शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

धो-धो पावसातही टँकर भागवतोय ‘त्या’ रहिवाशांची ‘तहान’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:44 IST

कल्याण : पावसाच्या सरींवर सरी येत असतानाही दुसरीकडे कल्याणनजीकच्या आंबिवली परिसरातील नेपच्यून स्वराज्य सेक्टर २ मधील सोसायट्यांना पिण्याच्या पाण्याचे ...

कल्याण : पावसाच्या सरींवर सरी येत असतानाही दुसरीकडे कल्याणनजीकच्या आंबिवली परिसरातील नेपच्यून स्वराज्य सेक्टर २ मधील सोसायट्यांना पिण्याच्या पाण्याचे कमालीचे दुर्भीक्ष्य जाणवत आहे. केडीएमसीच्या पाणीपुरवठा विभागाकडून पाणीपुरवठा केला जात असला तरी सोसायटीत ते पुरेशा प्रमाणात येत नाही. पाणी वाढवून द्या, अशी मागणी रहिवाशांकडून वारंवार करण्यात आली आहे. लोकप्रतिनिधींनाही पत्रव्यवहार करण्यात आला आहे. त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने पावसातही रहिवाशांना टँकरच्या पाण्याचा आधार घ्यावा लागत आहे.

आंबिवली पश्चिम भागात नेपच्यून स्वराज्य गृहप्रकल्प आहे. यातील सेक्टर दोन मधील रहिवास असलेल्या १० इमारतींमध्ये पिण्याच्या पाण्याचा तुटवडा जाणवत आहे. याठिकाणी एकूण ४५० फ्लॅट आहेत. सव्वादोनशे फ्लॅटमध्ये कुटुंबे वास्तव्य करीत आहेत. संपूर्ण सेक्टर दोनला प्रतिदिन दीड ते दोन लाख लीटर पाण्याची गरज आहे. पण मनपाकडून ४० ते ५० हजार लीटरच पाणी उपलब्ध होत आहे. अपुऱ्या पाण्यामुळे आठ ते नऊ महिने दहा इमारतींमधील रहिवाशांना तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. अपुऱ्या पाण्यामुळे एक दिवसाआड पाण्याचा वापर करावा लागत आहे. नेपच्यून गृहप्रकल्प हा पाणी वितरण करताना शेवटचा भाग पडत असल्याने याठिकाणी सर्वात उशिरा, कमी दाबाने पाण्याचे वितरण होते. त्याचा फटका येथील सेक्टर २ ला बसत आहे. पाणी वाढवून द्या, अशी मागणी मनपासह लोकप्रतिनिधींकडे केली आहे.

एका टँकरमागे २२०० रुपयांचा खर्च

कोणतीही सुधारणा पाणीपुरवठ्यात झालेली नाही अशी माहिती रहिवासी सुनील बोऱ्हाडे आणि सोसायटीचे पदाधिकारी भानुदास धोपटे यांनी दिली. पाणी पुरेसे येत नसल्याने एक दिवसाआड टँकर मागवावाच लागतो. यंदाच्या आठवड्यात पाच ते सहा वेळा टँकर मागविण्यात आला आहे. २२०० रुपये एका टँकरमागे खर्च करावा लागत असल्याचे बोऱ्हाडे म्हणाले. तातडीने रहिवाशांच्या पाणी समस्येची दखल घेऊन त्यावर ठोस उपाययोजना करण्यात यावी, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे.