शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

संरक्षक भिंतीलगतची घरे तातडीने रिकामी करा; भिंत कोसळण्याच्या पार्श्वभूमीवर केडीएमसी आयुक्तांचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2019 01:15 IST

आयुक्तांनी बुधवारी सकाळी पुन्हा घटनास्थळाची पाहणी केली.

कल्याण : पश्चिमेतील नॅशनल उर्दू शाळेची भिंत कोसळून तिघांचा मंगळवारी मृत्यू झाला होता. या घटनेनंतर कल्याण-डोंबिवली पालिका आयुक्त गोविंद बोडके यांनी बुधवारी अधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेऊन संरक्षक भिंतीलगतच्या घरांमध्ये राहणाºया रहिवाशांना घरे रिकामी करण्याचे आदेश दिले आहेत.आयुक्तांनी बुधवारी सकाळी पुन्हा घटनास्थळाची पाहणी केली. त्यानंतर, त्यांनी प्रभाग अधिकारी, शहर अभियंता, उपायुक्त आणि बेकायदा बांधकाम नियंत्रण विभागाची बैठक घेतली. यावेळी त्यांनी संरक्षक भिंतीलगतची बेकायदा घरे तातडीने रिकामी करण्याचे आदेश दिले. त्याचबरोबर पूर, अपघातप्रवण ठिकाणे आणि टेकडी परिसरात राहणाऱ्यांना घरातून बाहेर काढावे, अशीही सूचना केली. धोकादायक व अतिधोकादायक इमारतींमधील घरे रिकामी करून रहिवाशांना अन्य ठिकाणी स्थलांतरित करण्याचे सूचित केले आहे. बांधकामांच्या ठिकाणी संरक्षक भिंती सुस्थितीत आहेत का, याचे सर्वेक्षण करून अहवाल द्यावा. तेथे कोणी राहत असल्यास त्यांना तेथून हटवावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.- कल्याण पूर्वेला कचोरे आणि नेतिवली टेकडीवर झोपड्या आहेत. या टेकडीचा भाग पावसात खचू शकतो. मात्र, तेथील रहिवाशांच्या सुरक्षिततेसाठी महापालिकेकडे काहीच उपाययोजना नाहीत. तसेच संक्रमण शिबिरांचीही व्यवस्था नाही. त्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणात घरातून रहिवाशांना बाहेर काढल्यास त्यांच्या राहण्याची पर्यायी व्यवस्था भरपावसात कुठे व कशी करणार, याचे उत्तर महापालिका प्रशासनाकडे नाही. संक्रमण शिबिरे नसताना रहिवाशांना बाहेर काढणे कितपत योग्य आहे, असा सवाल केला जात आहे. लोकांचा जीव वाचवणे हे महापालिका महत्त्वाचे समजते. मग, त्यांना रस्त्यावर भरपावसात राहावे लागले तरी चालेल, असाच त्याचा अर्थ आहे का, असा प्रश्नही उपस्थित होत आहे.तसेच, या घटनेत जखमी झालेल्या आरती कर्डिले (१६) हिच्यावर कळवा येथील रुग्णालयात उपचार सुरू असून तिच्या प्रकृतीत हळूहळू सुधारणा होत असल्याचे सूत्रांनी सांगितले.दरम्यान, या प्रकरणाचा तपास सुरू आहे. केडीएमसीकडून अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल, अशी माहिती बाजारपेठ पोलिसांनी दिली.

तिघांचे मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यातनॅशनल उर्दू शाळेची संरक्षक भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेत मृत पावलेल्या तिघांचे मृतदेह बुधवारी त्यांच्या नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले. या दुर्घटनेत शोभा कांबळे (६५), करिमा हुसेन महंमद आणि तिचा मुलगा हुसेन (३) यांचा मृत्यू झाला होता. शोभा यांचा मृतदेह त्यांच्या मुलाच्या ताब्यात दिला असून, त्यांच्यावर जालना येथील मूळगावी अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. तर, करिमाचा पती आणि बहिणीच्या ताब्यात करिमा व हुसेन या दोघांचे मृतदेह सोपवण्यात आले. या दोघांवरही मुंबईतील दफनभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिका