शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

‘त्या’ इमारती रिकाम्या करा

By admin | Updated: May 22, 2016 01:29 IST

ठाणे शहरातील अतिधोकादायक आणि धोकादायक या संवर्गांतील इमारती खाली न झाल्यास त्यासाठी सहायक आयुक्तांना व्यक्तिश: जबाबदार धरण्यात येईल

ठाणे : ठाणे शहरातील अतिधोकादायक आणि धोकादायक या संवर्गांतील इमारती खाली न झाल्यास त्यासाठी सहायक आयुक्तांना व्यक्तिश: जबाबदार धरण्यात येईल, असा इशारा ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिला आहे. तसेच येणाऱ्या मान्सूनच्या काळात आपत्तीचा सामना करण्यासाठी पालिका प्रशासन सज्ज करतानाच जे अधिकारी या काळात आपले मोबाइल बंद ठेवतील, त्यांच्यावर कारवाईचे स्पष्ट संकेत त्यांनी दिले आहेत. येत्या ७ जूनपर्यंत १०० टक्के नालेसफाई झालीच पाहिजे, असे आदेशही त्यांनी संबंधित विभागास दिले आहेत. शनिवारी ठाणे महानगरपालिकेच्या प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या वतीने मान्सूनपूर्व समन्वय बैठकीत ते बोलत होते. या वेळी त्यांनी सर्व जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांनी समन्वयाने काम करण्याच्या सूचनाही केल्या. शहरातील नालेसफाईचे काम कोणत्याही परिस्थितीत ७ जूनपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना देतानाच सर्व सहायक आयुक्त, कार्यकारी अभियंत्यांनी नालेसफाईच्या कामाची नियमित पाहणी करावी तसेच नालेसफाई करतानाच रस्त्याच्या बाजूच्या गटारांचीही सफाई व्यवस्थितपणे होत असल्याबाबत खात्री करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.दरम्यान, धोकादायक, अतिधोकादायक इमारतींच्या कारवाईबाबत धोरण स्पष्ट करताना आयुक्तांनी सर्व सहायक आयुक्तांनी आपापल्या प्रभाग समितीस्तरांवरील सर्व इमारती खाली करण्याची कारवाई करावी. ३१ मे अखेरपर्यंत अशा इमारती खाली झाल्या नाहीत, तर त्याबाबतीत सर्व सहायक आयुक्तांना व्यक्तिश: जबाबदार धरून इमारत खाली न केल्यामुळे जर कोणतीही दुर्घटना घडून जीवितहानी झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला. पावसाळ्यात कोणतीही आपत्कालीन घटना घडल्यास त्याचा सामना करण्यासाठी एक व्यक्ती संपर्क यादी तयार करण्याच्या सूचना देऊन यामध्ये होणारी पुनरावृत्ती टाळून मदतकार्य प्रभावीपणे करण्याबाबत अधिकाऱ्यांनी दक्ष राहावे, असे सांगून पावसाळ्यात आवश्यक ती सर्व साधनसामग्री अद्ययावत ठेवण्याचे आदेश त्यांनी दिले.