शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगरात खोदलेले रस्ते धुळीने माखले, पाणी फवारणी नावालाच, रस्ते दुरुस्ती कधी?

By सदानंद नाईक | Updated: January 5, 2024 19:01 IST

सर्वसामान्य नागरिकांना पडला प्रश्न

सदानंद नाईक, उल्हासनगर: शहरात भुयारी गटारीचे पाईप टाकण्यासाठी खोदलेले रस्ते वेळीच दुरुस्त केले नसल्याने रस्ते धुळीने माखले आहे. धुळीचा त्रास कमी करण्यासाठी पाण्याची फवारणी नावालाच केली जात असून रस्ता बांधणी कधी? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे.

 उल्हासनगरात ४२३ कोटीच्या भुयारी गटार योजनेला मंजुरी मिळाली असून गटारीचे पाईप टाकण्याचे काम सुरू झाले आहे. एमएमआरडीएने १५० कोटीच्या निधीतून एकून ७ रस्ता बांधणीला मंजुरी दिली असून हे रस्ते बांधण्यापूर्वी रस्त्यात भुयारी गटारी टाकण्यात येत आहे. मात्र खोदलेले रस्ते तात्पुरते बुजविल्याने रस्ते धुळीने माखले आहे. धुळीमुळे नागरिक हैराण झाल्याने, महापालिका यंत्राद्वारे पाणी फवारणी करीत आहे. मात्र ते पुरेशी नसल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. धुळीने शहरातील हवेच्या प्रदूषणात वाढ झाली आहे. रस्ता बांधणी पर्यंत नागरिकांनी श्वासातून धूळ घ्यायची काय? असा संतप्त प्रश्न नागरिक करीत आहेत.

 शहरातील भुयारी गटार योजने अंतर्गत गटारी पाईप टाकण्यासाठी खोदलेले रस्ते संबंधीत ठेकेदाराने त्वरित पक्के दुरुस्ती करण्याची अट आहे. अशी अट असताना खोदलेले रस्ते दुरुस्त का केली जात नाही? असा प्रश्न नागरिकासह राजकीय पक्षाचे नेते विचारीत आहेत. एमएमआरडीएने मंजुरी दिलेल्या ७ रस्त्याचे बांधकाम सुरु होण्यापूर्वी रस्ता खोदून गटारी पाईप टाकण्याचे काम सुरू झाले. मात्र गटारीचे पाईप टाकण्याचे काम २ ते ३ महिन्यांपूर्वी होऊनही रस्त्याच्या बांधणीला सुरवात झाली नाही. अथवा खोदलेले रस्ते संबंधित ठेकेदाराने दुरुस्त केले नाही. महापालिका बांधकाम विभाग व पाणी पुरवठा विभाग अधिकारी संबंधित ठेकेदारांचे रस्ता दुरुस्तीचे पैसे वाचविण्यासाठी त्याला पाठीशी घालत असल्याचा आरोप बीएसपीचे प्रदेश महासचिव प्रा. प्रशांत इंगळे यांनी केला आहे.

रस्ता दुरुस्तीचे आदेश- आयुक्त अजीज शेख

शहरात काही रस्ते खोदून भुयारी गटारी पाईप टाकण्याचे काम सुरू असून खोदलेले रस्ते धुळीने माखले आहे. मात्र खोदलेले रस्ते दुरुस्ती करण्याचे आदेश बांधकाम विभागाला दिले आहे.

संदीप जाधव (शहर अभियंता- महापालिका)

एमएमआरडीएने मंजूर केलेल्या रस्ताची बांधण्यापूर्वी भुयारी गटारीचे पाईप टाकण्याचे काम सुरू आहे. खोलेले रस्ते तात्पुरत्या स्वरूपात दुरुस्त केले असून लवकरच रस्ता बांधणीला सुरवात होणार आहे. त्यामुळे धुळीचा प्रश्न निकाली लागणार आहे.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर