शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

काम संपल्यावरही प्रवासी वेठीस, रेल्वेचे टीमवर्क आणि ४०० टन वजनाची लिफ्टिंग क्रेन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2019 00:39 IST

रेल्वेचे टीमवर्क आणि ४०० टन वजनाची लिफ्टिंग के्रन

अनिकेत घमंडी

डोंबिवली : ठाकुर्ली येथील पादचारी पुलाचे गर्डर टाकण्याचे काम बुधवारी सकाळी सव्वानऊ ते दुपारी १२ वाजून ५५ मिनिटांच्या कालावधीत पूर्ण करण्यात आले. अभियंता विभागाने काम ५० मिनिटे आधीच पूर्ण केले असतानाही रेल्वेने पावणेदोन वाजेपर्यंत ट्रॅफिक ब्लॉकची मंजूर करवून घेतलेली मुदत पूर्ण केल्याने प्रवाशांचे हाल झाले. विकासकामे करण्याकरिता ब्लॉक घ्यायला काहीच हरकत नाही. मात्र, नियोजन न केल्यामुळे प्रवाशांचे हाल झाले, अशी सार्वत्रिक भावना आहे.

पुलाच्या कामासाठी कल्याण ते डोंबिवली मार्गावर दोन्ही दिशांवर साडेचार तास रेल्वेसेवा ठप्प होती. त्यामुळे या ब्लॉकचा सर्वाधिक फटका डोंबिवली, दिव्याच्या प्रवाशांना बसला. डोंबिवलीत संतप्त प्रवाशांनी स्थानक प्रबंधकांना धारेवर धरले, तर दिव्यात रेल्वे प्रवासी रेल्वेमार्गात उतरले होते. मात्र, पोलिसांनी वेळीच पावले उचलल्याने परिस्थिती नियंत्रणात राहिली. डोंबिवली स्थानकात अडकून पडलेल्या प्रवाशांनी तेथील फलाट गर्दीने फुलून गेल्याचे फोटो सोशल मीडियावर टाकले आणि रेल्वेच्या नियोजनशून्य कारभाराबाबत नाराजी व्यक्त केली. लोहमार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश पवार यांनी प्रवाशांना शांत राहण्याचे आवाहन केले. फलाट क्रमांक १ ए, २, ३ आणि ५ वर प्रवाशांची तुडुंब गर्दी जमली होती. सव्वानऊ वाजता ब्लॉक सुरू झाल्यावर विशेष लोकलकरिता प्रवाशांनी फलाट १ ए व २ वर गर्दी केली.सकाळी सव्वानऊ ते १० वाजून ६ मिनिटे विशेष लोकल न आल्याने सगळा गोंधळ उडाला. त्यामुळे गर्दीवर नियंत्रण मिळवणे पोलिसांनाही कठीण गेले. दीर्घकाळ लोकल न आल्याने प्रवाशांचा संताप अनावर झाला होता. ते पाहून पवार यांनी रेल्वे वरिष्ठांशी संपर्क केला. त्यानंतर, सकाळी १० वाजण्याच्या सुमारास एक लोकल आली. त्यात दिवा, कोपरच्या प्रवाशांनी गर्दी केल्याने डोंबिवलीच्या प्रवाशांना त्यात घुसण्याकरिता झटापट करावी लागली. यामुळे डोंबिवलीकर आणखीनच संतापले. स्थानक प्रबंधकांशी प्रवाशांची वादावादी झाली. त्यानंतर, आलेल्या गाड्या तुलनेने रिकाम्या आल्याने कशीबशी गर्दी नियंत्रणात आली. ब्लॉकच्या कालावधीत डोंबिवली- सीएसएमटी मार्गावर नऊ विशेष लोकल सोडण्यात आल्या.

दिव्यातही भरपूर गर्दी होती. रेल्वेगाड्या येत नसल्याने प्रवासी रेल्वेमार्गातच उभे होते. आता ते तेथेच बैठक मारून आंदोलन सुरू करतील, अशी भीती पोलिसांना वाटत होती. परंतु, पुलाचे काम होणे गरजेचे असल्याचे आवाहन प्रवाशांना केल्यावर आणि पोलिसांनी तातडीने रेल्वेमार्गातील प्रवाशांना तेथून हुसकावल्याने दिव्यात आंदोलन झाले नाही, अशी माहिती प्रत्यक्षदर्शी अ‍ॅड. आदेश भगत यांनी दिली. लोकल येत नसल्याने अनेक प्रवासी माघारी गेल्याचेही ते म्हणाले. कल्याण ते कसारा, कर्जत मार्गावरील विशेष लोकलसेवा सुरळीत सुरू होती, त्यामुळे कल्याण स्थानकातील गर्दी वगळता अन्य स्थानकांत फारसा गोंधळ झाला नाही. परंतु, लोकलसेवेचा बोजवारा उडाल्याबद्दल कल्याण स्थानकात अडकलेल्या प्रवाशांमध्येही नाराजी होती. लांब पल्ल्यांच्या प्रवाशांचे हाल झाले. काहींनी कसारा, इगतपुरी येथूनच रस्तामार्गे मुंबई गाठण्यासाठी धावपळ केली. मात्र, ठिकठिकाणच्या वाहतूककोंडीने त्यांचेही हाल झाले. ज्यांनी लोकलनेच प्रवास केला, त्यांचा प्रवास रखडत झाला. कर्जत, पनवेलमार्गे दिव्यात आलेल्या प्रवाशांनाही गर्दी व गोंधळाचा फटका बसला. दुपारी सेवा सुरळीत होईस्तोवर सामान, कुटुंबासमवेत त्यांना विविध स्थानकात ताटकळत बसावे लागले.रेल्वेचे टीमवर्क आणि ४०० टन वजनाची लिफ्टिंग के्रनच्पादचारी पुलासाठी ४०० मेट्रीक टन वजनाचे सहा मीटर रुंदीचे चार गर्डर टाकण्यासाठी बुधवारी सकाळी ९.३० पासून सुरुवात झाली. गर्र्डर ठेवण्यासाठी ४०० टन वजनाची खास क्रेन घटनास्थळी आणण्यात आली होती. मध्य रेल्वेचे वरिष्ठ अभियंता (नॉर्थ झोन) दत्तात्रेय लोलगे यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम सुरू होते. ओव्हरहेड वायर, वीजपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता रमेशन, सहअभियंता आर.एन. मैत्री या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत १०० कर्मचाऱ्यांनी गर्डर उभारण्याचे काम केले.च्क्रेन ठाकुर्ली पूर्वेला उभी करण्यात आली होती. त्यात लिफ्टिंग क्रेनचे तज्ज्ञ हजर होते. त्यांनी काम पूर्णत्वास नेले. वरिष्ठ अभियंता लोलगे यांच्या माहितीनुसार, त्या ठिकाणी गर्डर घेऊन रेल्वेची विशेष गाडी आली होती. एकेक गर्डर आधी खाली घेण्यात आला. त्यानंतर, ते वर चढवण्यात आले. प्रत्येक गर्डर वर चढवण्याकरिता साधारण २० मिनिटांचा कालावधी लागला. एक गर्डर पूर्णपणे बसवण्यासाठी, वेल्डिंग, नटबोल्ड, ब्रिकवर्कअशा अन्य तांत्रिक कामांसाठी सुमारे दीड तास लागला.च्रेल्वेच्या क्रेनने हे काम करण्यासाठी वेळ लागला असता. त्यासाठी विशेष प्रकल्पांसाठी लागणारी खासगी लिफ्टिंग क्रेन मागवण्यात आली होती. त्यामुळे गर्डर चढवण्याचे कामजलदगतीने झाल्याचा विश्वास अधिकाºयांनी व्यक्त केला. काम पूर्ण झाल्यानंतर ब्लॉक संपला असल्याचे जनसंपर्क अधिकारी डॉ. ए.के. सिंग यांनी जाहीर केल्यानंतर सहाव्या मार्गिकेवरून सर्वप्रथम दुपारी १ वाजून ५० मिनिटांनी पहिली राजधानी एक्स्प्रेस मुंबईच्या दिशेने धावली. त्यानंतर हळूहळू वाहतूक पूर्वपदावर आली.च्सहा मीटर रुंदीच्या या पादचारी पुलासाठी सुमारे तीन कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून मार्च महिन्यापर्यंत तो पूर्ण होईल, अशी शक्यता अधिकाºयांनी व्यक्त केली. वेळेत काम सुरू केल्याने रेल्वे प्रशासनाने दुपारी १२ वाजून ५५ मिनिटांनी म्हणजे ब्लॉकच्या पावणेदोन वाजण्याच्या मुदतीपूर्वी ५० मिनिटे आधीच काम पूर्ण केले. दरम्यान, नवीन पादचारी पूल उभारल्यानंतर सध्या डोंबिवली दिशेला असलेला पादचारी पूल पाडण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :thaneठाणेlocalलोकलMumbaiमुंबई