शहरं
Join us  
Trending Stories
1
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
2
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
3
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
4
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
5
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
6
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
7
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
8
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
9
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
10
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
11
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
12
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
13
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
14
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
15
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
16
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
17
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
18
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
19
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
20
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली

लोकलसेवा कोलमडल्याने नोकरदारांची दांडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:27 IST

लोकमत न्यूज नेटवर्क डोंबिवली : मुंबई आणि ठाणे जिल्ह्यांत बुधवारी झालेल्या पहिल्याच मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेची लोकलसेवा कोलमडली. त्याचा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

डोंबिवली : मुंबई आणि ठाणे जिल्ह्यांत बुधवारी झालेल्या पहिल्याच मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेची लोकलसेवा कोलमडली. त्याचा फटका ठाणे जिल्ह्यातील अत्यावश्यक सेवेतील नोकरदारांना बसला. पहाटेपासून पडणाऱ्या पावसामुळे लोकल कासव गतीने सुरू सुरू होत्या. मात्र, सकाळी ८ नंतर पावसाचा जोर वाढल्याने सायन येथे पाणी साचले. त्यामुळे सकाळी ९ नंतर ठाण्यापर्यंत लोकल सुरू ठेवण्याचा निर्णय रेल्वेने घेतला. मात्र, त्यामुळे प्रवाशांची गैरसोय झाली, तर अनेकांची कामावर दांडी झाली.

लोकलअभावी काहीजण डोंबिवली, कल्याण, दिवा, ठाणे स्थानकात अडकून पडले. लोकल पुढे न गेल्याने कल्याण ते ठाण्यादरम्यान लोकलचा वेग मंदावला होता. त्यामुळे ठाणे गाठायलाही खूप वेळ लागला. त्यात महिला प्रवाशांचे खूप हाल झाले. मर्यादित जागा असल्याने हालचाल करणे कठीण गेल्याने गैरसोय अधिक वाढली. ठाण्यापुढे लोकल न सोडता कर्जत-कसारा दिशेने आलेल्या लोकल ठाण्यातून पुन्हा माघारी चालविण्यात आल्या. यामुळे ठाणे स्थानकात प्रवाशांची तोबा गर्दी झाली होती, तर सकाळच्या सत्रात मुंबईकडे फार कमी प्रमाणात लोकल सोडण्यात आल्या. तोपर्यंत विविध ठिकाणांहून आलेले प्रवासी परत माघारी नेण्यासाठी रेल्वेने ठाणे-कल्याण मार्गावर अल्पावधीत शटलसेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला. मात्र, अनेकांना प्रवासातच दोन्ही दिशांना पाच तास लागल्याने मनस्ताप झाला होता.

रेल्वे स्थानकात बसण्यासाठी आसनव्यवस्था पुरेशी नसल्याने उभे राहण्याशिवाय प्रवाशांपुढे पर्याय नव्हता. पादचारी पुलांवर एखादी लोकल आल्यानंतर गर्दी ओसंडून वाहत होती. दुपारी ३ नंतर ठाणे, डोंबिवली-कल्याण भागात पावसाचा जोर ओसरला. त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला. कळवा, दिवा भागात रेल्वे ट्रॅक परिसरात पाणी साचले नसल्याचे सांगण्यात आले.

----------------