शहरं
Join us  
Trending Stories
1
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
2
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
3
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
4
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
5
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
6
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
7
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
8
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
9
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
10
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
11
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
12
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
13
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
14
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
15
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
16
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
17
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
18
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
19
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
20
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार

संपणार कधी या भग्न शिल्प अन शिलालेखांचा वनवास ?

By admin | Updated: June 21, 2016 00:50 IST

वसईला शेकडो वर्षाचा ऐतीहासीक वारसा लाभलेला आहे.एकेकाळी शूर्पारक म्हणून प्रसिद्ध असलेली ही भूमी पुरातन शिल्प, शिलालेखांनी समृध्द होती.

विरार : वसईला शेकडो वर्षाचा ऐतीहासीक वारसा लाभलेला आहे.एकेकाळी शूर्पारक म्हणून प्रसिद्ध असलेली ही भूमी पुरातन शिल्प, शिलालेखांनी समृध्द होती. वसईत आजही अनेक पुरातन वास्तू, मंदिरे जागोजागी उभ्या आहेत. रामायण, महाभारत, बौद्ध, जैन, सातवाहन, गौतमीपुत्र ,शतकर्णी, शिलाहार, राजा बिम्बदेव, मुघल व पोर्तुगीज ह्या काळात व राजविटमध्ये येथे अनेक शिल्पस्थापत्य कला उदयास आल्या. सुमारे दोन हजार वर्षांपूर्वी कला, संगीत, शिल्प, साहित्य याबरोबरच ज्ञान-विज्ञानाच्या निर्मितीचा कळसही या प्रदेशाने अनुभवला आहे.वसईत ठिकठिकाणी खोदकाम करताना किंवा तलावांतून मिळालेली शिल्प वा शिलालेख इतिहासाची साक्ष देणारी आहेत. पूर्वी हाच शूर्पारक म्हणून नावलौकीक असलेला परिसर ‘पवित्र तीर्थक्षेत्र’ म्हणून भारतवर्षात प्रसिद्ध होता. या भूमीत असलेल्या १०८ तलाव पवित्र तीर्थ असल्याचे लोक मानत असत. काही तलावांना स्नानासाठी दगडी घाट देखील बांधलेले होते. त्यावर सुंदर अशी शिल्प देखील होती. नक्षीदार मूर्ती व शिल्पपटांनी संपन्न २०० हून अधिक मंदिरे होती. काळाच्या ओघात व परकीय आक्रमणात यातील बरीच मंदिरे नष्ट झाली. कालांतराने मंदिरांतील भग्न झालेल्या मूर्तींचे विर्सजन तलावांत करण्यात आले होते, नंतरच्या पिढींना तलावात खोदकाम करताना किंवा विहीरींतील गाळ काढताना हा पुरातन ठेवा सापडला गेला. तो पुन्हा बाहेर काढून ठेवण्यात आला. हा बाहेर काढून ठेवलेला अनमोल ठेवा त्यानंतर कायम दुर्लक्षीतच राहिला. आजही अशा कित्येक भग्न मूर्ती/शिल्प व शिलालेख वसई-विरार परीसरात बेवारस अवस्थेत रस्त्याच्या कडेला किंवा मंदिराच्या बाजुला अडगळीत पडलेला आढळतो. निर्मळ येथील सुळेश्वर मंदिर व सोपारा येथील चक्रेश्वर मंदिर परिसरात अशा असंख्य भग्न मूर्त्या व शिलालेख आपल्याला पहायला मिळतील.वसई-विरार परीसरात असे कुठलेच संग्रहालय सध्या तरी अस्तित्वात नाही. वसईत अनेक ठिकाणी बेवारसपणे पडलेला हा अनमोल ठेवा आपल्या पुढच्या पिढीसाठी जतन करून ठेवावा अशी मागणी आता नागरीकांकडून होत आहे. तलाव सुशोभीकरण, मँरेथॉन स्पर्धा, माहि वसई महोत्सव व वसई विजयोत्सवावर लाखो रूपये खर्च करणाऱ्या महापालिकेने वसईत कायम स्वरूपी संग्रहालय बनवून हा अनमोल असा ऐतिहासीक ठेवा लवकरात लवकर जतन करून ठेवण्यात यावा असे लोकांकडून सांगण्यात येत आहे. (वार्ताहर) एके काळी या मूर्ती/शिल्प देवालयाची प्रतिष्ठा होत्या. त्यांची सकाळ-संध्याकाळ पूजा-अर्चा होत असे. पण आता इतिहासाची साक्ष देणारी ही शिल्प, मूर्ती व शिलालेख सध्या आपले अिस्तत्वच हरवून बसलेली आहेत. मोडी लिपीत कोरलेल्या शिलालेखांचा काही ठिकाणी चक्क कपडे धुण्यासाठी वापर केला जात आहे हे ऐकून विश्वासही बसणार नाही. काल-परवापर्यंत द्रुष्टीस पडणारा हा ऐतिहासिक ठेवा हळूहळू वसईतून गायब होत असल्याचे निदर्शनास येऊ लागले आहे.आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत या पुरातन वस्तूंना मागणी असल्यामुळेच गेल्या काही वर्षात हा अनमोल ठेवा चोरला तर जात नाही ना अशी भीती लोकांना वाटू लागली आहे.