शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

पावसाळा सुरु झाल्यानंतरही त्या ४१ धोकादायक इमारती कारवाईच्या प्रतिक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2018 17:33 IST

पावसाळ्यापूर्वी पालिकेने धोकादायक इमारतींची यादी जाहीर करुन त्यावर कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु आता पावसाने शहरात जोरदार हजेरी लावल्यानंतरही शहरात ४१ इमारती या कारवाईच्या प्रतिक्षेत आहेत.

ठळक मुद्देनौपाड्यात ८ इमारती अतिधोकादायक३८ इमारतींची झाली दुरुस्ती

ठाणे - मागील चार दिवसापासून शहरात पावसाने चांगलाच धुडघुस घातला आहे. असे असताना ठाणे महापालिकेच्या हद्दीमध्ये आजही ४१ इमारती अशा आहेत, ज्या रिमाक्या करणे आवश्यक असताना देखील या इमारती रिकाम्या करणे प्रशासनाला शक्य झालेले नाही. रिकाम्या न करण्यात आलेल्या बहुतांश इमारतींवर न्यायालयाची स्थगिती असल्याने पालिका प्रशासन देखील अशा इमारतींवर कारवाई करण्यासाठी हतबल आहे. मात्र भविष्यात एखादी दुर्घटना घडल्यास प्रशासनालाच जबाबदार धरले जाऊ शकते, त्यामुळे पालिका दुहेरी कात्रीत अडकली आहे. कारवाई करणे शिल्लक असलेल्या अतिधोकादायक इमारतींमध्ये सर्वाधिक ८ इमारती या नौपाडा आणि कोपरी परिसरात असून त्यानंतर ३ इमारती या मुंब्रा प्रभाग समितीच्या हद्दीमधील आहे.                   धोकादायक असतानाही घरे न सोडण्याच्या मानिसकतेमुळे भिवंडीमधील ८ लोकांना दोन वर्षांपूर्वी आपला जीव गमवावा लागला होता. दरम्यान शासनाने धोकादायक इमारतींच्या संदर्भात ठरवून दिलेल्या धोरणानुसार चार श्रेणीमध्ये विभागणी करण्यात आली असून यामध्ये सी १ आणि सी २ ए या दोन श्रेणीमधील इमारती खाली करणे महत्वाचे आहे. सी १ या श्रेणीमध्ये अतिधोकादायक इमारती येत असून त्या तात्काळ खाली करून पाडणे अपेक्षित आहे. तर सी २ ए श्रेणीमधील इमारती या खाली करून दुरु स्त करणे अपेक्षित आहे. मात्र अजूनही अतिधोकादायक अर्थात सी १ श्रेणीमध्ये ११ अतिधोकादायक इमारती तर सी २ बी मध्ये ३१ अशा इमारती आहेत ज्यामध्ये अजूनही नागरिक वास्तव्यास आहेत. ११ अतिधोकादायक इमारतींमध्ये ८ इमारती या नौपाडा तसेच कोपरी प्रभाग समितीच्या हद्दीमधील आहेत. यामध्ये तीन इमारतींवर न्यायालयालायीन स्थगिती असून तीन इमारतींचे दुरु स्तीचे काम सुरु आहे. मुंब्रा प्रभाग समितीच्या हद्दीमध्ये असलेल्या तीन इमारतींपैकी दोन इमारतीं या ७० टक्के रिकाम्या करण्यात आल्या असल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.सी २ बी श्रेणीमधील इमारतींपैकी वर्तक नगर प्रभाग समितीच्या हद्दीमध्ये ७, उथळसर २, लोकमान्य -सावरकर नगर २, नौपाडा कोपरी मध्ये ७ तर मुंब्रा प्रभाग समितीच्या हद्दीमध्ये १३ इमारतींचा समावेश आहे. यामध्ये नौपाडा कोपरी प्रभाग समतिीच्या हद्दीमधील ७ इमारतींपैकी १ इमारत तोडण्यात आली आहे तर दोन इमारती तोडण्याची कारवाई सुरु करण्यात आली आहे. ठाणे महापालिकेच्या अतिक्र मण विभागाने शहरातील अतिधोकादायक अशा एकूण ९५ इमारती जाहीर केल्या होत्या. यामध्ये आतापर्यंत ८४ इमारती रिकाम्या करण्यात आल्या असून २१ इमारती पाडण्यात आल्या आहेत. बहुतांश इमारतींना न्यायालयालायीन स्थगिती असल्याने अजूनही ११ इमारतींवर प्रशासनाला कारवाई करता आलेली नाही. तर सी ए श्रेणीमधील ११५ इमारती जाहीर करण्यात आल्या होत्या. यामध्ये ८४ इमारती रिकाम्या करण्यात आल्या असून ३८ इमारती या दुरु स्त करण्यात आल्या आहेत. मात्र अजूनही ३१ इमारती प्रशासनाच्या वतीने रिकाम्या करण्यात आलेल्या नाहीत. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाcommissionerआयुक्त