शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
3
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
4
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
5
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
6
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
7
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
8
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
9
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
10
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
11
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
12
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
13
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
14
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
15
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
16
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
17
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
18
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
19
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
20
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!

उल्हासनगरात खोदलेले रस्ते धुळीने माखले, पाणी फवारणी नावालाच, रस्ते दुरुस्ती कधी?

By सदानंद नाईक | Updated: January 5, 2024 19:01 IST

सर्वसामान्य नागरिकांना पडला प्रश्न

सदानंद नाईक, उल्हासनगर: शहरात भुयारी गटारीचे पाईप टाकण्यासाठी खोदलेले रस्ते वेळीच दुरुस्त केले नसल्याने रस्ते धुळीने माखले आहे. धुळीचा त्रास कमी करण्यासाठी पाण्याची फवारणी नावालाच केली जात असून रस्ता बांधणी कधी? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे.

 उल्हासनगरात ४२३ कोटीच्या भुयारी गटार योजनेला मंजुरी मिळाली असून गटारीचे पाईप टाकण्याचे काम सुरू झाले आहे. एमएमआरडीएने १५० कोटीच्या निधीतून एकून ७ रस्ता बांधणीला मंजुरी दिली असून हे रस्ते बांधण्यापूर्वी रस्त्यात भुयारी गटारी टाकण्यात येत आहे. मात्र खोदलेले रस्ते तात्पुरते बुजविल्याने रस्ते धुळीने माखले आहे. धुळीमुळे नागरिक हैराण झाल्याने, महापालिका यंत्राद्वारे पाणी फवारणी करीत आहे. मात्र ते पुरेशी नसल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. धुळीने शहरातील हवेच्या प्रदूषणात वाढ झाली आहे. रस्ता बांधणी पर्यंत नागरिकांनी श्वासातून धूळ घ्यायची काय? असा संतप्त प्रश्न नागरिक करीत आहेत.

 शहरातील भुयारी गटार योजने अंतर्गत गटारी पाईप टाकण्यासाठी खोदलेले रस्ते संबंधीत ठेकेदाराने त्वरित पक्के दुरुस्ती करण्याची अट आहे. अशी अट असताना खोदलेले रस्ते दुरुस्त का केली जात नाही? असा प्रश्न नागरिकासह राजकीय पक्षाचे नेते विचारीत आहेत. एमएमआरडीएने मंजुरी दिलेल्या ७ रस्त्याचे बांधकाम सुरु होण्यापूर्वी रस्ता खोदून गटारी पाईप टाकण्याचे काम सुरू झाले. मात्र गटारीचे पाईप टाकण्याचे काम २ ते ३ महिन्यांपूर्वी होऊनही रस्त्याच्या बांधणीला सुरवात झाली नाही. अथवा खोदलेले रस्ते संबंधित ठेकेदाराने दुरुस्त केले नाही. महापालिका बांधकाम विभाग व पाणी पुरवठा विभाग अधिकारी संबंधित ठेकेदारांचे रस्ता दुरुस्तीचे पैसे वाचविण्यासाठी त्याला पाठीशी घालत असल्याचा आरोप बीएसपीचे प्रदेश महासचिव प्रा. प्रशांत इंगळे यांनी केला आहे.

रस्ता दुरुस्तीचे आदेश- आयुक्त अजीज शेख

शहरात काही रस्ते खोदून भुयारी गटारी पाईप टाकण्याचे काम सुरू असून खोदलेले रस्ते धुळीने माखले आहे. मात्र खोदलेले रस्ते दुरुस्ती करण्याचे आदेश बांधकाम विभागाला दिले आहे.

संदीप जाधव (शहर अभियंता- महापालिका)

एमएमआरडीएने मंजूर केलेल्या रस्ताची बांधण्यापूर्वी भुयारी गटारीचे पाईप टाकण्याचे काम सुरू आहे. खोलेले रस्ते तात्पुरत्या स्वरूपात दुरुस्त केले असून लवकरच रस्ता बांधणीला सुरवात होणार आहे. त्यामुळे धुळीचा प्रश्न निकाली लागणार आहे.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर