शहरं
Join us  
Trending Stories
1
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
2
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
3
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
4
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
5
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
6
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
7
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
8
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
10
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
11
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
12
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
13
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
14
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
15
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
16
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
17
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
18
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
19
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
20
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप

उल्हासनगरात खोदलेले रस्ते धुळीने माखले, पाणी फवारणी नावालाच, रस्ते दुरुस्ती कधी?

By सदानंद नाईक | Updated: January 5, 2024 19:01 IST

सर्वसामान्य नागरिकांना पडला प्रश्न

सदानंद नाईक, उल्हासनगर: शहरात भुयारी गटारीचे पाईप टाकण्यासाठी खोदलेले रस्ते वेळीच दुरुस्त केले नसल्याने रस्ते धुळीने माखले आहे. धुळीचा त्रास कमी करण्यासाठी पाण्याची फवारणी नावालाच केली जात असून रस्ता बांधणी कधी? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे.

 उल्हासनगरात ४२३ कोटीच्या भुयारी गटार योजनेला मंजुरी मिळाली असून गटारीचे पाईप टाकण्याचे काम सुरू झाले आहे. एमएमआरडीएने १५० कोटीच्या निधीतून एकून ७ रस्ता बांधणीला मंजुरी दिली असून हे रस्ते बांधण्यापूर्वी रस्त्यात भुयारी गटारी टाकण्यात येत आहे. मात्र खोदलेले रस्ते तात्पुरते बुजविल्याने रस्ते धुळीने माखले आहे. धुळीमुळे नागरिक हैराण झाल्याने, महापालिका यंत्राद्वारे पाणी फवारणी करीत आहे. मात्र ते पुरेशी नसल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. धुळीने शहरातील हवेच्या प्रदूषणात वाढ झाली आहे. रस्ता बांधणी पर्यंत नागरिकांनी श्वासातून धूळ घ्यायची काय? असा संतप्त प्रश्न नागरिक करीत आहेत.

 शहरातील भुयारी गटार योजने अंतर्गत गटारी पाईप टाकण्यासाठी खोदलेले रस्ते संबंधीत ठेकेदाराने त्वरित पक्के दुरुस्ती करण्याची अट आहे. अशी अट असताना खोदलेले रस्ते दुरुस्त का केली जात नाही? असा प्रश्न नागरिकासह राजकीय पक्षाचे नेते विचारीत आहेत. एमएमआरडीएने मंजुरी दिलेल्या ७ रस्त्याचे बांधकाम सुरु होण्यापूर्वी रस्ता खोदून गटारी पाईप टाकण्याचे काम सुरू झाले. मात्र गटारीचे पाईप टाकण्याचे काम २ ते ३ महिन्यांपूर्वी होऊनही रस्त्याच्या बांधणीला सुरवात झाली नाही. अथवा खोदलेले रस्ते संबंधित ठेकेदाराने दुरुस्त केले नाही. महापालिका बांधकाम विभाग व पाणी पुरवठा विभाग अधिकारी संबंधित ठेकेदारांचे रस्ता दुरुस्तीचे पैसे वाचविण्यासाठी त्याला पाठीशी घालत असल्याचा आरोप बीएसपीचे प्रदेश महासचिव प्रा. प्रशांत इंगळे यांनी केला आहे.

रस्ता दुरुस्तीचे आदेश- आयुक्त अजीज शेख

शहरात काही रस्ते खोदून भुयारी गटारी पाईप टाकण्याचे काम सुरू असून खोदलेले रस्ते धुळीने माखले आहे. मात्र खोदलेले रस्ते दुरुस्ती करण्याचे आदेश बांधकाम विभागाला दिले आहे.

संदीप जाधव (शहर अभियंता- महापालिका)

एमएमआरडीएने मंजूर केलेल्या रस्ताची बांधण्यापूर्वी भुयारी गटारीचे पाईप टाकण्याचे काम सुरू आहे. खोलेले रस्ते तात्पुरत्या स्वरूपात दुरुस्त केले असून लवकरच रस्ता बांधणीला सुरवात होणार आहे. त्यामुळे धुळीचा प्रश्न निकाली लागणार आहे.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर