शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
2
आता खामेनेईचा खात्मा करणारच..: हॉस्पिटलवरील हल्ल्यानंतर इस्त्रायलचे खुले चॅलेंज
3
मुंबई, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासह पुणे घाट, सातारा घाट परिसरात 24 तासांसाठी ऑरेंज अलर्ट
4
'हवाई हलकल्लोळ' सुरूच! आधी दिल्ली-लेह फ्लाइट... नंतर हैदराबाद-तिरूपती विमानाचा 'यू टर्न'
5
बसच्या तिकिटामुळे हत्या उघडकीस आली! पाच वर्षाचे रिलेशन, लग्नाची इच्छा, घडलं वेगळंच
6
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर: १० राशी मालामाल, इच्छापूर्ती काळ; अचानक पैसे मिळतील, चांगले घडेल!
7
Video: इलॉन मस्क यांना मोठा धक्का; प्रक्षेपणादरम्यान SpaceX च्या स्टारशिप रॉकेटमध्ये स्फोट
8
Air India Plane Crash: 'असं वाटलं पाकिस्ताननेच मिसाईल हल्ला केला, चार मित्र गमावले'; अपघातातून वाचलेल्या केशवने सांगितला थरार
9
ठाकरेंसोबत रात्रीतून खेळ झाला! काल मातोश्रीवर आलेले 'ते' दोन नेते आज शिंदेंच्या शिवसेनेत
10
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
11
लीड्स टेस्टपूर्वीच टीम इंडियाला मोठा झटका, 259 धावा करणाऱ्या 'या' क्रिकेटरला दुखापत! नेमकं काय घडलं? आता कशी असेल प्लेइंग 11?
12
Ashadhi Ekadashi 2025: संत नामदेवांनी पांडुरंगाच्या आरतीत उल्लेखलेली 'राही' नेमकी कोण?
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधी यांना वाढदिवसानिमित्त दिल्या खास शुभेच्छा, म्हणाले...
14
Shree Swami Samarth: एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
15
चालत्या रिक्षात अचानक झाला स्फोट; आगीत महिला प्रवासी जिवंत जळाली, ५ जण जखमी
16
अहमदाबाद विमान अपघात: Air India ४,०८० कोटी रुपयांचा 'इन्श्युरन्स क्लेम' करणार, इतिहासातील सर्वाधिक आकडा ठरणार?
17
Pandharpur Wari 2025: वारकऱ्यांसाठी टोलमाफी! पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना कसे मिळणार टोलमाफीचे पास?
18
Monolithisch India IPO Listing: ६२ टक्क्यांच्या प्रीमिअमसह लिस्टिंग, नंतर लागलं अपर सर्किट; पहिल्याच दिवशी गुंतणूकदार मालामाल
19
प्यार तूने क्या किया! बॉयफ्रेंडच्या घरात बसलेली बायको, संतापलेल्या नवऱ्याने घेतला नाकाचा चावा
20
Sonam Raghuvanshi : बनावट मृतदेह, संजय वर्मा...; राजा रघुवंशीच्या हत्येसाठी सोनम आणि राजचं खतरनाक प्लॅनिंग

पुरोगामीत्वाच्या नावाखाली जातीयवाद

By admin | Updated: May 30, 2017 05:41 IST

महात्मा गांधी आणि स्वा. सावरकर या दोन्ही नेत्यांनी अस्पृश्यता निर्मूलनाचा विचार मांडला. पण, सावरकरांनी अस्पृश्यता निर्मूलनाबरोबर

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : महात्मा गांधी आणि स्वा. सावरकर या दोन्ही नेत्यांनी अस्पृश्यता निर्मूलनाचा विचार मांडला. पण, सावरकरांनी अस्पृश्यता निर्मूलनाबरोबर जाती निर्मूलनाचा विचार १९३४-३५ मध्ये मांडला आणि जाती निर्मूलनाचा आग्रह धरला. त्यावरून, सावरकरांच्या दूरदर्शी विचारांची साक्ष पटते, पण आज समाजात पुरोगामीत्वाच्या नावाखाली काही नेते जातीयवाद करत असल्याचे स्पष्ट मत भाजपाचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी व्यक्त केले. सावरकर यांच्या जयंतीनिमित्त रविवारी मराठी ग्रंथसंग्रहालय येथे वि.दा. सावरकर प्रतिष्ठानतर्फे सावरकर स्मृती पुरस्कार प्रदान सोहळ्याचे आयोजन केले होते. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले भंडारी बोलत होते. ते म्हणाले की, एक देश एक भाषा हा मुद्दा सावरकरांनी मांडला. या देशात शेकडो भाषा आणि हजारो बोलीभाषा आहेत. मात्र, देशाची संपर्काची भाषा एक असावी, असे सावरकरांचे मत होते. सावरकरांनी मराठी भाषेला अनेक नवे शब्द दिले, पण त्या शब्दांची टिंगलटवाळी केली. त्यांच्या भाषाशुद्धीच्या विषयाकडे गांभीर्याने लक्ष न दिल्याने त्याचे तोटे आता आपल्याला जाणवू लागले असल्याचे भंडारी म्हणाले. सावरकरांनी सांगितलेला भाषाशुद्धीचा आग्रह म्हणजे वर्णवर्चस्वाचा आग्रह धरणे, असा अर्थ लावला जातो. हा पुळचटपणा आता सोडून देण्याची गरज आहे. ते क्रि याशील विचारवंत आणि कृतिशील साहित्यिक होते, याची साक्ष त्यांनी धरलेल्या भाषाशुद्धीच्या आग्रहामुळे पटते. म्हणूनच, त्यांनी धरलेला भाषाशुद्धीचा आग्रह योग्यच होता, असेही भंडारी म्हणाले. या वेळी पत्रकारिता क्षेत्रासाठी श्रीकांत बोजेवार, कार्यक्षम नगरसेवक नरेश म्हस्के, उद्योग क्षेत्रासाठी मेधा मेहंदळे, सांस्कृतिक क्षेत्रासाठी महेश वर्दे, साहित्य क्षेत्रासाठी अशोक केळकर, सामाजिक क्षेत्रासाठी उज्ज्वला बागवडे यांना सावरकर स्मृती पुरस्काराने भंडारी यांच्या हस्ते गौरवण्यात आले. व्यासपीठावर भाजपा ठाणे शहराध्यक्ष संदीप लेले, प्रतिष्ठानचे अध्यक्ष विद्याधर ठाणेकर उपस्थित होते.