शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीतील विटा शहर हादरले! रेफ्रिजरेटर-सिलेंडरच्या भीषण स्फोटात लग्नघरातील चौघांचा मृत्यू
2
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर, काही दिवसांपासून आयसीयूमध्ये सुरु आहेत उपचार; चाहते चिंतेत
3
दिल्लीचे जवाहरलाल नेहरू स्टेडियम तोडले जाणार; केंद्रीय क्रीडा मंत्रालयाचा मोठा निर्णय
4
भाजपाची त्सुनामी! १२२ पैकी १०७ जागा जिंकून ‘या’ ठिकाणी मिळवला मोठा विजय, काँग्रेसला २ जागा
5
रुपाली ठोंबरे पाटील, अमोल मिटकरींना अजित पवारांचा धक्का; राष्ट्रवादीच्या प्रवक्तेपदावरून हकालपट्टी
6
भोपाळमध्ये मॉडेल खुशबूचा संशयास्पद मृत्यू; आईनं लावला 'लव्ह जिहाद'चा आरोप, प्रियकराला अटक
7
आता घरबसल्या आधारकार्डमध्ये करा बदल; UIDAI कडून नवीन आधार अ‍ॅप लाँच, वैशिष्ट्ये पाहून शॉक व्हाल
8
लॅपटॉप चार्जर केबलवरचा 'तो' काळा गोळा कशासाठी असतो? अनेकांनी पाहिला असेल पण...
9
जे विष वापरून ट्रम्प यांच्या हत्येचा कट रचला, तेच विष बनवणाऱ्या डॉक्टरवर ATS ला संशय कसा आला?
10
'सैयारा' फेम अनीत पड्डा कॉलेजच्या अंतिम वर्षाची परीक्षा देणार, मग करणार 'शक्ती शालिनी'ला सुरुवात
11
तिरुपती लाडू घोटाळा: ५ वर्षात पुरवले ६८ लाख किलो बनावट तूप, टँकरचे लेबल बदलून केली फसवणूक
12
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या काही तासांत सुटली, लग्नाच्या पहिल्याच रात्री नवऱ्याचा मृत्यू
13
लेन्सकार्टच्या गुंतवणूकदारांना मोठा झटका! IPO ला बंपर प्रतिसाद, पण लिस्टिंगनंतर शेअर कोसळला
14
Manifestation: लाल पेन, पांढरा कागद, ११ नोव्हेंबरला इच्छापूर्तीसाठी Manifest करा ११:११ चे पोर्टल!
15
भारताविरोधात बायो केमिकल शस्त्राचा वापर; गुजरातच्या दहशतवाद्याकडून 'रिसिन' जप्त, किती खतरनाक?
16
कारच्या 'हेजर्ड लाइट्स'चा वापर कधी करावा, कधी नाही? सुरक्षित ड्रायव्हिंगसाठी नियम माहीत आहेत का?
17
११ जिल्हे, ५९ सर्च ऑपरेशन, १० जणांना अटक; ४८ तास सुरू असलेल्या छाप्याची इनसाईड स्टोरी
18
कोण आहे डॉक्टर आदिल अहमद राठर? ज्याच्या खुलाशातून जप्तकरण्यात आली 350 किलो स्फोटकं अन् AK-47
19
'पंचायत' फेम जितेंद्र कुमारच्या आगामी सिनेमाची घोषणा, 'ही' अभिनेत्री साकारणार आईची भूमिका
20
“कोरेगाव प्रकरणात जमीन परत केली तरी पार्थ पवारांवर कारवाई झालीच पाहिजे”; काँग्रेसची मागणी

ठाण्यात दर १८ मिनिटाला भटक्या कुत्र्यांचा चावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2018 02:41 IST

ठाण्यात भटक्या कुत्र्यांची दहशत पुन्हा एकदा वाढू लागली असून गेल्या आठवड्यात एकाच दिवशी कुत्र्याने चार जणांना चावा घेतल्याची घटना घडली आहे

ठाणे : ठाण्यात भटक्या कुत्र्यांची दहशत पुन्हा एकदा वाढू लागली असून गेल्या आठवड्यात एकाच दिवशी कुत्र्याने चार जणांना चावा घेतल्याची घटना घडली आहे. ठाण्यात दर अठराव्या मिनिटाला भटका कुत्रा एकाचा चावा घेत असल्याची धक्कादायक माहिती माहिती अधिकाराद्वारे उघड झाली आहे.पालिकेच्या आरोग्य विभागामार्फत २००४ पासून आतापर्यंत ५० हजारांहून अधिक भटक्या कुत्र्यांवर निर्बिजीकरण शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. परंतु, अद्यापही सुमारे १५ हजार कुत्र्यांवरील शस्त्रक्रिया बाकी असल्याचे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे.मागील वर्षी एकाच महिन्यात भटक्या कुत्र्यांनी १३०० जणांचे लचके तोडले. मागील कित्येक वर्षांपासून या या कुत्र्यांचा सर्व्हे होणे बाकी आहे. शहरात आजमितीला नेमके किती भटके कुत्रे आहेत, याची माहिती आरोग्य विभागाला नाही. सर्व्हेच्या प्रस्तावाला २०१५ मध्ये मंजुरी मिळाली. परंतु, अद्यापही तो झालेला नाही. शहराची लोकसंख्या २२ लाखांच्या आसपास असून या लोकसंख्येच्या दोन ते तीन टक्के भटक्या कुत्र्यांची संख्या असू शकते, असा अंदाज आहे. तसेच कुत्र्यांची जननक्षमता लक्षात घेता अंदाजे प्रतिमहिना २५० ते ३०० कुत्र्यांवर निर्बिजीकरण शस्त्रक्रिया केल्या जातात.परंतु, असे असले तरी आजही भटक्या कुत्र्यांची दहशत कायम आहे. आता मुंबईच्या वेशीवरील कुत्रेदेखील ठाण्यात आणून सोडले जात असल्याचा दावा महापालिकेने केला आहे. त्यांची दहशत केवळ हिरानंदानी भागातच नव्हे तर अनेक झोपडपट्टी भागांत दिवसेंदिवस ती वाढत आहे.महापालिका हद्दीतील सुमारे १५ हजार भटक्या कुत्र्यांवर शस्त्रक्रिया करणे शिल्लक असल्याचा दावा करण्यात येत असला, तरी प्रत्यक्षात पालिका हद्दीत कुत्र्यांची संख्या सुमारे ७५ ते ८० हजार असल्याचे दावे केले जात आहेत. यासंदर्भात सत्यजित शहा यांना माहिती अधिकारात सांगितलेला तपशील धक्कादायक आहे. मागील काही वर्षांत श्वानदंशांच्या घटनांमध्ये वाढ तर झाली आहेच, शिवाय चावा घेण्याचा कालावधीही कमी झालेला आहे. २०१०-११ मध्ये कुत्र्याच्या दोन चाव्यांमधील अंतर ५३ मिनिटांचे होते. २०१७ मध्ये ते ३५ मिनिटांवर आले. तर, आजघडीला ते १८ मिनिटांवर आले आहे. पालिकेने श्वानदंशाची जी आकडेवारी दिली आहे त्यात केवळ शासकीय रुग्णालयांत उपचार घेणाऱ्यांचीच संख्या आहे. खाजगी दवाखान्यांचा उल्लेख नाही. त्यामुळे श्वानदंशाच्या दोन घटनांमधील अंतर याहून कमी असू शकते.