शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

आंदोलनामुळे हटविले अतिक्रमण; नागरिकांनी सोडला सुटकेचा निःश्वास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2021 01:16 IST

नेहमी व्हायची वाहतूककोंडी

वाडा : वाडा शहरातील खंडेश्वरी नाका ते परळी नाका या मुख्य रस्त्यावर फेरीवाल्यांनी अतिक्रमण केले असून अतिक्रमणामुळे नेहमीच वाहतूक कोंडी होत असल्याने नागरिकांना त्याचा त्रास होत होता. प्रशासन त्याकडे डोळेझाक करीत असल्याने येथील सामाजिक कार्यकर्ते स्वप्निल मोरे व फयेज शेख यांनी गेल्या सोमवारी अतिक्रमण हटविण्याच्या मागणीसाठी तहसीलदार कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले होते. 

या उपोषणाची त्याच दिवशी दखल घेऊन येत्या काही दिवसात अतिक्रमण हटविण्यात येईल, असे लेखी आश्वासन दिल्याने उपोषण स्थगित करण्यात आले होते. दरम्यान, पोलीस प्रशासनाने बुधवारी हे अतिक्रमण हटविल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. शहरातील मुख्य रस्त्याचे अलीकडेच रुंदीकरण करण्यात आले आहे. रस्त्याच्या बाजूला गटारीचे बांधकाम करण्यात आले आहे. या गटारावर हातगाडीवाले, फेरीवाले, फळ, भाजी, मासळी विक्रेते आदी व्यावसायिकांनी बसून अतिक्रमण केले आहे. त्यामुळे पादचाऱ्यांना चालताना रस्त्यावरून चालावे लागते. परिणामी किरकोळ अपघात घडतात. तसेच खरेदीसाठी आलेले ग्राहक आपल्या गाड्या रस्त्यावरच पार्क करत वस्तू खरेदी करतात. त्यामुळे येथे नेहमीच वाहतूक कोंडी होत असते. हे अतिक्रमण हटविण्याच्या मागणीसाठी नगरपंचायत, सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलीस व तहसीलदार प्रशासन यांच्याकडे वारंवार तक्रारी करूनही ते डोळेझाक करीत होते. येथील सामाजिक कार्यकर्ते स्वप्निल मोरे व फयेज शेख यांनी सोमवारी तहसीलदार कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले. या उपोषणाची तत्काळ दखल घेत आज पोलीस प्रशासनाने सकाळपासूनच अतिक्रमण हटविण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.