शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

काम संपल्यावरही प्रवासी वेठीस, रेल्वेचे टीमवर्क आणि ४०० टन वजनाची लिफ्टिंग क्रेन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2019 00:39 IST

रेल्वेचे टीमवर्क आणि ४०० टन वजनाची लिफ्टिंग के्रन

अनिकेत घमंडी

डोंबिवली : ठाकुर्ली येथील पादचारी पुलाचे गर्डर टाकण्याचे काम बुधवारी सकाळी सव्वानऊ ते दुपारी १२ वाजून ५५ मिनिटांच्या कालावधीत पूर्ण करण्यात आले. अभियंता विभागाने काम ५० मिनिटे आधीच पूर्ण केले असतानाही रेल्वेने पावणेदोन वाजेपर्यंत ट्रॅफिक ब्लॉकची मंजूर करवून घेतलेली मुदत पूर्ण केल्याने प्रवाशांचे हाल झाले. विकासकामे करण्याकरिता ब्लॉक घ्यायला काहीच हरकत नाही. मात्र, नियोजन न केल्यामुळे प्रवाशांचे हाल झाले, अशी सार्वत्रिक भावना आहे.

पुलाच्या कामासाठी कल्याण ते डोंबिवली मार्गावर दोन्ही दिशांवर साडेचार तास रेल्वेसेवा ठप्प होती. त्यामुळे या ब्लॉकचा सर्वाधिक फटका डोंबिवली, दिव्याच्या प्रवाशांना बसला. डोंबिवलीत संतप्त प्रवाशांनी स्थानक प्रबंधकांना धारेवर धरले, तर दिव्यात रेल्वे प्रवासी रेल्वेमार्गात उतरले होते. मात्र, पोलिसांनी वेळीच पावले उचलल्याने परिस्थिती नियंत्रणात राहिली. डोंबिवली स्थानकात अडकून पडलेल्या प्रवाशांनी तेथील फलाट गर्दीने फुलून गेल्याचे फोटो सोशल मीडियावर टाकले आणि रेल्वेच्या नियोजनशून्य कारभाराबाबत नाराजी व्यक्त केली. लोहमार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश पवार यांनी प्रवाशांना शांत राहण्याचे आवाहन केले. फलाट क्रमांक १ ए, २, ३ आणि ५ वर प्रवाशांची तुडुंब गर्दी जमली होती. सव्वानऊ वाजता ब्लॉक सुरू झाल्यावर विशेष लोकलकरिता प्रवाशांनी फलाट १ ए व २ वर गर्दी केली.सकाळी सव्वानऊ ते १० वाजून ६ मिनिटे विशेष लोकल न आल्याने सगळा गोंधळ उडाला. त्यामुळे गर्दीवर नियंत्रण मिळवणे पोलिसांनाही कठीण गेले. दीर्घकाळ लोकल न आल्याने प्रवाशांचा संताप अनावर झाला होता. ते पाहून पवार यांनी रेल्वे वरिष्ठांशी संपर्क केला. त्यानंतर, सकाळी १० वाजण्याच्या सुमारास एक लोकल आली. त्यात दिवा, कोपरच्या प्रवाशांनी गर्दी केल्याने डोंबिवलीच्या प्रवाशांना त्यात घुसण्याकरिता झटापट करावी लागली. यामुळे डोंबिवलीकर आणखीनच संतापले. स्थानक प्रबंधकांशी प्रवाशांची वादावादी झाली. त्यानंतर, आलेल्या गाड्या तुलनेने रिकाम्या आल्याने कशीबशी गर्दी नियंत्रणात आली. ब्लॉकच्या कालावधीत डोंबिवली- सीएसएमटी मार्गावर नऊ विशेष लोकल सोडण्यात आल्या.

दिव्यातही भरपूर गर्दी होती. रेल्वेगाड्या येत नसल्याने प्रवासी रेल्वेमार्गातच उभे होते. आता ते तेथेच बैठक मारून आंदोलन सुरू करतील, अशी भीती पोलिसांना वाटत होती. परंतु, पुलाचे काम होणे गरजेचे असल्याचे आवाहन प्रवाशांना केल्यावर आणि पोलिसांनी तातडीने रेल्वेमार्गातील प्रवाशांना तेथून हुसकावल्याने दिव्यात आंदोलन झाले नाही, अशी माहिती प्रत्यक्षदर्शी अ‍ॅड. आदेश भगत यांनी दिली. लोकल येत नसल्याने अनेक प्रवासी माघारी गेल्याचेही ते म्हणाले. कल्याण ते कसारा, कर्जत मार्गावरील विशेष लोकलसेवा सुरळीत सुरू होती, त्यामुळे कल्याण स्थानकातील गर्दी वगळता अन्य स्थानकांत फारसा गोंधळ झाला नाही. परंतु, लोकलसेवेचा बोजवारा उडाल्याबद्दल कल्याण स्थानकात अडकलेल्या प्रवाशांमध्येही नाराजी होती. लांब पल्ल्यांच्या प्रवाशांचे हाल झाले. काहींनी कसारा, इगतपुरी येथूनच रस्तामार्गे मुंबई गाठण्यासाठी धावपळ केली. मात्र, ठिकठिकाणच्या वाहतूककोंडीने त्यांचेही हाल झाले. ज्यांनी लोकलनेच प्रवास केला, त्यांचा प्रवास रखडत झाला. कर्जत, पनवेलमार्गे दिव्यात आलेल्या प्रवाशांनाही गर्दी व गोंधळाचा फटका बसला. दुपारी सेवा सुरळीत होईस्तोवर सामान, कुटुंबासमवेत त्यांना विविध स्थानकात ताटकळत बसावे लागले.रेल्वेचे टीमवर्क आणि ४०० टन वजनाची लिफ्टिंग के्रनच्पादचारी पुलासाठी ४०० मेट्रीक टन वजनाचे सहा मीटर रुंदीचे चार गर्डर टाकण्यासाठी बुधवारी सकाळी ९.३० पासून सुरुवात झाली. गर्र्डर ठेवण्यासाठी ४०० टन वजनाची खास क्रेन घटनास्थळी आणण्यात आली होती. मध्य रेल्वेचे वरिष्ठ अभियंता (नॉर्थ झोन) दत्तात्रेय लोलगे यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम सुरू होते. ओव्हरहेड वायर, वीजपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता रमेशन, सहअभियंता आर.एन. मैत्री या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत १०० कर्मचाऱ्यांनी गर्डर उभारण्याचे काम केले.च्क्रेन ठाकुर्ली पूर्वेला उभी करण्यात आली होती. त्यात लिफ्टिंग क्रेनचे तज्ज्ञ हजर होते. त्यांनी काम पूर्णत्वास नेले. वरिष्ठ अभियंता लोलगे यांच्या माहितीनुसार, त्या ठिकाणी गर्डर घेऊन रेल्वेची विशेष गाडी आली होती. एकेक गर्डर आधी खाली घेण्यात आला. त्यानंतर, ते वर चढवण्यात आले. प्रत्येक गर्डर वर चढवण्याकरिता साधारण २० मिनिटांचा कालावधी लागला. एक गर्डर पूर्णपणे बसवण्यासाठी, वेल्डिंग, नटबोल्ड, ब्रिकवर्कअशा अन्य तांत्रिक कामांसाठी सुमारे दीड तास लागला.च्रेल्वेच्या क्रेनने हे काम करण्यासाठी वेळ लागला असता. त्यासाठी विशेष प्रकल्पांसाठी लागणारी खासगी लिफ्टिंग क्रेन मागवण्यात आली होती. त्यामुळे गर्डर चढवण्याचे कामजलदगतीने झाल्याचा विश्वास अधिकाºयांनी व्यक्त केला. काम पूर्ण झाल्यानंतर ब्लॉक संपला असल्याचे जनसंपर्क अधिकारी डॉ. ए.के. सिंग यांनी जाहीर केल्यानंतर सहाव्या मार्गिकेवरून सर्वप्रथम दुपारी १ वाजून ५० मिनिटांनी पहिली राजधानी एक्स्प्रेस मुंबईच्या दिशेने धावली. त्यानंतर हळूहळू वाहतूक पूर्वपदावर आली.च्सहा मीटर रुंदीच्या या पादचारी पुलासाठी सुमारे तीन कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून मार्च महिन्यापर्यंत तो पूर्ण होईल, अशी शक्यता अधिकाºयांनी व्यक्त केली. वेळेत काम सुरू केल्याने रेल्वे प्रशासनाने दुपारी १२ वाजून ५५ मिनिटांनी म्हणजे ब्लॉकच्या पावणेदोन वाजण्याच्या मुदतीपूर्वी ५० मिनिटे आधीच काम पूर्ण केले. दरम्यान, नवीन पादचारी पूल उभारल्यानंतर सध्या डोंबिवली दिशेला असलेला पादचारी पूल पाडण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :thaneठाणेlocalलोकलMumbaiमुंबई