शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
2
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
3
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
4
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
5
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
6
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
7
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
8
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
9
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
10
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
11
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...
12
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
13
Vivo Y400 5G: एमोलेड डिस्प्ले, ६००० mAh बॅटरी आणि बरेच काही; विवो व्हाय ४०० भारतात लॉन्च!
14
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
15
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
16
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
17
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
18
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
19
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
20
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...

पावसाळा सुरु झाल्यानंतरही त्या ४१ धोकादायक इमारती कारवाईच्या प्रतिक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2018 17:33 IST

पावसाळ्यापूर्वी पालिकेने धोकादायक इमारतींची यादी जाहीर करुन त्यावर कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु आता पावसाने शहरात जोरदार हजेरी लावल्यानंतरही शहरात ४१ इमारती या कारवाईच्या प्रतिक्षेत आहेत.

ठळक मुद्देनौपाड्यात ८ इमारती अतिधोकादायक३८ इमारतींची झाली दुरुस्ती

ठाणे - मागील चार दिवसापासून शहरात पावसाने चांगलाच धुडघुस घातला आहे. असे असताना ठाणे महापालिकेच्या हद्दीमध्ये आजही ४१ इमारती अशा आहेत, ज्या रिमाक्या करणे आवश्यक असताना देखील या इमारती रिकाम्या करणे प्रशासनाला शक्य झालेले नाही. रिकाम्या न करण्यात आलेल्या बहुतांश इमारतींवर न्यायालयाची स्थगिती असल्याने पालिका प्रशासन देखील अशा इमारतींवर कारवाई करण्यासाठी हतबल आहे. मात्र भविष्यात एखादी दुर्घटना घडल्यास प्रशासनालाच जबाबदार धरले जाऊ शकते, त्यामुळे पालिका दुहेरी कात्रीत अडकली आहे. कारवाई करणे शिल्लक असलेल्या अतिधोकादायक इमारतींमध्ये सर्वाधिक ८ इमारती या नौपाडा आणि कोपरी परिसरात असून त्यानंतर ३ इमारती या मुंब्रा प्रभाग समितीच्या हद्दीमधील आहे.                   धोकादायक असतानाही घरे न सोडण्याच्या मानिसकतेमुळे भिवंडीमधील ८ लोकांना दोन वर्षांपूर्वी आपला जीव गमवावा लागला होता. दरम्यान शासनाने धोकादायक इमारतींच्या संदर्भात ठरवून दिलेल्या धोरणानुसार चार श्रेणीमध्ये विभागणी करण्यात आली असून यामध्ये सी १ आणि सी २ ए या दोन श्रेणीमधील इमारती खाली करणे महत्वाचे आहे. सी १ या श्रेणीमध्ये अतिधोकादायक इमारती येत असून त्या तात्काळ खाली करून पाडणे अपेक्षित आहे. तर सी २ ए श्रेणीमधील इमारती या खाली करून दुरु स्त करणे अपेक्षित आहे. मात्र अजूनही अतिधोकादायक अर्थात सी १ श्रेणीमध्ये ११ अतिधोकादायक इमारती तर सी २ बी मध्ये ३१ अशा इमारती आहेत ज्यामध्ये अजूनही नागरिक वास्तव्यास आहेत. ११ अतिधोकादायक इमारतींमध्ये ८ इमारती या नौपाडा तसेच कोपरी प्रभाग समितीच्या हद्दीमधील आहेत. यामध्ये तीन इमारतींवर न्यायालयालायीन स्थगिती असून तीन इमारतींचे दुरु स्तीचे काम सुरु आहे. मुंब्रा प्रभाग समितीच्या हद्दीमध्ये असलेल्या तीन इमारतींपैकी दोन इमारतीं या ७० टक्के रिकाम्या करण्यात आल्या असल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.सी २ बी श्रेणीमधील इमारतींपैकी वर्तक नगर प्रभाग समितीच्या हद्दीमध्ये ७, उथळसर २, लोकमान्य -सावरकर नगर २, नौपाडा कोपरी मध्ये ७ तर मुंब्रा प्रभाग समितीच्या हद्दीमध्ये १३ इमारतींचा समावेश आहे. यामध्ये नौपाडा कोपरी प्रभाग समतिीच्या हद्दीमधील ७ इमारतींपैकी १ इमारत तोडण्यात आली आहे तर दोन इमारती तोडण्याची कारवाई सुरु करण्यात आली आहे. ठाणे महापालिकेच्या अतिक्र मण विभागाने शहरातील अतिधोकादायक अशा एकूण ९५ इमारती जाहीर केल्या होत्या. यामध्ये आतापर्यंत ८४ इमारती रिकाम्या करण्यात आल्या असून २१ इमारती पाडण्यात आल्या आहेत. बहुतांश इमारतींना न्यायालयालायीन स्थगिती असल्याने अजूनही ११ इमारतींवर प्रशासनाला कारवाई करता आलेली नाही. तर सी ए श्रेणीमधील ११५ इमारती जाहीर करण्यात आल्या होत्या. यामध्ये ८४ इमारती रिकाम्या करण्यात आल्या असून ३८ इमारती या दुरु स्त करण्यात आल्या आहेत. मात्र अजूनही ३१ इमारती प्रशासनाच्या वतीने रिकाम्या करण्यात आलेल्या नाहीत. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाcommissionerआयुक्त