शहरं
Join us  
Trending Stories
1
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; 9 प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानाला नेमकं काय घडलं?
2
“युद्धाची गरजच भासणार नाही, एक दिवस POKतील जनता म्हणेल की आम्ही भारतवासी आहोत”: राजनाथ सिंह
3
टाटा-महिंद्राच्या कंपनीचे शेअर आपटले! पण अदानींचा 'हा' स्टॉक ठरला टॉप गेनर; IT क्षेत्राला सर्वाधिक फटका
4
“आता रिकामे ठेवू नका, काहीतरी जबाबदारी द्या, चुकलो असेन तर...”; धनंजय मुंडेंची भरसभेत विनंती
5
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
6
VIDEO: आईची माया! सिंहीणने रेडकूवर घातली झडप, म्हशीने शिंगाने लावलं उडवून अन् पुढे...
7
बगरम हवाई तळावर अमेरिकेचा 'डोळा'; ट्रम्प यांना आता का हवंय अफगाणिस्तानचं 'एअरफील्ड'?
8
ज्या सुटकेसवर बसून रील बनवलं, त्यातच तिला भरून नदीत फेकलं; लव्हस्टोरीचा भयंकर शेवट
9
कहो ना कहो...! इमरान हाश्मीसमोर गाताना राघव जुयालच्या डोळ्यात आलेलं पाणी, म्हणाला...
10
आजपासून स्वस्त झालं Rail Neer; जीएसटी रिव्हिजननंतर रेल्वेनं कमी केली MRP
11
नेपाळ, फ्रान्सनंतर आता फिलिपिन्समध्येही भडका! लोक रस्त्यावर; धुमश्चक्रीत ९५ पोलीस जखमी, २१६ जणांना अटक
12
स्टार क्रिकेटपटूने निवृत्ती घेतली मागे, आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये करणार पुनरागमन  
13
५ कपन्यांमधील हिस्सा विकण्याच्या विचारात मोदी सरकार! लिस्ट मध्ये आहेत या सरकारी कंपन्यांची नावं
14
"५० हजार देतो, शरीरसंबंध ठेव", मुलाच्या वयाच्या निर्मात्याने अभिनेत्रीकडे केलेली धक्कादायक मागणी
15
इस्रायल-अमेरिकेचं टेन्शन वाढलं; इराणने १० हजार किमीपर्यंत मारा करणाऱ्या ICB मिसाईलची केली चाचणी
16
अशी धुलाई कधीच पाहिली नव्हती...; अभिषेक शर्माच्या फटकेबाजीनंतर पाकिस्तानी पत्रकाराची कबुली
17
परदेशी उपग्रहाच्या हालचालींवर भारताची करडी नजर; ५० बॉडीगार्ड उपग्रहांची तयारी
18
'मला बायको हवीय, माझं लग्न लावून द्या,कारण…’, तरुणाने थेट पंचायत समितीला दिलं पत्र, त्यानंतर...
19
Navratri 2025: नवरात्रीत अनवाणी चालण्याची प्रथा कशी सुरू झाली? खरंच लाभ होतो का?
20
भारतीय सैन्याने पाडलेले...श्रीनगरमधील डल सरोवरात सापडले पाकिस्तानचे 'फुसकी' क्षेपणास्त्र

संरक्षक भिंतीलगतची घरे तातडीने रिकामी करा; भिंत कोसळण्याच्या पार्श्वभूमीवर केडीएमसी आयुक्तांचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2019 01:15 IST

आयुक्तांनी बुधवारी सकाळी पुन्हा घटनास्थळाची पाहणी केली.

कल्याण : पश्चिमेतील नॅशनल उर्दू शाळेची भिंत कोसळून तिघांचा मंगळवारी मृत्यू झाला होता. या घटनेनंतर कल्याण-डोंबिवली पालिका आयुक्त गोविंद बोडके यांनी बुधवारी अधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेऊन संरक्षक भिंतीलगतच्या घरांमध्ये राहणाºया रहिवाशांना घरे रिकामी करण्याचे आदेश दिले आहेत.आयुक्तांनी बुधवारी सकाळी पुन्हा घटनास्थळाची पाहणी केली. त्यानंतर, त्यांनी प्रभाग अधिकारी, शहर अभियंता, उपायुक्त आणि बेकायदा बांधकाम नियंत्रण विभागाची बैठक घेतली. यावेळी त्यांनी संरक्षक भिंतीलगतची बेकायदा घरे तातडीने रिकामी करण्याचे आदेश दिले. त्याचबरोबर पूर, अपघातप्रवण ठिकाणे आणि टेकडी परिसरात राहणाऱ्यांना घरातून बाहेर काढावे, अशीही सूचना केली. धोकादायक व अतिधोकादायक इमारतींमधील घरे रिकामी करून रहिवाशांना अन्य ठिकाणी स्थलांतरित करण्याचे सूचित केले आहे. बांधकामांच्या ठिकाणी संरक्षक भिंती सुस्थितीत आहेत का, याचे सर्वेक्षण करून अहवाल द्यावा. तेथे कोणी राहत असल्यास त्यांना तेथून हटवावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.- कल्याण पूर्वेला कचोरे आणि नेतिवली टेकडीवर झोपड्या आहेत. या टेकडीचा भाग पावसात खचू शकतो. मात्र, तेथील रहिवाशांच्या सुरक्षिततेसाठी महापालिकेकडे काहीच उपाययोजना नाहीत. तसेच संक्रमण शिबिरांचीही व्यवस्था नाही. त्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणात घरातून रहिवाशांना बाहेर काढल्यास त्यांच्या राहण्याची पर्यायी व्यवस्था भरपावसात कुठे व कशी करणार, याचे उत्तर महापालिका प्रशासनाकडे नाही. संक्रमण शिबिरे नसताना रहिवाशांना बाहेर काढणे कितपत योग्य आहे, असा सवाल केला जात आहे. लोकांचा जीव वाचवणे हे महापालिका महत्त्वाचे समजते. मग, त्यांना रस्त्यावर भरपावसात राहावे लागले तरी चालेल, असाच त्याचा अर्थ आहे का, असा प्रश्नही उपस्थित होत आहे.तसेच, या घटनेत जखमी झालेल्या आरती कर्डिले (१६) हिच्यावर कळवा येथील रुग्णालयात उपचार सुरू असून तिच्या प्रकृतीत हळूहळू सुधारणा होत असल्याचे सूत्रांनी सांगितले.दरम्यान, या प्रकरणाचा तपास सुरू आहे. केडीएमसीकडून अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल, अशी माहिती बाजारपेठ पोलिसांनी दिली.

तिघांचे मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यातनॅशनल उर्दू शाळेची संरक्षक भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेत मृत पावलेल्या तिघांचे मृतदेह बुधवारी त्यांच्या नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले. या दुर्घटनेत शोभा कांबळे (६५), करिमा हुसेन महंमद आणि तिचा मुलगा हुसेन (३) यांचा मृत्यू झाला होता. शोभा यांचा मृतदेह त्यांच्या मुलाच्या ताब्यात दिला असून, त्यांच्यावर जालना येथील मूळगावी अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. तर, करिमाचा पती आणि बहिणीच्या ताब्यात करिमा व हुसेन या दोघांचे मृतदेह सोपवण्यात आले. या दोघांवरही मुंबईतील दफनभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिका