शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
2
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
3
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
4
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
5
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी
6
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
7
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
8
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
9
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
10
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
11
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
12
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
13
रा. स्व. संघाने शिकवली फक्त शिस्त आणि सेवा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली संघ शाखेतील प्रार्थनेची शक्ती
14
संघ शताब्दी आणि राज्यघटना; शताब्दीच्या उंबरठ्यावर रा.स्व.संघ आणि 'अमृतमहोत्सवी' संविधान!
15
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू
16
ट्रम्प यांच्या योजनेला हमास मान्यता देईना; इस्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्यात १६ जण ठार
17
शताब्दी वर्षात संघाचे ध्येय: 'राष्ट्रसेवेत' समाजाचा सहभाग! स्वयंसेवकांचे कुटुंब कसे बनले संघाच्या कार्याचे केंद्र?
18
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
19
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
20
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम

आंदोलनामुळे हटविले अतिक्रमण; नागरिकांनी सोडला सुटकेचा निःश्वास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2021 01:16 IST

नेहमी व्हायची वाहतूककोंडी

वाडा : वाडा शहरातील खंडेश्वरी नाका ते परळी नाका या मुख्य रस्त्यावर फेरीवाल्यांनी अतिक्रमण केले असून अतिक्रमणामुळे नेहमीच वाहतूक कोंडी होत असल्याने नागरिकांना त्याचा त्रास होत होता. प्रशासन त्याकडे डोळेझाक करीत असल्याने येथील सामाजिक कार्यकर्ते स्वप्निल मोरे व फयेज शेख यांनी गेल्या सोमवारी अतिक्रमण हटविण्याच्या मागणीसाठी तहसीलदार कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले होते. 

या उपोषणाची त्याच दिवशी दखल घेऊन येत्या काही दिवसात अतिक्रमण हटविण्यात येईल, असे लेखी आश्वासन दिल्याने उपोषण स्थगित करण्यात आले होते. दरम्यान, पोलीस प्रशासनाने बुधवारी हे अतिक्रमण हटविल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. शहरातील मुख्य रस्त्याचे अलीकडेच रुंदीकरण करण्यात आले आहे. रस्त्याच्या बाजूला गटारीचे बांधकाम करण्यात आले आहे. या गटारावर हातगाडीवाले, फेरीवाले, फळ, भाजी, मासळी विक्रेते आदी व्यावसायिकांनी बसून अतिक्रमण केले आहे. त्यामुळे पादचाऱ्यांना चालताना रस्त्यावरून चालावे लागते. परिणामी किरकोळ अपघात घडतात. तसेच खरेदीसाठी आलेले ग्राहक आपल्या गाड्या रस्त्यावरच पार्क करत वस्तू खरेदी करतात. त्यामुळे येथे नेहमीच वाहतूक कोंडी होत असते. हे अतिक्रमण हटविण्याच्या मागणीसाठी नगरपंचायत, सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलीस व तहसीलदार प्रशासन यांच्याकडे वारंवार तक्रारी करूनही ते डोळेझाक करीत होते. येथील सामाजिक कार्यकर्ते स्वप्निल मोरे व फयेज शेख यांनी सोमवारी तहसीलदार कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले. या उपोषणाची तत्काळ दखल घेत आज पोलीस प्रशासनाने सकाळपासूनच अतिक्रमण हटविण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.