शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

लोकलसेवा कोलमडल्याने नोकरदारांची दांडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:27 IST

लोकमत न्यूज नेटवर्क डोंबिवली : मुंबई आणि ठाणे जिल्ह्यांत बुधवारी झालेल्या पहिल्याच मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेची लोकलसेवा कोलमडली. त्याचा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

डोंबिवली : मुंबई आणि ठाणे जिल्ह्यांत बुधवारी झालेल्या पहिल्याच मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेची लोकलसेवा कोलमडली. त्याचा फटका ठाणे जिल्ह्यातील अत्यावश्यक सेवेतील नोकरदारांना बसला. पहाटेपासून पडणाऱ्या पावसामुळे लोकल कासव गतीने सुरू सुरू होत्या. मात्र, सकाळी ८ नंतर पावसाचा जोर वाढल्याने सायन येथे पाणी साचले. त्यामुळे सकाळी ९ नंतर ठाण्यापर्यंत लोकल सुरू ठेवण्याचा निर्णय रेल्वेने घेतला. मात्र, त्यामुळे प्रवाशांची गैरसोय झाली, तर अनेकांची कामावर दांडी झाली.

लोकलअभावी काहीजण डोंबिवली, कल्याण, दिवा, ठाणे स्थानकात अडकून पडले. लोकल पुढे न गेल्याने कल्याण ते ठाण्यादरम्यान लोकलचा वेग मंदावला होता. त्यामुळे ठाणे गाठायलाही खूप वेळ लागला. त्यात महिला प्रवाशांचे खूप हाल झाले. मर्यादित जागा असल्याने हालचाल करणे कठीण गेल्याने गैरसोय अधिक वाढली. ठाण्यापुढे लोकल न सोडता कर्जत-कसारा दिशेने आलेल्या लोकल ठाण्यातून पुन्हा माघारी चालविण्यात आल्या. यामुळे ठाणे स्थानकात प्रवाशांची तोबा गर्दी झाली होती, तर सकाळच्या सत्रात मुंबईकडे फार कमी प्रमाणात लोकल सोडण्यात आल्या. तोपर्यंत विविध ठिकाणांहून आलेले प्रवासी परत माघारी नेण्यासाठी रेल्वेने ठाणे-कल्याण मार्गावर अल्पावधीत शटलसेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला. मात्र, अनेकांना प्रवासातच दोन्ही दिशांना पाच तास लागल्याने मनस्ताप झाला होता.

रेल्वे स्थानकात बसण्यासाठी आसनव्यवस्था पुरेशी नसल्याने उभे राहण्याशिवाय प्रवाशांपुढे पर्याय नव्हता. पादचारी पुलांवर एखादी लोकल आल्यानंतर गर्दी ओसंडून वाहत होती. दुपारी ३ नंतर ठाणे, डोंबिवली-कल्याण भागात पावसाचा जोर ओसरला. त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला. कळवा, दिवा भागात रेल्वे ट्रॅक परिसरात पाणी साचले नसल्याचे सांगण्यात आले.

----------------