शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
3
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
4
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   
5
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
6
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
7
पुण्यात आल्यावर मुंबईच्या तरुणीला पटवलं, शरीरसंबंधही ठेवले; नंतर तिच्याच मैत्रिणीसोबत...
8
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
9
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
10
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसंदर्भात ICC ची मोठी घोषणा; सलामीच्या लढतीसह फायनलची तारीख ठरली!
11
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
12
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
13
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
14
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
15
Nagpur: मित्राचा वाढदिवस ठरला आयुष्यातील शेवटचा दिवस, स्विमिंग पूलमध्ये बुडून तरुणाचा मृत्यू
16
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
17
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
18
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
19
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
20
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?

आंदोलनामुळे हटविले अतिक्रमण; नागरिकांनी सोडला सुटकेचा निःश्वास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2021 01:16 IST

नेहमी व्हायची वाहतूककोंडी

वाडा : वाडा शहरातील खंडेश्वरी नाका ते परळी नाका या मुख्य रस्त्यावर फेरीवाल्यांनी अतिक्रमण केले असून अतिक्रमणामुळे नेहमीच वाहतूक कोंडी होत असल्याने नागरिकांना त्याचा त्रास होत होता. प्रशासन त्याकडे डोळेझाक करीत असल्याने येथील सामाजिक कार्यकर्ते स्वप्निल मोरे व फयेज शेख यांनी गेल्या सोमवारी अतिक्रमण हटविण्याच्या मागणीसाठी तहसीलदार कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले होते. 

या उपोषणाची त्याच दिवशी दखल घेऊन येत्या काही दिवसात अतिक्रमण हटविण्यात येईल, असे लेखी आश्वासन दिल्याने उपोषण स्थगित करण्यात आले होते. दरम्यान, पोलीस प्रशासनाने बुधवारी हे अतिक्रमण हटविल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. शहरातील मुख्य रस्त्याचे अलीकडेच रुंदीकरण करण्यात आले आहे. रस्त्याच्या बाजूला गटारीचे बांधकाम करण्यात आले आहे. या गटारावर हातगाडीवाले, फेरीवाले, फळ, भाजी, मासळी विक्रेते आदी व्यावसायिकांनी बसून अतिक्रमण केले आहे. त्यामुळे पादचाऱ्यांना चालताना रस्त्यावरून चालावे लागते. परिणामी किरकोळ अपघात घडतात. तसेच खरेदीसाठी आलेले ग्राहक आपल्या गाड्या रस्त्यावरच पार्क करत वस्तू खरेदी करतात. त्यामुळे येथे नेहमीच वाहतूक कोंडी होत असते. हे अतिक्रमण हटविण्याच्या मागणीसाठी नगरपंचायत, सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलीस व तहसीलदार प्रशासन यांच्याकडे वारंवार तक्रारी करूनही ते डोळेझाक करीत होते. येथील सामाजिक कार्यकर्ते स्वप्निल मोरे व फयेज शेख यांनी सोमवारी तहसीलदार कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले. या उपोषणाची तत्काळ दखल घेत आज पोलीस प्रशासनाने सकाळपासूनच अतिक्रमण हटविण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.