शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

कल्याण-डाेंबिवलीतील तलावांवर अतिक्रमण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:26 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत जवळपास सात मोठे तलाव आहेत. त्यांपैकी काळा तलावाचा स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत जवळपास सात मोठे तलाव आहेत. त्यांपैकी काळा तलावाचा स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत विकास केला जात आहे. त्याचबरोबर गौरीपाडा येथील तलावाची भिंत बांधण्याचे काम सुरू होते. मात्र, बांधलेली भिंतही ढासळली आहे. दरम्यान, अन्य तलावांचा विकास हा कागदावरच राहिला आहे.

महापालिकेच्या हद्दीतील तलावांवर झालेली अतिक्रमणे महापालिकेकडून हटविली जात नाहीत. काही तलावांच्या जागेवर अतिक्रमण करण्यात आले आहे, तर काही तलाव भूमाफियांनी गिळंकृत करून त्यावर चाळी उभारण्याचे काम केले आहे. मात्र, या सर्व प्रकारांकडे महापालिका प्रशासनाची डोळेझाक सुरू आहे. तलाव हे नैसर्गिक जलस्रोत आहेत. भविष्यात जलसंकट तयार झाल्यावर त्यातून पाणीपुरवठा केला जाऊ शकतो. तलावाचे पाणी हे पिण्यासाठी योग्य नसले तरी अन्य कामांसाठी वापरले जाऊ शकते. अन्यथा तलावाचे सुशोभीकरण मनोरंजनाचे केंद्र तेथे विकसित केले जाऊ शकते, याकडे जाणकारांनी लक्ष वेधले आहे.

--------------------------------------------------

हे घ्या पुरावे

१. कल्याणमधील भटाळे तलावाच्या जागेवर विकास आराखड्यात आरक्षण टाकण्यात आले होते. आरक्षण हटविले गेले असले तरी त्या जागेवरील अतिक्रमण कायम आहे. मागील चार वर्षांत टीएलआरकडून सर्वेक्षण करण्यात आलेले नाही.

२. आटाळी परिसरातील मोठा तलाव हा बुजविण्यात आला. त्या तलावावर भूमाफियांनी अतिक्रमण केले आहे. तलाव बुजवून तेथे चाळी उभारण्यात आल्या आहेत.

३. डावजे तलावाची जागा एका खासगी विकासकास हॉटेल विकसित करण्यासाठी महापालिकेने लीजवर दिली होती. हा करारही संपुष्टात आला आहे. तरीदेखील हा तलाव संबंधितांकडून परत घेण्याची तसदी प्रशासनाकडून घेतली जात नाही.

--------------------

नदीनाल्यालगत इमारती

कल्याण पश्चिममधील संतोषीमाता रोडवर एक इमारत चक्क नाल्यावर उभारण्यात आली आहे. प्रशासनाकडून त्यावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. त्याचबरोबर वालधुनी नदीकिनारी योगीधाम, घोलपनगर ही नगरे वसली आहेत. नदीकिनारी सखल भाग, पूरनियंत्रण रेषेचा विचार न करता नदी किनारी अतिक्रमणे करण्यात आली आहेत. ही बाब यंदाच्या अतिवृष्टीतही उघडकीस आली आहे.

-----------------------------

टप्प्याटप्प्याने तलावांचा विकास

महापालिका हद्दीतील सात तलावांपैकी काळा तलावाच्या विकासावर १० कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. तसेच स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत पुन्हा १७ कोटी रुपये खर्चून विकास केला जाणार आहे. गौरीपाडा तलाव सुशोभित केला जात आहे. टप्प्याटप्प्याने तलावाचा विकास केला जाईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.

-------------------------

प्रशासनाचे दुर्लक्ष

केडीएमसीने काळा तलाव विकसित केला आहे. मात्र, अन्य तलावांच्या विकासाबाबत प्रशासनाची उदासीनता आहे. अनेक तलाव बुजवून त्या जागेवर चाळी उभारल्या जात आहेत. भटाळे तलावाच्या जागेवरील आरक्षण हटविण्यासाठी नगरविकास खात्याकडे पाठपुरावा केला. सरकारने आरक्षण हटविले. मात्र चार वर्षांत महापालिका आणि टीएलआर खात्याकडून जागेचे सर्वेक्षण करण्यात आलेले नाही. रहाटाळे, आधारवाडी, उंबर्डे, डावजे या तलावाच्या विकासासाठी प्रशासनाने एकात्मिक विकास आराखडा तयार केला पाहिजे. उंबर्डे तलावाचा विकासासाठी स्थायी समितीने पुढाकार घेतला होता. मात्र, पुढे काही झाले नाही. नैसर्गिक जलस्त्रोतांचे संवर्धन करणे गरजे आहे.

- सचिन बासरे, माजी नगरसेवक, शिवसेना

----------