शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
2
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
3
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
4
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
5
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
6
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
7
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
8
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
9
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
10
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...
11
भारतीय न्यायव्यवस्थेपुढे अनोखी आव्हाने; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली खंत
12
दुर्घटनेला महिना उलटला तरी अजूनही प्रवासी, नातेवाईक धास्तावलेलेच...
13
पोलंडची इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी क्वीन
14
बुमराहला रोखण्याच्या नादात इंग्लंड स्वत: अडकला जाळ्यात!
15
ड्युक्स चेंडूंची समस्या म्हणजे ‘मार पायाला आणि मलम डोक्याला!’, टिकतच नाहीय...
16
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
17
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
18
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
19
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
20
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य

दिव्यामध्ये दीड हजार घरांचे अतिक्रमण जमीनदोस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2020 05:33 IST

सरकारी भूखंड व कांदळवनाच्या जागेवर बांधण्यात आलेल्या ३९ चाळींचे बेकायदेशीर अतिक्रमण ठाणे जिल्हा प्रशासनाने धडक कारवाई करून सोमवारी जमीनदोस्त केले.

ठाणे : दिवा डम्पिंगच्या बाजूस असलेल्या सरकारी भूखंड व कांदळवनाच्या जागेवर बांधण्यात आलेल्या ३९ चाळींचे बेकायदेशीर अतिक्रमण ठाणे जिल्हा प्रशासनाने धडक कारवाई करून सोमवारी जमीनदोस्त केले. या चाळींमधील १५०० पेक्षा जास्त घरे जेसीबी, पोकलेन मशीनच्या साहाय्याने तोडण्यात आली. गेल्या काही वर्षांमधील ही सर्वात मोठी कारवाई जिल्हा प्रशासनाने चोख पोलीस बंदोबस्तात पार पाडली आहे. सुमारे अडीच ते तीन एकरांवरील अतिक्रमणे या कारवाईदरम्यान पाडण्यात आली.उत्तर प्रदेश, बिहार, ओडिशा व अन्य राज्यांतील रहिवाशांचे या चाळींमध्ये वास्तव्य होते. भूमाफियांनी कांदळवन नष्ट करून सरकारी जमिनीवर बिनदिक्कतपणे या ३९ चाळींचे बांधकाम केले होते. परराज्यांतून आलेल्या रहिवाशांना त्यातील घरे अल्प किमतीत विकून भूमाफिया फरार झाले आहेत. दुपारी १२ वाजण्याच्या दरम्यान कारवाई सुरू झाली, तेव्हा प्रारंभी रहिवाशांनी कडाडून विरोध केला. येथील युवक, युवती आणि महिलांनी जेसीबीसमोर उभे राहून त्यांनी या कारवाईत अडथळा आणण्याचा प्रयत्न केला. काही तरुणांनी तर जेसीबीवर चढून चालकास दम देण्याचाही प्रयत्न केला. रहिवाशांचा रोष लक्षात घेऊन प्रशासनाने कारवाई काही काळ थांबवली.न्यायालयाच्या आदेशानुसार ही कारवाई केली जात आहे. त्यानुसार, केवळ दुकाने तोडण्यासाठी सहकार्य करा, असे आवाहन प्रशासनाने केले. त्यानंतर, पोलिसांनी गर्दी हटवून दुपारी दीड वाजता पुन्हा कारवाई सुरू केली. एकावेळी पाच चाळी जेसीबीच्या साहाय्याने तोडण्यास प्रारंभ झाला. या वेळी मात्र पोलिसांच्या भीतीमुळे एकाही रहिवाशाने कारवाईत अडथळा आणला नाही. सर्व्हे नंबर २७३ आणि २७५ या दोन्ही सरकारी भूखंडांवर समोरासमोर असलेल्या उत्तर प्रदेश आणि बिहारच्या रहिवाशांच्या चाळी चोख व कडक पोलीस बंदोबस्तात तोडण्यात आल्या.या दोन्ही भूखंडांवरील ३९ चाळी तोडण्यासाठी सहा जेसीबी, एक पोकलेन मशीनचा वापर करण्यात आला. एका चाळीत सुमारे ३० ते ३५ घरे होती. त्यानुसार, एक हजार ५०० खोल्या पोलीस आणि राज्य राखीव दलाच्या कडक बंदोबस्तात तोडण्यात आल्या. सुमारे ३५० पोलीस अधिकाऱ्यांचे मनुष्यबळ यावेळी तैनात करण्यात आले होते. यामध्ये पोलीस उपायुक्त सुभाष बोरसे यांच्यासह सहायक पोलीस आयुक्त, पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक आदी पोलीस अधिकाऱ्यांसह पुरुष आणि महिला पोलीस शिपाई यावेळी तैनात करण्यात आले होते.>३९ चाळींवरच कारवाईगेल्या काही वर्षांमध्ये राबवलेल्या अतिक्रमणविरोधी मोहिमांपैकी ही सर्वात मोठी आणि धडक कारवाई असल्याची चर्चा येथे सुरू होती. एका चाळीत ३० ते ३५ घरे दाटीवाटीने बांधण्यात आली आहेत. या घरांच्या ३९ चाळींवर हातोडा पडला आहे. २०१० नंतरच्या रहिवासी चाळी असल्यामुळे या रहिवाशांचे पुनर्वसन करता येणार नसल्याचेही प्रशासनाकडून सांगितले जात आहे. या जमिनीवर अतिक्रमण करून चाळींचे बांधकाम करणाºया विकासकांवर कारवाई करण्याची मागणी येथील रहिवाशांकडून केली जात आहे. या ३९ चाळी तोडल्यानंतर येथील उर्वरित चाळींवरही लवकरच कारवाई होण्याचे संकेत मिळत आहेत.