शहरं
Join us  
Trending Stories
1
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
2
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
3
प्रकरण शमविले? अजित पवार दोनदा मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, पार्थ पवार 'ती' जमीन परत देण्याची शक्यता 
4
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
5
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
6
'मै हूँ ना'मध्ये असती 'ही' अभिनेत्री, शूटिंगच्या दोन आठवड्यांपूर्वी सोडलेला सिनेमा; फराह खानचा खुलासा
7
संतापजनक! लहान मुलांना कागदाच्या तुकड्यांवर दिलं मध्यान्ह भोजन, Video पाहून बसेल धक्का
8
'सोन्याची आहे की चंद्रावरून आणलीत?'; प्राडाच्या सेफ्टी पिनचा सोशल मीडियावर धुमाकूळ! किंमत किती?
9
सेन्सेक्स-निफ्टी लाल रंगात बंद! 'या' सेक्टरमध्ये सर्वाधिक घसरण, पण PSU बँकांमध्ये मोठी तेजी!
10
आता घरबसल्या पाहा 'आरपार', ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेचा रोमँटिक सिनेमा ओटीटीवर रिलीज
11
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
12
'या' सरकारी बॉन्डने ८ वर्षांत दिला तब्बल ३१६% परतावा; मॅच्युरिटीवर मिळतोय 'टॅक्स फ्री' नफा!
13
अंपायरच्या लेकीसाठी ICC नं नियम बदलला? प्रतीकाच्या गळ्यात झळकला विश्वविजेतेपदाचा 'दागिना'
14
Smartphone Hacking : व्हॉट्सअ‍ॅपवर RTOचा मेसेज आला? चुकूनही त्यावर क्लिक करू नका! नाहीतर...
15
'अमेरिका, चीन, पाकिस्तान कोणीही आपल्यावर दबाव आणू शकत नाही'; अणुचाचणीच्या चर्चेवर राजनाथ सिंह यांचं मोठं विधान
16
धक्कादायक! मुंग्यांच्या भीतीने गमावला जीव, कोणत्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे हे होतं?
17
Hanuman Upasana: दिवसाची सुरुवात 'या' मंत्राने कराल तर २१ दिवसांत फरक बघाल!
18
Indonesia: इंडोनेशियात नमाज वेळी मशिदीत स्फोट; ५० हून अधिक जण जखमी!
19
राहुल गांधींच्या ‘या’ आवडत्या शेअरची बाजारात धूम; कंपनीची एकाच दिवसात १७ हजार कोटींची कमाई
20
Typhoon Kalmaegi : खिडकीच्या काचा फुटल्या, घरं कोसळली; व्हिएतनाममध्ये कलमेगी वादळाचं थैमान, ५ जणांचा मृत्यू

भिवंडी महापालिकेतील कर्मचाऱ्यांचे धोकादायक इमारतींमध्ये वास्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2020 20:14 IST

मात्र पुढे काय हा प्रश्न अनुत्तरीतच राहत असल्याने शहरात आजपर्यंत सुमारे 782 अतिधोकादायक इमारती आजही उभ्या आहेत. 

नितीन पंडित  

भिवंडी - भिवंडी शहरातील पटेल कंपाऊंड येथे तीन मजली धोकादायक जिलानी इमारत कोसळल्याची घटना घडली असून, या दुर्घटनेत आतापर्यंत 38 जणांचा मृत्यू तर 25 जण जखमी झाले होते. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींसह राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या दुर्घटनेची दखल घेतली. मात्र भिवंडीतील अनधिकृत बांधकाम व अतिधोकादायक इमारतींमधील राहणाऱ्या निवाऱ्यासाठी कोणतेही ठोस निर्णय शासन स्तरावर घेतले जात नाही हे मोठे दुर्दैव आहे. भिवंडी मनपा प्रशासनाकडून शहरातील धोकादायक व अतिधोकादायक  इमारतींना नोटीस देण्याचा दिखावा केला जातो, मात्र पुढे काय हा प्रश्न अनुत्तरीतच राहत असल्याने शहरात आजपर्यंत सुमारे 782 अतिधोकादायक इमारती आजही उभ्या आहेत. या इमारतींमध्ये आजही जीव मुठीत धरून लोक राहत आहेत. असे असतानाच भिवंडी मनपाच्या अखत्यारीत असलेल्या व मनपाचे कर्मचारी राहत असलेल्या अनेक इमारतीदेखील धोकादायक असून, मनपाचे कर्मचारी आजही या धोकादायक इमारतींमध्ये राहत आहेत. त्यामुळे जिलानी इमारत दुर्घटनेप्रमाणे मनपाच्या कर्मचाऱ्यांची एखादी इमारत कोसळून मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र मनपा प्रशासन आपल्याच कर्मचाऱ्यांच्या जीवाशी खेळात असल्याने मनपा आयुक्त डॉ. पंकज आशिया हे आतातरी या धोकादायक इमारतींची व आपल्या कर्मचाऱ्यांच्या धोकादायक वास्तव्याची दखल घेतील का हाच प्रश्न पडला आहे. 

शहरात मनपाच्या अखत्यारीत असलेल्या कर्मचारी वसाहतींमधील अनेक इमारती आज धोकादायक आहेत. मनपाचे सुमारे 525 कर्मचारी कुटुंब या धोकादायक इमारतींमध्ये वास्तव्यास आहेत. भिवंडी महापालिकेच्या प्रभाग समिती एक ते पाचमध्ये पालिकेच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांसाठी  46 निवासस्थाने आहेत, त्यांची सध्या दुरवस्था झाली असून, सदरची निवासस्थाने ही धोकादायक स्थितीत असून पालिकेने त्यांना वारंवर नोटीस दिल्या. मात्र त्यांच्या राहण्याची सोय करण्याबाबत पर्याय शोधला नसल्याने निवासस्थाने खाली करण्यास कर्मचारी सफाई कामगार तयार नाहीत. त्यामुळे पालिका आयुक्त प्रशासन असमर्थ ठरल्याचे दिसून येते. त्यामुळे या 525 कुटुंबं जीव मुठीत घेऊन राहावे लागत आहेत. 

शहरातील संगम पाडा येथील कर्मचारी वसाहतीत सुमारे 172 कुटुंबं आहेत, कोंबड पाडा (56 कुटुंब ), पद्मनगर (72 कुटुंब ), धामणकर नाका फायरब्रिगेड (10 कुटुंब ), वाजमोहल्ला  (32 कुटुंब ), वाटर स्लपाय पद्मनगर (36 कुटुंब ), कोटारगेट आझाद गार्डन  (32 कुटुंब ), भय्या साहेब आंबेडकर नगर  (12 कुटुंब), शिवाजी नगर भाजी मार्केट (48 कुटुंब), मिल्लत नगर, कामतघर, पद्मनगर प्रेमाताई हॉल, भावना मंगल कार्यालय ताडली, फेणे गाव, शास्त्रीनगर (19 कुटुंब ), अजय नगर (10 कुटुंब ), फायर ब्रिगेड कासार आळी (8 कुटुंब) अशी सुमारे 46 निवासस्थाने पालिका कार्यक्षेत्रात कर्मचाऱ्यांसाठी आहेत. ज्यात सुमारे शेकडो कर्मचारी व अधिकारी आजही राहत आहेत. विशेष म्हणजे यातील अनेक इमारती 30 ते  40 वर्षं जुनी असून, सध्या त्यांची दुरुस्ती न झाल्याने ती दुरवस्थेत आहेत. अडगळीच्या ठिकाणी असलेल्या या घरांची व इमारतींची अनेक आयुक्त व पालिकेच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली आहे. मात्र ते दूरस्त करण्यास असमर्थ ठरल्याने या निवासस्थानाची अवस्था दयनीय आहे. विशेष म्हणजे मनपा प्रशासनाने या इमारतींवर दुरुस्तीच्या नावावर कोट्यवधींचा खर्च देखील केला आहे. मात्र तरी देखील या इमारतींची आता दुरवस्था झाली आहे. बहुतांश ठिकाणी घराचे छपरं प्लास्टर निघालेले आहेत तर काही इमारतीवर झाडे उगवली आहेत. याबाबत रहिवासी कर्मचाऱ्यांनी पालिकेच्या बांधकाम व उद्यान विभागाकडे तक्रारी केल्या आहेत. मात्र ती झाडे तोडली गेली नसल्याने इमारत कमकुवत झाली आहे, अशी माहिती कामगार संघटनेचे कामगार कर्मचारी संघर्ष कृती समितीचे महेंद्र कुंभारे, भानुदास भसाळे, श्रीपत तांबे, संतोष चव्हाण, भारत तांबे यांनी दिली आहे. विशेष म्हणजे यासंदर्भात पालिका आयुक्त व प्रशासनाकडे कृती समितीच्या वतीने वारंवार निवेदन देण्यात आली आहेत. मात्र प्रशासनाने त्याकडे मनपा प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे, अशी माहिती कृती समितीच्या सदस्यांकडून देण्यात आली आहे.