शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर आम्ही शिंदेंच्या शिवसेनेसोबतची दोन जिल्ह्यात युती तोडू'; नारायण राणेंचा इशारा, तेलींबद्दल काय बोलले?
2
"आधी कर्जबाजारी व्हायचं आणि मग पुन्हा कर्जमाफी मागायची"; राधाकृष्ण विखे पाटलांची शेतकऱ्यांवर आगपाखड
3
"पंतप्रधान मोदींनीही घातली होती टोपी, मी फोटो पाठवेन", मुस्लीम तुष्टीकरणाच्या आरोपांवर काय म्हणाले रेवंत रेड्डी?
4
लय मोठा विषय चाललाय! चीन, पाकिस्तान अन् बांगलादेशला एकाचवेळी झटका; भारतीय सैन्य काय करतंय?
5
Rishabh Pant: टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, ऋषभ पंत पुन्हा जखमी, अर्ध्यातच मैदान सोडलं!
6
बिहार निवडणुकीनंतर भाजपाला मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष? बड्या नेत्याने दिले सूचक संकेत
7
पार्थ अजित पवार जमीन प्रकरणात शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “समाजासमोर वास्तव...”
8
स्टंटबाजी करणाऱ्या टवाळखोरामुळं युवती जीवाला मुकली; ११० च्या स्पीडनं उडवलं, दात तुटले अन्...
9
उपाशी ठेवलं, बेदम मारलं... पोटच्या लेकाने, सुनेने जमिनीसाठी केले जन्मदात्या आईचे हालहाल
10
"वहिनी, तुमची जोडी जमत नाही, हे काका कोण?", रील्सचं वेड, सर्वस्व असलेल्या नवऱ्याच संपवलं
11
Viral Video: मिरची पूड घेऊन ज्वेलर्समध्ये शिरली, पण प्लॅन फसला! दुकानदारानं २० वेळा थोबाडलं
12
Operation Pimple : सैन्याला मोठं यश! कुपवाडामध्ये घुसखोरी करणाऱ्या २ दहशतवाद्यांचा खात्मा
13
शेजाऱ्याशी लफडं, गुपित पतीला कळलं; प्रियकरासोबत मिळून पत्नीने केली हत्या, मृतदेह नदीत फेकला
14
उद्धव ठाकरेंसमोर व्यथा मांडताना ९० वर्षीय शेतकऱ्याला रडू कोसळले; म्हणाले, “कर्जमाफी...”
15
IND vs AUS 5th T20I : तिलक वर्माला बसवलं बाकावर! टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये रिंकूची एन्ट्री
16
जरीन खान यांच्यावर हिंदू पद्धतीने झाले अंत्यसंस्कार, मुलगा झायेदने दिला अग्नी; कारण...
17
कतरिना कैफचे सासरे 'आजोबा' बनल्यानंतर झाले भावुक! 'ज्युनिअर कौशल'साठी शेअर केली प्रेमळ पोस्ट
18
"महाराष्ट्र लुटून खा... आम्ही...! मंत्री सरनाईकांनी २०० कोटींची जमीन ३ कोटीत घेतली", वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
19
राहू-केतू गोचर २०२५: राहू केतू तसे तापदायकच, पण नोव्हेंबरमध्ये 'या' ८ राशींवर होणार मेहेरबान!
20
Railway: धावत्या ट्रेनला गरुडाची समोरून धडक, जखमी होऊनही लोको पायलटनं प्रसंगावधान दाखवलं, नाही तर...

धो-धो पावसातही टँकर भागवतोय ‘त्या’ रहिवाशांची ‘तहान’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:44 IST

कल्याण : पावसाच्या सरींवर सरी येत असतानाही दुसरीकडे कल्याणनजीकच्या आंबिवली परिसरातील नेपच्यून स्वराज्य सेक्टर २ मधील सोसायट्यांना पिण्याच्या पाण्याचे ...

कल्याण : पावसाच्या सरींवर सरी येत असतानाही दुसरीकडे कल्याणनजीकच्या आंबिवली परिसरातील नेपच्यून स्वराज्य सेक्टर २ मधील सोसायट्यांना पिण्याच्या पाण्याचे कमालीचे दुर्भीक्ष्य जाणवत आहे. केडीएमसीच्या पाणीपुरवठा विभागाकडून पाणीपुरवठा केला जात असला तरी सोसायटीत ते पुरेशा प्रमाणात येत नाही. पाणी वाढवून द्या, अशी मागणी रहिवाशांकडून वारंवार करण्यात आली आहे. लोकप्रतिनिधींनाही पत्रव्यवहार करण्यात आला आहे. त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने पावसातही रहिवाशांना टँकरच्या पाण्याचा आधार घ्यावा लागत आहे.

आंबिवली पश्चिम भागात नेपच्यून स्वराज्य गृहप्रकल्प आहे. यातील सेक्टर दोन मधील रहिवास असलेल्या १० इमारतींमध्ये पिण्याच्या पाण्याचा तुटवडा जाणवत आहे. याठिकाणी एकूण ४५० फ्लॅट आहेत. सव्वादोनशे फ्लॅटमध्ये कुटुंबे वास्तव्य करीत आहेत. संपूर्ण सेक्टर दोनला प्रतिदिन दीड ते दोन लाख लीटर पाण्याची गरज आहे. पण मनपाकडून ४० ते ५० हजार लीटरच पाणी उपलब्ध होत आहे. अपुऱ्या पाण्यामुळे आठ ते नऊ महिने दहा इमारतींमधील रहिवाशांना तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. अपुऱ्या पाण्यामुळे एक दिवसाआड पाण्याचा वापर करावा लागत आहे. नेपच्यून गृहप्रकल्प हा पाणी वितरण करताना शेवटचा भाग पडत असल्याने याठिकाणी सर्वात उशिरा, कमी दाबाने पाण्याचे वितरण होते. त्याचा फटका येथील सेक्टर २ ला बसत आहे. पाणी वाढवून द्या, अशी मागणी मनपासह लोकप्रतिनिधींकडे केली आहे.

एका टँकरमागे २२०० रुपयांचा खर्च

कोणतीही सुधारणा पाणीपुरवठ्यात झालेली नाही अशी माहिती रहिवासी सुनील बोऱ्हाडे आणि सोसायटीचे पदाधिकारी भानुदास धोपटे यांनी दिली. पाणी पुरेसे येत नसल्याने एक दिवसाआड टँकर मागवावाच लागतो. यंदाच्या आठवड्यात पाच ते सहा वेळा टँकर मागविण्यात आला आहे. २२०० रुपये एका टँकरमागे खर्च करावा लागत असल्याचे बोऱ्हाडे म्हणाले. तातडीने रहिवाशांच्या पाणी समस्येची दखल घेऊन त्यावर ठोस उपाययोजना करण्यात यावी, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे.