शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

धो-धो पावसातही टँकर भागवतोय ‘त्या’ रहिवाशांची ‘तहान’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:44 IST

कल्याण : पावसाच्या सरींवर सरी येत असतानाही दुसरीकडे कल्याणनजीकच्या आंबिवली परिसरातील नेपच्यून स्वराज्य सेक्टर २ मधील सोसायट्यांना पिण्याच्या पाण्याचे ...

कल्याण : पावसाच्या सरींवर सरी येत असतानाही दुसरीकडे कल्याणनजीकच्या आंबिवली परिसरातील नेपच्यून स्वराज्य सेक्टर २ मधील सोसायट्यांना पिण्याच्या पाण्याचे कमालीचे दुर्भीक्ष्य जाणवत आहे. केडीएमसीच्या पाणीपुरवठा विभागाकडून पाणीपुरवठा केला जात असला तरी सोसायटीत ते पुरेशा प्रमाणात येत नाही. पाणी वाढवून द्या, अशी मागणी रहिवाशांकडून वारंवार करण्यात आली आहे. लोकप्रतिनिधींनाही पत्रव्यवहार करण्यात आला आहे. त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने पावसातही रहिवाशांना टँकरच्या पाण्याचा आधार घ्यावा लागत आहे.

आंबिवली पश्चिम भागात नेपच्यून स्वराज्य गृहप्रकल्प आहे. यातील सेक्टर दोन मधील रहिवास असलेल्या १० इमारतींमध्ये पिण्याच्या पाण्याचा तुटवडा जाणवत आहे. याठिकाणी एकूण ४५० फ्लॅट आहेत. सव्वादोनशे फ्लॅटमध्ये कुटुंबे वास्तव्य करीत आहेत. संपूर्ण सेक्टर दोनला प्रतिदिन दीड ते दोन लाख लीटर पाण्याची गरज आहे. पण मनपाकडून ४० ते ५० हजार लीटरच पाणी उपलब्ध होत आहे. अपुऱ्या पाण्यामुळे आठ ते नऊ महिने दहा इमारतींमधील रहिवाशांना तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. अपुऱ्या पाण्यामुळे एक दिवसाआड पाण्याचा वापर करावा लागत आहे. नेपच्यून गृहप्रकल्प हा पाणी वितरण करताना शेवटचा भाग पडत असल्याने याठिकाणी सर्वात उशिरा, कमी दाबाने पाण्याचे वितरण होते. त्याचा फटका येथील सेक्टर २ ला बसत आहे. पाणी वाढवून द्या, अशी मागणी मनपासह लोकप्रतिनिधींकडे केली आहे.

एका टँकरमागे २२०० रुपयांचा खर्च

कोणतीही सुधारणा पाणीपुरवठ्यात झालेली नाही अशी माहिती रहिवासी सुनील बोऱ्हाडे आणि सोसायटीचे पदाधिकारी भानुदास धोपटे यांनी दिली. पाणी पुरेसे येत नसल्याने एक दिवसाआड टँकर मागवावाच लागतो. यंदाच्या आठवड्यात पाच ते सहा वेळा टँकर मागविण्यात आला आहे. २२०० रुपये एका टँकरमागे खर्च करावा लागत असल्याचे बोऱ्हाडे म्हणाले. तातडीने रहिवाशांच्या पाणी समस्येची दखल घेऊन त्यावर ठोस उपाययोजना करण्यात यावी, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे.