शिवाजी बारकुंड व कार्यकारी अभियंता दीपक खांबित यांच्याशी पालिकेच्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता त्यांनी फोन उचलला नाही. प्रशासनाच्या मनमानी व भ्रष्ट कारभाराला सत्ताधाऱ्यांची साथ असल्याने कामांचा दर्जा न राखता केवळ खिसेभरू वृत्तीने कामे उरकली जात आहेत. यामुळे शहरवासीयांच्या पैशांचा दुरुपयोग होऊन पावसाळ्यात लोकांचे हाल होणार आहेत. -प्रमोद सामंत, नगरसेवक१५ मेनंतर खोदकामास परवानगी देऊ नये व ३१ मेपर्यंत डांबरीकरणाची कामे पूर्ण करण्याच्या आयुक्तांच्या आदेशांचे पालन केले जात आहे. पाणीपुरवठा, भूमिगत गटार योजनेदरम्यान पडलेले खड्डे प्राधान्याने बुजवायला घेतले आहेत. -नितीन मुकणे, उपअभियंता, बांधकाम विभाग