शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
2
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
3
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
4
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
5
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
6
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
7
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
8
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
9
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
10
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
11
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
12
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
13
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
14
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
15
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
16
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
17
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!
18
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
19
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! पगाराबाबत सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
20
"मी सोहमला सांगितलंय लग्नानंतर वेगळं राहायचं...", सुचित्रा बांदेकर स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या- "एकत्र राहून रोज..."

पुरोगामीत्वाच्या नावाखाली जातीयवाद

By admin | Updated: May 30, 2017 05:41 IST

महात्मा गांधी आणि स्वा. सावरकर या दोन्ही नेत्यांनी अस्पृश्यता निर्मूलनाचा विचार मांडला. पण, सावरकरांनी अस्पृश्यता निर्मूलनाबरोबर

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : महात्मा गांधी आणि स्वा. सावरकर या दोन्ही नेत्यांनी अस्पृश्यता निर्मूलनाचा विचार मांडला. पण, सावरकरांनी अस्पृश्यता निर्मूलनाबरोबर जाती निर्मूलनाचा विचार १९३४-३५ मध्ये मांडला आणि जाती निर्मूलनाचा आग्रह धरला. त्यावरून, सावरकरांच्या दूरदर्शी विचारांची साक्ष पटते, पण आज समाजात पुरोगामीत्वाच्या नावाखाली काही नेते जातीयवाद करत असल्याचे स्पष्ट मत भाजपाचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी व्यक्त केले. सावरकर यांच्या जयंतीनिमित्त रविवारी मराठी ग्रंथसंग्रहालय येथे वि.दा. सावरकर प्रतिष्ठानतर्फे सावरकर स्मृती पुरस्कार प्रदान सोहळ्याचे आयोजन केले होते. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले भंडारी बोलत होते. ते म्हणाले की, एक देश एक भाषा हा मुद्दा सावरकरांनी मांडला. या देशात शेकडो भाषा आणि हजारो बोलीभाषा आहेत. मात्र, देशाची संपर्काची भाषा एक असावी, असे सावरकरांचे मत होते. सावरकरांनी मराठी भाषेला अनेक नवे शब्द दिले, पण त्या शब्दांची टिंगलटवाळी केली. त्यांच्या भाषाशुद्धीच्या विषयाकडे गांभीर्याने लक्ष न दिल्याने त्याचे तोटे आता आपल्याला जाणवू लागले असल्याचे भंडारी म्हणाले. सावरकरांनी सांगितलेला भाषाशुद्धीचा आग्रह म्हणजे वर्णवर्चस्वाचा आग्रह धरणे, असा अर्थ लावला जातो. हा पुळचटपणा आता सोडून देण्याची गरज आहे. ते क्रि याशील विचारवंत आणि कृतिशील साहित्यिक होते, याची साक्ष त्यांनी धरलेल्या भाषाशुद्धीच्या आग्रहामुळे पटते. म्हणूनच, त्यांनी धरलेला भाषाशुद्धीचा आग्रह योग्यच होता, असेही भंडारी म्हणाले. या वेळी पत्रकारिता क्षेत्रासाठी श्रीकांत बोजेवार, कार्यक्षम नगरसेवक नरेश म्हस्के, उद्योग क्षेत्रासाठी मेधा मेहंदळे, सांस्कृतिक क्षेत्रासाठी महेश वर्दे, साहित्य क्षेत्रासाठी अशोक केळकर, सामाजिक क्षेत्रासाठी उज्ज्वला बागवडे यांना सावरकर स्मृती पुरस्काराने भंडारी यांच्या हस्ते गौरवण्यात आले. व्यासपीठावर भाजपा ठाणे शहराध्यक्ष संदीप लेले, प्रतिष्ठानचे अध्यक्ष विद्याधर ठाणेकर उपस्थित होते.