शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
2
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
3
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
4
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
5
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
6
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
7
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
8
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
9
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
10
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
11
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
12
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
13
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
14
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
15
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
16
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
17
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
18
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
19
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
20
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय

दिव्यामध्ये दीड हजार घरांचे अतिक्रमण जमीनदोस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2020 05:33 IST

सरकारी भूखंड व कांदळवनाच्या जागेवर बांधण्यात आलेल्या ३९ चाळींचे बेकायदेशीर अतिक्रमण ठाणे जिल्हा प्रशासनाने धडक कारवाई करून सोमवारी जमीनदोस्त केले.

ठाणे : दिवा डम्पिंगच्या बाजूस असलेल्या सरकारी भूखंड व कांदळवनाच्या जागेवर बांधण्यात आलेल्या ३९ चाळींचे बेकायदेशीर अतिक्रमण ठाणे जिल्हा प्रशासनाने धडक कारवाई करून सोमवारी जमीनदोस्त केले. या चाळींमधील १५०० पेक्षा जास्त घरे जेसीबी, पोकलेन मशीनच्या साहाय्याने तोडण्यात आली. गेल्या काही वर्षांमधील ही सर्वात मोठी कारवाई जिल्हा प्रशासनाने चोख पोलीस बंदोबस्तात पार पाडली आहे. सुमारे अडीच ते तीन एकरांवरील अतिक्रमणे या कारवाईदरम्यान पाडण्यात आली.उत्तर प्रदेश, बिहार, ओडिशा व अन्य राज्यांतील रहिवाशांचे या चाळींमध्ये वास्तव्य होते. भूमाफियांनी कांदळवन नष्ट करून सरकारी जमिनीवर बिनदिक्कतपणे या ३९ चाळींचे बांधकाम केले होते. परराज्यांतून आलेल्या रहिवाशांना त्यातील घरे अल्प किमतीत विकून भूमाफिया फरार झाले आहेत. दुपारी १२ वाजण्याच्या दरम्यान कारवाई सुरू झाली, तेव्हा प्रारंभी रहिवाशांनी कडाडून विरोध केला. येथील युवक, युवती आणि महिलांनी जेसीबीसमोर उभे राहून त्यांनी या कारवाईत अडथळा आणण्याचा प्रयत्न केला. काही तरुणांनी तर जेसीबीवर चढून चालकास दम देण्याचाही प्रयत्न केला. रहिवाशांचा रोष लक्षात घेऊन प्रशासनाने कारवाई काही काळ थांबवली.न्यायालयाच्या आदेशानुसार ही कारवाई केली जात आहे. त्यानुसार, केवळ दुकाने तोडण्यासाठी सहकार्य करा, असे आवाहन प्रशासनाने केले. त्यानंतर, पोलिसांनी गर्दी हटवून दुपारी दीड वाजता पुन्हा कारवाई सुरू केली. एकावेळी पाच चाळी जेसीबीच्या साहाय्याने तोडण्यास प्रारंभ झाला. या वेळी मात्र पोलिसांच्या भीतीमुळे एकाही रहिवाशाने कारवाईत अडथळा आणला नाही. सर्व्हे नंबर २७३ आणि २७५ या दोन्ही सरकारी भूखंडांवर समोरासमोर असलेल्या उत्तर प्रदेश आणि बिहारच्या रहिवाशांच्या चाळी चोख व कडक पोलीस बंदोबस्तात तोडण्यात आल्या.या दोन्ही भूखंडांवरील ३९ चाळी तोडण्यासाठी सहा जेसीबी, एक पोकलेन मशीनचा वापर करण्यात आला. एका चाळीत सुमारे ३० ते ३५ घरे होती. त्यानुसार, एक हजार ५०० खोल्या पोलीस आणि राज्य राखीव दलाच्या कडक बंदोबस्तात तोडण्यात आल्या. सुमारे ३५० पोलीस अधिकाऱ्यांचे मनुष्यबळ यावेळी तैनात करण्यात आले होते. यामध्ये पोलीस उपायुक्त सुभाष बोरसे यांच्यासह सहायक पोलीस आयुक्त, पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक आदी पोलीस अधिकाऱ्यांसह पुरुष आणि महिला पोलीस शिपाई यावेळी तैनात करण्यात आले होते.>३९ चाळींवरच कारवाईगेल्या काही वर्षांमध्ये राबवलेल्या अतिक्रमणविरोधी मोहिमांपैकी ही सर्वात मोठी आणि धडक कारवाई असल्याची चर्चा येथे सुरू होती. एका चाळीत ३० ते ३५ घरे दाटीवाटीने बांधण्यात आली आहेत. या घरांच्या ३९ चाळींवर हातोडा पडला आहे. २०१० नंतरच्या रहिवासी चाळी असल्यामुळे या रहिवाशांचे पुनर्वसन करता येणार नसल्याचेही प्रशासनाकडून सांगितले जात आहे. या जमिनीवर अतिक्रमण करून चाळींचे बांधकाम करणाºया विकासकांवर कारवाई करण्याची मागणी येथील रहिवाशांकडून केली जात आहे. या ३९ चाळी तोडल्यानंतर येथील उर्वरित चाळींवरही लवकरच कारवाई होण्याचे संकेत मिळत आहेत.