शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
2
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
3
देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
4
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
5
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
6
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
7
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पॉवरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
8
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?
9
“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार
10
Bigg Boss 19: 'बिग बॉस हिंदी'कडून मराठमोळ्या प्रणित मोरेवर अन्याय? शोसाठी मिळालं सगळ्यांपेक्षा कमी मानधन
11
Moto G67 Power: ७०००mAh बॅटरी आणि चार कॅमेरे; मोटो जी६७ पॉवर भारतात लॉन्च!
12
भारत, चीन, तुर्कस्तान... तीन देशांनी घेतला असा निर्णय की रशियाला होतंय नुकसान, ट्रम्प यांच्यामुळे नाईलाज
13
"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी
14
परदेशी सहल बजेटमध्ये! 'या' ५ देशांमध्ये भारतीय रुपया आहे मजबूत; कमी खर्चात करा परदेशवारी
15
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
16
बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का! मतदानाच्या तोंडावर भाजप आमदाराने राजदमध्ये प्रवेश केला; नाराज का झाला...
17
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
18
चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा
19
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
20
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'

दिव्यामध्ये दीड हजार घरांचे अतिक्रमण जमीनदोस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2020 05:33 IST

सरकारी भूखंड व कांदळवनाच्या जागेवर बांधण्यात आलेल्या ३९ चाळींचे बेकायदेशीर अतिक्रमण ठाणे जिल्हा प्रशासनाने धडक कारवाई करून सोमवारी जमीनदोस्त केले.

ठाणे : दिवा डम्पिंगच्या बाजूस असलेल्या सरकारी भूखंड व कांदळवनाच्या जागेवर बांधण्यात आलेल्या ३९ चाळींचे बेकायदेशीर अतिक्रमण ठाणे जिल्हा प्रशासनाने धडक कारवाई करून सोमवारी जमीनदोस्त केले. या चाळींमधील १५०० पेक्षा जास्त घरे जेसीबी, पोकलेन मशीनच्या साहाय्याने तोडण्यात आली. गेल्या काही वर्षांमधील ही सर्वात मोठी कारवाई जिल्हा प्रशासनाने चोख पोलीस बंदोबस्तात पार पाडली आहे. सुमारे अडीच ते तीन एकरांवरील अतिक्रमणे या कारवाईदरम्यान पाडण्यात आली.उत्तर प्रदेश, बिहार, ओडिशा व अन्य राज्यांतील रहिवाशांचे या चाळींमध्ये वास्तव्य होते. भूमाफियांनी कांदळवन नष्ट करून सरकारी जमिनीवर बिनदिक्कतपणे या ३९ चाळींचे बांधकाम केले होते. परराज्यांतून आलेल्या रहिवाशांना त्यातील घरे अल्प किमतीत विकून भूमाफिया फरार झाले आहेत. दुपारी १२ वाजण्याच्या दरम्यान कारवाई सुरू झाली, तेव्हा प्रारंभी रहिवाशांनी कडाडून विरोध केला. येथील युवक, युवती आणि महिलांनी जेसीबीसमोर उभे राहून त्यांनी या कारवाईत अडथळा आणण्याचा प्रयत्न केला. काही तरुणांनी तर जेसीबीवर चढून चालकास दम देण्याचाही प्रयत्न केला. रहिवाशांचा रोष लक्षात घेऊन प्रशासनाने कारवाई काही काळ थांबवली.न्यायालयाच्या आदेशानुसार ही कारवाई केली जात आहे. त्यानुसार, केवळ दुकाने तोडण्यासाठी सहकार्य करा, असे आवाहन प्रशासनाने केले. त्यानंतर, पोलिसांनी गर्दी हटवून दुपारी दीड वाजता पुन्हा कारवाई सुरू केली. एकावेळी पाच चाळी जेसीबीच्या साहाय्याने तोडण्यास प्रारंभ झाला. या वेळी मात्र पोलिसांच्या भीतीमुळे एकाही रहिवाशाने कारवाईत अडथळा आणला नाही. सर्व्हे नंबर २७३ आणि २७५ या दोन्ही सरकारी भूखंडांवर समोरासमोर असलेल्या उत्तर प्रदेश आणि बिहारच्या रहिवाशांच्या चाळी चोख व कडक पोलीस बंदोबस्तात तोडण्यात आल्या.या दोन्ही भूखंडांवरील ३९ चाळी तोडण्यासाठी सहा जेसीबी, एक पोकलेन मशीनचा वापर करण्यात आला. एका चाळीत सुमारे ३० ते ३५ घरे होती. त्यानुसार, एक हजार ५०० खोल्या पोलीस आणि राज्य राखीव दलाच्या कडक बंदोबस्तात तोडण्यात आल्या. सुमारे ३५० पोलीस अधिकाऱ्यांचे मनुष्यबळ यावेळी तैनात करण्यात आले होते. यामध्ये पोलीस उपायुक्त सुभाष बोरसे यांच्यासह सहायक पोलीस आयुक्त, पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक आदी पोलीस अधिकाऱ्यांसह पुरुष आणि महिला पोलीस शिपाई यावेळी तैनात करण्यात आले होते.>३९ चाळींवरच कारवाईगेल्या काही वर्षांमध्ये राबवलेल्या अतिक्रमणविरोधी मोहिमांपैकी ही सर्वात मोठी आणि धडक कारवाई असल्याची चर्चा येथे सुरू होती. एका चाळीत ३० ते ३५ घरे दाटीवाटीने बांधण्यात आली आहेत. या घरांच्या ३९ चाळींवर हातोडा पडला आहे. २०१० नंतरच्या रहिवासी चाळी असल्यामुळे या रहिवाशांचे पुनर्वसन करता येणार नसल्याचेही प्रशासनाकडून सांगितले जात आहे. या जमिनीवर अतिक्रमण करून चाळींचे बांधकाम करणाºया विकासकांवर कारवाई करण्याची मागणी येथील रहिवाशांकडून केली जात आहे. या ३९ चाळी तोडल्यानंतर येथील उर्वरित चाळींवरही लवकरच कारवाई होण्याचे संकेत मिळत आहेत.