शहरं
Join us  
Trending Stories
1
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
2
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
3
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
4
बॉक्सर नीरजनं विचालं, कसे आहात? पंतप्रथान मोदींनी उत्तर दिलं, तुझ्यासारखाच...!; VIDEO व्हायरल
5
KTM Duke: केटीएम ड्यूक १६० आता आणखी पॉवरफुल! ग्राहकांना मिळणार नवीन अपडेट्स
6
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
7
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
8
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
9
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
10
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
11
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
12
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
13
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
14
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
15
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
16
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
17
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
18
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
19
‘मी स्नेहाची हत्या केलेली नाही…’, पँटवर लिहून प्रियकरानं संपवलं जीवन, पोलिसांवर गंभीर आरोप
20
क्रिश का गाना सुनेगा..? अचानक २० वर्षांनी रंगली तुफान चर्चा, 'ले बेटा' वाला Video Viral
Daily Top 2Weekly Top 5

संमेलन कार्यालय रिकामे करा

By admin | Updated: April 27, 2017 23:56 IST

अखिल भारतीय साहित्य संमेलन भरवण्यासाठी पुढाकार घेतलेल्या ‘आगरी युथ फोरम’ या संस्थेला कल्याण-डोंबिवली महापालिकेने

जान्हवी मोर्ये / डोंबिवलीअखिल भारतीय साहित्य संमेलन भरवण्यासाठी पुढाकार घेतलेल्या ‘आगरी युथ फोरम’ या संस्थेला कल्याण-डोंबिवली महापालिकेने सहा महिन्यांसाठी चार रस्त्यानजीकच्या ‘जगन्नाथ प्लाझा’ इमारतीत कार्यालयासाठी जागा दिली होती. मात्र, त्याची मुदत संपल्याने हे कार्यालय आता रिकामे करावे, अन्यथा तेथील साहित्य फोरमच्या कामाचे नाही, असे समजून त्याचा ताबा घेतला जाईल, अशी नोटीस महापालिकेच्या मालमत्ता विभागाच्या व्यवस्थापकांनी बजावली आहे.साहित्य संमेलन ३ ते ५ फेब्रुवारीदरम्यान डोंबिवलीत झाले. त्यासाठी महापालिकेने एक रुपया भाडेतत्त्वावर जगन्नाथ प्लाझा इमारतीतील जागा फोरमला संमेलनाच्या कार्यालयासाठी दिली होती. ही जागा महापालिकेच्या आरक्षणातून वाचनालयासाठी देण्यात येणार आहे. त्या जागेत अद्याप वाचनालय सुरू झाले नसल्याने त्याचा उपयोग साहित्यिक उपक्रमासाठी करण्याचे महापालिकेने ठरवले. त्यामुळेच ही जागा संमेलनाच्या कार्यालयासाठी आॅक्टोबर २०१६ ते मार्च २०१७ या सहा महिन्यांसाठी देण्यात आली. मात्र, आता त्याची मुदत संपल्याने ते रिकामे करण्याची नोटीस मालमत्ता विभागाच्या व्यवस्थापकांनी बजावली आहे. त्यानुसार, तीन दिवसांत कार्यालय रिकामे न केल्यास त्यातील साहित्यासह जागेचा ताबा घेतला जाईल, असा इशारा त्यांनी नोटीसमध्ये दिला आहे.यासंदर्भात महापौर राजेंद्र देवळेकर यांना विचारले असता, हा प्रश्न महासभेत उपस्थित करण्याइतका मोठा नाही. ही प्रशासकीय बाब आहे. प्रशासकीय स्तरावर त्याचा निर्णय घेतला जाईल. संमेलन कार्यालयासाठी एक रुपया भाडेतत्त्वावर ही जागा वापरासाठी सहा महिन्यांकरिता दिली होती. साहित्य संमेलन तसेच कार्यालयाची मुदत संपल्याने ही नोटीस बजावली आहे.याविषयी आगरी युथ फोरमचे पदाधिकारी म्हणाले की, महापालिकेने नोटीस बजावली असली तरी संमेलनाचे कामकाज अजूनही संपलेले नाही. त्यामुळे कार्यालय सुरू ठेवण्यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी फोरमने महापालिका प्रशासनाकडे केली आहे. त्यासाठी भाडे द्यावे लागले, तरी ११ महिन्यांचा भाडेकरार करून कामकाज सुरू ठेवता येईल. तसा पत्रव्यवहार मालमत्ता व्यवस्थापकांशी केला जाईल. पुढील साहित्य संमेलनापर्यंत याच साहित्य संमेलनाच्या कार्यालयातून कारभार सुरू राहील, असेही ते म्हणाले.