शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंना भाजपाचा मोठा धक्का; २ मोठ्या नेत्यांचा लवकरच पक्षप्रवेश होणार
2
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
3
हत्येनंतर शीर अन् धड वेगळे केले, सुटकेसमध्ये मृतदेह लपवून फरार; अखेर १६ वर्षांनी आरोपीला अटक
4
महाराष्ट्राच्या १५ हजार एकर महसूल जमिनीसह सीमेवरील १४ गावांवर तेलंगण राज्याचा ताबा !
5
भारताकडे 'रेअर अर्थ'चा ५वा सर्वात मोठा खजिना; तरीही आयातीसाठी चीनवर का अवलंबून? 'ही' आहे खरी अडचण
6
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
7
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
8
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
9
"मला पुढच्या जन्मी गोविंदा पती म्हणून नकोय...", सुनीता अहुजाचं वक्तव्य चर्चेत, म्हणाली- "हा एकच जन्म..."
10
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
11
ट्रॉलरसह आठ मच्छीमारांचे पाकिस्तानकडून अपहरण?
12
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
13
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
14
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
15
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
16
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
17
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
18
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
19
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
20
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!

उत्तन समुद्रकिनारी कचऱ्याचे साम्राज्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:23 IST

मीरा रोड : सार्वजनिक ठिकाणांच्या साफसफाईची जबाबदारी मीरा-भाईंदर महापालिकेची असताना उत्तन समुद्रकिनारी मोठ्या प्रमाणात लाटांनी वाहून आलेल्या कचऱ्याकडे महापालिकेने ...

मीरा रोड : सार्वजनिक ठिकाणांच्या साफसफाईची जबाबदारी मीरा-भाईंदर महापालिकेची असताना उत्तन समुद्रकिनारी मोठ्या प्रमाणात लाटांनी वाहून आलेल्या कचऱ्याकडे महापालिकेने दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे समुद्रकिनारी कचऱ्याचे साम्राज्य पसरले असून सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. यामुळे मच्छीमारांनी संताप व्यक्त केला आहे.

शहरातील दैनंदिन कचरा उचलणे व साफसफाईची जबाबदारी मीरा-भाईंदर महापालिकेची आहे. या कामासाठी महापालिकेने कोट्यवधींचे कंत्राट दिले आहे. सध्या मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे, जेणेकरून समुद्राच्या लाटांनी उत्तनच्या किनाऱ्यावर विविध प्रकारचा कचरा मोठ्या प्रमाणात वाहून आला आहे. किनाऱ्यावर सध्या कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे. काही दिवसांपासून कचरा किनाऱ्यावर तसाच पडून असल्याने दुर्गंधी पसरली आहे. यामुळे रोगराई पसरण्याची भीती मच्छीमारांनी व्यक्त केली आहे. समुद्रकिनारी मोठ्या प्रमाणात गोळा झालेल्या कचऱ्यामुळे मच्छीमारांना त्यांच्या दैनंदिन कामांमध्ये अडथळा होत आहे. जाळी विणणे, बोट दुरुस्ती, रंगरंगोटी आदी कामांत व्यत्यय येत असल्याचे मच्छीमारांचे म्हणणे आहे.

संपूर्ण शहराचा कचरा आणून उत्तनमध्ये पालिका टाकते. या कचऱ्याच्या बेकायदा डम्पिंगमुळे आधीच नागरिक हैराण झाले आहेत. संपूर्ण शहराचा कचरा आणून टाकणाऱ्या महापालिकेला उत्तन-पाली समुद्रकिनारी साचलेले कचऱ्याचे ढीग साफ करावेसे वाटत नाही, हे संतापजनक असल्याचे स्थानिक नगरसेविका शर्मिला बगाजी यांनी म्हटले आहे.