शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
3
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
7
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
8
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
9
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
10
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
11
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
12
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
13
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
14
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
15
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
16
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
17
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
18
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
19
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
20
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

‘मफतलाल’च्या कामगारांची देणी चार महिन्यांत मिळणार

By admin | Updated: May 4, 2017 05:53 IST

न्यायालयाच्या निर्णयामुळे मफतलाल कंपनीच्या कामगारांना मोठा दिलासा मिळाला आहे. कंपनीची कळव्यातील जमीन

ठाणे : न्यायालयाच्या निर्णयामुळे मफतलाल कंपनीच्या कामगारांना मोठा दिलासा मिळाला आहे. कंपनीची कळव्यातील जमीन विकण्यास न्यायालयाने मंजुरी दिली असून ही प्रक्रिया पूर्ण होऊन अंदाजे चार महिन्यांत कामगारांना त्यांची थकीत देणी मिळणार आहेत. न्यायालयाच्या या निर्णयाने कामगारांचा २८ वर्षांचा वनवास संपुष्टात येणार आहे.कळव्यातील मफतलाल कंपनी बंद पडल्यानंतर येथील ३३०० कामगार संकटात सापडले होते. कंपनी बंद झाल्यानंतर थकीत देणी रक्कम मिळावी, यासाठी कामगारांनी लढा सुरू केला. हा लढा तीव्र करण्यासाठी सहा वर्षांपूर्वी कामगारांनी संघर्ष समितीची स्थापना केली. समितीचा लढा यशस्वी होण्याच्या टप्प्यात असतानाच जिल्हा प्रशासनाने कायद्यावर बोट ठेवून कंपनीच्या १२४ पैकी ६३ एकर जमिनीचा ताबा घेतला. त्यामुळे कामगारांना त्यांच्या हक्काचा पैसा मिळण्यात अडथळा निर्माण झाला. अशा परिस्थितीत ठाण्याचे आमदार संजय केळकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे पाठपुरावा केला. त्यास यश मिळाले. मफतलाल कंपनीच्या जमीनविक्रीस परवानगी देणारे पत्र शासनाने उच्च न्यायालयात सादर केले. उच्च न्यायालयानेही जमीनविक्रीस परवानगी दिल्याने कामगारांची थकीत देणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. कंपनीच्या जमीनविक्र ीच्या प्रक्रि येस आता प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे. ही प्रक्रिया पूर्ण होण्यास जवळपास चार महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. त्यानंतर, कामगारांना सुमारे आठ ते १५ लाखांपर्यंत थकीत देणी मिळण्याचा अंदाज असल्याची माहिती आ. केळकर यांनी दिली. (प्रतिनिधी)लढा यशस्वी झाल्यानंतर आता श्रेयासाठी वाद कामगारांसाठी संघर्ष समिती गत ६ वर्षांपासून लढा देत आहे. हा लढा यशस्वी झाल्यानंतर बम्बई मजदूर युनियन या लढ्याचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप संघर्ष समितीचे पदाधिकारी किरण मोहिते आणि रवींद्र वळामे यांनी पत्रकारांशी बोलताना केला. मुंब्य्रातील नगरसेवक राजन किणे आणि आमदार संजय केळकर यांच्या सहकार्यामुळे समितीचा लढा यशस्वी झाला, असेही त्यांनी सांगितले. बम्बई मजदूर युनियनचे सचिव संजय वढावकर यांनी न्यायव्यवस्थेवर आपला पूर्ण विश्वास असल्याचे सांगितले. त्यामुळेच आम्ही कायदेशीर लढ्याकडे लक्ष केंद्रित केले होते. संघर्ष समितीने चार वर्षांत चार वेळा नेते बदलले. मजदूर युनियनने कामगारांच्या समस्येचे कधीही राजकारण केले नसल्याचे स्पष्ट करून वढावकर यांनी कामगारांच्या लढ्यास साथ दिल्याबद्दल आ. केळकरांचे आभार मानले.