शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
2
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
3
टॅरिफचे विघ्न, स्वदेशीचा मंत्र, अमेरिकेचे भारतावर अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ आजपासून, ४८ अब्ज डॉलर्सच्या निर्यातीला फटका
4
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
5
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
6
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
7
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
8
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
9
उच्च न्यायालयाने सुनावले, तरीही जरांगे मुंबईत आंदोलनावर ठाम! मुंबईकडे कूच करणारच, जरांगे यांचा इशारा
10
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
11
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
12
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
13
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
14
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
15
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
16
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
17
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
18
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
19
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
20
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार

सहा वर्षे होऊनही ठामपाची मलनि:सारण वाहिन्यांचे काम अर्धवटच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:50 IST

ठाणे : ठाण्यात गेल्या सहा वर्षांपासून केंद्राच्या अमृत योजनेअंतर्गत सुरू असलेल्या मलनि:सारण वाहिन्यांचे काम अद्यापही पूर्ण न झाल्याने ...

ठाणे : ठाण्यात गेल्या सहा वर्षांपासून केंद्राच्या अमृत योजनेअंतर्गत सुरू असलेल्या मलनि:सारण वाहिन्यांचे काम अद्यापही पूर्ण न झाल्याने केंद्रीय पंचायत राजमंत्री कपिल पाटील यांनी बुधवारी नियोजन भवन येथे झालेल्या दिशाच्या बैठकीत तीव्र नाराजी व्यक्त केली. महापालिकेने आता काम पूर्ण होण्यासाठी डिसेंबरपर्यंतचा कालावधी जाईल, असे सांगितले. वास्तविक पाहता हे काम वेळेत पूर्ण अपेक्षित असताना त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचेही त्यांनी या बैठकीत स्पष्ट केले.

बुधवारी झालेल्या जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण समिती (दिशा)च्या बैठकीत ठाणे शहरातील मलनि:सारण वाहिन्यांच्या कामांची पूर्तता कुठपर्यंत झाली याची माहिती पाटील यांनी मागविली. त्यावर ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी २०१५ मध्ये अमृत योजनेअंतर्गत ठाणे शहरात ६० कि.मी.चे मलनि:सारण वाहिन्या टाकण्याचे काम हाती घेतले असून यासाठी केंद्राचे ५७ कोटी, राज्य शासनाचे २८ कोटी आणि महापालिकेच्या निधीतून ६० कोटी रुपयांची तरतूद केल्याचे सांगितले. आतापर्यंत ६० कि.मी. पैकी ५६ कि.मी.चे काम पूर्ण झाले असल्याचा दावा करून उर्वरित ५ कि.मी.चे काम हे डिसेंबर अखेर पूर्ण केले जाईल, असेही सांगितले. पैकी एक कि.मी.च्या पाईपलाईनही टाकल्याचे त्यांनी स्पष्ट केले. परंतु, सहा वर्षे उलटूनही अद्याप हे काम का पूर्ण झाले नाही, असा सवाल पाटील यांनी केला. महत्त्वाच्या कामांमध्ये ढिलाई कशासाठी असा प्रश्न करून यापुढील काम फास्ट ट्रॅकवर घेऊन पूर्ण करावे, असे आदेश ठाणे महापालिकेला दिले.

----------------------