शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
3
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
4
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
5
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
6
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
7
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
8
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
9
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
10
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
11
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
12
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
13
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
14
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
15
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
16
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
17
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
18
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
19
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
20
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!

‘मफतलाल’च्या कामगारांची देणी चार महिन्यांत मिळणार

By admin | Updated: May 4, 2017 05:53 IST

न्यायालयाच्या निर्णयामुळे मफतलाल कंपनीच्या कामगारांना मोठा दिलासा मिळाला आहे. कंपनीची कळव्यातील जमीन

ठाणे : न्यायालयाच्या निर्णयामुळे मफतलाल कंपनीच्या कामगारांना मोठा दिलासा मिळाला आहे. कंपनीची कळव्यातील जमीन विकण्यास न्यायालयाने मंजुरी दिली असून ही प्रक्रिया पूर्ण होऊन अंदाजे चार महिन्यांत कामगारांना त्यांची थकीत देणी मिळणार आहेत. न्यायालयाच्या या निर्णयाने कामगारांचा २८ वर्षांचा वनवास संपुष्टात येणार आहे.कळव्यातील मफतलाल कंपनी बंद पडल्यानंतर येथील ३३०० कामगार संकटात सापडले होते. कंपनी बंद झाल्यानंतर थकीत देणी रक्कम मिळावी, यासाठी कामगारांनी लढा सुरू केला. हा लढा तीव्र करण्यासाठी सहा वर्षांपूर्वी कामगारांनी संघर्ष समितीची स्थापना केली. समितीचा लढा यशस्वी होण्याच्या टप्प्यात असतानाच जिल्हा प्रशासनाने कायद्यावर बोट ठेवून कंपनीच्या १२४ पैकी ६३ एकर जमिनीचा ताबा घेतला. त्यामुळे कामगारांना त्यांच्या हक्काचा पैसा मिळण्यात अडथळा निर्माण झाला. अशा परिस्थितीत ठाण्याचे आमदार संजय केळकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे पाठपुरावा केला. त्यास यश मिळाले. मफतलाल कंपनीच्या जमीनविक्रीस परवानगी देणारे पत्र शासनाने उच्च न्यायालयात सादर केले. उच्च न्यायालयानेही जमीनविक्रीस परवानगी दिल्याने कामगारांची थकीत देणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. कंपनीच्या जमीनविक्र ीच्या प्रक्रि येस आता प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे. ही प्रक्रिया पूर्ण होण्यास जवळपास चार महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. त्यानंतर, कामगारांना सुमारे आठ ते १५ लाखांपर्यंत थकीत देणी मिळण्याचा अंदाज असल्याची माहिती आ. केळकर यांनी दिली. (प्रतिनिधी)लढा यशस्वी झाल्यानंतर आता श्रेयासाठी वाद कामगारांसाठी संघर्ष समिती गत ६ वर्षांपासून लढा देत आहे. हा लढा यशस्वी झाल्यानंतर बम्बई मजदूर युनियन या लढ्याचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप संघर्ष समितीचे पदाधिकारी किरण मोहिते आणि रवींद्र वळामे यांनी पत्रकारांशी बोलताना केला. मुंब्य्रातील नगरसेवक राजन किणे आणि आमदार संजय केळकर यांच्या सहकार्यामुळे समितीचा लढा यशस्वी झाला, असेही त्यांनी सांगितले. बम्बई मजदूर युनियनचे सचिव संजय वढावकर यांनी न्यायव्यवस्थेवर आपला पूर्ण विश्वास असल्याचे सांगितले. त्यामुळेच आम्ही कायदेशीर लढ्याकडे लक्ष केंद्रित केले होते. संघर्ष समितीने चार वर्षांत चार वेळा नेते बदलले. मजदूर युनियनने कामगारांच्या समस्येचे कधीही राजकारण केले नसल्याचे स्पष्ट करून वढावकर यांनी कामगारांच्या लढ्यास साथ दिल्याबद्दल आ. केळकरांचे आभार मानले.