शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
2
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
3
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
4
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
5
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
6
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
7
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
8
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
9
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
10
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
11
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

धो-धो पावसातही टँकर भागवतोय ‘त्या’ रहिवाशांची ‘तहान’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:44 IST

कल्याण : पावसाच्या सरींवर सरी येत असतानाही दुसरीकडे कल्याणनजीकच्या आंबिवली परिसरातील नेपच्यून स्वराज्य सेक्टर २ मधील सोसायट्यांना पिण्याच्या पाण्याचे ...

कल्याण : पावसाच्या सरींवर सरी येत असतानाही दुसरीकडे कल्याणनजीकच्या आंबिवली परिसरातील नेपच्यून स्वराज्य सेक्टर २ मधील सोसायट्यांना पिण्याच्या पाण्याचे कमालीचे दुर्भीक्ष्य जाणवत आहे. केडीएमसीच्या पाणीपुरवठा विभागाकडून पाणीपुरवठा केला जात असला तरी सोसायटीत ते पुरेशा प्रमाणात येत नाही. पाणी वाढवून द्या, अशी मागणी रहिवाशांकडून वारंवार करण्यात आली आहे. लोकप्रतिनिधींनाही पत्रव्यवहार करण्यात आला आहे. त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने पावसातही रहिवाशांना टँकरच्या पाण्याचा आधार घ्यावा लागत आहे.

आंबिवली पश्चिम भागात नेपच्यून स्वराज्य गृहप्रकल्प आहे. यातील सेक्टर दोन मधील रहिवास असलेल्या १० इमारतींमध्ये पिण्याच्या पाण्याचा तुटवडा जाणवत आहे. याठिकाणी एकूण ४५० फ्लॅट आहेत. सव्वादोनशे फ्लॅटमध्ये कुटुंबे वास्तव्य करीत आहेत. संपूर्ण सेक्टर दोनला प्रतिदिन दीड ते दोन लाख लीटर पाण्याची गरज आहे. पण मनपाकडून ४० ते ५० हजार लीटरच पाणी उपलब्ध होत आहे. अपुऱ्या पाण्यामुळे आठ ते नऊ महिने दहा इमारतींमधील रहिवाशांना तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. अपुऱ्या पाण्यामुळे एक दिवसाआड पाण्याचा वापर करावा लागत आहे. नेपच्यून गृहप्रकल्प हा पाणी वितरण करताना शेवटचा भाग पडत असल्याने याठिकाणी सर्वात उशिरा, कमी दाबाने पाण्याचे वितरण होते. त्याचा फटका येथील सेक्टर २ ला बसत आहे. पाणी वाढवून द्या, अशी मागणी मनपासह लोकप्रतिनिधींकडे केली आहे.

एका टँकरमागे २२०० रुपयांचा खर्च

कोणतीही सुधारणा पाणीपुरवठ्यात झालेली नाही अशी माहिती रहिवासी सुनील बोऱ्हाडे आणि सोसायटीचे पदाधिकारी भानुदास धोपटे यांनी दिली. पाणी पुरेसे येत नसल्याने एक दिवसाआड टँकर मागवावाच लागतो. यंदाच्या आठवड्यात पाच ते सहा वेळा टँकर मागविण्यात आला आहे. २२०० रुपये एका टँकरमागे खर्च करावा लागत असल्याचे बोऱ्हाडे म्हणाले. तातडीने रहिवाशांच्या पाणी समस्येची दखल घेऊन त्यावर ठोस उपाययोजना करण्यात यावी, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे.