शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

दिव्यामध्ये दीड हजार घरांचे अतिक्रमण जमीनदोस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2020 05:33 IST

सरकारी भूखंड व कांदळवनाच्या जागेवर बांधण्यात आलेल्या ३९ चाळींचे बेकायदेशीर अतिक्रमण ठाणे जिल्हा प्रशासनाने धडक कारवाई करून सोमवारी जमीनदोस्त केले.

ठाणे : दिवा डम्पिंगच्या बाजूस असलेल्या सरकारी भूखंड व कांदळवनाच्या जागेवर बांधण्यात आलेल्या ३९ चाळींचे बेकायदेशीर अतिक्रमण ठाणे जिल्हा प्रशासनाने धडक कारवाई करून सोमवारी जमीनदोस्त केले. या चाळींमधील १५०० पेक्षा जास्त घरे जेसीबी, पोकलेन मशीनच्या साहाय्याने तोडण्यात आली. गेल्या काही वर्षांमधील ही सर्वात मोठी कारवाई जिल्हा प्रशासनाने चोख पोलीस बंदोबस्तात पार पाडली आहे. सुमारे अडीच ते तीन एकरांवरील अतिक्रमणे या कारवाईदरम्यान पाडण्यात आली.उत्तर प्रदेश, बिहार, ओडिशा व अन्य राज्यांतील रहिवाशांचे या चाळींमध्ये वास्तव्य होते. भूमाफियांनी कांदळवन नष्ट करून सरकारी जमिनीवर बिनदिक्कतपणे या ३९ चाळींचे बांधकाम केले होते. परराज्यांतून आलेल्या रहिवाशांना त्यातील घरे अल्प किमतीत विकून भूमाफिया फरार झाले आहेत. दुपारी १२ वाजण्याच्या दरम्यान कारवाई सुरू झाली, तेव्हा प्रारंभी रहिवाशांनी कडाडून विरोध केला. येथील युवक, युवती आणि महिलांनी जेसीबीसमोर उभे राहून त्यांनी या कारवाईत अडथळा आणण्याचा प्रयत्न केला. काही तरुणांनी तर जेसीबीवर चढून चालकास दम देण्याचाही प्रयत्न केला. रहिवाशांचा रोष लक्षात घेऊन प्रशासनाने कारवाई काही काळ थांबवली.न्यायालयाच्या आदेशानुसार ही कारवाई केली जात आहे. त्यानुसार, केवळ दुकाने तोडण्यासाठी सहकार्य करा, असे आवाहन प्रशासनाने केले. त्यानंतर, पोलिसांनी गर्दी हटवून दुपारी दीड वाजता पुन्हा कारवाई सुरू केली. एकावेळी पाच चाळी जेसीबीच्या साहाय्याने तोडण्यास प्रारंभ झाला. या वेळी मात्र पोलिसांच्या भीतीमुळे एकाही रहिवाशाने कारवाईत अडथळा आणला नाही. सर्व्हे नंबर २७३ आणि २७५ या दोन्ही सरकारी भूखंडांवर समोरासमोर असलेल्या उत्तर प्रदेश आणि बिहारच्या रहिवाशांच्या चाळी चोख व कडक पोलीस बंदोबस्तात तोडण्यात आल्या.या दोन्ही भूखंडांवरील ३९ चाळी तोडण्यासाठी सहा जेसीबी, एक पोकलेन मशीनचा वापर करण्यात आला. एका चाळीत सुमारे ३० ते ३५ घरे होती. त्यानुसार, एक हजार ५०० खोल्या पोलीस आणि राज्य राखीव दलाच्या कडक बंदोबस्तात तोडण्यात आल्या. सुमारे ३५० पोलीस अधिकाऱ्यांचे मनुष्यबळ यावेळी तैनात करण्यात आले होते. यामध्ये पोलीस उपायुक्त सुभाष बोरसे यांच्यासह सहायक पोलीस आयुक्त, पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक आदी पोलीस अधिकाऱ्यांसह पुरुष आणि महिला पोलीस शिपाई यावेळी तैनात करण्यात आले होते.>३९ चाळींवरच कारवाईगेल्या काही वर्षांमध्ये राबवलेल्या अतिक्रमणविरोधी मोहिमांपैकी ही सर्वात मोठी आणि धडक कारवाई असल्याची चर्चा येथे सुरू होती. एका चाळीत ३० ते ३५ घरे दाटीवाटीने बांधण्यात आली आहेत. या घरांच्या ३९ चाळींवर हातोडा पडला आहे. २०१० नंतरच्या रहिवासी चाळी असल्यामुळे या रहिवाशांचे पुनर्वसन करता येणार नसल्याचेही प्रशासनाकडून सांगितले जात आहे. या जमिनीवर अतिक्रमण करून चाळींचे बांधकाम करणाºया विकासकांवर कारवाई करण्याची मागणी येथील रहिवाशांकडून केली जात आहे. या ३९ चाळी तोडल्यानंतर येथील उर्वरित चाळींवरही लवकरच कारवाई होण्याचे संकेत मिळत आहेत.