शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
8
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
9
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
10
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
11
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
12
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
13
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
14
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
15
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
16
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
17
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
18
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
19
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
20
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!

महासभेतही महाशिवआघाडी, प्रस्तावांचा विरोध मावळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2019 00:48 IST

एकीकडे राज्यात महाशिवआघाडीची सरकार स्थापनेकडे वाटचाल सुरू असताना दुसरीकडे ठाणे महापालिकेतही तिचे दर्शन झाले.

ठाणे : एकीकडे राज्यात महाशिवआघाडीची सरकार स्थापनेकडे वाटचाल सुरू असताना दुसरीकडे ठाणे महापालिकेतही तिचे दर्शन झाले. सोमवारी झालेल्या महासभेत कोणते विषय मंजूर करायचे, कोणते नामंजूर, तहकूब करायचे, असे सर्व सोपस्कार शिवसेना, राष्टÑवादी आणि काँग्रेसचे आधीच ठरल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे महासभेचा हा अजेंडा ठरवित असताना भाजपला कसे अडचणीत आणायचे, याची रणनीतीही निश्चित झाली होती. त्यानुसार, महासभेत भाजप विरुद्ध महाशिवआघाडी असे चित्र दिसून आले. एकेक विषय मंजूर करीत असताना महाशिवआघाडीचा विजय असो, असा जयघोषही काहीवेळ पाहावयास मिळाला.राज्यात आता शिवसेना, राष्टÑवादी आणि काँग्रेस अशी सत्तेची समीकरणे जुळत आली असताना त्याचा फायदा घेऊन ठाणे महापालिकेत मात्र महाशिवआघाडीचे सूत जळून आल्याचे दिसून आले. महापालिकेत सध्या शिवसेनेची एकहाती सत्ता आहे. त्यामुळे भाजपसह राष्टÑवादी हे सुरुवातीपासून विरोधी बाकावर आहेत. मात्र, राज्यात युतीचे सरकार याआधी होते, त्यानुसार काही गोष्टींमध्ये भाजप ठाण्यात शिवसेनेला साथ देत होती. तर, राष्टÑवादीकडून विरोधी पक्षाची भूमिका बजावली जात होती. त्यामुळे सत्ताधाऱ्यांना नको ते विषय मंजूर करायचे, जरी झाले तरी त्याला राष्टÑवादी विरोध करताना दिसत होती. काही प्रकरणांवरून तर राष्टÑवादी थेट न्यायालयातही गेली आहे.परंतु, आता राज्यात महाशिवआघाडीची समीकरणे जुळून येत असताना त्याचा फायदा घेऊन शिवसेनेने राष्टÑवादी आणि काँग्रेसला आपलेसे करून सोमवारी झालेल्या महासभेत अनेक किचकट आणि नको ते विषयसुद्धा एकहाती मंजूर करून घेतले. विशेष म्हणजे महासभा कशी चालवायची, शिवसेनेच्या नगरसेवकांनी कशी भूमिका घ्यायची, त्याला राष्टÑवादी त्याला कशा प्रकारे उत्तर देणार आणि भाजपला एकाकी कसे पाडले जाईल, यासाठीची रणनीती आदल्यादिवशीच निश्चित केली होती.त्यानुसार, महासभा सुरू होण्यापूर्वीही महाशिवआघाडी अधिक घट्ट करण्यात आली. त्यानुसार, महासभेत मंजुरीसाठी आलेल्या एक्सॉनला जागा देण्याच्या प्रस्तावाविरोधात भाजपचे सर्व नगरसेवक असताना शिवसेना, राष्टÑवादी आणि काँग्रेसने हा विषय चुटकीसरशी मंजूर करून घेतला.>आता भाजप विरोधी बाकांवरआता आपली महाशिवआघाडी आहे, असे सांगून महाशिवआघाडीचा विजय असो, अशी घोषणाही करण्यास काही नगरसेवक मागेपुढे पाहताना दिसले नाहीत. त्यामुळे संतप्त झालेल्या भाजपचे गटनेते नारायण पवार यांनी काही प्रकरणांना विरोध करण्याचा प्रयत्न करत असताना तू पण काँग्रेसमध्ये होता, आता तुला पश्चात्ताप होईल, असा टोमणाही काँग्रेसचे गटनेते विक्रांत चव्हाण यांनी पवार यांना लगावला. एकूणच भाजपचे २३ नगरसेवक एकीकडे आणि महाशिवआघाडीचे नगरसेवक एकीकडे असे संख्याबळ महासभेत दिसून आले. त्यामुळे भाजप या महासभेत विरोधी बाकावर गेल्याचे दिसून आले.