शहरं
Join us  
Trending Stories
1
किश्तवाड येथे धरालीसारखी दुर्घटना, ढगफुटी होऊन आला पूर, १० जणांचा मृत्यू
2
'अमेरिकाच नाही, संपूर्ण जग तुमचे ऐकेल', गडकरींनी भारत विश्वगुरु बनण्याचा मास्टर प्लॅन सांगितला
3
मतदार यादीतून काढलेल्या ६५ लाख लोकांची नावे सार्वजनिक करा; SC चे निवडणूक आयोगाला निर्देश
4
ट्रम्प यांनी डेड इकॉनॉमी म्हटलेलं, आता अमेरिकेच्याच एजन्सीनं भारताचं रेटिंग केलं अपग्रेड
5
किश्तवाड ढगफुटी: फारुख अब्दुल्ला म्हणाले, "संपूर्ण देशाने देवाकडे प्रार्थना करावी, बचाव कार्यही कठीण!"
6
'लव्ह अँड वॉर', 'अल्फा'च नाही तर आलिया भट आणखी एका सिनेमाच्या तयारित, वाचा सविस्तर
7
नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले?
8
"मूल जन्माला घाला आणि ६ लाख रुपये मिळवा"; चीनला टक्कर देत 'या' देशाने केली मोठी घोषणा!
9
इथेनॉलनंतर आता डिझेलमध्ये बायोफ्युएल मिसळणार; गडकरींनी वादाच्या पार्श्वभूमीवर केली घोषणा
10
Independence Day 2025: काय योगायोग...! १९४७ ला तोच वार होता, जो उद्या १५ ऑगस्टला...; ७८ वर्षांनी...
11
२ मुलांना घेऊन आईनं मारली नदीत उडी; पतीच्या निधनानंतर दीराशी केले होते लग्न, मात्र...
12
तो कोहलीमुळं खचला! खरंच हेच असेल का पाकचा 'बब्बर शेर' प्रत्येक मॅचमध्ये 'ढेर' होण्यामागचं कारण?
13
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज! ८वा वेतन आयोग कधी लागू होणार? सरकारचा मोठा खुलासा!
14
इन्स्टाग्रामवर १.२ मिलियन फॉलोअर्स, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीनं केली अटक; कोण आहे 'ही' मॉडेल?
15
बस बनवणाऱ्या कंपनीला ₹५९४ कोटींचा नफा; शेअर खरेदीसाठी उड्या, ₹१२१ वर आला भाव
16
८८१ किमी केवळ १२ तासांत; ‘ही’ देशातील सर्वांत लांब अंतराची वंदे भारत, किती स्पीडने जाते?
17
२० वर्षे पगार दिला, पण नोकरीवर काही काम करू दिले नाही! नाराज महिला कंपनीविरोधात गेली कोर्टात, म्हणाली...
18
नीरज चोप्राची पत्नी हिमानी मोरचा मोठा निर्णय! टेनिसला कायमचा रामराम, 'या' व्यवसायात घेतली उडी
19
कोणत्या धर्माचं पालन करते सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया चांडोक? किती शिकलीये? जाणून घ्या
20
कबुतरखाना वाद: मध्यस्थीचा प्रस्ताव देणाऱ्या जैन मुनींना राज ठाकरेंचं थेट उत्तर; म्हणाले...

अतिधोकादायक इमारतीतील रहिवाशांचे स्थलांतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:27 IST

कल्याण : केडीएमसी हद्दीत मंगळवार रात्रीपासून एकूण ८३.५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. धोकादायक इमारती कोसळून दुर्घटना होऊ नये, ...

कल्याण : केडीएमसी हद्दीत मंगळवार रात्रीपासून एकूण ८३.५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. धोकादायक इमारती कोसळून दुर्घटना होऊ नये, यासाठी काही इमारती रहिवासमुक्त करण्यात आल्या. कल्याण पूर्वेतील दोन अतिधोकादायक इमारतींतील २८ नागरिकांना स्थलांतरित करण्यात आले, तर डोंबिवली पश्चिमेतील २० अतिधोकादायक इमारतींपैकी १५ इमारती रहिवासमुक्त करण्यात आल्या. अन्य पाच इमारती रहिवासमुक्त करण्याचे काम प्रगतिपथावर आहे.

‘ग’ प्रभागातील २० अतिधोकादायक इमारतींपैकी १२ इमारती रहिवासमुक्त केल्या आहेत. आठ इमारती रहिवासमुक्त करण्याचे काम सुरू आहे. ‘अ’ प्रभागात टिटवाळा परिसरातील एक अतिधोकादायक इमारत रहिवासमुक्त केली आहे. जोरदार पावसामुळे मनपा हद्दीतील सखल भागांत पाणी साचल्याने काही नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याचे प्रशासनाने मान्य केले आहे. मनपाने मनुष्यबळासह जेसीबीद्वारे पाणी साचलेल्या भागातील पाण्याचा निचरा करण्याचे काम केले आहे. महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी आणि शहर अभियंता सपना कोळी-देवनपल्ली यांनी मुख्यालयातील स्मार्ट सिटी कंट्रोल रूममध्ये प्रत्यक्ष उपस्थित राहून पावसाचा आढावा घेतला. महापालिकेतील २०१ ठिकाणी असलेल्या ५५१ सीसीटीव्हीच्या साहाय्याने पाणी कुठे साचले आहे, याचे अवलोकन करून पाण्याचा निचरा करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले.

------------------