शहरं
Join us  
Trending Stories
1
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात 'तारा'चा भीमपराक्रम! मगरींच्या विळख्यात दीड किमी पोहून वारणा धरण केले पार
2
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
3
KTM Duke: केटीएम ड्यूक १६० आता आणखी पॉवरफुल! ग्राहकांना मिळणार नवीन अपडेट्स
4
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
5
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
6
ग्लॅमर अन् परंपरेचा 'गुलाबी संगम'... BIGG BOSS गाजवणाऱ्या मालती चहरचा 'सुपरहॉट' लूक (PHOTOS)
7
बॉक्सर नीरजनं विचारलं, कसे आहात? पंतप्रथान मोदींनी उत्तर दिलं, तुझ्यासारखाच...!; VIDEO व्हायरल
8
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
9
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
10
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
11
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
12
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
13
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
14
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
15
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
16
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
17
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
18
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
19
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
20
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
Daily Top 2Weekly Top 5

संरक्षक भिंतीलगतची घरे तातडीने रिकामी करा; भिंत कोसळण्याच्या पार्श्वभूमीवर केडीएमसी आयुक्तांचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2019 01:15 IST

आयुक्तांनी बुधवारी सकाळी पुन्हा घटनास्थळाची पाहणी केली.

कल्याण : पश्चिमेतील नॅशनल उर्दू शाळेची भिंत कोसळून तिघांचा मंगळवारी मृत्यू झाला होता. या घटनेनंतर कल्याण-डोंबिवली पालिका आयुक्त गोविंद बोडके यांनी बुधवारी अधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेऊन संरक्षक भिंतीलगतच्या घरांमध्ये राहणाºया रहिवाशांना घरे रिकामी करण्याचे आदेश दिले आहेत.आयुक्तांनी बुधवारी सकाळी पुन्हा घटनास्थळाची पाहणी केली. त्यानंतर, त्यांनी प्रभाग अधिकारी, शहर अभियंता, उपायुक्त आणि बेकायदा बांधकाम नियंत्रण विभागाची बैठक घेतली. यावेळी त्यांनी संरक्षक भिंतीलगतची बेकायदा घरे तातडीने रिकामी करण्याचे आदेश दिले. त्याचबरोबर पूर, अपघातप्रवण ठिकाणे आणि टेकडी परिसरात राहणाऱ्यांना घरातून बाहेर काढावे, अशीही सूचना केली. धोकादायक व अतिधोकादायक इमारतींमधील घरे रिकामी करून रहिवाशांना अन्य ठिकाणी स्थलांतरित करण्याचे सूचित केले आहे. बांधकामांच्या ठिकाणी संरक्षक भिंती सुस्थितीत आहेत का, याचे सर्वेक्षण करून अहवाल द्यावा. तेथे कोणी राहत असल्यास त्यांना तेथून हटवावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.- कल्याण पूर्वेला कचोरे आणि नेतिवली टेकडीवर झोपड्या आहेत. या टेकडीचा भाग पावसात खचू शकतो. मात्र, तेथील रहिवाशांच्या सुरक्षिततेसाठी महापालिकेकडे काहीच उपाययोजना नाहीत. तसेच संक्रमण शिबिरांचीही व्यवस्था नाही. त्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणात घरातून रहिवाशांना बाहेर काढल्यास त्यांच्या राहण्याची पर्यायी व्यवस्था भरपावसात कुठे व कशी करणार, याचे उत्तर महापालिका प्रशासनाकडे नाही. संक्रमण शिबिरे नसताना रहिवाशांना बाहेर काढणे कितपत योग्य आहे, असा सवाल केला जात आहे. लोकांचा जीव वाचवणे हे महापालिका महत्त्वाचे समजते. मग, त्यांना रस्त्यावर भरपावसात राहावे लागले तरी चालेल, असाच त्याचा अर्थ आहे का, असा प्रश्नही उपस्थित होत आहे.तसेच, या घटनेत जखमी झालेल्या आरती कर्डिले (१६) हिच्यावर कळवा येथील रुग्णालयात उपचार सुरू असून तिच्या प्रकृतीत हळूहळू सुधारणा होत असल्याचे सूत्रांनी सांगितले.दरम्यान, या प्रकरणाचा तपास सुरू आहे. केडीएमसीकडून अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल, अशी माहिती बाजारपेठ पोलिसांनी दिली.

तिघांचे मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यातनॅशनल उर्दू शाळेची संरक्षक भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेत मृत पावलेल्या तिघांचे मृतदेह बुधवारी त्यांच्या नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले. या दुर्घटनेत शोभा कांबळे (६५), करिमा हुसेन महंमद आणि तिचा मुलगा हुसेन (३) यांचा मृत्यू झाला होता. शोभा यांचा मृतदेह त्यांच्या मुलाच्या ताब्यात दिला असून, त्यांच्यावर जालना येथील मूळगावी अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. तर, करिमाचा पती आणि बहिणीच्या ताब्यात करिमा व हुसेन या दोघांचे मृतदेह सोपवण्यात आले. या दोघांवरही मुंबईतील दफनभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिका