शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदू समाज संघटित आणि बलशाली होणे, या देशाच्या सुरक्षिततेची अन् विकासाची गॅरंटी; कारण...!" - मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
काय आहे 'सर क्रिक' वाद? ज्यावरून भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची पाकिस्तानला थेट धमकी
3
पहलगाम घटनेने आपल्याला शिकवले की कोण शत्रू आणि कोण मित्र: मोहन भागवत
4
भारत गाझामध्ये सैन्य पाठवणार? संयुक्त राष्ट्रांच्या शांती सैनिकांची परिषद बोलावली, चीन आणि पाकिस्तानला बोलावले नाही
5
IND vs WI: वेस्ट इंडीजविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात शुभमन गिलच्या नावावर नकोशा विक्रमाची नोंद!
6
अश्विन पाशांकुशा एकादशी २०२५: श्रीविष्णूंचे पद्मनाभ स्वरुप पूजन, ‘असे’ करा व्रत; शुभ-लाभ!
7
Archana Puran Singh : एकेकाळी जेवणासाठी अभिनेत्रीकडे होते फक्त ११ रुपये; संघर्षाचे दिवस आठवून झाली भावुक
8
IND vs WI : DSP सिराजची 'दबंगगिरी'! कमबॅकमध्ये दिग्गज स्टारच्या पोराच्या पदरी 'भोपळा'
9
पत्नीच्या नावे 'या' योजनेत १ लाख रुपये जमा करा, २ वर्षांनंतर तुम्हाला किती रिटर्न मिळेल? पटापट पाहा डिटेल्स
10
दे दणादण! रस्त्याच्या कडेला स्टॉल लावण्यावरुन भाजपाचे २ नगरसेवक भिडले, झाली हाणामारी
11
बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपाला झटका; ४ वेळा आमदार राहिलेल्या नेत्याचा पक्षाला रामराम
12
एलन मस्क बनले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती! संपत्ती ५०० बिलियन डॉलरवर, इतकी कमाई आली कोठून?
13
हिंसा हे प्रश्नांचं उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य; सरसंघचालकांनी टोचले राजकीय पक्षांचे कान
14
Success Story: १९२९ मध्ये बनवलेलं हे क्रीम, आजही घराघरात होतो वापर; कोलकाताच्या या व्यक्तीनं उभी केली १६० कोटींची कंपनी
15
वडील करणार होते पाचव्यांदा लग्न; संपत्तीसाठी लेकाने काढला काटा, पोलिसांची केली दिशाभूल अन्...
16
'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू
17
ट्रम्प टॅरिफमुळे भारताच्या प्रगतीला ब्रेक लागेल? रिझर्व्ह बँकेचा इशारा, 'फक्त जीएसटी कपात पुरेशी नाही...'
18
Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
19
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये संपेल पेन्शनचं टेन्शन, दर महिन्याला मिळतील ₹२००००
20
महात्मा गांधींच्या पणतीला पाहिलंत का? दिसायला आहे खूप ग्लॅमरस, गाजवतेय हॉलिवूड

लोकलसेवा कोलमडल्याने नोकरदारांची दांडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:27 IST

लोकमत न्यूज नेटवर्क डोंबिवली : मुंबई आणि ठाणे जिल्ह्यांत बुधवारी झालेल्या पहिल्याच मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेची लोकलसेवा कोलमडली. त्याचा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

डोंबिवली : मुंबई आणि ठाणे जिल्ह्यांत बुधवारी झालेल्या पहिल्याच मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेची लोकलसेवा कोलमडली. त्याचा फटका ठाणे जिल्ह्यातील अत्यावश्यक सेवेतील नोकरदारांना बसला. पहाटेपासून पडणाऱ्या पावसामुळे लोकल कासव गतीने सुरू सुरू होत्या. मात्र, सकाळी ८ नंतर पावसाचा जोर वाढल्याने सायन येथे पाणी साचले. त्यामुळे सकाळी ९ नंतर ठाण्यापर्यंत लोकल सुरू ठेवण्याचा निर्णय रेल्वेने घेतला. मात्र, त्यामुळे प्रवाशांची गैरसोय झाली, तर अनेकांची कामावर दांडी झाली.

लोकलअभावी काहीजण डोंबिवली, कल्याण, दिवा, ठाणे स्थानकात अडकून पडले. लोकल पुढे न गेल्याने कल्याण ते ठाण्यादरम्यान लोकलचा वेग मंदावला होता. त्यामुळे ठाणे गाठायलाही खूप वेळ लागला. त्यात महिला प्रवाशांचे खूप हाल झाले. मर्यादित जागा असल्याने हालचाल करणे कठीण गेल्याने गैरसोय अधिक वाढली. ठाण्यापुढे लोकल न सोडता कर्जत-कसारा दिशेने आलेल्या लोकल ठाण्यातून पुन्हा माघारी चालविण्यात आल्या. यामुळे ठाणे स्थानकात प्रवाशांची तोबा गर्दी झाली होती, तर सकाळच्या सत्रात मुंबईकडे फार कमी प्रमाणात लोकल सोडण्यात आल्या. तोपर्यंत विविध ठिकाणांहून आलेले प्रवासी परत माघारी नेण्यासाठी रेल्वेने ठाणे-कल्याण मार्गावर अल्पावधीत शटलसेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला. मात्र, अनेकांना प्रवासातच दोन्ही दिशांना पाच तास लागल्याने मनस्ताप झाला होता.

रेल्वे स्थानकात बसण्यासाठी आसनव्यवस्था पुरेशी नसल्याने उभे राहण्याशिवाय प्रवाशांपुढे पर्याय नव्हता. पादचारी पुलांवर एखादी लोकल आल्यानंतर गर्दी ओसंडून वाहत होती. दुपारी ३ नंतर ठाणे, डोंबिवली-कल्याण भागात पावसाचा जोर ओसरला. त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला. कळवा, दिवा भागात रेल्वे ट्रॅक परिसरात पाणी साचले नसल्याचे सांगण्यात आले.

----------------